Thursday, 13 November 2025

कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

 कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत

सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ताकायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या  बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले, बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी  बँकेच्या ज्या मालमत्तासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत यासंदर्भात देखील सहकार विभागाने आवश्यक तो पाठपुरावा करावा. एमपीआयडी यांच्याकडील विषयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात यावा.

०००००

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचाhttps://patsansthaniyamakmandal.in/

 महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईदि.११:- महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळपुणे यांच्या 'मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (https://patsansthaniyamakmandal.in/या संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सहकार मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या कार्यक्रमास  सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेया व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे सहकारी पतसंस्थांची माहिती, सहकारी संस्थामार्फत होणारा व्यवहारकर्जठेवी यांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व बाबीवर सहकार विभागास देखरेख करणे सोयीचे होणार आहे. विभागाने माहिती प्रणाली अधिकाधिक अद्ययावत करावी. या प्रणालीवर सर्व सहकारी पतसंस्थांची माहिती विहित कालावधीत भरावी यासाठीही प्रयत्न केले जावेत. भरलेली माहिती डॅशबोर्डवर पाहता यावीअशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

 जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

-मंत्री गिरीश महाजन

हा सन्मान राज्यातील पाणी संवर्धन उपक्रमांना नवी ऊर्जा देणारा ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या विकासकामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर लागली आहे असे जलसंपदा (विदर्भतापीकोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

 जलसंपदा विभागाच्या कामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर

-मंत्री गिरीश महाजन

हा सन्मान राज्यातील पाणी संवर्धन उपक्रमांना नवी ऊर्जा देणारा ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या विकासकामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर लागली आहे असे जलसंपदा (विदर्भतापीकोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

राज्याच्या जलसंपदा विभागाला मिळालेल्या पुरस्कारामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाला अधिक गती

 राज्याच्या जलसंपदा विभागाला मिळालेल्या पुरस्कारामुळे

दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाला अधिक गती

-मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

जलसंपदामध्ये राज्याला संपन्न करण्यासाठीच्या प्रयत्नांना यामुळे नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.   मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यातील जलसंपदा विभागाने राबविलेल्या जलसंवर्धनसिंचन आणि जलव्यवस्थापनातील नवकल्पनांना आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाला अधिक गती मिळेलअसा विश्वास जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

Wednesday, 12 November 2025

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

 राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

मुंबईदि ११:-  केंद्रीय जलशक्ती मंत्रालय,  जल संसाधननदी विकास व गंगा संरक्षण विभागयांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये महाराष्ट्रराज्याने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्रराज्याला जाहीर झाला आहे.

या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकने सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहेतर कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थानाशिक यांनी सर्वोत्कृष्ट जल/पाणी वापर संस्था  या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांन्ता राव यांनी  राज्याचे मुख्य सचिव  राजेशकुमार यांना  पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडणार असूनराज्याला ट्रॉफीप्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्याच्या जलसंधारणजलव्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा (तापी विदर्भ व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजनआणि जलसंपदा (गोदावरी व मराठवाडा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला आयोजन

 भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन

·         सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला आयोजन

 

नवी दिल्ली 12 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025चे 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वा.  उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

 या कार्यक्रमासउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगनमहाराष्ट्र सदन सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमलाविकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र कुशवाहमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ उपाध्यक्ष जयदीप कवाडेव्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्यावतीने हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र दालनात एकूण 60 गाळे उभारण्यात आले असून एक जिल्हा एक उत्पादनमहिला बचत गटमहिला उद्योजिकायांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.  

Featured post

Lakshvedhi