Tuesday, 10 June 2025

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे 'स्टॉकहोम कॉन्फरन्स'मध्ये उद्या भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे

'स्टॉकहोम कॉन्फरन्स'मध्ये उद्या भाषण

स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

 

मुंबईदि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral Integrity) या आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. ही परिषद 10 ते 12 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तेथे ज्ञानेश कुमार यांनी स्वीडनमधील भारतीय प्रवासी समुदायासोबत मनमोकळा व संस्मरणीय संवाद साधला.

या संवादादरम्यान त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाच्या समावेशात्मक सहभाग आणि नागरिक सजगतेवरील भर दिला. विशेषत: परदेशस्थित भारतीय (NRIs) आणि प्रवासी भारतीय नागरिक (OCIs) यांच्यासाठी आयोगाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यात ऑनलाइन मतदार नोंदणी प्रणाली (Online Voter Registration System) व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतपत्रक व्यवस्थापन प्रणाली (Electronic Transmission of Postal Ballot Management System) सारख्या उपक्रमांचा समावेश आहेजे परदेशस्थित मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास सुलभ करतात.

            भारताच्या निवडणूक व्यवस्थापनातील नेतृत्वाची दखल घेत उद्या सुरू होणाऱ्या परिषदेमध्ये ज्ञानेश कुमार यांना उद्घाटनपर कीनोट भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय निवडणुकांचा व्यापक व्यापप्रचंड लॉजिस्टिक यंत्रणा व त्यातील व्यवस्थापन प्रणाली अनेक देशांच्या निवडणूक संस्थांना आकर्षित करत असते. सुमारे 50 देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत. ही परिषद इंटरनॅशनल आयडिया (लोकशाही आणि निवडणूक सहाय्य (International Institute for Democracy and Electoral Assistance) या संस्थेद्वारेस्वीडन परराष्ट्र मंत्रालयस्वीडिश निवडणूक प्राधिकरण आणि ऑस्ट्रेलियन निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

परिषदेच्या पूर्वसंध्येला आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडिया (International IDEA) चे महासचिव केविन कॅसस-झमोरा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडमनेदरलँड्सफ्रान्सदक्षिण आफ्रिकाइंडोनेशियामेक्सिकोमंगोलियाआणि स्वित्झर्लंड यांच्यासह सुमारे 20 देशांच्या निवडणूक आयुक्तांशी द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. या भेटी भारताच्या जागतिक लोकशाही सहकार्य आणि उत्तम सरावांच्या देवाण-घेवाणीत योगदान करतील.

या दौऱ्यात ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडियाच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या संचालिका श्रीमती लीना रिक्किला तमंगनामिबियाच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा डॉ.एल्सी टी. न्गिकेंबुआआणि मॉरिशसचे निवडणूक आयुक्त अब्दूल रहमान मोहम्मद इर्फान यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत.

ही स्टॉकहोम परिषद निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकतेसमोरील सध्याच्या आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील निवडणूक संस्थांचे प्रमुखधोरणकर्ते आणि संस्थात्मक नेते यांना एकत्र आणते. डिजिटल गोंधळदिशाभूल करणारी माहितीनिवडणूक सुरक्षेची चिंताहवामानाशी संबंधित जोखमीआणि निवडणुकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर चर्चेला या परिषदेत महत्त्व आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने इंटरनॅशनल आयडिया सोबत दीर्घकाळाचे सहकार्य राखले आहे. भारताचे निवडणूक आयोग व भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था (India International Institute of Democracy and Electoral Management) मार्फत जागतिक स्तरावर लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनातील नवोपक्रमांचे नेतृत्व भारत करत आहे.

या दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये आयआयआयडीइएम (IIIDEM) चे महासंचालक राकेश वर्माकायदा विभागाचे उपमहासंचालक विजय कुमार पांडेयआणि मुख्य सचिव राहुल शर्मा यांचा समावेश आहे.

0000

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन प्रशिक्षण सत्राचे आयोजन,pl share

 सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 

मुंबईदि. ६ :  सागरी मत्स्यव्यवसायनौकानयनसागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचलन याविषयी प्रशिक्षण सत्राचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे दि. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषे खालील प्रशिक्षणार्थींसाठी १०० रुपये आणि दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींसाठी ४५० रुपये प्रतिमहिना शुल्क आकारण्यात येते. या प्रशिक्षणासाठी दि. २० जून २०२५ रोजी पर्यंत अर्ज करता येणार आहे.

            प्रशिक्षणासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :- प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सदृढ असावात्याचे वय १८ ते ३५ दरम्यान असावेपोहता येणे आवश्यक आहे. शिक्षण किमान चौथी पास असावेमासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभवप्रशिक्षणार्थी बायोमेट्रीक कार्ड/ आधारकार्ड धारक असावाविहित नमुन्यातील अर्ज असावा व त्यासोबत मच्छिमार संस्थेची शिफारस असावी. दारिद्र्य रेषे खालील प्रशिक्षणार्थींनी त्याबाबतचे गट विकास अधिकारी यांच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

            प्रशिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दि. २० जून २०२५ रोजी पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मच्छिमार संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडूरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई – ६१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी सचिन भालेरावमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी मो.नं. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशकमो.नं. 7507988552 यांच्याकडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

0000

परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा

 परिवहन महामंडळा’च्या जागांचा पीपीपी’ पद्धतीने

विकास करून उत्पन्न वाढवा

-         परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावेअशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

            एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) श्री.दिनेश महाजनवास्तुविषारद श्री. लहीवाल आदी उपस्थित होते.

            परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘एसटी’च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थितीव्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरीनिमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानकआगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामांबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देवून तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प

 उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला असून ४० प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या २१२ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला असून २०२५-२६ मध्ये ४०० शाळांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सक्षम कार्यक्रमामार्फत २५०० हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या१५०० प्रोटोटाइप तयार झालेतर ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची विक्री केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल दिसून आला असून५०० शिक्षकांना उद्योजकतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.


नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायालावाढ करण्यासाठी सक्षम

 नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायाला आकार देऊन त्याची वाढ करण्यासाठी राज्यात योग्य वातावरण आपण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख युवा मनुष्यबळ दाखल होत असल्याने त्यांच्या हातांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी सक्षम’ सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रोत्साहन अधिक उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्य शासनाच्या यंत्रणास्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून सक्षम’ सारखे कार्यक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविल्यास शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेचा पाया रुजवण्याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

 शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी

सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी

मुंबईदि. : युवकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गत दोन वर्षांत नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात शासकीय व अनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या’ माध्यमातून सक्षम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्यमशील मानसिकता विकास कार्यक्रम प्रभावी ठरल्याचे निष्पन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. उद्यम लर्निंग फाउंडेशन ही मेकिन महेश्वरी यांनी ना-नफा तत्वावर स्थापन केलेली संस्था असून 14 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पाधारित शिक्षणातून उद्यमशील मानसिकता व कौशल्ये विकसित करणे तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून देणे ही या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सक्षम’ कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित केली होती.

विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलताआत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यास हा कार्यक्रम मदत करणार असून या माध्यमातून राज्यातील 17 हजार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत १२ राज्यांतील सरकारी शाळामहाविद्यालयआयटीआय संस्थांमध्ये २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना उद्योजकीय शिक्षण दिले आहे.

2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार

 2030 पर्यंत 52 टक्के वीज  अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार

            सौर ऊर्जा निर्मितीसाठी येणाऱ्या समस्या दूर करण्याला प्राधान्य देत असल्याने वेगाने काम होत आहे. नुकताच रशियाच्या शासकीय कंपनीसोबत थोरियमपासून ऊर्जा निर्मितीत करार करण्यात आला असून हा करार भारतासाठी ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलणारा ठरेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे पर्यावरणाचा विनाश थांबविता येईल आणि 2030 पर्यंत 50 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल. 2030 पर्यंत राज्यात 52 टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

       मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी अन्य मान्यवरांसह अपारंपरिक उर्जेसंदर्भातील प्रदर्शनाला भेट दिली. सुरवातीला त्यांच्या हस्ते महाऊर्जा कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 

Featured post

Lakshvedhi