Monday, 30 September 2024

कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर 2398 कोटी रुपये वितरित

 कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

एका क्लिकवर 2398 कोटी रुपये वितरित

 

मुख्यमंत्रीदोन्ही उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या हस्ते

मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण

 

मुंबई, दि. 30 : गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित  पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रीमंडळ बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली.  

2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी  34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू पहिल्या टप्प्यात सुमारे 2399 कोटींचे वाटप

 कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू

पहिल्या टप्प्यात सुमारे 2399 कोटींचे वाटप

 

मुंबईदि.30 : 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये 2398  कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

पुणे दि.29: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा 1 चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे तसेच  सोलापूर विमानतळाचे उद्धाटनबिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रउद्योगशैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहेत्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेतआगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

याकार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारकेंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतखासदार डॉ. मेधा कुलकर्णीश्रीरंग बारणेआमदार उमा खापरेयोगेश टिळेकरमाधुरी मिसाळभिमराव तापकीरसुनील कांबळेसिद्धार्थ शिरोळेआश्विनी जगतापआदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

 

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेराज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात 52 टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहेविविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची कार्यवाही करा

पुरंदर विमानतळासाठी लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावेआगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहेअसेही श्री. शिंदे म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी

राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री वयोश्री योजनामुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनामुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी 90 लाख महिलांना लाभ देण्यात आला आहेयाकरीता वर्षभरासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वे कोल्हापूर येथून आयोध्याकरीता सोडण्यात आली असून आगामी काळात राज्यासह पुण्यातून याकरीता प्रयत्न करावेत. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहीलअशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोच्या कामाला गती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपुणे मेट्रोच्या कामाला सन 2014 पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईलअसे नियोजन केले आहेअसेही ते म्हणाले.

पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी 500 वर्ष आपल्या प्रेरणा देत राहीलश्री. फडणवीस म्हणाले.

पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट

पुणे ही सांस्कृतिकतंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक 'मॅग्नेटआहे. पुणे शहर व परिसरात सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहेअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेपुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहेही गोष्ट मान्य करतो. परंतुआगामी 50 ते 100 वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे.

भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्यासाठी राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता 10 कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईलअशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

श्री. मोहोळ म्हणालेकेंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रोआयुर्वेदिक महाविद्यालयनवीन विमानतळाचे टर्मिनलस्मार्ट सिटीचांदणी चौकातील पूलसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसपुणे ते कोल्हापूरपुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेसपुण्यात 33 किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमीकरणाकरीता बेटी-बचावबेटी पढावलखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेतअसेही श्री. मोहोळ म्हणाले.  

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद - मंत्री छगन भुजबळ

 

मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणालेक्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री श्री. भुजबळ म्हणालेमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षणआरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या.  भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आनंद आहेसेही श्री. भुजबळ म्हणाले. 

मंत्री श्री. चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले,  पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठमंडईस्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने  पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहेअसेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमारमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसेपिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

 

0000

 


पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

 पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

 

सातारा दि.२९-पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईआयुष व आरोग्य कुटुंब कल्याण  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत 16 कोटी 25 लाख 56 हजार इतकी आहे. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे 135 लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत 110 मिमी ते 250 मिमी व्यासाची  38.964 किमी. पाईपलाईन असणार आहे.  तर 4,442 घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायत मालकीची तीन मजली इमारत 2001 मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीवर जन सुविधा योजनेतून 50 लाख खर्चून ग्रामसचिवलयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज ग्रामसचिवालयामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांना विविध सुविधा मिळणार आहेत. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखनगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनमुख

 पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

सातारादि. २९: पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनकृषी सहसंचालक उमेश पाटीललोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाईजिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  माती परीक्षण प्रयोगशाळाधान्य व स्वच्छता प्रतवारी केंद्रडाळ प्रक्रिया केंद्रतेल घाणा केंद्र व भात प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. 

जिल्ह्यातील दुर्गम भागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून १६.३३ हेक्टर क्षेत्रावर काळोली येथे बहुउ‌द्देशीय कृषी संकुल उभारण्यात आले. या बहुउद्‌देशीय संकुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४९८ लक्ष रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४९१ लक्ष रुपये वितरित करण्यात आले आहेत. या संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर विविध पिकाचे प्रात्यक्षिक स्वरूपात असलेले निवासी प्रशिक्षणवेगवेगळ्या प्रक्रिया उ‌द्योगांचे प्रशिक्षण आणि माती परीक्षण या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या कृषी संकुलात तालुका बीज गुणन केंद्र काळवली प्रक्षेत्रावर १२.२० हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून सध्या या क्षेत्रावर भातसोयाबीनऊस आणि रब्बी ज्वारी या पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते. पाटण तालुक्यात पिकांच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. येथे भात सोयाबीनऊसभुईमूगसूर्यफूल या पिकांची लागवड करण्यात येते.

