Wednesday, 7 May 2025

सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

 सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

– कृषि आयुक्त सूरज मांढरे

 

मुंबई6 मई : सरकारी कार्यों में सूचना प्रबंधनसमय नियोजनकार्य की निगरानी और रिपोर्टिंग के लिए नवाचार तकनीक के कई टूल्स उपलब्ध हैं। इन टूल्स का उपयोग करने से निश्चित ही शासकीय कामकाज में गति आएगीऐसा मत कृषि आयुक्त सूरज मांढरे ने व्यक्त किया।

"टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" के अंतर्गत प्रशासनिक अधिकारियों और कर्मचारियों के कौशल विकास हेतु मंत्रालय के परिषद सभागृह6वीं मंजिल पर प्रभावी तकनीकी उपयोग’ विषय पर कृषि आयुक्त सूरज मांढरे और महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक द्वारा व्याख्यान आयोजित किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र सदननई दिल्ली की निवासी आयुक्त आर. विमला समेत प्रशिक्षणार्थी उपस्थित थे।

कृषि आयुक्त मांढरे ने कहा कि गूगल कीपएवरनोटमाइक्रोसॉफ्ट वन नोटगूगल ड्राइवड्रॉपबॉक्सक्लिकअपमाइक्रोसॉफ्ट टू डूगूगल कैलेंडरगूगल शीट्स और टेलीग्राम जैसे टूल्स का उपयोग कर कार्य को अधिक गतिशील बनाया जा सकता है। टेक्नोलॉजी एक ऐसी चीज है जो बिना किसी भेदभाव के सभी को एक समान स्तर पर लाती है। यह शारीरिक स्थितिरंगजाति या धर्म की परवाह किए बिना सभी के लिए उपयोगी होती है।

उन्होंने यह भी कहा कि अगर माइक्रोसॉफ्ट वन नोट जैसे टूल्स का सही उपयोग किया जाए तो शासन के कई मुद्दे हल हो सकते हैं। पेंसिल के साथ टैबलेट प्रशासनिक कार्यों में बेहद उपयोगी हैं। अब मेहनत से अधिक स्मार्ट कार्य प्रणाली पर जोर देना चाहिए। शासन के लिए कार्य करते हुए स्वयं को भी तकनीकी रूप से दक्ष बनाना आवश्यक हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के डॉ. विकास नाईक ने बताया कि तकनीक का सही उपयोग करने से शासकीय कार्य अधिक प्रभावी और समयबद्ध हो सकते हैं। टास्क मैनेजमेंट के लिए 'Any.do' जैसे एप्लिकेशन का उपयोग कर कार्य की जानकारी रखी जा सकती है और एक्सेल का उपयोग क्षेत्रीय स्तर पर डेटा प्रबंधन के लिए उपयुक्त होता है।

महाराष्ट्र सिविल सर्विस’ पोर्टल की जानकारी देते हुए श्री. नाईक ने कहा कि इस प्लेटफॉर्म पर नागरिक किसी भी विभाग से संबंधित प्रश्न पूछ सकते हैं और अधिकारियों से सीधे उत्तर प्राप्त कर सकते हैं। साथ ही, 'महासंपर्कएप्लिकेशन के माध्यम से भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों और जनप्रतिनिधियों की जानकारी सरलता से प्राप्त की जा सकती हैयह जानकारी भी उन्होंने दी। प्रशासनिक व्यवस्था में समस्याओं के समाधान हेतु तकनीक आधारित उपायों की आवश्यकता है और इसके लिए तकनीक प्रभावी साधन प्रदान करती हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी की विभिन्न योजनाओं की जानकारी देते हुए उन्होंने नवाचार पहल और तकनीकी साधनों के समन्वय का महत्व रेखांकित किया।

0000

दशावतार नावाचे एक व्रत

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

     *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*

                  *🔸दशावतार.🔸*


*------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*------------------------------------------*


*दुष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी परमेश्वर युगायुगांत निरनिराळे अवतार घेतो, असे भगवद्‌गीतेत म्हटले आहे. हे दहा अवतार विष्णूचे आहेत. शिव, गणपती, देवी इ. देवतांनीही अवतार घेतले असल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, वामन व परशुराम या अवतारांची कथाबीजे वैदिक वाङ्‌मयात मिळतात. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात विष्णूचे चोवीस अवतारही सांगितले आहेत.*


*पुराणांत दशावतारांच्या जन्मतिथी सांगितल्या आहेत. त्या अशा (१) मत्स्य—चैत्र शुद्ध तृतीया, (२) कूर्म—वैशाख पौर्णिमा, (३) वराह—भाद्रपद शुद्ध तृतीया, (४) नरसिंह—वैशाख शुद्ध चतुर्दशी, (५) वामन—भाद्रपद शुद्ध द्वादशी, (६) परशुराम—वैशाख शुद्ध तृतीया, (७) राम—चैत्र शुद्ध नवमी, (८) कृष्ण—श्रावण वद्य अष्टमी, (९) बुद्ध—आश्विन शुद्ध दशमी, (१०) कल्की—श्रावण शुद्ध षष्ठी.*


*विष्णूने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणांत अनेक कथा आढळतात. मत्स्यावतार- शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनूचे रक्षण करण्यासाठी, कूर्मावतार- देव व दैत्य मंथन करीत असता मंदार पर्वताला आधार देण्यासाठी, वराहावतार- हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी, नरसिंहावतार- हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, वामनावतार- तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, परशुरामावतार- सहस्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, रामावतार- रावणादि राक्षसांचा नाश करण्यासाठी, कृष्णावतार–कंसादी दुष्टांचा वध करण्यासाठी, बुद्धावतार- यज्ञहिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसेचे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी व कल्कीचा अवतार- म्लेंच्छांदी दुष्टशक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी. हा शेवटचा कलियुगाच्या शेवटी होणार आहे, असे कल्कीपुराणात म्हटले आहे.*


*दशावतारांची ही कल्पना उत्क्रांतिवादावर आधारित आहे, असे एक मत आहे, तर ॲनी बेझंट यांनी आपल्या अवताराज  (१९२५) या पुस्तकात अवतारानुसार वेगवेगळी युगे मानली आहेत. गीतगोविंदकार जयदेवाने श्रीकृष्ण हा श्रेष्ठ देव मानून त्याचे दहा अवतार सांगितले आहेत. कृष्णाऐवजी तो बलराम हा आठवा अवतार मानतो.*


*दशावतार नावाचे एक व्रतही सांगितले आहे. अवतार ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या अवताराची मूर्ती तयार करून तिची पूजा, तीस खाद्यपदार्थांचा नैवेद्य असा याचा विधी आहे. या पदार्थांपैकी दहा देवाला, दहा ब्राह्मणाला देऊन दहा स्वतःसाठी ठेवतात.....*

*स्त्रोत: मराठी विश्वकोश,जोशी, रंगनाथशास्त्री...*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

 शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर

करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

- कृषी आयुक्त सुरज मांढरे

 

              मुंबई, दि. ६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापनवेळेचे नियोजनकामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान झाले. यावेळी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला यांसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, गुगल कीपएव्हरनोटमायक्रोसॉफ्ट वन नोटगुगल ड्राइव्हड्रॉपबॉक्सक्लिकअपमायक्रोसॉफ्ट टू डूगुगल कॅलेंडरगुगल शीट्सटेलिग्राम याचा वापर करून आपले काम अधिक गतिमान करता येईल. टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे जी कोणताही भेदभाव न करता सर्वांना एका समान पातळीवर आणते. शरीररंगजातधर्म यांचा फरक न बघता ती सर्वांना उपयुक्त ठरते.

मायक्रोसॉफ्ट वन नोट या टूल्सचा जर वापर केला तर शासनाचे अनेक प्रश्न सुटतील. पेन्सिल असलेले टॅबलेट कामकाजात खूप उपयुक्त आहेत. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क वर भर दिला पाहिजे. शासनाचे काम करत असताना स्वतः देखील तंत्रज्ञान अवगत करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांनी सांगितले कीतंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व वेळेत पूर्ण होऊ शकते. टास्क मॅनेजमेंटसाठी ऐनी डू (Any Do) सारख्या अ‍ॅप्लिकेशन्सचा उपयोग करून कामाची नोंद ठेवता येते व एक्सल (Excel) चा उपयोग क्षेत्रीय स्तरावर डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

महाराष्ट्र सिव्हिल सर्विस’ संकेतस्थळाची माहिती देताना श्री. नाईक यांनी सांगितले कीया प्लॅटफॉर्मवर नागरिक कोणत्याही विभागासंदर्भात प्रश्न विचारू शकतात व अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर मिळवू शकतात.

त्याचबरोबर, ‘महासंपर्क’ अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीलोकप्रतिनिधी यांची माहिती सुलभपणे मिळू शकतेयाबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रशासकीय यंत्रणेत एखाद्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या तंत्राची गरज आहे आणि यासाठी तंत्रज्ञान ही प्रभावी साधने उपलब्ध करून देतेअसेही श्री. नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

****

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 मुख्य निवडणूक आयुक्तांचा 

बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 

मुंबईदि. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतीलयासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.

 

आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक  आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण








 

दिलखुलास' कार्यक्रमात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

 

मुंबईदि. ७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ५५१ वी रँक पटकावत उत्तीर्ण झालेले बिरदेव डोणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार ८मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून 90 हून अधिक उमदेवार उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हे उत्तीर्ण झाले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास कसा  करावाअभ्यासाचे नियोजन कसे करावेविषयांची निवड व मुलाखतीची तयारी कशी करावीतसेच या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी कशाप्रकारे अभ्यास व तयारी केली याविषयी 'दिलखुलासकायर्क्रमातून श्री. डोणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार,आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

 सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार

-         आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

 

            मुंबईदि. ७ : आपण रोज जेवतो तोच खरा आहार (डाएट) असतो. त्यामुळे त्यात पोषणमूल्यांची योग्य सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी बनवलेले पारंपरिक पदार्थ हेच शरीरासाठी सर्वोत्तम असतात कारण ते नैसर्गिकपचायला हलके आणि संतुलित असतात. सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली ही अशाच संतुलित आहारात दडलेली आहेअसे आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.

 

टेक-वारी कार्यक्रमात मंत्रालयात 'आरोग्यदायी जीवनशैली’ या विषयावर ऋजुता दिवेकर यांचे व्याख्यान झाले.

 

आहारतज्ञ ऋजुता दिवेकर म्हणाल्याआजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. मात्रसंतुलित आणि नैसर्गिक आहाराच्या मदतीने आरोग्य सुदृढ ठेवता येते. पौष्टिकतेचा विचार करता आहारात फळेभाज्याघरी बनवलेले अन्नयोग्य प्रमाणातील कार्बोहायड्रेट्सप्रथिने यांचा समावेश असावा. वेळेवर आणि योग्य प्रमाणात खाणे हेच दीर्घकालीन सृदृढ आरोग्याचे गमक आहे.

 

आठवड्यातून किमान तीन दिवस तरी नियमित व्यायाम कराचालण्याची सवय लावा, शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिने चढा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि आरोग्य सुधारते.

प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असेलतर मोबाईल आणि टीव्ही यासारख्या स्क्रीनवर खर्च होणारा वेळ कमी करणे आवश्यक आहे. लोकलसिझनल आणि पारंपरिक (ट्रेडिशनल) पदार्थ खाण्यावर भर द्यावा. पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नापासून शक्यतो दूर राहणे आरोग्यास हितावह आहेअसे सांगत दिवेकर यांनी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या आहार आणि आरोग्याच्या गरजांवर सविस्तर मार्गदर्शन केले

Featured post

Lakshvedhi