Sunday, 30 June 2024

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 - उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबई,दि.29 : मुंबईत मोठ्या प्रमाणात एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            याबाबतची लक्षवेधी सदस्य  प्रसाद लाड यांनी मांडली होती.

        मंत्री श्री.सामंत  म्हणाले कीमुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंगूने झाले होते यंदा डेंगूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंगू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक विभागही डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

        पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्याअनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

0000

 

८ व्हा आपली शाळा

 तिसरा अंतरा ऐकला अन अंतरबाह्य हललो.अप्रतिम - nostalgic.ज्यांनी मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे,त्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.धन्य ती माझी मराठी शाळा👌😭🙏


नागरिकांनी रस्ते अपघाताबाबत ९८३३४९८३३४,९५०३२१११००,९५०३५१११०० या महामार्ग सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा,

 रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबईदि.29 :  राज्यात विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            विधानभवनात आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे ड्रंक आणि ड्राईव्ह रस्ता सुरक्षा याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवारराज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या कीरस्ते अपघाताची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी पोलिस विभाग आणि परिवहन विभाग यांनी सायंकाळी सहा ते ते रात्री बारा वाजेपर्यंत

संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी. त्याचे सूक्ष्म नियोजन करतानाच मद्यपाशन करून वाहन चालविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. विशेषत: मोठमोठ्या शहरालगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू दुकानअवैध धाबे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अल्पवयीन वाहन चालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई करावी.

            पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच वाहतूक नियमांची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावणे आवश्यक आहे. ठिकठिकाणाच्या सिग्नल यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी. ग्रामीण भागात नागरिकांच्या सोयीसाठी सिग्नल यंत्रणेचे सुलभीकरण करावे. ग्रामीण भागात एसटी बसस्थानकाच्या ठिकाणी सूचना फलक  आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याची कार्यवाही करावी.

            नागरिकांनी रस्ते अपघाताबाबत ९८३३४९८३३४,९५०३२१११००,९५०३५१११०० या महामार्ग सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले.

            परिवहन आयुक्त श्री.भीमनवार यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.तसेच यावेळी बोलताना जास्तीत जास्त अपघात हे संध्याकाळी ६ ते ९ आणि ९ ते १२ च्या सुमारास होत असून, आपण अपघात झालेल्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट शोधत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी बोलताना रवींद्रकुमार सिंगल (पोलीस आयुक्तनागपूर) यांनी सांगितले की११२ आणि १०८ हेल्पलाईन संदर्भात जागृती मोहीम करण गरजेचे असल्याचे  सांगितले.

तर प्रवीण पवार (पोलिस आयुक्तछत्रपती संभाजीनगर) यांनी बोलताना संभाजीनगर मधील अपघातच प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाले असल्याचे सांगितले. ब्लॅक स्पॉट संदर्भात पाहणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले

            यावेळी बैठकीत बोलताना  अधिकारी मनोज पाटील (अतिरिक्त आयुक्त,पुणे) यांनी आतापर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील १६८२ लोकांवर कारवाई केल्याचे सांगितले.तसेच पुढच्या तीन महिन्यांत ब्लॅक स्पॉट शोधून अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी लाडकी बहिण योजना

 


सत्संग आणि आई ....*

 *सत्संग आणि आई ....*


दुपारच्या निवांत क्षणी फोन वाजला. स्क्रीनवर "आई" नाव वाचून मी सुखावले. आईबरोबर गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानी. हा आनंदाचा ठेवा लुटायला मी नेहमी अधीर असते. 


माहेर दूर असल्याने प्रत्यक्ष भेटीचे योग दुर्लभच, त्यामुळे ह्या शब्दभेटीवर आम्ही मायलेकी समाधान मानतो.

        

ख्याली खुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, अगं, नुकतंच *गुरुचरित्राचे कथाप्रवचन* ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत. ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला.

        

आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश.

 

*गुरुभक्ती, नामसाधना, सत्संग*


असे अनेक विषय तिच्या रसाळ गप्पांतून मला प्रसन्न बनवत होते. आई सांगत होती, 


समोरच्या 'श्रावणधारा' हौसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती - श्रद्धा यांचे दाखले देत किर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी - जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना,

        

श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतां पती-पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ. कडे आलेली ही केस.

        

साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषां प्रमाणे दाढी - मिशा येत होत्या. दाट दाढी आणि मिशा.

       

ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित, तज्ज्ञ स्टाफ. माहेरही तसेच वेल एज्यूकेटेड. दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली. 


अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित. उपाय दिशाहीन. 

       

पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढी-मिशी सारखी ही दाढीमिशी रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला आँफिसला जावे लागे. कोणी तरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली,आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या. 


ह्या उच्चपदस्थ ,स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडी परिक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.

        

सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मन मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, "हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला, 


त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बॉस ही तुमची प्रतिमा. कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार. कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील. तो ताणतणाव, बॉसचा एटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या नसानसात भिनलाय.

        

खरं तर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरूषी स्वभावाचे लक्षण आहे. *स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म* तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे दडपले आणि ऑफिस-रूटीनचे पुरूषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; 


की २०-२२ वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे *हार्मोन्स* बदलले. 'स्त्रीत्व' संपून ते 'पुरुषी' बनू लागले. त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढी-मिशा.


बाई दचकल्या. हे निदान अनपेक्षित होतं तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, "यावर उपाय आहे, 


तुमचा अँटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना, पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला. 'स्त्री' सारख्या दिसा.


केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा.


बाई स्तंभित. डॉक्टरांनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दिड महिन्यात फरक जाणवला. दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ.

         

डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नाँर्मल झाल्या.

         

आई थांबली, म्हणाली, घटना ऐकताना मला तुझी आठवण आली. तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली.

         

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी.

         

*सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला* धन्यवाद देत मी फोन ठेवला.

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

 मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबई, दि. २९ : हेचि दान देगा देवा...तुझा विसर न व्हावा....विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

            वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्ररथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा प्रारंभ आज मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्थाअस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी प्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरेविभागाच्या उपसचिव नंदा राऊत यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीइतरांनी हेवा करावा अशी राज्याची परंपरा आहे. वारकऱ्यांचे भाव पाहिले की कळते जगात सर्वात सुखी वारकरी आहेत. आस्था आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या पंढरपूरच्या वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरपूरची वारी होय. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी देशातून आणि परदेशातून भक्त येत असतात. या चित्ररथांद्वारे संत सखूसंत निर्मलासंत कान्होपात्रासंत जनाबाईसंत मुक्ताबाईसंत महदंबा या स्त्री संतांची महती त्यांच्या अभंगांद्वारे भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पोवाडापथनाट्य आणि भारूड या कलाप्रकारांच्या माध्यमातून भक्तगणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजनाआपत्ती आल्यास घ्यावयाची काळजीशासकीय मदत यासंदर्भातील माहिती चित्ररथामार्फत देण्यात येणार आहे.

            कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण...नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा....या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या संत केशवदास यांच्या रचनांवर कलापथकाने सादरीकरण केले. 'ज्ञानेश्वर महाराज की जयतुकाराम महाराज की जयया गजरात मंत्रालय परिसर दुमदुमला होता. पृथ्वी थिएटरच्या कला पथकातील २४ कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. शाहीर यशवंत जाधव यांनी अभंग सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 

            मुंबईदि.२९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

            ही बाब केवळ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे. किल्ले रायगड येथे असलेल्या शिलालेखावर राज्याभिषेकाची तारीख नसून तिथी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा उल्लेख करण्यात आलेला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदनातून दिली.

             याबाबत विधानसभा सदस्य  जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला

Featured post

Lakshvedhi