भारत के संविधान की गौरवशाली अमृत महोत्सवी यात्रा के उपलक्ष्य में 26 मार्च 2025 को विधानसभा में चर्चा आयोजित की गई थी। इस चर्चा के उत्तर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा दिए गए भाषण का संकलन महाराष्ट्र विधानमंडल के वी.एस. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्र द्वारा पुस्तक के रूप में तैयार किया गया है। विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर ने बताया कि इस पुस्तक का विमोचन राज्यपाल आचार्य देवव्रत के हाथों मंगलवार, 9 दिसंबर 2025 को किया जाएगा।
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 3 December 2025
महाराष्ट्र विधानसभा का शीतकालीन अधिवेशन नागपुर में 8 से 14 दिसंबर तक •
महाराष्ट्र विधानसभा का शीतकालीन अधिवेशन नागपुर में 8 से 14 दिसंबर तक
• विधानसभा और विधान परिषद की कार्य सलाहकार समितियों की बैठक में निर्णय
मुंबई, दि 3: महाराष्ट्र विधानमंडल का शीतकालीन अधिवेशन नागपुर में सोमवार, 8 दिसंबर से रविवार, 14 दिसंबर 2025 के दौरान आयोजित किया जाएगा। कार्य सलाहकार समिति ने यह निर्णय लिया है। 13 दिसंबर (शनिवार) और 14 दिसंबर रविवार को सरकारी छुट्टी होने के बावजूद दोनों सदनों का कामकाज आयोजित किया जाएगा।
विधान भवन में विधानमंडल की कार्य सलाहकार समिति की बैठक आयोजित की गई। बैठक में विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तकनीकी शिक्षा तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशिष शेलार, विधायक—सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल; विधान परिषद सदस्य—अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील; विधानमंडल के सचिव जितेंद्र भोळे तथा संबंधित अधिकारी उपस्थित थे।
Winter Session of Maharashtra Legislature to be held in Nagpur from December 8 to 14
Winter Session of Maharashtra Legislature to be held in Nagpur from December 8 to 14
• Decision taken in the meetings of Business Advisory Committees of Assembly and Council
Mumbai, Dec 3:The Winter Session of the Maharashtra Legislature will be held in Nagpur from Monday, December 8 to Sunday, December 14, 2025. The Business Advisory Committee has decided that proceedings of both Houses will also be conducted on December 13 (Saturday) and December 14 (Sunday), despite being government holidays.
A meeting of the Legislature’s Business Advisory Committee was held at the Vidhan Bhavan. The meeting was attended by Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar, Legislative Council Deputy Chairperson Dr. Neelam Gorhe, Assembly Deputy Speaker Anna Bansode, Higher and Technical Education & Parliamentary Affairs Minister Chandrakant Patil, Revenue Minister Chandrashekhar Bawankule, Water Resources Minister Radhakrishna Vikhe-Patil, Cultural Affairs Minister Adv. Ashish Shelar, MLAs Sudhir Mungantiwar, Deepak Kesarkar, Jitendra Awhad, Bhaskar Jadhav, Sunil Prabhu, Amin Patel; MLCs Anil Parab, Prasad Lad, Praveen Darekar, Vikram Kale, Satej Patil; Legislature Secretary Jitendra Bhole and senior officials.
During the Amrit Mahotsav commemorating the glorious journey of the Constitution of India, a discussion was held in the Legislative Assembly on March 26, 2025. Responding to the discussion, Chief Minister Devendra Fadnavis delivered an important address. The Maharashtra Legislature’s V.S. Pange Parliamentary Training Centre has compiled this speech in the form of a book. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar informed that this book will be released by Governor Acharya Devvrat on Tuesday, December 9, 2025.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या
स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव
मुंबई,दि.३ : पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि विकास योजनांची जलद अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कामगिरीच्या आधारे तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर मूल्यमापन करून पुरस्कार देण्यात येणार आहेत. या योजनेचे स्वरुप स्पर्धात्मक असल्यामुळे या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयान्वये मान्यता दिली आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि प्रचारात्मक खर्चासाठी जिल्हा परिषदांना स्वनिधी (सेस फंड) अपुरा ठरत असल्याने, जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, संबंधित जिल्हा परिषदांनी हा निधी अभियानातील घटकांसाठी प्राप्त प्रस्तावांनुसार आणि शासनाने दिलेल्या वेळापत्रकातच खर्च करणे अनिवार्य राहणार आहे. अधिक पारदर्शकता आणि प्रभावी नियोजनासाठी क्षमता बांधणी, प्रशिक्षण, कार्यशाळा, यशोगाथा फिल्म, मेळावे आणि तांत्रिक सहाय्य इत्यादींसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५११०४१८१५४९६६२० असा आहे.
राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार
राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार
· विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
00000
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 3: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमांतर्गत “महापरिनिर्वाण दिनानिमित्त - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व योगदान” या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत 6, 8 आणि 9 डिसेंबर 2025 या रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने कार्यरत आहे. समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धा, जातीय-पंथीय भेदभाव, सांप्रदायिक द्वेष व असमानतेतून मुक्त करत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य आणि समतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी शासनामार्फत विविध धोरणात्मक उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर, ‘महापरिनिर्वाण दिन’ निमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी कार्य, विचारसंपदा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान या विषयावर महासंचालक श्री. वारे यांनी ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
00000
ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पइंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार
ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा
या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई–पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्यांनाही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील भूमिगत वाहतूक व्यवस्थेचा हा मोठा प्रयोग असून फ्लायओव्हर, कोस्टल बोगदा, आणि आता भूमिगत बोगदा या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचे खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाची माहिती
Ø मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.
Ø प्रकल्पाचा खर्चः रु ८०५६ कोटी
Ø पूर्णत्वाचा कालावधीः ५४ महिने
प्रकल्पाचे मुख्य फायदे
Ø मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.
Ø प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.
Ø इंधनाची बचत होईल.
Ø तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
प्रकल्प तपशील
Ø हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या ५० मी. खालून जातो.
Ø प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी , ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग .
Ø प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता . दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग ८० किमी/तास .
Ø दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.
Ø बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.
Ø प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.
Ø सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.
बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान
Ø या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.
Ø हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)
Ø प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (ओईएम) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.
Ø कटर हेड व्यासः १२.१९ मीटर
Ø लांबी: ८२ मीटर
Ø वजनः अंदाजे २, ४०० मेट्रिक टन.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...