Tuesday, 5 November 2024

राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात 1,181 मतदान केंद्रे

 राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात

1,181 मतदान केंद्रे

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेतयामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेतशहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावेयासाठी राज्यामध्ये पुणेमुंबईठाणेशहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेततसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेतसहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वरील आचारसंहिता भंगाबाबतच्या 2,452 तक्रारी निकाली दि.

 सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वरील आचारसंहिता भंगाबाबतच्या 2,452 तक्रारी निकाली

दि. 15.10.2024 ते 04.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲप (C-Vigil appवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2,469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2,452 (99.31%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेततसेच आज अखेर एनजीएसपी पोर्टल (NGSP Portalवरील 7,793 तक्रारीपैकी 5,205 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समिती

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियोसंदेश यांचे र्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती ठि करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरण (PRE CERTIFICATIONसाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 90 प्रमाणपत्राद्वारे 628 जाहिरातींना  मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीमुख

 राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्ती

राज्यात दि. 15.10.2024 ते दि. 04.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या  राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसेदारुड्रग्ज  मौल्यवान धातु बाबींच्या एकुण - 252.42 कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहेयामध्ये रोख रक्कम - 63.47 कोटी तर  34,89,088 लिटर दारु ( 33.73 कोटी रुपये किमतीचीजप्त करण्यात आलीड्रग्ज 38,24,422 ग्राम (32.67 कोटी रुपये किमतीचे.) मौल्यवान धातू 14,28,983 ग्राम (83.12 कोटी रुपये किमतीचे ), तर फ्रिबीज 34,634 (संख्या) 2.79 कोटी रुपये किमतीचे आणि इतर 8,79,913 (संख्या) 36.62 कोटी रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे.

निवडणूक पारदर्शकता: राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व

 निवडणूक पारदर्शकता: राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व


निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे. या दृष्टिकोनातून निवडणूक यंत्रणा विविध टप्प्यांवर आवश्यक खबरदारी घेत आहे. मतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो, कारण त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेला अधिक बळ मिळते. म्हणूनच, विविध टप्प्यांवर राजकीय पक्षांचे उमेदवार आणि प्रतिनिधी यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते.


मतदार यादीचे पुनरिक्षण


राज्यभरात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या प्रक्रियेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी संबंधित मतदान केंद्रांच्या मतदार यादीवर लक्ष ठेवतात, ज्यात नवीन मतदारांची नोंदणी, तसेच वगळलेली नावे यांची तपासणी केली जाते. यामध्ये, बुथ लेवल अधिकारी यांना मदत करण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सक्रियपणे सहभागी होतात. जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्या कार्यवाहीचे दस्तऐवजीकरण करून राजकीय पक्षांना आवश्यक माहिती देतात.


राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बैठका घेतल्या जातात. सभेची सूचना राजकीय पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवर त्यांना पाठविली जाते. या बैठकींना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन शंका आणि अडचणी मांडतात. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत शंकांचे निरसन केले जाते. तसेच आवश्यकता भासल्यास भारत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनासाठी पाठविले जाते.


ईव्हीएम प्रक्रिया


मतदान यंत्राबाबत ( ईव्हीएम ) प्रकियेमध्ये राजकीय पक्षांचा वेळोवेळी सहभाग आवश्यक आहे, तशा निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना आहेत. मतदान यंत्र ठेवलेले गोडाऊन उघडण्याच्या वेळेस आणि बंद करण्याच्या वेळेस राजकीय पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाते. ईव्हीएम मशीन्स त्यांच्या समक्ष उघडून सीलबंद करण्याची कार्यवाही केली जाते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत व्हिडिओ शुटींग देखील केली जाते.


आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी म्हणुन जिल्हास्तरावर ईव्हीएम मशिन्स उपलब्ध झाल्यानंतर कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट आणि बॅलेट युनिट यांची संख्या निश्चित करुन निवडणुकीसाठी किती मशिन्स आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणात उपलब्धता निश्चित केली आते.


 ‘फस्ट लेव्हल चेक’ म्हणजे प्रत्येक मशिनची तपासणी करुन ते चालू अवस्थेत आहे की नाही, त्यामध्ये बिघाड आहे काय?, त्यांची सर्व बटने व्यवस्थित काम करत आहेत किंवा कसे? यांची तपासणी केली जाते. ही तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या केंद्र शासनाच्या संस्थेचे अभियंते करत असतात. या तपासणीच्या वेळेस जिल्हा पातळीवर राजकीय पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाते. त्यांच्या समक्ष तपासणीची कार्यवाही पूर्ण करुन मॉकपोल ही प्रक्रिया राबविण्याकरिता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होतात. त्यावर अल्फा, बिटा अशा चिन्हांचा उपयोग करुन एका चिन्हाचे बटन दाबले तर दुसऱ्या चिन्हाची प्रिंट स्लिप निघत नाही याबाबत तपासणी करुन स्थानिक राजकीय प्रतिनिधींची खात्री झाल्यावर ते मशिन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी तयार ठेवले जाते. मॉकपोल झाल्यावर राजकीय पक्षांसमक्ष सर्व मशिन्स गोडाऊन मध्ये सीलबंद ठेवली जातात.


महाराष्ट्र राज्यामध्ये ‘फस्ट लेव्हल चेक’ प्रक्रिया १ ऑगस्टपासून राबविण्यात आली असून मशिन्स सीलबंद करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचेशी चर्चा करुन त्याच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग करुन जतन करुन ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्षांनी स्थानिक प्रतिनिधींमार्फत ‘एफएससी’ प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.


‘एफएससी’ ओके असे स्टीकर लावलेल्या मशिन्सच्या गोडावून मधील एकूण मतदान केंद्र संख्येच्या ५ टक्के मशिन्स प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी वापरण्यात आल्या आहेत. जनजागृती कामासाठी ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर असा कालावधी होता. त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यासाठी त्याच मशिन्स उपयोगात आणल्या जात आहेत. या मशिन्स प्रत्यक्ष निवडणुकीकरिता वापरल्या जाणार नाहीत.


त्यानंतर कमिशनिंग प्रक्रियेवेळी मशिन्सची सिंबॉल लोडिंग ही प्रक्रिया केली जाते. यासाठी दि.१० नोव्हेंबरपासून वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे आणि अशाप्रकारे कमिशनिंग पुढील ४ ते ५ दिवसात पूर्ण होईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींना निमंत्रित करुन त्यांच्या समक्ष कमिशनिंग केले जाते. मॉकपोलमुळे तयार होणाऱ्या ‘व्हीव्हीपॅट’ च्या वोटर स्लीप एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. स्थानिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समक्ष मतदानासाठी सिध्द असलेली सर्व मशिन्स कडेकोट बंदोबस्तात गोडाऊनमध्ये ठेवले जातात.


मतदान अधिकाऱ्यांच्या यादीचे निवडणूक आयोगाच्या परराज्यातील निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये सरमिसळीकरण (randomisation) केले जाते. त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्यास कोणत्या मतदान केंद्रावर निवडणुकीच्या कामासाठी जावे लागणार हे मतदान केंद्रावर जाण्यास पथके निघतात तेव्हाच कळते. त्याचप्रमाणे मतदान केंद्रासाठी कंट्रोल युनिट, ‘व्हीव्हीपॅट’, बॅलेट युनिट यांचे सरमिसळीकरण (randomization) होते आणि कोणत्या मतदान केंद्रावर कोणकोणत्या कर्मचाऱ्याजवळ कोणते मशिन्स जाणार यांचे संगणकाद्वारे वाटप होते. ही प्रक्रिया राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर केली जाते व त्याबाबतचे इतिवृत्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीसह जतन केली जाते. कोणत्या नंबरचे कोणते मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार त्याची यादी उमेदवारांना दिली जाते.


मतदान यंत्र संच घेऊन मतदान पथक मतदान केंद्रावर जायला निघतात, तेव्हा राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर गोडाऊन उघडले जाते आणि सरमिसळीकरण (randomization) नुसार तिन्ही मशिन्स मतदान अधिकाऱ्यांच्या पथकाकडे सुपुर्द केली जातात. प्रत्यक्ष मतदान सुरु होण्याच्या आधी मतदान केंद्रावर उमेदवार किंवा उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी यांच्यासमोर ‘मॉकपोल’ घेतला जातो. मशिन्स व्यवस्थित चालू आहेत की नाही याची खात्री मतदान प्रतिनिधी यांना पटल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली जाते. मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भाग वगळून मतदान अधिकारी यांची सर्व कामे प्रत्येक मतदान केंद्रात उमेदवाराच्या प्रतिनिधी समक्ष घडतात.


मतदान संपल्यावर तिन्ही मशिनचा तपशील मतदान प्रतिनिधी समक्ष तपासला जातो व मशिन्स सीलबंद केली जातात. मतदान यंत्रांच्या वाहतुकीदरम्यान उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी वाहनाचे सिलिंग स्वत: पाहु शकतात. सिलिंग करणे अथवा उघडणे या प्रक्रियेदरम्यान व्हिडिओ शुटींग देखील केली जाते.


मतदानाच्या वेळेस देखील मशिन्स उघडणे व बंद करतेवेळेस उमेदवाराचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीबाबत मतदान यंत्रावरील लावण्यात येणाऱ्या स्लीपवर ते स्वाक्षरी करु शकतात.


मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या पातळीवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी बैठका वेळोवेळी घेण्यात येतात. सदर बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रियेसंबंधी माहिती दिली जाते आणि शंकांचे निरसन केले जाते.


आपल्या महाराष्ट्र राज्याला शांततापूर्ण निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची सवय आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि संबंधित सर्व घटकांचा सहभाग याबाबत प्रत्येक टप्यावर खबरदारी घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुकांना गौरवशाली परंपरा असल्याने सध्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील शांततेने पार पडेल अशी अपेक्षा आणि खात्री आहे.


 


राज्यात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार

 राज्यात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार

 

मुंबईदि. ५ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ पुरुष मतदार२ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदारतसेच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. पुणे येथे ८८ हजार ९३७ दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ४८ हजार ६२६ पुरुष४० हजार ३०१ महिला आणि १० तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ३८ हजार १४९ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये २१ हजार ५७३ पुरुष मतदार१६ हजार ५७३ महिला मतदार आणि ३ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत.

दिव्यांग मतदारांची सर्वात कमी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे ६ हजार ४३ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यामध्ये ३ हजार ७१० पुरुष आणि २ हजार ३३३ महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

राज्यात तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ३९ आहे. सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. एकूण १२ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात १०नांदेड जिल्ह्यात ६ठाणे जिल्ह्यात ३आणि पालघर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी २ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. याशिवाय मुंबई उपनगरलातूरसोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ तृतीयपंथी दिव्यांग मतदार नोंदणीकृत 

सहवास हा चांगल्या व्यक्तीचा आणि चांगल्या गोष्टीचा हवा 🟤*

 *🔴 सहवास हा चांगल्या व्यक्तीचा आणि चांगल्या गोष्टीचा हवा 🟤*

       ========                                                                      


   🍇  *दहा मिनिटे*.. बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व  कष्टपूर्ण आहे, हे कळेल...

          

   🍇     *दहा मिनिटे*.. बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे, हे समजेल...         


   🍇      *दहा मिनिटे*.. 

साधू संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे, असे वाटेल...


     🍇   *दहा मिनिटे*.. राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे, कळून येईल...

        

  🍇      *दहा मिनिटे*..

विमा एजंट समोर बसा, जगण्या पेक्षा मेलेले केव्हाही बरे, असे वाटेल...

        

 🍇   *दहा मिनिटे*.. व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल...

       

 🍇   *दहा मिनिटे*... शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे, हे समजेल...

       

   🍇   *दहा मिनिटे*.. चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे, अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल...

        

   🍇  *दहा मिनिटे*... शेतकरी, कामगार यांच्यासमोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता, असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल...

       

    🍇  *दहा मिनिटे*.. 

सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे, याचा साक्षात्कार होईल...

       

 🍇   *दहा मिनिटे*...

 माऊलींच्या वारीत चाला, आपोआप तुमचा अहंकार, मी पणा गळून पडेल...      

        

🍇   *दहा मिनिटे*.. मंदिरा मध्ये बसा, मनाला मनःशांती मिळेल...   

       

 🍇   *दहा मिनिटे*... लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल...

       

🍇   *दहा मिनिटे*.. 

आई वडिलां सोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल...


*❣️सहवास कुणाचा, हे खूप महत्त्वाचं असतं..!❣️*


 🌹🌹🌹🙋‍♂️🙋‍♂️🌹🌹

शालेय विध्र्थ्यनिही मतदान चे महत्व , जागरूकता........

 


Featured post

Lakshvedhi