Friday, 10 April 2026

कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

 कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित,

 निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेबालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षितनिरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत.

हा करार नागपूर येथील एम्सबालरोग विभागासोबत करण्यात आला असूनया अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेहजन्मजात हृदयरोगदमास्थूलतासिकलसेलमानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंधलवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणमानकीकृत उपचार पद्धतीडेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार

 

मुंबईदि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्सबालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू

 न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे या न्यायालयांसाठी जागा नसल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्यात याव्यात. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघतीलअसा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत

 महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम१९९९  अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेया कायद्याअंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावे. पोलीस स्टेशन अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतीलअशी व्यवस्था करावी. पोलीस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी १०० विशेष न्यायालये स्थापन करावी. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी.

 

मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरीव्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्त्वाने घरे उपलब्ध होतीलयाची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईलयाबाबतही यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्त्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाहीअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

 भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

 

मुंबईदि. 10 : मुंबईमध्ये नोकरीव्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश

 विनग्रुप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ म्हणाले कीआम्हाला महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडी व उद्योग विभागासोबत या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होताना आनंद आणि अभिमान वाटतो. महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश आहे. आमच्या विनग्रुप कंपनीकडे एकात्मिक शहरी विकासइलेक्ट्रिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये जागतिक अनुभव आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासपर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.

Featured post

Lakshvedhi