Sunday, 30 June 2024

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

 जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. २९ : सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृष्यमान होणाऱ्या जाहिरात फलकांचे ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. याबाबत तज्ञांची नावेकाही सूचना आल्यास त्याचा स्वीकार करण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

            घाटकोपरमुंबई येथे १३ मे २०२४ रोजी महाकाय जाहिरात फलक पेट्रोलपंपावर कोसळून झालेल्या अपघाताबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले कीभविष्यात अशी घटना घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील असून डिजीटल होर्डींग्ज संदर्भातही सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या अपघातात जखमी व्यक्तींपैकी ज्या १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा जास्त उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.१६ हजार प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी एकूण रु.२ लक्ष १६ हजार इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जखमी व्यक्तींपैकी १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा कमी उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.५ हजार ४०० प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या अपघात ग्रस्तांपैकी १७ मृत व्यक्तिंच्या वारसांना राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.५ लाख या प्रमाणे एकूण रु.८५ लाखराज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु. ४ लाख याप्रमाणे एकूण रु.६८ लाख व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यानुसार मृत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी रु.११ लाख इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

            या अपघाताच्या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त अहवालातील निष्कर्षांच्या आधारे शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीद्वारे पुढील चौकशीची कार्यवाही सुरु आहे तसेचतत्कालीन पोलीस आयुक्तलोहमार्ग मुंबई यांच्याकडून प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे निर्दशनास आल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे. संबंधित घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकास परवानगी घेणे अनिवार्य आहे. शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता नियमन व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उचित कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती, श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

            या चर्चेत सदस्य सुनील शिंदेजयंत पाटीलशशिकांत शिंदेअनिल परबभाई जगतापअभिजित वंजारीसचिन अहिरआदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/


महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

 महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम

शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

-   सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे 

 

            मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणा-या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावेअसे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईलअसे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

            राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहेयासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

            श्री. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थानेसंताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामीजोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड)माहूरअक्कलकोटगाणगापुरनरसोबाची वाडीऔदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे.यातुन वेळेचीइंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईलअशी माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावीअसे सूचित केले.

            या लक्षवेधीत सदस्य  शशिकांत शिंदे,भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 

0000

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            पुणेदि. : २९: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी खासदार श्रीरंग बारणेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेनगर परिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेआळंदी संस्थानचे पदाधिकारीनगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना  छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो व निधी  मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.

000


 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन 'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान








 

            पुणेदि.२९ :  टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी....  'ज्ञानोबा माऊली', 'माऊलीमाऊलीचा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावनहाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

            आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळखासदार श्रीरंग बारणेप्रधान सचिव प्रवीण दराडेविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलप्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजननगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापविश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथविश्वस्त डॉ.भावार्थ देखणेगुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार - आरफळकरह.भ.प राणा महाराज वासकरह.भ.प संग्राम बापू भंडारे महाराज आदी उपस्थित होते.

            मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळाअनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

            अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिकसांस्कृतिक परंपरा असलेल्या  पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणावारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटना मधील प्रमुख महाराज यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील  मान्यवरांसोबत संवाद साधला. वारकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल येथील महिलांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

*वारकऱ्यांसाठी शासनातर्फे सुविधा

            आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनमंदिर संस्थानपुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोयविजेची सोयवैद्यकीय पथकेपालखी मार्गाचे वेळापत्रकमंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणासुलभ शौचालयपोलीस मदत केंद्रअग्निशमन यंत्रणारुग्णवाहिकानदी पात्रात बोटीची व्यवस्थासूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

0000

Saturday, 29 June 2024

तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या जनजागृतीसाठी रविवारी परिषदेचे आयोजन

 तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या जनजागृतीसाठी

रविवारी परिषदेचे आयोजन

 

            मुंबई,दि. 29 : भारतीय न्याय संहिता 2023भारतीय साक्ष अधिनियम, 2023आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावीयासाठी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने एनएससीआय सभागृहवरळीमुंबई येथे रविवारी (30 जून 2024) फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग या विषयावर परिषदेचे आयोजन केले आहे.

            पूर्वीचे कायदे रद्द करताना नागरिक केंद्रीत आणि लोकशाहीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या नवीन तीन गुन्हेगारी कायद्यांना लागू करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता 2023भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 हे कायदे भारतीय दंड संहिता (1860 चा 45), फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (1974 चा 2) आणि भारतीय पुरावा कायदा, 1872 (1872 चा 1) या पूर्वीच्या फौजदारी कायद्यांची जागा घेतील.

            या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेला गुजरातपंजाबहरियाणाराजस्थानजम्मू-काश्मीरलडाख येथील न्यायमूर्तीविधी व न्याय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

            दिवसभर चालणाऱ्या या परिषदेची सुरूवात उद्घाटन सत्राने होईल. त्यानंतर प्रत्येक कायद्यावर एक सत्र होणार आहे. या परिषदेला विविध उच्च न्यायालयेजिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश आणि माजी न्यायाधीशवकीलपोलीसकायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधीसीबीआयईडीआणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी यांचा समावेश असणारे प्रतिनिधी उपस्थित असतील. विधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात

 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात

-अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

 

मुंबई, दि. २९ :- विकासाच्या विविध योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पद्मविभूषण प्रा. प्रशांत महानलोबीस यांच्या जन्म दिनानिमित्त नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे १८ व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालनालयाचे संचालक डॉ. जितेंद्र चौधरीअपर संचालक (समन्वय) कृष्णा फिरकेउपसचिव दिनेश वाघभारतीय प्रौद्योगिक संस्थानचे सहायक प्राध्यापक परमेश्वर उदमले आदींसह संचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. देवरा म्हणाले कीप्रा. प्रशांत महानलोबीस यांनी जी सांख्यिकीची पद्धत सुरू केली त्याचा आजही आपल्याला चांगला उपयोग होत आहे. या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करून नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने आपण त्यांचा वापर करत असताना एक नवीन डेटा तयार करीत असतो. पण तोच डेटा अचूक करण्यासाठीच्या पद्धतीचा अभ्यास करून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.

डॉ. चौधरी म्हणाले कीसांख्यिकी माहिती नव युवकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. योजना राबविताना सांख्यिकीची अत्यंत आवश्यकता आहे. या वर्षीच्या सांख्यिकी दिनाची संकल्पना विदा (Use of Data for decision making ) अशी ठरविली आहे.

प्रा. उदमले यांनी ग्रामीण भागासाठी विविध कामांच्या डेटा संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पर्यायाबाबत माहिती दिली. सांख्यिकीय माहितीवर आधारित महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी २०२३राज्यातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशकपायाभूत सुविधा सांख्यिकी २०२१-२२ आणि २०२२-२३,शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष अहवाल २०२३महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा २०१९-२०राज्य शाश्वत विकास ध्येये प्रगती अहवाल २०२२-२३शाश्वत विकास ध्येये कॉमिक, न्यू सीरीज ऑन स्टेट डोमेस्टिक प्रॉड्यक्ट ऑफ महाराष्ट्रडीस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्रॲनालिसिस ऑफ स्टेट बजेट ऑफ महाराष्ट्रइस्टिमेट ऑफ ग्रोस फिक्स्डकॅपिटल फॉर्मेशनवार्षिक उद्योग पाहणी अहवाल २०२०-२१ या प्रकाशनांचे विमोचन यावेळी करण्यात आले.

०००

धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार

 विधानसभा लक्षवेधी :-

धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना

अधिक मदत देण्याबाबत विचार करणार

- कामगार मंत्री सुरेश खाडे

 

            मुंबईदि.२९ : नागपूर जिल्ह्यातील धामणा (तुरागोंदी) येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत २५ लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक मदत देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन निश्चित विचार करेलअशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनधिकृत कारखान्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

            याबाबतविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

            मंत्री श्री. खाडे म्हणाले कीदि. १३ जून २०२४ रोजी या कारखान्यात फटाक्यांच्या वातीचे पॅकिंगचे काम सुरु असताना आग लागली व स्फोट झाला. या घटनेमध्ये ९ कामगार गंभीररित्या भाजले. त्यापैकी ५ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व उर्वरित ४ जखमी कामगारांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इमारतीमधील स्पिनिंग विभागात तयार होणाऱ्या फटाक्याच्या वाती पॅकिंग विभागात आणून त्या आवश्यक लांबीमध्ये कापून या वार्तीचे बंडल तयार केले जातात. ज्वलनशील असलेल्या फटाक्याच्या वातींचे बंडल प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन या पिशवीचे इलेक्ट्रीक सिलिंग मशीनद्वारे पॅकिंग सुरु असताना ज्वलनशील फटाक्याची वात गरम सिलिंग मशीनच्या संपर्कात आल्याने तेथे आग लागली. ही आग लगत असलेल्या पोर्टेबल मॅगझिन रुममध्ये पसरल्याने गन पावडरच्या ५० किलोचा साठा असलेल्या डब्यांमध्ये स्फोट झाला. संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या हा कारखाना बंद करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

            या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अनिल देशमुखयामिनी जाधवविश्वजित कदमराम कदमअस्लम शेखजितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi