Wednesday, 10 July 2024

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमातून 11 दिवसांत 5 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

 'आरोग्याची वारीपंढरीच्या दारीउपक्रमातून 11 दिवसांत

5 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

            मुंबईदि. ९ : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारीपंढरीच्या दारीहा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

            संत ज्ञानेश्वर महाराजसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेतयासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारीपंढरीच्या दारीहा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारीकर्मचारी वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून २,३२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग तयार केला आहेत. येथे ऑक्सिजन मॉनिटरऔषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

            या आषाढी वारीमध्ये डॉक्टरनर्सआरोग्य सहाय्यकआशाआरोग्य सेवकशिपाईसफाईगार असे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना’ आहे. यासह तापसर्दीखोकलाड्रेसिंगजुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली आहे. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे. 

            फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे.

'आरोग्याची वारी.. पंढरीच्या दारीउपक्रम थोडक्यात

            प्रत्येक ५ किमी अंतरावर आपला दवाखाना’ :२५८वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४ बाय ७ उपलब्ध : ७०७,  दिंडी प्रमुखांसाठी वितरीत केलेले औषधी कीट : ५८८५महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ : १३६पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना : १३६पालखी मार्गावर आरोग्य दूत : २१२पालखी सोबत माहितीशिक्षण व संदेशवहन चित्ररथ : ९पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष : ८७आरोग्य शिक्षण व संवादावर आधारित आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.

सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता

 सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधानभवनात माध्यम प्रतिनिधींचा सत्कार

            मुंबईदि. ९ : सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

            विधानभवनातील दालनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीविविध बातम्यांची शासनस्तरावर तत्काळ दखल घेवून कार्यवाही देखील केली जाते. शासनाच्या योजनानिर्णय आणि विधिमंडळाचे कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून तसे सहकार्य देखील मिळते. परंतुब्रेकिंग न्यूजबरोबर सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे. सकारात्मक बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये आशाआनंद निर्माण होण्यास मदत होते. विकासात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांचे कल्याण होईल, असे कार्य माध्यम प्रतिनिधींनी करावेअसे आवाहनही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

            यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छपुस्तक देवून सत्कार केला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना स्मृतीचिन्ह भेट देवून आभार मानले.

            या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडेमुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप चव्हाणटी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधवराजेंद्र हुंजे यांनी मनोगत व्यक्त करुन सत्काराबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले.

            प्रास्ताविक उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब यांनी केले.

००००

Tuesday, 9 July 2024

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी

 बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची

फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

           

            मुंबईदि. ९ : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर२०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.

            महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेलअशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कलावाणिज्यविज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावीअसा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्टीकरण केले.

            राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी  १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य प्राप्त

 चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणी

दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य प्राप्त

- कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

 

            मुबंईदि. ९ : नागपूर येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज प्रा.लि. धामणा या कारखान्यामध्ये सेप्टी प्युज व मायक्रो कॉर्डचे (फटाक्यांची वात) उत्पादन पॅकिंगचे काम सुरु असताना झालेल्या स्फोटातील दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.

            यासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री.खाडे  बोलत होते.

            या अपघातात मृत झालेल्या कामगारांच्या वारसास प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसान भरपाई डिमांड ड्राप्टद्वारे देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ९ मृत कामगारांच्या वारसांकरिता प्रत्येकी १० लाख असे एकूण ९० लाख अर्थसहाय्य जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्या वारसांची नोंद झाल्यावर त्यांना ही रक्कम दिली जाईल, असे मंत्री श्री.खाडे यांनी सांगितले.

            त्याचप्रमाणे  कारखान्यात झालेल्या अपघाताच्या चौकशी दरम्यान फटाक्यांच्या वातींचे उत्पादन प्रक्रियेकरीता व्यवस्थापनाने परवानगी न घेता काही रोजंदारी कामगांराना कामावर ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे  परवानगी न घेता कामगार संख्येत वाढ केल्याबाबत भोगवटादाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाकडून कारखान्याचे भोगवटादार व व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली होती. तसेच केंद्र शासनाच्या पेट्रोलियम ॲण्ड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन विभागाच्या चौकशी अहवालानुसार फटाक्याच्या वातीचे बंडल्स इलेक्ट्रीक सिलींग मशीनद्वारे पॅकिंग करताना आग लागून स्फोट झाल्याचे नमूद केले आहे. परंतु नियमानुसार या कंपनीत कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक इक्पिमेंट वापरण्यास कायद्याने मनाई असतानाही ती वापरल्याचे आढळून आले आहे. नियम भंग केल्यामुळे त्यांच्यावर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच कारखान्याचा उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला असून तो कायमस्वरुपी बंद करणेबाबत कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत कामगार विभागाने अशा प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे सर्वेक्षण केल्याची माहिती मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी दिली.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून अशा कारखान्यांची केलेली पाहणीत्या संदर्भात घेतलेली दक्षता याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना यावेळी दिल्या.

            या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविक्रम काळेभाई जगतापसतेज पाटील, अभिजीत वंजारी आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची

 पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची

पुनर्रचना ही राज्याच्या हिताची

                                                     - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

            मुंबई, दि. ९ : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय हा राज्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे. यामध्ये कोणाच्या काही शंका असल्यास त्या दूर केल्या जातील, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

          यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले कीपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची आहे यामध्ये ज्या संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे त्यांचे मुद्दे देखील मंत्रीमंडळासमोर मांडून त्याला मान्यतेसाठी सादर केले जातील. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सक्षमीकरण होवून नवीन पदे निर्माण होतील. यातील लाभधारकांना काही शंका आहेत त्यांच्याशी चर्चा करून व्यापक व सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.

          या प्रश्नाच्या चर्चेत सर्वश्री अभिजित वंजारी, सतेज पाटील, सुरेश लाड यांनी सहभाग घेतला.

0000

दुष्काळग्रस्तांना निधी वेळेत वाटप करणार

 दुष्काळग्रस्तांना निधी वेळेत वाटप करणार

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

            मुंबई, दि. ९ : दुष्काळग्रस्तांना मंजूर केलेला निधी वाटप करण्यासाठी शासन कार्यवाही करत आहे. दुष्काळग्रस्तांना जी मदत शासनाने जाहीर केली आहे त्या शेतकऱ्यांना हा निधी वेळेत वाटप करणार असल्याचे विधानपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

          यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी शासनाला आवश्यकता भासल्यास मुदत वाढवली जाईल. आतापर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून ईकेवायसीची मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत केली जाईल. एन.डी.व्ही.आय. (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार हे ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. जिरायत, बागायती पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत करत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीच्या निकषापेक्षा जास्त मदत दिली जात आहे, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            या प्रश्नाच्या चर्चेत विराधी पक्षनेते अंबादास दानवेविधानपरिषद सदस्य सतेज पाटीलविधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकसित होवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून

कौशल्य विकसित होवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील

- मंत्री चंद्रकात पाटील

            मुंबईदि. ९ :  राज्यातील युवक-युवतींचे  कौशल्य विकसित व्हावे,व्यवसाय करण्याची आवड निर्माण व्हावी  यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना शासन राबवत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            यासंदर्भात विधानपरिषद नियम ९३ अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचना उपस्थित केली होती.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित करणेव्यवसाय करण्याची आवड निर्माण करण्यासाठी ही योजना शासन राबवत आहे. या योजनेसाठी शासनाच्या दहा पॉलिटेक्नीकल इंजिनीअरींग कॉलेजना ५३ कोटी ६६ लाख रूपये मंजूर केले आहेत. सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) देखील तयार करत आहोत. लवकरच ही केंद्र सुरू होईल. प्रत्येक भागाची गरज लक्षात घेवून तसे अभ्यासक्रम तयार केले जातील तसेच उपलब्ध मनुष्यबळाला सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि त्यांना रोजगार देखील प्राप्त होईल असा या योजनेचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही नवीन कौशल्य विकास निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावे, असेही सांगितले आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचावी यासाठी ५० हजार योजनादूत नेमले जाणार आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देतानाच त्यांतर्गत हे योजनादूत नेमले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत असेल. हे योजनादूत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिध्दी करतील. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर आदी तरूणांना रोजगार प्राप्त होणार आहेत असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

0000

Featured post

Lakshvedhi