Saturday, 29 June 2024

आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देणार

 आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला

लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २९ :- राज्यातील सर्वसामान्यवंचित-उपेक्षितआर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनादिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतीलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनादिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. सर्वच आर्थिक योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतीलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

-------०००-----


कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

 कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून

वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

 

            मुंबईदि. 29 : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतीलअसे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामण खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्यातील विविध खेळांनाखेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करूनपदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहेत्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्दे समाविष्ट करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईलअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी

 विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर

किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी

                               - कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई, दि.29 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणे प्रक्रिया सुरु आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाहीअसा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

            मंत्री श्री. मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे. अशा केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल.

            शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे, तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते. मात्र, काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणेपेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेतया विरोधात आता मंत्री श्री. मुंडे यांनी कडक भूमिका घेतली आहे.

000000

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

  विधानपरिषद लक्षवेधी सूचना क्रमांक 2

 

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 - उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबई,दि.29 : मुंबईत मोठ्या प्रमाणात एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            याबाबतची लक्षवेधी सदस्य  प्रसाद लाड यांनी मांडली होती.

        मंत्री श्री.सामंत  म्हणाले कीमुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंगूने झाले होते यंदा डेंगूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंगू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक विभागही डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

        पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्याअनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगित

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

 


 

विधानपरिषद लक्षवेधी सूचना क्रमांक 3

 

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ            

            मुंबईदि. 29 :अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या मुला-मुलींनी कॉलेजचे अध्यक्ष व व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल आंदोलन लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार याची काळजी घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

          अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य  प्रा. राम शिंदे यांनी मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

        मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले कीरत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड जिल्हा अहमदनगर मधील एकाच आवारात व इमारतीत विविध सात महाविद्यालये चालवली जातात.या संस्थेविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हितानुसार निर्णय घेतला आहे तसेच संस्थेविरोधात प्राप्त तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे.संस्थेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच कार्यवाही होणार

 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच कार्यवाही होणार

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

            मुंबईदि. 29 : जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतक-यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

        ८ ते ११ एप्रिल या दरम्यान राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.

         मंत्री श्री.पाटील म्हणाले कीराज्यात केवळ ८ ते ११ एप्रिल २०२४ याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही, तर जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे या भागात २ लाख ९१ हजार४३३ हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्याच्यामध्ये ३ लाख २३ हजार २१९ शेतकरी आहेत.४९५ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत.या नुकसानासाठी मदतीच्या निकषापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी  जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

दावोस येथील गेल्या तीन वर्षातील केलेल्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार

 दावोस येथील गेल्या तीन वर्षातील केलेल्या

सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार

-उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि.२९ : थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

             विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सलग दोन वर्षापासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून या वर्षी दावोस येथे तीन लाख ७२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा (जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क) मोठा प्रकल्प नवी मुंबई येथे सुरु करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात दावोस येथे उद्योग विभागाच्या तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत आणि इतर विभागांच्यावतीने किती सामंजस्य करार करण्यात आलेत्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभागाद्वारे काढली जाईल, असे सांगून श्री. सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच शेंद्रा येथे असलेल्या ऑरिका सिटी अंतर्गत दिल्लीमुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्टयात मोठ्या संख्येने विविध परदेशी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक करत आपले उद्योग सुरु केलेले आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात  निर्माण झालेल्या आहेतत्यासोबतच अनेक नवीन परदेशी उद्योग समूह या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी दिली.

            तसेच ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रकल्पांना बाधा न होणारी मुख्य ठिकाणी असलेली  जमीन  ही एमएसईबीसाठी  राखीव  ठेवली जाईल. तसेच त्या  ठिकाणी  होणा-या एमएसईबीला पूरक योजना उपलब्ध करुन दिल्या जातील. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजचितेगावशेंद्राबिडकीन येथील एमआयडीसींना एकमेकांसोबत जोडणारा अंतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव ही तयार असून  येत्या महिनाभरातच त्याचे काम सुरु करण्यात येईल. तसेच ऑरिक सिटी पासून ९८० किमी अतंरावर असलेल्या समृद्धी महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया ही लवकरच सुरु करण्यात येणार आहेया ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाला जोडणा-या अंतर्गत रस्त्याचा लाभ येथील उद्योजकउत्पादन वितरणाला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे सांगून दक्षिण कोरियाचा ह्युंदाईचा प्रकल्प पुण्यात येत आहे. या कंपनीने चार हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचे ठरवलेले आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

            या चर्चेत विधान परिषद सदस्य सचिन अहीरअभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi