Sunday, 9 November 2025

Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

 Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

Mumbai, November 8: To ensure the digital safety of over 1.2 billion telecom subscribers in India, particularly mobile users, the Department of Telecommunications (DoT) has launched a citizen-centric initiative called “Sanchar Saathi.” Introduced in May 2023, this digital platform provides mobile users with greater control over their connections, protection against fraud, and a convenient mechanism to report security threats.

Vinay Jambhali, Director, Mumbai LSA Telecom Department, and Sumnesh Joshi, Deputy Director General (DDG), appealed to citizens across Maharashtra to remain alert and responsible regarding cyber safety.

Citizens are advised to remove unnecessary apps from their mobile devices, keep their phones updated with the latest security software, and download the ‘Sanchar Saathi’ app to benefit from its user-friendly and protective features.

Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen

 Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector


Mumbai, November 8: To ensure the digital safety of over 1.2 billion telecom subscribers in India, particularly mobile users, the Department of Telecommunications (DoT) has launched a citizen-centric initiative called “Sanchar Saathi.” Introduced in May 2023, this digital platform provides mobile users with greater control over their connections, protection against fraud, and a convenient mechanism to report security threats.


Vinay Jambhali, Director, Mumbai LSA Telecom Department, and Sumnesh Joshi, Deputy Director General (DDG), appealed to citizens across Maharashtra to remain alert and responsible regarding cyber safety.


Citizens are advised to remove unnecessary apps from their mobile devices, keep their phones updated with the latest security software, and download the ‘Sanchar Saathi’ app to benefit from its user-friendly and protective features.

शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु,25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025https://mahaelection.gov.in/Citizen/Login,

 33

शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

 

मुंबईदि. 8 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणेनागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघतसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

 

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच 6 नोव्हेंबर नंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल.

 

10 डिसेंबर, 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर, 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

 

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेतअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकषआवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील Manual या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावीअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 

मुंबईदि. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावीअशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली होती. महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणीविनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा

 एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असतानातंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेलअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवीअभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

  

सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कार भारतीची अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभा

 

नागपूरदि.8 : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्रभारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजलीकारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या  अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथेझाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथविदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

 राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

संचार साथी पोर्टलद्वारे परदेशी क्रमांक भारतीय (+91) क्रमांक म्हणून दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशा तक्रारींवर दूरसंचार विभाग आणि पोलिस यांच्यातील समन्वयातून तातडीने तपास व कारवाई करण्यात येते आणि संबंधित फसवणूक नेटवर्क निष्क्रिय केले जातात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते.

नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक 1963 वर माहिती द्यावी.

Featured post

Lakshvedhi