Wednesday, 12 February 2025

उमेद'ने दिले ग्रामीण महिलांना उद्योजकतेचे बळ



 उमेद'ने दिले ग्रामीण महिलांना उद्योजकतेचे बळ


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उदघाटन 

मुंबई दि. 12 (प्रतिनिधी) – 'उमेद अभियान' अंतर्गत आयोजित 'महालक्ष्मी सरस' या भव्य प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन पुन्हा एकदा ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान वांद्रे येथील बीकेसी - एमएमआरडीए मैदानात आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण उद्योजक आणि महिला बचत गटांच्या उत्पादने खरेदीसाठी हे प्रदर्शन मोठी संधी ठरले आहे. 'उमेद'मूळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेचे बळ मिळाले असून महिलांच्या व्यवसायाला नव्या संधी निर्माण झाल्या आहेत

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामीण विकास मंत्री श्री. जयकुमार गोरे आणि राज्य मंत्री श्री. योगेश कदम यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक भव्य झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भेट देत विविध उत्पादने खरेदी केली.  

'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी उत्साहात गर्दी करत भरभरून प्रतिसाद दिला. विविध हस्तकला, घरगुती उत्पादने, पारंपरिक वस्त्रप्रकार आणि मसाल्यांचे पदार्थ हे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले असून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

खरेदीसोबतच फूड कोर्टलाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत नागरिक विविध स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता, या प्रदर्शनाने मुंबईतील खरेदीप्रेमींमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रदर्शनात ५०० हून अधिक स्टॉल्स असून, हातमागाच्या वस्तू, घरगुती उत्पादने, विविध मसाले, शोपीस* यांसारख्या नवनवीन वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांना येथे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या १०० हून अधिक खाद्यपदार्थ स्टॉल्स वर रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधीही मिळत आहे.  
 
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला उद्योजिका आणि स्वयं सहायता गटांनी सहभाग घेतला आहे. 'उमेद अभियान' हे केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता, महिलांसाठी *उमेद मार्ट' नावाचे ऑनलाइन व्यासपीठही उपलब्ध करून देत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागातील महिला घरबसल्या आपली उत्पादने विकू शकतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक बळकट होत आहे.  

''उमेद अभियान' अंतर्गत हजारो महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत असून, त्यांना आर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले आहे केले आहे.

१०, १२वी विधर्त्यकरिता ट्रॅफिक मध्ये फसले asalt आणि exam साठी जात asalt तर ट्रॅफिक पोलिस shi contact करा


 

येत्या महाशिवरात्री पर्यंत जेवढे जमेल तेवढे शिवलिलामृत वाचावे,pl share

 येत्या महाशिवरात्री पर्यंत  जेवढे जमेल तेवढे शिवलिलामृत वाचावे .


खाली दिलेले मंत्रे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व यशासाठी आहेत. या मंत्रांची  सलग साखळी तयार व्हावी याकरिता तुम्ही ती मंत्रे पठण  करून पुढे दहा जणांना 

पाठवा, ( मला सोडून )  🙏

न पाठवू शकल्यास मला परत सेंड करा  म्हणजे साखळी तुटणार नाही.

श्री शंकर महादेव मंत्र - 



🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️


॥ॐ नमः शिवाय ॥

॥ॐ नमो भगवते रुद्राय नमः॥

॥ॐ शिवाय नमः॥

॥श्री शिवाय नमःस्तुभ्यम्॥

॥ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमही तन्नो रुद्र प्रचोदयात्॥

॥ॐ सोमनाथाय नमः॥

॥ॐ केदारनाथाय नमः॥

॥ॐ भिमाशंकराय नमः॥

॥ॐ बैद्यनाथाय नमः॥

॥ॐ वैजनाथाय नमः॥

॥ॐ नागेश्वराय नमः॥

॥ॐ नागनाथाय नमः

॥ॐ त्र्यंबकेश्वराय नमः॥

॥ॐ घृष्णेश्वराय नमः॥

॥ॐ रामेश्वराय नमः॥

॥ॐ मल्लिकार्जुनाय नमः॥

॥ॐ महाकालेश्वराय नमः॥

॥ॐ काशीविश्वेराय नमः॥

॥ॐ विश्वेश्वराय नमः ॥

॥ॐ निळकंटेश्वराय नमः॥

॥ॐ अमरनाथाय नमः॥

 

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 

                                                                      प्लीज पुढे पाठवा... 🙏🙏🙏



प्लिज १० ठिकाणी पाठविणे शक्य नसेल तर १ ला तरी पाठवा म्हणजे साखळी ब्रेक होणार नाही ....

शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा pl share

 शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे;

राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत 

महामेट्रोने समन्वयाने काम करावे

-         उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबईदि. 12 :- शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असूनती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी 99 वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळशिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरपरिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकरनगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे 2025) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो सार्वजनिक खासगी भागीदारी’ या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक त्या कार्यवाही पूर्ण कराव्यात. शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानकाच्या विकासाचा प्रकल्पसुद्धा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असूनतो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

          आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.

          वाहनतळासाठी दोन तळघर.

          किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.

          बसस्थानक तळमजल्यावरबसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.

          शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

 मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने

मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

-  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. 12 : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सकाळ ग्रुपचे बॉबी निंबाळकर आदी उपस्थित होते.

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगित तत्वावर राबवण्यात यावा. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने मूल्यमापन करावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये किती आणि कशी वाढ झाली आहे, मच्छिमारांना कशा प्रकारे फायदा झाला याचा या मूल्यमापनामध्ये समावेश असावा. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागाने त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मंत्री श्री. राणे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर हे 2026 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा आणि तो तातडीने राबवण्याचे नियोजन करण्यात यावे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्यतः किनारपट्टीच्या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. जेणेकरून किनारपट्टीच्या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येईल. वाढवण बंदरासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती राज्यातूनच पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. तरी याविषयीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मच्छिमारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शाश्वत मासेमारी व्यवसाय, पर्यावरण स्नेही मच्छिमारी, मच्छिमारांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांची सुरक्षा,  अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असणार आहे.

0000

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

 एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे 

राज्यात दुसरी निल क्रांती

-  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. 12 : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते.  

यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि प्रगत कायद्यासाठी दक्षता अंमलबजावणीचे संचालक बी.व्ही. सत्यसाईकृष्णा आदी उपस्थित होते.

            सागरी सुरक्षा तसेच मच्छिमारांची सुरक्षा हा महत्वाचा विषय असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा आराखडा तयार करावा. तसेच मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, मच्छिमारांची सुरक्षा निश्चित करणे, मच्छिमार नोंदणी, मच्छिमारी नौका नोंदणी, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, मासळी विक्रीची व्यवस्था, त्याची वाहतुक, आपत्तीच्या काळात राबवावयाची सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा यासाठी एआयचा वापर करावा. अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर ससून डॉक येथे उभारण्यात यावे. त्याचे मुल्यमापन करून सर्व राज्यभरात ही प्रणाली कशा प्रकारे लागू करता येईल यासाठी चाचपणी करावी. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे त्याचबरोबर राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ करुन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलणे शक्य असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

            ससून डॉक येथे उभारण्यात येणाऱ्या या एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीमध्ये मासळीचे मूल्यमापन, आपत्तीच्या काळात मच्छिमारांची सुरक्षा, मासळी आजारांचां शोध  घेणारी प्रणाली, एआय आधारित मासळी बाजार प्रणाली, सागरी सुरक्षा, सागरी गस्त, बेकायदेशीर मासेमारीवर लक्ष ठेवणे व त्याला आळा घालणारी प्रणाली, मच्छिमार कल्याणाच्या योजनांची देखरेख करणारी प्रणाली यांचा समावेश असणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मासळीचे उत्पादन वाढीसाठीही मदत होणार असून पारदर्शकता येणार आहे.

गंगा नदीच्या सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र pl share

 *🙏गंगा नदीच्या  सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र.. त्यात तीला येऊन मिळणार्या नद्या आणि ज्या ज्या राज्यातून ती जाते त्यातील तिचा किती प्रवास होतो हे ही आहे.  आपण सर्व या नदीला का पवित्र मानतो हे यातून कळतं* 👌


Featured post

Lakshvedhi