Thursday, 9 April 2026

आम्हाला महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडी व उद्योग विभागासोबत या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी

 विनग्रुप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ म्हणाले कीआम्हाला महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडी व उद्योग विभागासोबत या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होताना आनंद आणि अभिमान वाटतो. महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश आहे. आमच्या विनग्रुप कंपनीकडे एकात्मिक शहरी विकासइलेक्ट्रिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये जागतिक अनुभव आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासपर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.

Wednesday, 8 April 2026

राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य

 राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.


 

राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल.

 

व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना

 व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक;

उद्योग विभाग व एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिकएकात्मिक शहरी विकासाला चालना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•    व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकउद्योग विभाग व एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

 

            मुंबईदि. 8 : शाश्वत नागरी विकासऔद्योगिक व पर्यटन वृद्धीनवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकासहरित ऊर्जाआधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

विकसित महाराष्ट्र मिशन डॉक्युमेंट अंमलबजावणीच्या अनुषंगाने

  विभागाच्या प्रधान सचिव ए. शैला यांनी विकसित महाराष्ट्र मिशन डॉक्युमेंट अंमलबजावणीच्या अनुषंगाने  सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी  कृषीपदुमग्राम विकासउद्योगपर्यटननगरविकासगृहनिर्माणऊर्जा,वनेसार्वजनिक बांधकाम विभागपर्यावरणपाणी पुरवठाजलसंपदापरिवहनआरोग्यशालेय शिक्षणउच्वशिक्षणमहिला बालविकाससामाजिक न्याय विभागाचेअल्पसंख्याक विभागवित्त विभागमाहिती तंत्रज्ञान या विभागांनी सादरीकरणाद्वारे व्हीजन डॉक्युमेंटच्या नियोजनाची माहिती दिली

डॅशबोर्डद्वारे मॉनिटरिंग

 डॅशबोर्डद्वारे मॉनिटरिंग

सर्व विभागांनी आपले ॲक्शन प्लॅन वित्त विभागासोबत समन्वय साधून 30 एप्रिलपर्यंत अंतिम करावेत. पुढील काळात सर्व प्रगतीचे डायनॅमिक मॉनिटरिंग डॅशबोर्डद्वारे केले जाईल. यामुळे प्रत्येक विभागाच्या कामाची नियमित आणि पारदर्शक समीक्षा होईलअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या कामाचे समाधान व्यक्त करत,या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी हा आता पुढचा महत्वाचा  टप्पा  असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन यावेळी केले.

 

२९ एप्रिल ते १२ मे पर्यंत,*

 *🏵️ आणीबाणीचा इशारा जारी...*


*२९ एप्रिल ते १२ मे पर्यंत,*

सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणीही बाहेर (विशेषतः मोकळ्या जागांमध्ये) जाऊ नये. हवामान खात्याने सांगितले आहे की तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत वाढू शकते. जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक अस्वस्थ वाटत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वायुवीजनासाठी खोल्यांचे दरवाजे उघडे ठेवा. मोबाईल फोनचा वापर कमीत कमी करा, अति उष्णतेमुळे स्फोट होण्याचा धोका आहे. काळजी घ्या आणि ही माहिती इतरांना कळवा.


दही, ताक आणि विड्याच्या पानांचा रस यांसारखी थंड पेये भरपूर प्या.


*अतिशय महत्त्वाची माहिती:*


*नागरी संरक्षण विभाग जनतेसाठी आणि रहिवाशांसाठी खालील सूचना जारी करत आहे.*


येत्या काही दिवसांत तापमान ४७°C ते ५५°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. *म्हणून, खालील खबरदारीचे पालन करावे:*


*गाडीत ठेवू नये अशा वस्तू:*


गॅसची उपकरणे

लायटर्स

कार्बनयुक्त पेये

सुगंध आणि बॅटरी

हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा

गाडीची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका

इंधन टाकी संध्याकाळी भरा

सकाळी गाडीने प्रवास करणे टाळा

प्रवास करताना टायरमध्ये जास्त हवा भरू नका


*इतर खबरदारी:*


विंचू आणि साप थंड ठिकाणी घरात येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या

भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या

गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नका

विद्युत मीटरवर जास्त भार टाकू नका

एअर कंडिशनिंगचा वापर फक्त आवश्यक खोल्यांमध्येच करा

दर २-३ तासांनी किमान ३० मिनिटांची विश्रांती घ्या

जेव्हा बाहेरील तापमान ४५-४७°C असेल, तेव्हा एसी २४-२५°C वर सेट करा

सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळा


*शेवटी:*

*कृपया ही माहिती इतरांसोबत शेअर करा.* अनेकांना याची माहिती नसेल.* तुम्ही कदाचित हे पहिल्यांदाच वाचणाऱ्यांपैकी एक असाल.*


*हार्दिक शुभेच्छा,*

*नागरी संरक्षण विभाग*

Featured post

Lakshvedhi