Saturday, 12 July 2025

मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी क्षेत्र का चमत्कारमुख्यमंत्री द्वारा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे पर ‘

 मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी क्षेत्र का चमत्कार

– मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस

मुख्यमंत्री द्वारा मुंबईपुणे एक्सप्रेसवे पर मिसिंग लिंक’ परियोजना का निरीक्षण

पुणे, 12 जुलाई – यशवंतराव चव्हाण मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग पर मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी चमत्कार है। मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस ने कहा कि इस परियोजना में देश की सबसे लंबी सुरंग हैऔर इसके पूरा होने पर पुणेमुंबई की यात्रा का समय आधे घंटे से कम हो जाएगा।

मुख्यमंत्री यह बात मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग पर मिसिंग लिंक’ परियोजना का निरीक्षण करने के बाद कह रहे थे। इस मौके पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांसद श्रीरंग बारणेपूर्व विधायक बाला भेगड़ेनगर विकास विभाग की प्रधान सचिव मनीषा म्हैसकरपुणे के विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीमहाराष्ट्र राज्य सड़क विकास महामंडल के उपाध्यक्ष व प्रबंध निदेशक अनिलकुमार गायकवाडपुणे के जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डीरायगड के जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड जिल्हा परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेअतिरिक्त प्रबंध निदेशक मनुज जिंदलमुख्य अभियंता राजेश पाटीलअधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री फड़नवीस ने कहा कि मुंबईपुणे हाईवे पर मिसिंग लिंक’ परियोजना से दूरी कम होगीजिससे यात्रियों को लाभ मिलेगा। घाट वाला हिस्सा टल जाएगाऔर यह परियोजना पूरा होने पर एक सुविधाजनक यात्रा मुहैया कराएगी। इस परियोजना में कुल तीन सुरंगें हैंजिनमें से एक 9किमी लंबी और 23मी चौड़ी हैजो देश की सबसे लंबी सुरंग होगी और समृद्धि हाईवे की सुरंग का रिकॉर्ड तोड़ देगी। अत्यधिक ऊँचाई का एक पुल भी बनाया जा रहा हैजिसकी ऊँचाई 185मीटर होगीजो देश में अब तक का सबसे ऊँचा पुल होगा। मुख्यमंत्री ने कहा कि यह भी एक अभूतपूर्व उपलब्धि होगी।

महाराष्ट्र राज्य सड़क विकास महामंडल द्वारा इस प्रोजेक्ट का कार्य बहुत अच्छी गुणवत्ता से किया जा रहा है। उन्होंने बताया कि 94 प्रतिशत कार्य पूरा हो चुका है और शीघ्र ही शेष कार्य भी पूरा कर लिया जाएगा। उन्होंने प्रतिकूल परिस्थितियों में कार्य कर रहे अभियंताओं व मजदूरों की प्रशंसा की।

उपमुख्यमंत्री शिंदे ने कहा कि मिसिंग लिंक’ परियोजना अत्याधुनिक तकनीक का इस्तेमाल करते हुए बन रही हैऔर यह परियोजना गेम‑चेंजर साबित होगी। यहां की वातावरणीय और वायुदाब की स्थिति को देखते हुए कई अभियंता बेहद कठिन परिस्थितियों में कार्य कर रहे हैं। परियोजना शुरू होने के बाद मुंबईपुणे यात्रा का समय आधे घंटे तक कम हो जाएगाघाट क्षेत्र में यातायात की समस्या हल होगीऔर दुर्घटनाएं टलेंगी। इस परियोजना से ईंधन की बचत होगीप्रदूषण घटेगाऔर देश एवं महाराष्ट्र के विकास को गति मिलेगीजिससे आम जनता को भी राहत मिलेगी। इस अवसर पर प्रबंध निदेशक गायकवाड ने प्रोजेक्ट की जानकारी दी।

 

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई – पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी

 मुख्यमंत्र्यांकडून मुंबई – पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी

 पुणे दि.12 - यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंकप्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंकप्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार श्रीरंग बारणेमाजी आमदार बाळा भेगडेनगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेसह व्यवस्थापकीय संचालक  मनुज जिंदलराजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोटअधीक्षक अभियंता  राहुल वसईकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब व 23 मीटर रुंदचा असून देशातल्या सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची 185 मीटर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण 94 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीमिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असूनहा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच  इंधनाचीही बचत होईलप्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व  राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्री गायकवाड यांनी  प्रकल्पाविषयी माहिती दिली.

