Monday, 8 July 2024

पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील

 पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि. : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन आणि हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी पुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहीलअसा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला.

 

            सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम शिंदेगोपीचंद पडळकरसत्यजित तांबे आदींनी सहभाग घेतला.

 

            मंत्री श्री.पाटील म्हणाले कीपालघर जिल्ह्यात लाख 45 हजार 697 कुटुंब संख्या असून सुमारे 85 टक्के नळ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत 562 पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 26 अशा एकूण 588 योजना घेण्यात आल्या आहेत. यापैकी 92 योजनांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत जेथे योजना पूर्ण झाल्या आहेत त्या गावांमध्ये यावर्षी टँकर सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

            पालघर जिल्ह्यातील मोखाडाजव्हारविक्रमगड व वाडा तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम क्षेत्रात वसलेला असून भूपृष्ठ खडकाळ असल्याने काही भागातील पाणी धारण क्षमता अत्यंत अल्प असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून भूजल पातळी खाली जाते. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे टंचाईची समस्या निर्माण झाली असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. जल जीवन मिशनच्या कामांबाबत जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यावर भर; भाडेतत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

 स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यावर भर;

भाडेतत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. : शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात 16,885 अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातीलअसेही त्यांनी सांगितले.

 

            राज्यातील अंगणवाड्यांबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री सत्यजित तांबेज्ञानेश्वर म्हात्रेगोपीचंद पडळकरजयंत पाटीलसुनील शिंदे आदींनी भाग घेतला.

 

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीराज्यात लाख 10 हजार 556 अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी 72,379 केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत. ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा 8084 नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्याठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

            मुंबईतील झोपडपट्टीमध्ये 5147 अंगणवाडी केंद्र आहेत. महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण अंगणवाडी केंद्रांपैकी 20 ते 25 टक्के केंद्र महिला व बालविकास विभागांतर्गत आहेत. इतर केंद्र महानगरपालिकेमार्फत सुरू आहेत. अंगणवाडी केंद्राचा सर्व मुलांना लाभ व्हावा यासाठी शासन आणि महानगरपालिकेमार्फत एकत्रित प्रयत्न करण्यात येतील. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नसेल अशा ठिकाणी सुविधा असलेल्या कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याचे धोरण आहे. एसआरएमधील जागा उपलब्ध होण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील भाडेतत्वावरील अंगणवाडी केंद्रांच्या भाड्याच्या रकमेत चार हजार वरून आठ हजारअ वर्ग नगरपालिका क्षेत्रात तीन वरून सहा हजार, तर ग्रामीण भागातही भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.  

 

            अंगणवाडी केंद्राच्या जागेत स्वच्छता असावीतसेच भाड्याच्या जागेसाठी रेडीरेकनर प्रमाणे भाडे द्यावेअशी सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

 

मुंबई महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबईत ३०० मिलिमीटर एवढा पाऊस नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य ; सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

 मुंबई महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईत ३०० मिलिमीटर एवढा पाऊस

नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर

होल्डिंग पाँडस्मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

                                                         - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ८ : हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभागमुंबई महानगरपालिकारेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहलमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्गरेल्वेप्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला.  या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टीसायन याभागात पाणी साचले.. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पंप बसविले आहेत.

            एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या होल्हिंग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवेहिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            सकाळपासून आपण रेल्वेमुंबई महानगरपालिकाराज्य आपत्ती नियंत्रण कक्षमुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतोअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

0000

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे

सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 

            मुंबईदि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्हयांच्या सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे.

           राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्वअशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने,उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्रयोगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीटी प्रणालीव्दारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.

          ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.


महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार

 महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्यपुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकृषी मंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार

            मुंबई दि 8:- माजी सरन्यायाधीशकेरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार  समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 यावर्षाचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्यपुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या 'ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह'मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ॲग्रीकल्चर टुडे च्या वतीने या पुरस्काराची सुरुवात सन 2008 पासून करण्यात आलेली आहे.

            महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षासर्वात मोठी बांबू लागवडतृणधान्य अभियानऔष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्पपंधानमंत्री किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्यत्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरणसूक्ष्म बाजरी कार्यक्रमडाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थानतसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

            कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.

            ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरीयांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानब्राझीलअल्जेरियानेदरलँड इत्यादी देशांचे राजदूततसेच महाराष्ट्रउत्तर प्रदेशहरियाणाहिमाचल प्रदेशनागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.

            सन 2008 पासून या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषीमंत्री शरद पवारकेंद्रीय मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानअखिलेश यादवदिवंगत नेते प्रकाश सिंह बादलवर्गीस कुरियनएम. एस. स्वामिनाथन इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आलेला असून स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

            2023 करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022 करिता तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे

 मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कसज्ज रहावे

                                                     - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 8 : राज्यात सर्व दूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे.या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नयेअसे आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 9 जुलै रोजी मुलुंडला आयोजन

 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार

मेळाव्याचे 9 जुलै रोजी मुलुंडला आयोजन

 

          मुंबईदि. ८ : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवर ९ जुलै २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामिठागर रोडठाकूरवाडीमुलुंड (पूर्व)मुंबई - ४०००८१ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या कौशल्य रोजगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात  मुंबई जिल्ह्यातील सीआयआय (CII), शिंडलर (Schndilar), महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेडपेटीएममॅजिक बसचाणक्य स्टाफिंगएमईपी इन्फ्रॉस्ट्रक्चरएलआयसीएड्रॉमेडा सेल्स अॅन्ड डिस्ट्रीब्युशन प्रा. लि.बीटीडब्लू व्हीसा सर्व्हिस प्रा.लि.युवा शक्ती प्रा.लि. यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असूनत्यांच्याकडील रिक्त पदांसाठी मुलाखती होणार आहेत त्यानुसार त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास शासनाचे विविध महामंडळाच्या कर्जाच्या योजनेबाबत महामंडळाचे प्रतिनिधी माहितीसह उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १० वी नापास /१० वी पास/१२ वी पास/आय.टी.आय/पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावेअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi