Sunday, 18 May 2025

एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा जुना प्रश्न भारत निवडणूक आयोगाने सोडवला ,pl share

 एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा जुना प्रश्न

भारत निवडणूक आयोगाने सोडवला

 

मुंबईदि. 13 : निवडणूक यादी निर्दोष व अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नांतर्गतभारत निवडणूक आयोगाने (ECI) जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकसारख्या मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांकांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला आहे. 2005 पासून वेगवेगळ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) वापरलेल्या एकसारख्या मालिकेमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता आणि खरे मतदार एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह नोंदवले गेले होते.

या दीर्घकालीन समस्येच्या समाधानासाठी देशभरातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी (CEOs) आणि 4,123 विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक नोंदणी अधिकारी (EROs) यांनी 10.50 लाख मतदान केंद्रांवरील 99 कोटींपेक्षा जास्त मतदारांची संपूर्ण निवडणूक माहिती तपासली. सरासरी दर चार मतदान केंद्रांमागे केवळ एक अशा प्रकारचा मतदार ओळख पत्र क्रमांक (EPIC) आढळला. क्षेत्रीय पडताळणी दरम्यानअसे सर्व मतदार खरे असून ते वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. अशा सर्व मतदारांना नव्या क्रमांकांसह नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) कार्डे वितरित करण्यात आली आहेत.

या समस्येचे मूळ 2005 पासून दिसून येतेजेव्हा वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वतंत्रपणे विधानसभा मतदारसंघानुसार मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या (EPIC) मालिका वापरल्या. 2008 मध्ये मतदारसंघांचे पुनर्रचना (delimitation) झाल्यानंतर या मालिका बदलल्या गेल्यामात्र काही ठिकाणी जुन्याच मालिकांचा वापर झाला किंवा टंकलेखनाच्या चुका झाल्यामुळे दुसऱ्या मतदारसंघासाठी असलेल्या मालिकांचा वापर झाला.

दरम्यानप्रत्येक मतदाराचे नाव त्या मतदान केंद्राच्या निवडणूक यादीत असतेजिथे तो/ती सामान्य रहिवासी आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) जरी एकसारखा असला तरीत्याचा वापर करून कोणीही दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करू शकलेले नाही. त्यामुळे या गोंधळाचा कोणत्याही निवडणुकीच्या निकालावर परिणाम झालेला नाहीहेही भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

 स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य  पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्यआणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कारदेऊन गौरविण्यात येते. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार - २०२५', जाहीर करण्यात आला आहे. तर आयआयटीमुंबईचे शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मानपत्रस्मृतिचिन्हरू. ५१,००० असे स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराचे स्वरूप आहे. तर  मानपत्रस्मृतिचिन्ह आणि १ लाख १००१ रुपये असे स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराचे स्वरूप आहे.

मेजर अनिल अर्स यांचा परिचय

मेजर अनिल अर्स हे जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांना जेव्हा काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांवर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती मिळालीतेव्हा त्यांनी प्रसंगावधान दाखवत दहशतवादी टप्प्यात येण्याची प्रतीक्षा केली. दहशतवाद्यांचा गट टप्प्यात येताच मेजर अनिल अर्स यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने गोळीबार करून तीन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेच्या जवळ मेजर अनिल अर्स यांनी ही कारवाई केल्याने नियंत्रण रेषेपलीकडूनही जोरदार गोळीबार सुरु झाला. त्यावेळी जीवितहानी होण्याचा धोका पत्करून ते त्यांच्या पथकासोबत उर्वरित दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी तिथेच थांबले. १५ मिनिटांनंतर त्यांच्या पथकाने आणखी दोन दहशतवाद्यांना पाहिले आणि अचूक गोळीबार करून त्यांनाही कंठस्नान घातले. आपल्या पथकातील सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवत दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर अनिल अर्स यांनी अदम्य साहस आणि लढाऊ नेतृत्व दाखविल्याबद्दल २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते 'शौर्य चक्रप्रदान करण्यात आले.

प्राध्यापक मिलिंद अत्रे यांचा परिचय

सध्या मिलिंद अत्रे हे आयआयटी मुंबईआयनॉक्स येथे उपसंचालक – एआरटी (अॅकेडेमीकरिसर्च आणि ट्रान्सलेशन) आहेत. त्यांनी ४ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबईचे डीन (संशोधन आणि विकास) म्हणून आणि ६ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबई येथे बिझनेस इनक्यूबेटर, SINE (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप) चे प्रोफेसर-इन-चार्ज म्हणून काम केले आहे. प्राध्यापक अत्रे यांनी नागपूरच्या व्हीएनआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर १९९१ मध्ये आयआयटी मुंबई येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात क्रायोजेनिक्समध्ये पीएचडी केली. टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटर (टीआरडीडीसीपुणे) मध्ये २ वर्षे काम केल्यानंतरत्यांनी जर्मनीमध्ये त्यांच्या पोस्ट-डॉक्टरेट संशोधनावर काम केले. १९९६ मध्ये ते अणू ऊर्जा विभागात सहभागी होण्यासाठी भारतात परतले.