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळेवारकऱ्याचे वाचले प्राणअधिक माहितीसाठी टोल-फ्री क्र. / निशुल्क दूरध्वनी क्र १४५५५/१८०० १११ ५६५ व १५५ ३८८/१८००

 आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळेवारकऱ्याचे वाचले प्राण

 योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्र. / निशुल्क दूरध्वनी क्र १४५५५/१८०० १११ ५६५ व १५५ ३८८/१८०० २३३२ २०० आणि https://www.jeevandayee.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी

मुंबईदि. 7 : आषाढी वारीसाठी नांदेडहून आलेले वारकरी बालाजी संगेकर (वय 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीदरम्यान तब्येत खालावल्याने तातडीने त्यांना पंढरपूर येथील डॉ.काने हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आणि तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

उपचाराचा खर्च मोठा असल्याने श्री.संगेकर यांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ETI (Emergency Tertiary Intervention) सेवा मिळाल्यामुळे संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा न पडता वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचवता आले.

महाराष्ट्र शासनाने सर्वाना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी एकत्रित योजना राबवली आहे. या योजनेतून शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. या योजनेमुळे 1356 आजारांवर उपचार करण्यात येत असून आपत्कालीन सेवा (ETI) अंतर्गत तातडीचा लाभ मिळतो. त्याचबरोबर राज्यभरातील 2000 हून अधिक अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा मिळते.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्र. / निशुल्क दूरध्वनी क्र १४५५५/१८०० १११ ५६५ व १५५ ३८८/१८०० २३३२ २०० आणि https://www.jeevandayee.gov.in या वेबसाईटला भेट द्यावीअसे राज्य आरोग्य हमी सोसायटीने कळविले आहे.

प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ

 प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून

१० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ

- अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबईदि. ७ : राज्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला असून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सध्या १,८६,०१३ शिधापत्रिकांवर ७,७७,४५७ लाभार्थी आहेततर अंत्योदय अन्न योजनेत ६६,७३४ शिधापत्रिकांवर २,४८,९१६ लाभार्थी लाभ घेत असल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 याबाबत सदस्य देवराव भोंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नाना पटोलेप्रशांत ठाकूर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

अन्ननागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणालेधान्य वितरणाची प्रक्रिया ई-पॉस (e-PoS) मशीनद्वारे पार पाडली जात असूनअधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार मे महिन्यातील वितरण प्रक्रियेमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेचकेंद्र शासनाच्या योजनेंतर्गत कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे तिथे  व्हिटॅमिनयुक्त (फोर्टिफाइड) तांदूळ पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील गरजू व गरिबांना वेळेवर आणि योग्य दर्जाचे अन्नधान्य मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असूनया योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार

 कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार

- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. 7 : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी  कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून  फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले फ़ुलशेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान,काढणीपश्चात प्रशिक्षणहरितगृहातील आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात  फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र बाजारात कृत्रिम फुले येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासह पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच   बैठक घेऊन यावर नियंत्रणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री. गोगावले यांनी यावेळी सांगितले.

सदस्य कैलास पाटील(घाडगे)नारायण कुचे यांनी या लक्षवेधीमध्ये सहभाग घेतला.

0000

भरती प्रक्रियेतील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

 भरती प्रक्रियेतील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

-         मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. ७ : जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्नपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नाना पटोलेवरूण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणालेबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ११ दिव्यांग उमेदवारांची नायर हॉस्पिटल येथे पुनर्पडताळणी करण्यात आली. यामध्ये २ उमेदवारांचे दिव्यांगत्व प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. नाशिक महानगरपालिकेत भरती करण्यात आलेल्या हिंदी आणि उर्दू माध्यमातील दोन शिक्षकांकडे मात्र वैध दिव्यांग युनिक आयडी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. उमेदवारांची प्रवर्गानुसार कागदपत्र पडताळणी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जात असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील -

 अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी

 आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील

-         सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि.7 :- अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी अपेक्षित निधी मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेयासाठी निधीची मागणी पुरवणी मागणीतून पूर्ण करण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले कीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य विभागाचे एक महत्त्वाचे केंद्र असूनकॅथलॅबचे काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. हॉस्पिटलमधील ऑपरेटिव्ह डॉक्टर्सच्या मानधनवाढीबाबत सदस्य विक्रम काळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले कीत्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असूनविभागाच्या नियमांनुसार त्याला मान्यता देण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील निधीच्या वितरणात अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीया योजनेमधून शासकीय रुग्णालयांना सध्या फक्त 12 टक्के निधी मिळतो. त्यामध्ये वाढ होऊन 50 टक्के पेक्षा जास्त निधी मिळावायासाठी नव्या धोरणावर काम सुरू असूनते लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले कीमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे घेणे हा गंभीर प्रकार असून यावर तत्काळ चौकशी सुरू करण्यात येईल.

Featured post

Lakshvedhi