Tuesday, 12 August 2025

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकर

 गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण

 नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका,

 गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयाचा गैरवापर

 स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणेधमक्या देणेहेट स्पीचफेक न्यूजअंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात.  त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टी' प्रणाली विकसित pl share

 सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टीप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रस्ताविक केले. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यक्रमापूर्वी गरुड दृष्टि बाबत सादरीकरण केले. सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत;

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 

मुंबईदि. 11 : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेअसे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेबीड- अजित आशाताई अनंतराव पवारनागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळेअहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे - पाटीलगोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळसांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटीलनाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजनपालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकजळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटीलअमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसेयवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोडरत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंतधुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावलजालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडेनांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावेचंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईकेसातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाईमुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलारवाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणेरायगड- कु.आदिती वरदा सुनिल तटकरेलातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसलेनंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटेसोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरेहिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळभंडारा- संजय सुशिला वामन सावकारेछत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाटधाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईकबुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणेअकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकरकोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकरगडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वालवर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी- श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर.

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालयकोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्तकोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावेअसेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत

 शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत

- मंत्री मंगलप्रभात लोढा

जनता दरबारात महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

 

मुंबईदि. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी केली.

यासंदर्भात कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनाही पत्र लिहिले आहे. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधण्याच्या निर्देशांनुसार कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातील एफ उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत तक्रारी मांडल्या. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी करतात, कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

या अडचणींची कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त श्री.अरुण क्षीरसागर यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

सायन-कोळीवाडा मतदारसंघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठावीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार श्री. तमिळ सेल्वन यांनी त्यांच्या मतदारसंघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले.

Featured post

Lakshvedhi