त्यांनी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यासाठी इंदूर येथील राजा रमणा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (RRCAT) येथे काम केले. २००० मध्येते MRI/NMR प्रणालींशी संबंधित संशोधन करण्यासाठी ऑक्सफर्ड इन्स्ट्रुमेंट्सइंग्लंड येथे प्रिन्सिपल इंजिनिअर म्हणून सहभागी झालेजिथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स कूलिंगसाठी कोल्ड प्रोब४ के पल्स ट्यूब क्रायोकूलर, MRI, सुपरकंडक्टिंग मॅग्नेट आणि हेलियमसाठी री-कंडेन्सिंग क्रायोस्टॅट विकसित करण्यावर काम केले. अत्रे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेतजसे कीअध्यापनातील उत्कृष्टतेसाठी प्रोफेसर सुखात्मे पुरस्कारडॉ. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवार्डइंडस्ट्रियल इम्पॅक्ट अवार्ड. सध्या त्यांच्याकडे संरक्षणअवकाश आणि अणुऊर्जाअणू प्रयोगांशी संबंधित विविध प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्रात ‘एम-सॅंड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित

 बांधकाम क्षेत्रात एम-सॅंडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित

नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावातसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावेयासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वाळुच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिब्रास ६०० रुपये आकारण्यात येतेत्याऐवजी प्रतिब्रास २०० रुपये इतक्या सवलतीच्या दराने स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

क्वॉरी वेस्ट व डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या साहाय्याने तयार होणारी ही कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्याय ठरू शकतेया धोरणानुसारजिल्हा प्रशासन व वन विभागाच्या परवानगीनंतर एम-सॅंड युनिट्स उभारण्यास परवानगी देण्यात येणार असूनपर्यावरणीय नियमांचे पालन आवश्यक राहील.

राज्यातील सर्व शासकीयनिमशासकीय व सार्वजनिक संस्थांनी आपल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये एम-सॅंडचा प्राधान्याने वापर करावाअशा सूचना शासनाने दिल्या आहेत. याशिवायभारतीय मानक ब्युरोच्या (IS 383:2016) निकषानुसार गुणवत्ताधारित एम-सॅंडचाच वापर करण्यात यावाअसे स्पष्ट करण्यात आले आहे. कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी - प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार आहे. तसेच एम-सँड तयार करणाऱ्या युनिटला प्रतिब्रास २०० रुपये इतकी सवलत देण्यात येणार आहे.

एम-सॅंड युनिट्समुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतीलतसेच नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरण रक्षणास हातभार लागेलअसा शासनाचा विश्वास आहे. यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असूनधोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा तयार केली जाणार आहे.

राज्यातील बांधकाम क्षेत्रात या निर्णयामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या पावलामुळे पर्यावरण रक्षणटिकाऊ विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

एम सँड गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदानव्याज सवलतविद्युत शुल्कातून सूटमुद्रांक शुल्क माफी आणि वीजदरात अनुदान दिले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन




 ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 

नागपुर18 मई: ऑपरेशन सिंदूर को सफलतापूर्वक अंजाम देते हुए भारतीय सेना ने पाकिस्तान का एक भी हमला सफल नहीं होने दिया। इस युद्ध में देश में ही निर्मित हथियारों का उपयोग कर भारत ने जीत हासिल कीजिससे पूरी दुनिया को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत’ की झलक देखने को मिली। यह हम सभी के लिए अत्यंत गर्व की बात हैऐसा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां दिया।

 

वे ऑपरेशन सिंदूर की सफलता के उपलक्ष्य में खापरखेड़ा (नागपुर) में आयोजित तिरंगा यात्रा के दौरान बोल रहे थे। इस अवसर पर राज्य के राजस्व मंत्री एवं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेविधायक आशीष देशमुख और चरणसिंह ठाकुर उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि तिरंगा यात्रा का उद्देश्य प्रत्येक नागरिक के हृदय में राष्ट्रप्रेम की भावना जागृत करना और हमारे वीर जवानों के प्रति कृतज्ञता प्रकट करना है। उन्होंने कहा कि पहलगाम में हुए आतंकी हमले के सूत्रधार पाकिस्तान को प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया गया है। अब भारत पर कोई भी हमला सहन नहीं किया जाएगा और उसका तत्काल कड़ा उत्तर दिया जाएगा। इस अभियान को सफल बनाने वाले वीर जवानों के प्रति हम तिरंगा यात्रा के माध्यम से कृतज्ञता प्रकट करेंऐसा आह्वान भी मुख्यमंत्री ने किया।

 

युद्ध में शहीद हुए जवानों को श्रद्धांजलि देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि पूरा देश उनके परिजनों के साथ मजबूती से खड़ा है। उन्होंने कहा कि पाकिस्तान में स्थित आतंकियों के ठिकानों पर भारत ने आक्रामक कार्रवाई कीजिससे अंततः पाकिस्तान को युद्धबंदी की मांग करनी पड़ी। यह पूरे देश की ऐतिहासिक जीत है।

 

श्री बावनकुळे ने कहा कि इस यात्रा के माध्यम से सर्वधर्म समभाव और देश की एकता का प्रतीक प्रस्तुत हो रहा है। यह यात्रा हमारे सैनिकों के शौर्य और पराक्रम के प्रति कृतज्ञता और गर्व को दर्शाती है।

 

अण्णा मोड से लेकर रेलवे क्रॉसिंग तक निकाली गई इस तिरंगा यात्रा में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया।

0000

Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

 Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

Tricolour Rally Held in Khaparkheda

 

Nagpur, May 18: While successfully executing Operation Sindoor, the Indian Army ensured that not a single attack by Pakistan succeeded. Using indigenously developed weapons to win this battle has shown India’s strength and offered a glimpse of Prime Minister Narendra Modi’s vision of a self-reliant (Atmanirbhar) India to the world. This is a moment of immense pride for us, said Chief Minister Devendra Fadnavis today.

 

He was speaking at a Tricolour Rally organized in Khaparkheda (Nagpur) to mark the success of Operation Sindoor. Also present at the event were State Revenue Minister and Guardian Minister Chandrashekhar Bawankule, MLA Ashish Deshmukh, and Charansingh Thakur.

 

CM Fadnavis stated that the rally aimed to ignite patriotism in every citizen’s heart and express gratitude to our brave soldiers. He said that Operation Sindoor, executed under the leadership of Prime Minister Modi, was a fitting reply to Pakistan — the mastermind behind the terrorist attack in Pahalgam. Going forward, no attack on India will be tolerated and will be met with an immediate and strong response, he declared. The Tricolour Rally is a way to express our gratitude to the valiant soldiers who ensured the success of this operation, he added.

 

Paying homage to the martyred soldiers and assuring their families of the nation’s unwavering support, CM Fadnavis said India carried out aggressive action to destroy the terrorist bases in Pakistan. The outcome of this war led to Pakistan calling for a ceasefire — a clear victory for the entire nation.

 

Minister Bawankule said the rally reflected national unity and religious harmony, expressing collective pride and gratitude for the courage shown by Indian soldiers.

 

The Tricolour Rally, held from the Anna Mod area to the railway crossing, witnessed massive public participation.


आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

 आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची

ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 

नागपूर दि.18: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष देशमुखचरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईलहा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही  मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूयाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

 

श्री बावनकुळे म्हणालेया यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे.

 

अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास शासन कटिबद्ध

 कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास शासन कटिबद्ध

 कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवत असूनकामगारांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडा आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेणे व त्यांना प्रोत्साहन देणेहा पुरस्कारमालिकेचा उद्देश असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी केले.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले कीराज्यभरातून निवडलेल्या ५१ गुणवंत कामगारांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले असून२०२३ चा कामगार भूषण’ पुरस्कार बजाज ऑटो लिमिटेडवाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथील श्रीनिवास कोंडीबा कळमकर यांना प्रदान करण्यात येत आहे. 

कामगार चळवळीतील योगदानाबाबत मंत्री फुंडकर यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा गौरव केला. भारतातील पहिली संघटित कामगार संघटना स्थापन करून त्यांनी कामगार चळवळीचा पाया घातल्याचे ते म्हणाले.

कामगार कल्याणासाठी राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले कीकामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीपरदेश शिक्षणासाठी योजनाक्रीडा स्पर्धानाट्य स्पर्धातसेच कौशल्य प्रशिक्षण व उद्योगांसोबत भागीदारीतून रोजगार संधी निर्माण करण्यावर शासन भर देत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळावीयासाठी आयटीआयमधून प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

आज राज्यात केवळ १० टक्के संघटित तर ९० टक्के असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांच्या हितासाठी स्वतंत्र आयुक्तालय तसेच विविध मंडळे कार्यरत आहेतअसे सांगून त्यांनी कामगारांनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

कामाबरोबरच स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावाअसे आवाहन त्यांनी कामगारांना केले.

Featured post

Lakshvedhi