Thursday, 17 March 2022

गेले ते दीन गेले.

 होळी,रे holeeeeeee

पूर्वी आपल्याला कोठलाही सण यायच्या आधी जवळ जवळ महिनाभर वेद लागायचे ,हल्ली सण कधी येतात आणि जातात ते कळतच नाही.मला वाटते नुसत्या formalities आपण पुऱ्या करतो.

खरे म्हणजे आपल्या लहानपणीचा म्हणजे आपल्या पिढीचा ,लहानपण ते मॅट्रिक पर्यंतचा कालखंड म्हणजे साधारण 1975 पर्यंतचा कालखंड किंवा जास्तीत जास्त 1978 पर्यंतचा कालखंड हे खरे सुवर्ण युग होता हे मानावे लागेल.आपल्या वयातील लोकांनी अनुभवी लेला तो वेळ हा शेवटाला कालखंड होता.कारण साधारण 1980 पासून आधुनिकीकरण व्हायला सुरुवात झाली आणि जुने ते सोने म्हणायची वेळ सुरू झाली.

म्हणून आपल्या वयाची पिढी ही शेवटची पिढी ठरली.

मी त्यात आणखी भाग्यवान ठरलो कारण होळी च्या मजेशीर गोष्टी मी आवास,थळ आणि शेवटी रेवदंडा येथे anubhavilya.

होळी च्या आधी आठ दिवस रिकामे डबे शोधायचे आणि ते दगडाने चेचून चपटे करायचे आणि त्यातील गॅप मध्ये दोरी ओवून ती गळ्यात अडकवायचे आणि दिवस भर काठ्यानी कुटत बसायचे आणि रात्री होळीवर कुटत बसायचे.असे वाद्य कुठे लोप पावले ते कळले नाही......

......त्यावेळी माणुसकी होती त्यामुळे दुसऱ्याच्या वाडीतील नारळ किंवा शहाळी चोरून खाणे हा आपला जन्म सिद्ध हक्क होता.आणि चोडांची रास त्याच वाडीत ठेवून जायचे .

पण बिचारा मालक कधी पोलीस स्टेशन ला गेला नाही. काही मुले अशी असायची की स्वतःच्याच वाडीत इतर मुलांना घेवून नारळ चोरायला अथॉरिटी द्यायचे.

मी थळ ला असताना आमच्या बाजूला पारेकरांची वाडी होती,खूप मोठी जवळ जवळ 5 एकर.त्यामुळे आजूबाजूच्या दोन तीन आळीतील पोरे त्याच वाडीला टार्गेट करायचे.त्यात दोन तीन माड मोहाचे होते त्यामुळे त्या माडा ना जास्त डिमांड होता.

मालक मिश्किल आणि चांगला होता तो काही दुसऱ्या दिवशी गोंगाट करत नसे, पण एके वर्षी त्याला कोणीतरी गुरू भेटला किंवा त्याने कुठून तरी उपाय ऐकले असतील ,त्याने त्या वर्षी त्या तीन ही madana ब्लेड अर्धी करून धारदार बाजू बाहेर राहील अशी ठराविक अंतराने लावून ठेवली आणि आणि त्यावर्षी होळीच्या पहिल्याच दिवशी madawar चढणारी दोन तीन मुले सोलपटून निघाली....

आट्या पाट्या ही मी खूप खेळलो आहे.revadandyat हा खेळ जास्त नसायचा......

रेवदंडा येथे घरावरील किंवा दुकानावरील नावाच्या पाट्या बदलण्याची मजा खूप असायची.आम्ही विठोबा आळीत राहायचो तेंव्हा आमच्या घराबाहेर असलेली" वार्डे गुरुजी" ही पाटी बच्चू भाई मुकादम राहत असलेल्या त्यांच्या शेजारील रिकाम्या घराला कोणी तरी नेवून लावली होती, आणि आमच्या घराबाहेर "देशी दारूचे दुकान" ही पाटी आणून लावली होती.सकाळी घरावरून जाणारे हसत हसत जात होते पण आमच्या लक्षात येत नव्हते आणि सुमारे 9 वाजता आमच्या वडिलांच्या लक्षात समोर राहत असलेल्या चंद्रकांत पाटील(जो टॉकीज वर होता) याने आणून दिले.आम्ही जवळ जवळ दोन दिवस खूप हसत होतो....

आत्ता घरात पुरण पोळ्या वर्षातून बऱ्याच वेळा बनविल्या जातात पण त्या काळी होळी व्यतिरिक्त बनवत नसत.घरातील बायकांचे पोळ्या बनविण्याचे काम चालू असताना मध्येच जावून वाटलेले पुरण चिमटीत घेवून किंवा नुकतीच उकडून ठेवलेली (पुरण पोळी साठी) चण्याची गोड डाळीचा बकाणा मारल्या शिवाय मजा वाटत नसे.शिवाय जेवायला बसल्यावर पुरण पोळी खायची स्पर्धा असायची ती वेगळीच.आताची आपली मुले जेमतेम आर्धी पुरण पोळी खातात....

....,प्रत्येक गावात आणि प्रत्येक आळीत "होळीच्या फाका" घालण्यात हातखंडा असलेली दोन चार टारगट पोरे असायचीच.(त्या वेळी कुठली अश्लीलता वाटली नाही. ).बाकी इतर मुलं "फोदेव" म्हणून त्यांना कोरस द्यायची.. ,..

वेग वेगळी सोंगे काढून घरो घरी जावून पैसे मागणे(लोक प्रेमाने द्यायचे) आणि ते पैसे बरोबर असलेल्या सगळ्यांनी वाटून घेणे ही मजा काही औरच असायची....

.......आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी वरील पेटत असलेल्या निखाऱ्यावर आंघोळी साठी पाणी तापवून आणणे ही गावो गावची अलिखित प्रथा असायची.आणि त्यातच "करी "साठी मटण आणायला जाणे हा एक कार्यभाग असायचा......

......आपण अनुभव घेतलेल्या गमती जमती आताची पिढी मिस करतेय....

आता आपण फक्त..

" जुन्या आठवणी आठवत राहायचे....

  आठवणी काढत आठवणीत रमायचे...."

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi