Friday, 27 December 2024

माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

 माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन;

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

 

मुंबई,  दि. 27 :- माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेचत्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी

 सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस

ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी

 

मुंबई, दि. २७ : नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यासत्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएसपी) उत्तीर्ण केला असणे आवश्यक आहे. 

किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमियोपॅथी नोंदणीकृत डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेचकिरकोळ औषध विक्रेते हे डॉक्टरांद्वारे देण्यात आलेले प्रिस्क्रीप्शनवर औषध विक्री करू शकतात.

तथापि महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायिक यांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषधांची विक्री करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) ही अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याबाबत खात्री करूनच औषधांची विक्री करावी. ही जबाबदारी किरकोळ औषध विक्रेते यांची राहील. असेही आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री. नार्वेकर यांनी कळविले

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

 जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 27 :  सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणेनंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणेवाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणेयासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे. तरी सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचणतक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावाअसे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

०००००

बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार; 10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार;

10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 27 : बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रकनियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावाअसे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्तसशस्त्र पोलीस ताडदेवमुंबई यांनी केले आहे.

मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी

 अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २७ : सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १५ जानेवारी२०२५ रोजीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिकआजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे तसेच एम.एस.सी.आय.टी. पास व टायपिंग येणा-यास प्राधान्य. वयोमर्यादा -४५ वर्षाच्या आत. मानधन दरमहा २४ हजार४७७ इतके आहे.

अर्जासोबत युध्द विधवा,विधवामाजीआजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवणेत आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई उपनगरद्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृहकलिनाडायमंड आवा हॉस्टेलच्या मागेहंस भुंग्रा मार्गसांताक्रुझ (पु.)मुंबई-४०००५५. दूरध्वनी : ०२२-३५०८३७१७ येथे संपर्क साधावा.

भारताने जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावले,राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची श्रध्दांजली

 भारताने जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञमुत्सद्दी संसदपटू गमावले

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 27 : देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.  

      अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी  देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

Dr. Singh elevated parliamentary debates with his insightful contributions : Governor C. P. Radhakrishnan

 

Mumbai, 27 : The Governor C. P. Radhakrishnan has expressed grief over the demise of former Prime Minister of India Dr Manmohan Singh.

In a condolence message, the Governor wrote : "Former Prime Minister of India Dr. Manmohan Singh was a globally renowned economist, distinguished scholar, statesman and an exemplary parliamentarian.

       As India’s Finance Minister during one of its most challenging periods, he successfully navigated the nation through economic crises and laid the foundation for globalization and liberalization. Known for his humility, dignity and profound intellect, Dr. Singh elevated parliamentary debates with his insightful contributions. With his demise, India has lost a globally respected statesman-scholar and a remarkable parliamentarian. My thoughts and prayers are with his family in this moment of sorrow."

0000


 

वृत्त क्र. 253

 

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

 

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने

देशाने प्रशासकअर्थतज्ज्ञ गमावला

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 27 : भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासकअर्थतज्ज्ञ गमावला आहेअशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कीरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरअर्थमंत्रीप्रधानमंत्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभोअशी मी प्रार्थना करतो.

0000


 

वृत्त क्र. 252

 

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही

राजकीयसामाजिकआर्थिक क्षेत्राची मोठी हानी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 27 :- भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरणखाजगीकरणउदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी प्रधानमंत्रीजागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाच्या राजकीयसामाजिकआर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंग यांनी रचला. मागील अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिलीयाचे बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांना आहेअसे सांगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात कीडॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यासदूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी  घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहेत्याचे मोठे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचे सभ्यसुसंस्कृतविश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्रीसाहसी प्रधानमंत्री आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

0000


 


विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना

 विभागीय क्रीडा संकुल समितीछत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना

 

मुंबईदि. 26 : विभागीय क्रीडा संकुल समितीछत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून अनधिकृतरित्या झालेल्या आर्थिक अफरा-तफरीबाबत विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात संबंधित रक्कम त्वरीत जमा करणेबाबत बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सखोल चौकशी

इंडियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज २६ डिसेंबर २०२४ रोजी या विषयी चर्चा करण्यात आली असून त्यांचे स्तरावर या व्यवहारामध्ये बँकेकडून झालेल्या अनियमिततानिष्काळजीपणा संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सखोल चौकशीची कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. तसेचया दरम्यान शासनाचा अपहारित्त निधी विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करणेबाबत देखील बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहेत.

जवाहरनगर पोलीस स्टेशनछत्रपती संभाजीनगर येथे तक्रार

अंदाजे रु.२१.५९ कोटी रूपयांच्या अफरातफरीची बाब दि.१३ डिसेंबर २०२४ रोजी निदर्शनास आल्याने विभागीय उपसंचालक यांनी दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशनछत्रपती संभाजीनगर येथे तक्रार अर्ज सादर केला.

कार्यादेश देण्यापुर्वी बँकेत शिल्लक रकमेबाबत चौकशी

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल समितीचे इंडियन बँकजालना रोड शाखा येथे बँक खाते आहे. या खात्यावरील शिल्लक निधीतून सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची निविदा प्रक्रीया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कार्यादेश देण्यापूर्वी बँकेत शिल्लक रकमेबाबत चौकशी केली असता समितीच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम कमी झाल्याचे व स्टेटमेन्टमध्ये कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर याचे नावे मोठ्या रकमा ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.

बँकेच्या निष्काळजीपणा

बँकेकडे अधिक चौकशी केली असता आर्थिक व्यवहार हे नेट बँकिंग सुविधेमार्फत झाल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर याने बनावट इ- मेल आयडीद्वारे बँकेस उपरोक्त सुविधा पुरविण्याकरिता बनावट पत्र पाठविले.

बँकेने सदर पत्राची कोणतीही खातरजमा केली नाही. तसेचबँकेत मुळ पत्र नसतांना किंवा विहित नमुन्यातील फॉर्मवर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसतांना नेट बँकिग सुविधा या खात्याकरिता उपलब्ध करून दिली. या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असतांना बँकेने एकदा देखील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यास संपर्क केला नाही अथवा सूचना / माहिती दिली नाही. बँकेच्या या निष्काळजीपणामुळे या अफरातफरीची संधी संबंधित कर्मचाऱ्यास मिळाली असल्याचे दिसून आले आहे.

हर्षकुमार क्षीरसागर याने नेट बँकिंगचा वापर करून मोठमोठ्या रकमा त्याचे स्वतःचे एचडीएफसी बँकेतील खात्यात वळत्या केल्याचे दिसून आले.

एफ.आय.आर. दाखल

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी प्राथमिक तपास करून दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणी एफ.आय.आर. दाखल करून घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यशोदा शेट्टी व त्यांचे पती यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले

दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणी यशोदा शेट्टी व त्यांचे पती यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अद्याप फरार आहे.

Featured post

Lakshvedhi