कृषी संकुलामध्ये २०० आसन क्षमता असलेले सुसज्ज शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कृषीउमेदमहिला आर्थिक विकास महामंडळग्रामविकास विभाग यांची शेतकरी तसेच महिला बचत गटासाठी प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दहा हजार शेतकरी या कृषी संकुलास भेट देतील.  कृषी संकुलामध्ये पीक उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या माती परीक्षण  प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना माती नमुने तपासण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागणार नाही. या बहुउ‌द्देशीय कृषी संकुलामध्ये पहिल्या टप्प्यात धान्य प्रतवारी केंद्रतेलघाणा औणि भात गिरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर धान्याची प्रतवारी करणे भुईमूगसूर्यफूल इत्यादीचे तेल तयार करणे आणि भात कांडून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. ही केंद्रे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी महाविद्यालयातील वि‌द्यार्थी यांचे मार्फत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रक्रिया केंद्रांमुळे दुर्गम भागातील युवकांना कृषी प्रक्रियेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

काळोलीच्या बीज गुणन केंद्रावर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस प्रात्यक्षिके उपकेंद्राच्या माध्यमातून घेणे प्रस्तावित असून तसा प्रस्ताव महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठात देण्यात येणार आहे. यामुळे पाटण आणि लगतच्या तालुक्यातील उसाचे उत्पादन वाढण्यासाठी उत्तम बियाणे शेतकऱ्याऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी निवासस्थानउपहारगृहशीतगृह या सुविधा प्रस्तावित असून जिल्हा वार्षिक योजनेतून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

0000

    

नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 

सातारादि. २९ : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी आयुष मंत्रालयआरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्रीराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे  उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनशिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशराज देसाईसमितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते.

या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडियामुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहेही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

सातारा (जिमाका), दि.२९ :  महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या  जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिलाशेतकरीयुवकज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतीलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

पाटण तालुक्यातील २८९ कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी   आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसेकरजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेखजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.

सी.एम. म्हणजे कॉमन मॅन असल्याचे समजून कार्य करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. लोकांच्या हाताला काम देण्याचे कार्य शासन करीत आहे. समाजातल्या विविध घटकांसाठी अत्यंत महत्वकांशी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून कार्य करित असल्यानेच महाराष्ट्र आज उद्योगविकासपायाभूत सुविधापरदेशी गुंतवणूक आदी बाबींमध्ये अग्रेसर आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया योजनेमुळे महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. ही योजना कधीही बंद न होता टप्प्याटप्प्याने यामध्ये मिळणाऱ्या निधीत वाढ होत राहिल. वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजनाशेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून  १२ हजार रुपये देण्यात येत असलेली शेतकरी सन्मान योजनाराज्यातील युवकांना हाताला काम देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण भत्ता देण्यात येत असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाशेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पावर मोफत वीज योजना१ रुपयात पीक विमा योजनामुलींना मोफत शिक्षण योजनाज्येष्ठांसाठी वयोश्री योजनातिर्थदर्शन योजना यासारख्या अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळे राज्याच्या व सामान्य माणसांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील.

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन चालणारे राज्य आहे. येणाऱ्या शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभा करुन त्यांना अभिवादन करण्यात येईलअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाटण येथे मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवारायांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्याच धर्तीवर पाटण येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेपाटण तालुका डोंगरदऱ्यामध्ये विखुरलेला आहे. यापूर्वी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी फार बिकट अवस्था होती. या तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले. जिल्ह्यातील जल पर्यटनाला चालना देण्याचे काम करण्यात आले. तारळी नदी उपसा सिंचन प्रकल्पातील पाणी  १०० मीटरपर्यंत पोहोचवले. मोरणा गुरेघरच्या उजव्या- डाव्या कालव्याला बंदिस्त पाईप लाईन करण्याचे काम दोन दिवसात सुरू होईल.  नाटोशी हे संपूर्ण गाव आणि वाड्या- वस्त्या पाण्यापासून वंचित होत्या. त्यासाठी जलसिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होईल.

पाटण तालुक्यातील नाडेगावात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहेही अभिमानाची बाब आहेअसे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेडोंगरी भागातील विकासासाठी पूर्वी मंजूर केलेला २०० कोटींचा आचार संहितेपूर्वी  निधी मिळाल्यास कामे सुरु करता येतील.  यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपये दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली , ता.पाटण ५ कोटीच्या कामांचा लोकार्पणनाडे ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पणवाटोळे ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ९४ कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भुमिपुजन, तारळी प्रकल्पामधील ५० व १०० मी उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या ७९ कोटींच्या कामांचे लोकार्पणपाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजनमल्हारपेठ येथील ग्रामसचिवालय नूतनीकरण इमारतीचे लोर्कापण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

Featured post

Lakshvedhi