Monday, 28 April 2025

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून निश्चितच गुणवत्ताधारक खेळाडू घडतील

 पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून

निश्चितच गुणवत्ताधारक खेळाडू घडतील

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार

 

महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न

 

मुंबईदि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था पाहिल्यावर छातीठोकपणे सांगू शकतो कीही सर्व व्यवस्था एक नंबर आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतीलअसा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

 

             पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन आज रविवार२७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकरखासदार श्रीरंग बारणेआमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदीआमदार विक्रांत पाटीलसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुखपनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटेरायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटीलमाजी महापौर कविता चौतमोलसिडकोचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटीलमाजी सभागृहनेते परेश ठाकूरमाजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले कीदिलीप वेंगसरकर सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील. त्यांची अशा प्रकारची अकादमी चालवण्याची हातोटी नक्कीच उदयन्मुख खेळाडूसाठी उपयुक्त आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पनवेलचे खेळाडू भारतीय संघात दिसतील - पद्मश्री वेंगसरकर

 यावेळी पद्मश्री दिलीप वेंगसरकर म्हणालेपनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.

 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कीआंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री. वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील क्रिकेटपटूंना उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

 

विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील म्हणाले कीशहराचा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी शहराची कलाक्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात समांतर वाढ होणे आवश्यक असते. महापालिकेच्या आयुक्तांनी व सर्व अधिकारी वर्गाने शहराचा हा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी विविध विकासकामांबरोबरच या क्रिकेट अकादमीतून चांगले कार्य केले आहे.

 

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सांगितले कीया भागाला क्रिकेटचा मोठा वारसा आहे. महापालिकेने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण अकादमीमुळे पनवेलच्या नावलौकिकात भर पडली आहे. भविष्यात भारतीय संघामध्ये या प्रशिक्षण केंद्रातील मुले खेळताना दिसली तर खऱ्या अर्थाने या उपक्रमाची पूर्तता होईल.

            पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले कीतरुण पिढीमध्ये नवभारत घडवण्याची ऊर्जा आहे. याच संकल्पनेतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. या केंद्रातून मुलांचे भविष्य घडेल. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विभागांमध्ये टेनिस कोर्टकबड्डीकुस्तीक्रिकेट व इतर खेळांचे क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

   आपल्या प्रास्ताविकातून  आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले कीहे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदानपॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्केउर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

 क्रिकेटपटूंचा सत्कार

       या कार्यक्रमात पनवेल परिसरातील क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू व मान्यवर प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी  माजी नगरसेवक तसेच महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडेउपायुक्त सर्वश्री  डॉ. वैभव विधातेप्रसेनजित कारलेकररविकिरण घोडकेमंगला माळवेस्वरूप खारगेसहायक आयुक्त श्रीराम पवारडॉ. रूपाली मानेसुबोध ठाणेकरशहर अभियंता संजय कटेकरमुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकरतसेच क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी मानले.

 

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा अडचणींवरही मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा

अडचणींवरही मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 27: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल सह्याद्री अतिथीगृह येथे महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री तथा महामंडळाचे सहअध्यक्ष डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

प्रारंभी महामंडळातर्फे सहसचिव विवेक दहिफळे यांनी सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजनेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अल्प व मध्य उत्पन्न घटक यांच्यासाठी शासकीय जमिनीवर किंवा खाजगी जमीन मालकासोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांचे घर निर्माण प्रकल्प महामंडळामार्फत राबविण्यात येतात. या महामंडळासाठी 600 कोटी रुपये भाग भांडवल मिळाले आहे. महाहौसिंग मार्फत आतापर्यंत बारामती येथील आंबेडकर वसाहत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि सोलापूरनागपूर या भागात सात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. यातून 21 हजार 35 सदनिका उपलब्ध होणार आहेत. यासाठी केंद्राकडून अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून 108 कोटी 59 लाख रुपये मिळाले असून 68 कोटी 54 लाख रुपये राज्य शासनाचा हप्ताही प्राप्त झाला आहे. याशिवाय टिटवाळाखंडाळा या ठिकाणी दोन नियोजित प्रकल्प देखील आहेत. बांधण्यात आलेल्या घरांची विक्री बुक माय होम्स मार्फत केली जाते. साधारणपणे 15 लाखापर्यंत एका सदनिकेची विक्री किंमत येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना सुलभ गृह कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांना सध्या काही आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्पांमध्ये डीपी रस्त्याचे काम करणेसांडपाणी व पावसाळी पाणी निचरा करणेवीज पुरवठा करणेपाणीपुरवठा करणे या बाबींसाठी महाहौसिंगच्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये तातडीने विविध महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे महावितरण व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन या अडचणी सोडवण्यात येतील असे सांगितले. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे. महाहौसिंगसारख्या महामंडळाने आपल्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात गृहनिर्माण करणे आवश्यक आहे. महामंडळाला या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही त्याचप्रमाणे घरांची विक्री करण्यासंदर्भात म्हाडामार्फत योग्य ती संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनाअतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंहम्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालउपस्थित होते.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार

 पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवायकोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीच्या आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले कीनागपूरहून गोवापर्यंत असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

अनुराग जैन म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात औद्योगिक विकासाला गती मिळाली. शेंद्रा-बिडकीन वसाहतविमानतळ विस्तारजालना ड्रायपोर्ट आणि समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांनी जागतिक उद्योग व नवउद्योजकांना आकर्षित केले. त्यामुळे रोजगार व आर्थिक विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग आणि पर्यटन वाढीस मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

अर्पित सावे यांनीमराठवाडा विभागातील औद्योगिक वाढीच्या गुंतवणूक संधी व दिशा" याविषयावर सादरीकरण केले. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या सोयी- सुविधांबाबत राम भोगले यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा व्यक्त केल्या.

 

याप्रसंगी मराठवाडा प्रदेशातील आर्थिक विकासनवोपक्रम आणि उद्योजकतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्राहक अभिमुखताअभिनव उत्पादनउद्योग ४.०पर्यावरण जागरूकताएचआर चॅम्पियनउद्योजक (वैयक्तिक) आणि जागतिक लघु व मध्यम उद्योग या श्रेणींमध्येउद्योगाच्या आकारानुसार सूक्ष्मलहानमध्यम आणि मोठे उद्योग  विभागांमध्ये  विविध  उद्योजकांना तर ग्लोबल एसएमई पुरस्कार प्रॅक्टीक प्रा. लि. यांना देण्यात आला.

 

अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क

 अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शकगतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहेनागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

 

00000

 

वृत्त क्र. 1768

 

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगरदि.२७ (विमाका) सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहेया माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेदरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहेज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेतयाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे  कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण  रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफइमाव कल्याण मंत्री अतुल सावेविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेराज्यसभा सदस्य खासदार डॉभागवत कराडखासदार सांदिपान भुमरेमदार सतिष चव्हाणमदार संजय केणेकरमदार नारायण कुचेमदार अनुराधा चव्हाणमदार संजना जाधववैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉअजय चंदनवाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉशिवाजी सुक्रेराज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्माराज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉअरविंद गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहेयाचे समाधान आहेराज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहेजीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहेकर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशनकीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहेआधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहेट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहेत्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहेया उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होतेदेशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहेमात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


 

छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावेयासाठी 2016 मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलात्यानुसार आवश्यक कार्यवाही करून

अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

 

00000

 


 


पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार

 पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवायकोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीच्या आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले कीनागपूरहून गोवापर्यंत असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi