Friday, 26 July 2024

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा

सुधारित कार्यक्रम जाहीर

            मुंबईदि. २६ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहेअशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून2024 रोजीचे पत्रान्वये दि.1.7.2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्रभारत निवडणूक आयोगाने  आज दि. २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असूनसुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहेतो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणीमतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरणमतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणे०१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - २५ जून ते १ ऑगस्ट २०२४.

            एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- २ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २ ते १६ ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- २७ ऑगस्ट २०२४.

पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी

 पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळचिखल दूर करण्यासाठी

युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी

                                                         -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी

नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

            मुंबईदि. २६: पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोडसंचयनी पुलाजवळील पाटील इस्टेटएकता नगरफुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखलगाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचेशेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

            पुण्यातील सिंहगड रोडसंचयनी पुलाजवळील पाटील इस्टेटएकता नगरफुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

            घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावीअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            पुराचे पाणीचिखल यामुळे परिसरात रोगराई पसरू नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

0000


गड आला पण सिंह गेला

 


वैसे आपको एक और जानकारी दे दी जाए

 आप को लगेगा अजीब बकवास है, किन्तु यह सत्य है👉🏻


पिछले 68 सालों में पीपल, बरगद और नीम के पेडों को सरकारी स्तर पर लगाना बन्द किया गया है।


पीपल कार्बन डाई ऑक्साइड का 100% एबजॉर्बर है, बरगद 80% और नीम 75 % ।


इसके बदले लोगों ने विदेशी यूकेलिप्टस को लगाना शुरू कर दिया, जो जमीन को जल विहीन कर देता है...


आज हर जगह यूकेलिप्टस, गुलमोहर और अन्य सजावटी पेड़ो ने ले ली है ।


अब जब वायुमण्डल में रिफ्रेशर ही नहीं रहेगा तो गर्मी तो बढ़ेगी ही, और जब गर्मी बढ़ेगी तो जल भाप बनकर उड़ेगा ही ।


हर 500 मीटर की दूरी पर एक पीपल का पेड़ लगायें, 

तो आने वाले कुछ साल भर बाद प्रदूषण मुक्त भारत होगा । 🌳


वैसे आपको एक और जानकारी दे दी जाए ।


पीपल के पत्ते का फलक अधिक और डंठल पतला होता है, जिसकी वजह शांत मौसम में भी पत्ते हिलते रहते हैं और स्वच्छ ऑक्सीजन देते रहते हैं ।


वैसे भी पीपल को वृक्षों का राजा कहते है ।

इसकी वंदना में एक श्लोक देखिए ।


मूलम् ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेवच।

पत्रे-पत्रेका सर्वदेवानाम, वृक्षराज नमस्तुते।।


अब करने योग्य कार्य ।


इन जीवनदायी पेड़ों को ज्यादा से ज्यादा लगाने के लिए समाज में जागरूकता बढ़ायें ।

बाग


रेबीज cha जन्म

 *...रेबीज लसचा जन्म...*


जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..

फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली..

किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘लुईस.’


निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली..

निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...

महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..


पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘लुईस पाश्चर’ 

लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...


मदतनीस रक्सच्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..


या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं..

हेच इंजेक्शन सश्याला दिलं ते तर बिचारं पॅरालाईज होत काही क्षणात मरून गेलं..

यावरून एक गोष्ट मात्र लक्ष्यात आली ही ‘लाळ’ जीवघेणी आहे..


लुईसच्या या प्रयोगशाळेत दिवसरात्र भुंकणारे कुत्रे त्यांची काळजी घेणं-ते चावणार नाही याची काळजी घेणं-लाळ जमा करणं असं क्लिष्ट काम चाललं होतं..


मदतनीस रक्सनं पाश्चरना एक निरिक्षण सांगितलं ते म्हणजे ‘या लाळेचा संसर्ग थेट मेंदूवर परिणाम करतो.’

यावर प्रयोग करूयात म्हणजे लाळेचं इंजेक्शन शरीरात इतरत्र देण्यापेक्षा थेट डोक्यात देऊन बघितलं तर?

‘छे छेऽऽ’ पाश्चरनं त्याला थेट नकार दिला..

मानेल तो रक्स कसला? पाश्चर सुट्टीवर जाताच भावानं देऊन टाकलं दोन हेल्दी कुत्र्यांना हे लाळेचं इंजेक्शन

दोन आठवड्यातच हे दोन्ही कुत्रे दगावले..

रक्स थोडा हैराण झाला..आता पाश्चर रागावणार..


पाश्चर सुट्टीवरनं परतले..त्यांनी रक्सचं कांड ऐकलं 

आणि त्यांनी ते ऐकून त्याला चक्क ‘शाबासकी’ दिली..

हे सिद्ध झालं होतं की लाळेतला विषाणु थेट मेंदूवर हल्ला करतो..


अश्यातच एक आधीच पिसाळेला (?) कुत्रा त्यांच्या प्रयोगशाळेत आणला..त्याला त्यांनी ते लाळेचं इंजेक्शन दिलं आणि ‘मरण’ तर दूर हा कुत्रा चक्क हळूहळू बरा होऊ लागला..

बघता बघता त्याची सगळी लक्षणं नाहीशी झाली थेट तसंच जसं आधी सर्दी खोकला होतो-वाढतो-आपोआप कमी होतो..


याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते..

आजारी कुत्र्यात पण ती तयार झाली होती..


पाश्चरनी ही संधी हेरली..या कुत्र्यात विषाणुविरुद्ध ॲंटिबाॅडी तयार झाल्या होत्या,ते बचावलं होतं आता वेळ होती ‘लस’ बनवायची..


पाश्चरनं प्रयोगशाळेतील चारपैकी दोन कुत्र्यांना लाळेचं इंजेक्शन दिलं ते वाचले इतर दोन गेले..

पाश्चरना वाटलं फ्रान्समधल्या यच्चयावत कुत्र्यांना हे इंजेक्शन द्यावं म्हणजे सगळे सुरक्षित होतील..

सल्ला महाग होता आणि श्वानप्रेमीही ‘सरसकट लस द्यावी की नको?’ या संभ्रमात होते..


विचारविमर्श झाला (फ्रान्स होतं म्हणून,आपल्याकडं एव्हाना मिडिया ‘पिसाळली’ असती) त्यातनं असं ठरलं की थेट कुत्र्यांना लस देण्याऐवजी त्यांनी ज्यांना चावा घेतला त्या माणसांना ही लस दिली तर?


हे लाॅजिकल होतं,तसंही पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्या घेतल्या लागलीच काही होत नाही विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच..


पण इथंही एक समस्या होती आतापर्यंत असा प्रयोग माणसावर थेट कधीच झाला नव्हता,तो कसा व्हावा?

कुत्रा माणसाला चावल्यावर..

पण जाणुनबुजून कुणी कुत्र्याकडून कसं चाववून घेईल? 


‘सर्किट’ नसेल तो शास्त्रज्ञ कसला..

अहो फक्त ‘पॅशन’ नाही तर एक ‘वेड’ असावं लागतं एखाद्या गोष्टीपाठी लागण्यासाठी..

पाश्चरनं पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालायची तयारी केली पण तेवढ्यात शेजारच्या खेड्यातून ‘जोसेफ’ नावाच्या एका दहा वर्षीय मुलाला कुत्रा चावल्याची बातमी आली..

जोसेफची आई त्याला पाश्चरकडं घेऊन आली..

पाश्चरनं जोसेफला लस दिली..जोसेफ वाचला..तारीख होती ६ जुलै १८८५.


हळूहळू ही बातमी जगभर पसरली..जगभरातून पत्रांचा वर्षाव झाला..चर्चा झाल्या..

रशियात एके दिवशी एकोणीस शेतकऱ्यांना कोल्हा चावला..सगळे थेट पॅरीसला जाऊन धडकले..

प्रारंभी भाषेची जरा अडचण जाणवली पण ‘वेदनेची आणि सहवेदनेची’ एक वेगळी भाषा असते..

शेतकऱ्यांसाठी लसी तयार करण्यात आल्या सगळे वाचले..


त्याआधी अश्या हल्ल्यात अनेक लोकं दगावायचे..

रशियाचा राजा ‘झार’ पाश्चरवर खूष झाला त्यानं पाश्चरला थेट रत्नजडीत बक्षिस पाठवलं आणि संस्थेच्या स्थापनेसाठी पैसेही..


बालपणी शाळेत मंद-मठ्ठ म्हणून ज्याला हिणवलं गेलं त्यानं जगाची रेबिज-काॅलरा-ॲंथ्रक्स पासून सुटका करत पाश्चरायजेशनसारखी प्रक्रिया जगाला दिली..


विचार करा एकदा ‘रेबिज’ झाला की आजही औषध नाही..रेबिजनं होणारा मृत्यू हा सगळ्यात दयनीय आणि भयावह असावा..लस शोधून पाश्चरनी या जगातल्या असंख्य प्राणीमात्रांवर अनंत उपकार करून ठेवलेत..


खऱ्या अर्थानं ‘महामानव’ असलेल्या या शास्रज्ञाचा आज स्मृतीदिन..


 *विनम्र आदरांजली* 💐


सुयश साठी

 *१. गगनभरारीचं वेड*

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

*२. झुंज*

वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

*3.संघर्ष कुठपर्यंत?*

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते

दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा

 दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल

समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा

       - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

          मुंबई, दि.25 : दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावेयासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15 ऑगस्टपर्यत अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा,असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिले.

          आज मंत्रालयात दिव्यांग विद्यापीठ निर्मितीसंदर्भात मंत्री उच्च व तंत्रशिक्षण श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडूउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकारअध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापण्याच्या आवश्यक सोयीसुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सविस्तर अहवाल १५ ऑगस्ट २०२४ पर्यत  राज्य शासनाकडे  तातडीने  अहवाल सादर करावाहा अहवाल  मंत्रिमंडळासमोर  ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर लवकरच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi