Wednesday, 1 January 2025

गळीत हंगामातील ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा

 गळीत हंगामातील ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी

कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या  कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

मुंबई दि. ३१ :- साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्रऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावाअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. एआय हे तंत्रज्ञान वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते  फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० मे. टन ते १००० मे. टनाची गोडाऊन बांधण्यात येणार आहेत. या योजनेतून गडचिरोली, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभी करावीत. तसेच सहकारी गृह निर्माण संस्थांचे १०० टक्के डिजिटलायझेशन करण्यावर भर द्यावा.  साखर कारखान्यांना देण्यात आलेला मार्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष हावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटसामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळपाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकरसहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईकमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव संजय खंदारेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

००००

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

 प्रगतीशील महाराष्ट्रगतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कष्टकरीशेतकऱ्यांसह सर्वांना घेणार सोबत

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा

 

मुंबईदि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही...अशी प्रतिज्ञा करूयाएकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरीशेतकरीकामगारासह सर्वांचीच साथ लाभेलअसा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, 'येणारे वर्ष सुखसमाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहोहीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरीशेतकरीकामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचनशिक्षणआरोग्यउद्योग- ऊर्जामाहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखापरस्पर स्नेहआदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईलअसे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहेत्यासाठी नववर्ष चैतन्यदायी ठरेल. सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या नवसंकल्पना घेऊन येईल. यातून आपला महाराष्ट्र आता थांबणार नाहीहा यत्न पूर्णत्वास जाईल. अशी मनोकामना करतो. तशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोअसे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे नववर्षाभिनंदन केले आहे.

००००

 

राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी

 राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी

राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पुढील काही दिवसात पूर्ण करावीअशा सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिल्या.

बैठकीस विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकरउपसचिव श्री हांडेकक्ष अधिकारी श्री. साखरे उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल यांनी राजशिष्टाचार विभागातील आकृतीबंधानुसार असलेल्या पदांची संख्यात्यानंतर महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधावाहनांची संख्याराज्यअतिथी गृह येथील सोयी सुविधा तसेच विभागांतर्गत असलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी

 वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 31 : वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

  सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळमहाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बैठकीमध्ये श्री. रावल आढावा घेताना बोलत होते.

बैठकीस महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाचे क्षेत्रीय प्रबंधक आप्पासाहेब धुळाजमहाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डूबे पाटीलमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकरसह व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदेव्यवस्थापकीय संचालक प्रशांत बारगावकर उपस्थित होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात यावा. ज्या ठिकाणी गोदामांमध्ये शीतगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहेतिथे देण्यात यावी. राज्यात होत असलेल्या ड्राय पोर्टमध्ये प्राधान्याने गोदामांची निर्मिती करावी. शेतमालाच्या उत्पादकतेनुसार विशिष्ट शेतमाल साठवण्यासाठी ‘सायलो’ निर्मितीवर भर देण्यात यावा. रेल्वे मार्गाजवळ मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून गोदामांची निर्मिती करावीअशाही सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.

  पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, भारतीय कापूस महामंडळाकडील रक्कम येण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यात मागणीनुसार व कापूस उत्पादनाच्या अंदाजानुसार सी.सी.आयकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यासाठी निश्चितच पावले उचलण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामांची क्षमतेनुसार व परिस्थितीनुसार श्रेणीबद्धता करावी. यामध्ये सद्यस्थितीत उपयोगात असणारेनिर्लेखित करण्यात येणारे यांची श्रेणी करावी. सोयाबीन खरेदीमध्ये फेडरेशनने आपला सहभाग वाढवावा. बारदाण्याअभावी कुठल्याही परिस्थितीत खरेदी रखडू नयेयाची काळजी घ्यावी. बारदाणा उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न करावेअशा सूचनाही मंत्री श्री. रावल यांनी दिल्या.

Tuesday, 31 December 2024

कूछ तो लोग कहेंगे

 लोक माझ्याबद्दल  काय विचार करतात?लोक माझ्याबद्दल काय बोलतात? लोक माझ चुकीच  valuation करतात. एक ना अनेक प्रकारे  आपण लोकांचा विचार करत असतो. आपण इतका लोकांचा विचार करतो की आपण स्वतः पण ह्या जगात आहोत ह्याचा आपल्याला विसर पडतो. 


मी चांगला म्हणून  पूर्ण जगसुद्धा चांगल असलच पाहीजे असा विचार करणं म्हणजे ओढ्याप्रमाणे ऊन्हाळ्यात समुद्रही सुकायलाच हवा अशी अपेक्षा करणं.


एक तर आपल स्वतःचं व्हॕल्युएशन आपल्याखेरीज दुसरं कोणीच करू शकत नाही,कारण प्रत्येक व्यक्ती  तिच्या तिच्या  विचारसरणीप्रमाणे, त्या दृष्टीने  तुमच्याकडे  बघणार, जे कधीच पूर्णतः  खर नसणार. त्यामुळे कोण आपल काय व्हॕल्युएशन करतय ह्यापेक्षा  मी स्वतःला किती ओळखते हे महत्त्वाचं आहे. 


आता मुद्दा राहीला लोक काय विचार करतील ,काय बोलतील आपल्याबद्दल हा  तर तिथेही हाच नियम आहे,जशी त्यांची विचारसरणी तशी त्यांची कृती. एक लक्षात  ठेवायचं तुमच्या  बद्दल बोलावस वाटतय तुमच्या बद्दल विचार करावासा वाटतोय त्यांना म्हणजे  तुम्हि महत्त्वाचे आहात त्यांच्यासाठी. कारण महत्त्व  नसलेल्या गोष्टींवर विचार केला जात नाहि किंवा त्यावर बोललपण जात नाहि.  त्यामुळे ऊगीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यापेक्षा, आपण महत्त्वाचे आहोत हा विचार करायचा आणि अधिकाधिक स्वतःवर फोकस करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं. बस इतकच......

माझे माहेर पंढरी भारतातील पहिलं माहेरघर सामाजिक

 भारतातील पहिलं माहेरघर  

लेखक: निरेन आपटे 


माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?...स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 


बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला घेतला आहे तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा ह्यासाठी. बंगल्याच्या दारात महिला आल्या की त्यांना ओवाळले जाते. भाकर तुकड्याने नजर काढली जाते, गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभाताई हसतमुखाने ह्या महिलांना माहेरवाशीण असल्याचा आनंद देतात. जेवायला पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, पुरी भाजी असे जे मागाल ते मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत.  शिवाय इथे राहायची, भरपूर गप्पा मारायची, गाणी गायची आणि नाचायचीही सोय आहे. हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो. प्रत्येक महिलेला काय हवं ते त्या स्वतः पाहतात. चहा, नाश्ता असे सगळे लाड पुरवतात. डोहाळजेवण, व्याहीजेवण, केळवण, वाढदिवस असे कार्यक्रम करतात. पुरुषांचं माहेर नसतं, पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे. माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे आणि नव्या जीवनशैलीमुळे अनेक ग्रुप त्यांच्याकडे येत आहेत. त्यासाठी त्या अत्यंत माफक दर आकारतात. 


माहेरवाशिणींचे लाड करण्याचा हा व्यवसाय भारतातला बहुदा पहिलाच व्यवसाय आहे. ह्या अनोख्या संकल्पनेमुळे अनेक महिलांना आनंद मिळत आहे. हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं. ऐन उमेदीत दुःखाचं आभाळ कोसळतं त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा  जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो. 


प्रभाताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचे, संगीत देण्याचे काम करत असत. दोघांचा प्रेमविवाह झाल्यामुळे संसार चांगला सुरु झाला होता. पण दैवाने उलटे फासे टाकले. यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट ऍटॅकचा झटका आला. त्यांची तडफड पाहून प्रभाताई क्षणभर हवालदिल झाल्या. पण लगेच खंबीर होऊन हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचला खरा, पण अपंगत्व आले. ते अंथरुणाला खिळून राहिले. त्यांची सेवा करण्यात प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला. आर्थिक परिस्थिती खराब होत गेली. चार पैसे मिळावेत म्हणून त्या काही घरांमधून पोळी-भाजी बनवण्याचं काम करू लागल्या. एकीकडे डॉक्टरांकडे चकरा चालू होत्या. यजमानांवर उपचार होत होते. तो खर्च वाढत होता. त्यात डॉक्टरांनी सल्ला दिला की मुलबाळ होऊ देऊ नका. कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. यजमानांना जगवण्यासाठी धावपळ सुरु केली. आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हे लक्षात आल्यावर त्यांनी जिममध्ये इंस्ट्रक्टर होण्यासाठी तळवलकर जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्या इंस्ट्रक्टर झाल्या. एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहचवत होत्या. यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरु केलं. वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरु केलं. सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत होत्या. त्यामुळे ६ महिन्यात गर्दी वाढली आणि आणखी मोठी जागा घ्यावी लागली. 

पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत राबायला सुरुवात झाली. प्रभाताईंच्या हाताला अनोखी चव होती. त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले. एकदा एकावेळी ५०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही. कमी वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं. त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले. त्या कामात बुडून गेल्या. सकाळी घरातून निघताना यजमान म्हणायचे की लवकर ये! त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रभाताईंना वाईट वाटे. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्या मुलुंडला राहतं होत्या. घर छोटं होतं. आपला एक बंगला असावा असं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी होती.


अशात बदलापूरला जागा मिळत होती. पण ती विकत घेता येईल इतके पैसे नव्हते. तेव्हा प्रतिभाताई पिळगावकर ह्यांनी मोठी रक्कम देऊ केली. शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या मॅनेजरने त्यांचा जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला. आपल्या समोर आलेला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं. 


यजमानांची सेवा केल्यामुळे बदलापूरच्या जागेत आपण वृद्धाश्रम सुरु करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार मनात आला. पण तोवर स्वतःच वय वाढलं होतं. शिवाय यजमानांकडे पाहायची जबाबदारी होतीच. त्या जागेत जिम चांगलं चालू लागलं. तिथे डायटेशियन आणि डॉक्टर नेमला. पण जितक्या प्रभाताई कणखर, तितकीच नियती कठोर होती. २००५ साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. सगळे कष्ट पाण्यात बुडाले. पुन्हा शून्यापासून उभं करायची वेळ आली. त्यावेळी विजूताईनी खूप मदत केली. दरवेळी कोणी ना कोणी महिला मदतीसाठी उभी राहायची. संकट इथेच थांबलं नाही. यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आणखी खर्च करू नका! अखेरीस जे विधिलिखित होतं तेच घडलं. यजमानांनी प्रभाताईंसमोर प्राण सोडला. हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार मनात यायला लागले.आसपासचे लोक धीर द्यायला येत होते. शेवटी जे घडेल ते स्वीकारायचं हे मनाशी ठरवून पुन्हा उभं राहायचं ठरवलं. जिवलग मैत्रीण सुवर्ण जोशी हिने सल्ला दिला की तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरु कर. ही अभिनव संकल्पना होती. प्रभाताईंनी सुरुवात केली. पहिल्यांदा १५ महिलांचा ग्रुप आला. त्यांना दारात ओवाळून आत घेतलं. गरम पाण्याने पाय धुतले. सायंकाळी शुभंकरोती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव-कढी बनवून खायला घातली. त्या महिलांना स्वतःच्या आईकडे आल्यासारखे वाटले. त्यांना इतकं प्रेम मिळालं की त्यांनी आणखी काही जणांना सांगितलं. अशाप्रकारे ह्या माहेरचा प्रचार होत गेला आणि एकामागून एक ग्रुप येऊ लागले आणि प्रभाताईंना एक नवीन काम मिळालं.  हे काम करताना मनाशी एक निर्णय घेतला की ज्या महिला परिस्थितीने पिचून गेल्या आहेत त्यांना मदत करायची. म्हणून त्यांनी स्वतःच्या माहेर घरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक, साफ सफाई अशी कामे दिली. रोजगार मिळवून दिला. ह्यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे. अनेक पीडित महिलांचे संसार उभे करावे असं स्वप्न आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी इतकी जपली की २०१९ साली आलेल्या पुरात पन्नास लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था केली. बदलापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे ह्यांना ही गोष्ट कळली. त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली. म्हणजे स्वतः संकटे झेलुनही प्रभाताई इतरांना संकटात मदत करू लागल्या. कष्ट, जिद्द, चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं.  


दरम्यान माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या महिलांची संख्या पुन्हा वाढू लागली. आनंदी झालेल्या महिलांनी ह्या माहेरघराचे विडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले. ते विडिओ अमेरिकेतही गेले. आपोआप ह्या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे लाड पुरवताना चकल्या, पुरणपोळ्या, मोदक, आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणे चालू होते. एकदा एकावेळी ७०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. कोणतीही ऑर्डर आली तर नाकारायची नाही हे ठरवलेच होते. त्यामुळे आसपासच्या महिलांना सोबत घेऊन ऑर्डर पूर्ण केली. ग्राहक समाधानी होत गेले आणि त्यांची मागणीही वाढत गेली. नियती जणू प्रभाताईंची परीक्षा घेत होती. लॉक डाउनचही संकट येऊन गेलं. पण प्रभाताईंनी हार मानली नाही. दोन्ही लॉक डाउननंतर पुन्हा अनेक महिला माहेरवाशिणीचं सुख घ्यायला येत आहेत. एका ७० वर्षाच्या आजोबांनी तर फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका, पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या. तिथून पुरुषांचही स्वागत सुरु झालं आहे. सगळंच अनोखं आहे. 


संकटे येतात. अक्षरशः आयुष्य उध्वस्त करून जातात. जीवलगांचा मृत्यू, पूर-दुष्काळ, आर्थिक अडचणी, बेरोजगारी पाचवीलाच पुजलेली असते. पण त्यातून यशाचा मार्ग काढता येतो. प्रभाताई शिर्के ह्यांचा जीवनप्रवास हाच संदेश देत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात.

प्रभा शिर्के ह्यांचा संपर्क क्रमांक: + 91 9923564125


हे अनोखं माहेरघर तुमच्या मित्र-मैत्रिणींना कळवण्यासाठी हा लेख इथून कॉपी-पेस्ट करून whatsapp किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता.

मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे

 *मृत्यु नंतर सुद्धा  पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय*

***********************************

🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️

🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर ,  सदैव पुण्य मिळत राहील*❗️

🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 

🔺 *सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा  MSG वाचत राहील*

*तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू रहा।* 


*🙏 जय श्रीराम 🙏*

Featured post

Lakshvedhi