Thursday, 7 August 2025

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे

 अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे...

 

   - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

 मुंबईदि ६ : रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धाअवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणंहे मोठं पुण्याईच काम आहे. लोकांचे प्रबोधन करून अवयवदान चळवळ अधिक गतिमानव्यापक लोकचळवळ करूया असे आवाहन सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब  कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

            केईएम हॉस्पिटलच्या सभागृहात (आरओटीटी ओ- एसओटीटीओ) संस्थेच्या वतीने जागतिक अवयवदान पंधरवडा निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टररुग्णालयेसेवाभावी संस्था तसेच अवयव रोपण केल्यानंतर विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्यातसेच आरओटीटीओ- एसओटीटीओ मॉडेलचे मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            लोकांच्या मनात अवयवदानाबद्दल अकारण भीती असतेअशीच भिती पूर्वी रक्तदानाबद्दल होती. आता रक्तदान सर्वत्र केले जाते. अवयवदानाबद्दल असलेली भिती व गैरसमज सुद्धा दूर करून अवयवदान ही लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व पातळीवरून लोकाचे प्रबोधनजनजागृती केली पाहिजे. प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करून किडनीडोळेहृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लोकांना आपण नवजीवन देवूयाअसे आवाहन मंत्री.श्री.आबिटकर यांनी केले. 

अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणारे झीटीसीसी(आरओटीटी ओ- एसओटीटीओ)विविध रुग्णालयेतज्ज्ञ डॉक्टरसेवाभावी संस्था यांचे कार्य उत्तम असून येत्या वर्षभरात अवयवदानाची प्रतीक्षा यादी कमी व्हावीअशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवारकेईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावतआरओटीटी ओ- एसओटीटीओ चे संचालक आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालयसायन रुग्णालयनायरबी.जे. मेडिकल कॉलेजकमांड हॉस्पिटल पुणेइंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूरएआयआय एमएस नागपूरडी.वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे तसेचरी-बर्थ फाऊंडेशनलिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.

अवयवदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित (एचएन रिलायन्स हॉस्पिटल) आणि डॉ. सुजाता पटवर्धन (केईमयांना बेस्ट एनटीआरसी ॲवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी

  

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. 6 : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असूनसरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडेतसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, "राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणेग्रामस्वच्छतासुंदर शाळा उभारणीमहिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणेसौर ऊर्जेचा वापरमहिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा."

तसेचमहा-ई-सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवा व दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी 30 टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातोत्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासकामे करावीतअसेही श्री. गोरे यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई येथे सर्वसुविधायुक्त सरपंच भवन उभारणेयासह विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष शत्रुघ्न धनवडेप्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीसकोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटीलतसेच महिला सरपंच उपस्थित होते.

सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा

 सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा

-         सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. 6 : सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रशस्त स्मारकाच्या निर्मितीसाठी जलसंपदा विभागाकडील जमीन ताब्यात घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीस माजी आमदार दिलीप येळगावकरसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री. बागुलसमाज कल्याण आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त शितल सोनटक्केसातारा सहायक आयुक्त सुनील जाधव उपस्थित होतेतर दूरदृष्यप्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

     सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सुभेदार रामजी आंबेडकर ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामावेळी देखरेखीसाठी होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी या ठिकाणी हे स्मारक पूर्णत्वास आल्यास सुभेदार रामजी आंबेडकर यांचे हे पहिलेच स्मारक असेल. चांगल्या वास्तुविषारदांकडून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा.

स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेने स्विकारावी. यासंदर्भात  ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा. सर्व नियमांनुसार बाबी पूर्ण करून प्रस्ताव सादर करावाअसे निर्देशही श्रीमती मिसाळ यांनी दिले.

००००

लेझिम, फुगडी, लगोरी, विटी-दांडूसह पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव

 लेझिम, फुगडी, लगोरी, विटी-दांडूसह पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत

खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

 

मुंबईदि.७: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचेआयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातमुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवाही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देणे गरजेचे असल्याचेही श्री.लोढा यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान देश विसरू शकत नाही. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहितीही कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी दिली. 

पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडीखो-खोलगोरीलेझीमरस्सीखेच,मल्लखांबपावनखिंड दौडकुस्ती, पंजा लढवणेविटी-दांडू, दोरीच्या उड्याफुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तसेच विविध शाळा,आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही श्री.लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला इथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा भारतीकडून करण्यात आले आहे.

खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात -

 खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबई, दि.6 : खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यात सातत्य राखण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार घेतल्यानंतर क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिवश्री. अनिल डिग्गीकर,आयुक्त शीतल तेली-उगलेउपसचिव सुनील पांढरेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक संजय सबनीसउपसंचालक उदय जोशीउपसंचालक माणिक पाटीलशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अशोक दमय्यावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले कीशालेय स्तरावरच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यावे. अद्ययावत क्रीडा सुविधाप्रशिक्षकस्पर्धांची संधी यांची पूर्तता करावी. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे खेळाडू शासनाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना विविध क्रीडा स्पर्धांतील यशानंतर बक्षीस प्राप्त करण्यास परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

 

जास्तीत जास्त प्रशिक्षक निर्माण व्हावेत, जेणेकरून गुणवत्ताधारक खेळाडू वाढतील. प्रशिक्षकांसाठी नव्या योजना तयार कराव्यात. खेळाडूंना शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणासंदर्भात पारदर्शक प्रणाली राबविण्यासाठी समन्वयाने काम करावे, जेणेकरून खेळाडूंवर अन्याय होणार नाही. युवकांच्या कल्याण संदर्भातील योजना राबविण्याबाबत युवकांकडून जास्तीत जास्त सूचना मागवून त्यावर सकारात्मक विचार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

 

राज्यात एकूण 162 क्रीडा संकुल पूर्ण असून138 क्रीडा संकुल प्रगतीपथावर आहेत.इतर ठिकाणी क्रीडा संकुल अद्ययावत सुविधांसह पूर्ण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी सादरीकरणात देण्यात आली.  एकूण 8 निवासी व एक अनिवासी क्रीडा प्रबोधिनी कार्यान्वित17 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते19 वर्षापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंची निवड करण्यात येतेसद्यस्थिती त एकूण 348 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणारे आहेत. तसेच युवक कल्याण उपक्रम अंतर्गत युवा पुरस्कारयुवा वसती गृहयुवा प्रशिक्षण शिबीरयुवा विकास निधीयुवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजनयुवा प्रशिक्षण केंद्राची स्थापनाजिल्हास्तर युवक कल्याणसमाजसेवा शिबीर आयोजन अशा विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 – अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 6 : अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

अल्पसंख्याक व औकाफ विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुलेजैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधीविभागाचे सचिव रूचेश जयवंशीआयुक्त प्रतिभा इंगळेउपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे म्हणाले कीअल्पसंख्याक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच शैक्षणिकसामाजिकआर्थिककौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सध्या राज्यात २६ ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे कार्यरत असून तीन ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर आहे. नव्याने एका वसतीगृहास मान्यता देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी मराठी फाउंडेशन वर्गही सुरू करण्यात आले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या केंद्रांमध्ये प्रत्येकी १० अनिवासी महिला उमेदवारांना दरमहा चार हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहारभत्ता दिला जातो.

छत्रपती संभाजीनगरनागपूर आणि अमरावती विभागातील १५ जिल्ह्यांमध्ये एकूण २८०० महिला बचतगट तयार केले जाणार असूनया महिलांना कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण खासगी संस्थेमार्फत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य अल्पसंख्याक आयोगराज्य उर्दू अकादमीराज्य हज समितीराज्य वक्फ बोर्डजैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळराज्य पंजाबी साहित्य अकादमी यांच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आली. योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा

 प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा

-मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी

 

नवी दिल्लीदि.6  :- पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी केली. याबाबतचे मागणी पत्रही केंद्रीय मंत्री श्री.पाटील यांना दिले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

 

प्रकाशा-बुराई योजना ही नंदुरबार तालुक्यासह साक्री व शिंदखेडा तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही योजना पूर्ण झाल्यावर सुमारे 7,085 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. राज्य शासनाने योजनेला 793 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असूनकाम संथ गतीने सुरू आहे. केंद्र सरकारच्या सहाय्य पात्र योजनेत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास कामाला गती मिळेल आणि या भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटेल. तसेच यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. रोजगाराच्या संधी ही वाढतील,असा विश्वास मंत्री श्री.रावल यांनी व्यक्त केला.

 

या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी बारमाही होऊन माथा ते पायथा नदी टप्प्यात येणारी सर्वच शेत जमीन सिंचनाखाली येईल. बागायती शेती झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे ही योजना केंद्र सरकारच्या साहाय्य पात्र योजनेमध्ये समाविष्ट करावीअशी मागणी मंत्री श्री. रावल यांनी यावेळी केली.

 

Featured post

Lakshvedhi