Wednesday, 28 February 2024

धान खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 धान खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

            मुबईदि. 28 : खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

            किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबई जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार

 मुंबई जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा

पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार

 

            मुंबई दि. 28 : मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024 पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व्हावी याकरिता मुंबई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

            अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावायाकरिता महिला बालविकास विभागामार्फत अब व कप्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडीलांचा मृत्यु दाखलाअर्जदाराचा जन्म दाखलानगरसेवक यांचा बालकांचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखलारहिवासी दाखलाआधारकार्डजात प्रमाणपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रबोनाफाईडफोटो कॉपी आदी कागदपत्रे अनाथ बालकांना पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

 असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 

            मुंबई, दि. 28 : टेलरिंग व्यवसायातील अल्प उत्पन्न, कमी शिक्षीत अशा कारागीरांना संघटीत करणे गरजेचे आहे. टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढविण्यासाठी शासनामार्फत शिबिराचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

            असंघटित टेलरिंग कामगारांच्या समस्यांबाबत नरिमन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकरप्रधान सचिव  विनिता वेद सिंगलआयुक्त डॉ. एच. पी. तुंबोरे आदिसह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री खाडे म्हणाले कीअसंघटित कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असूनजास्तीत – जास्त  कामगारांनी येथे नोंदणी करावी. टेलरिंग व्यावसायिकांना संघटित करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली असूनत्यांना प्रशिक्षणव्यवसायासाठी साहित्यआर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. इतर कामगारांप्रमाणे टेलरिंग कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी श्री. खाडे यांनी केले.

 

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

 निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी

मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

 

            मुंबई, दि. 28 : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई - ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

            कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज

 अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबईदि. 27 : शाळामहाविद्यालयांमधील शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासनाने कला शिक्षणाची सोय करावीअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. जहांगिर आर्ट गॅलरी येथे बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित 132 व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी कलाकार पद्मश्री मनोज जोशीबॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सोसायटीचे सदस्यकलाकार उपस्थित होते.

            मोबाईलच्या अतीवापरामुळे आज विद्यार्थीशिक्षकपालक तणावामध्ये असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणालेविद्यार्थ्यांमध्ये हिंसा पहायला मिळत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे कला शिक्षण आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता जागी होते. विद्यार्थ्यांमध्ये वेगळा विचार करण्याचीप्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचीनवीन विषय शिकण्याची क्षमता जागृत होते. कलेमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासात सकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कला मदत करते. कला शिक्षण हा शालेय शिक्षणातील महत्वाचा घटक आहे. कला म्हणजे चित्रकलाशिल्पकलासंगीतनृत्य आणि रंगभूमी या सर्वांचा त्यात समावेश होतो. आजच्या काळात कला शिक्षणाला कमी महत्व दिले जात आहे.

            राज्यपाल श्री. बैस म्हणालेदेशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगळी कला आहे. त्याची जोपासना करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरात किमान एक कलाकृती असावी यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या संस्थांनीही प्रयत्न करावेत. सर्वसामान्य लोकांमध्ये कलाकृतींचे महत्व सांगणे ही आजची गरज आहे. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचेही आयोजन करावे. आज डॉ. उत्तम पाचारणे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. याचा मला आनंद आहे. यासह अनेक कलाकारांचाही आज सन्मान केला जात आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांचे मी अभिनंदन करतो.

            संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेमध्ये संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर पद्मश्री मनोज जोशी कलेचे महत्व सांगताना म्हणालेकितीही कृत्रीम बुद्धीमता आली तरीही व्यक्तीमधील स्पंदन आणि कल्पनाशक्ती यावर ती मात करू शकत नाही.

            यावेळी डॉ. उत्तम पाचारणे यांना जाहीर करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला. उत्कृष्ट चित्रकारशिल्पकार यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

            मुंबई: दि27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्तमराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            मराठी भाषेतील विज्ञानाची व्याप्ती, संकल्पना आणि विविध तंत्रज्ञानाचे योगदान तसेच विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबविते. मराठीतून वैज्ञानिक संशोधन आणि विज्ञानातील प्रगतीचा प्रसार करणे ही या परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणेविज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणेजीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढवणेवैज्ञानिक संशोधन यासाठी मराठी विज्ञान परिषद राबवित असलेले उपक्रम तसेच महाराष्ट्रातील वैज्ञानिकांचे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदान याविषयी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात श्री. देशपांडे यांनी माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात श्री. देशपांडे यांची मुलाखत बुधवार दि. 28गुरूवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी तसेच शुक्रवार दि. 1 आणि शनिवार दि. 2 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक अभिजित मुळ्ये यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000


 

मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी आरंभ लाभार्थ्यांना पहिला हप्त्याच्या 375 कोटी निधीचे होणार वितरण

 मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी आरंभ

लाभार्थ्यांना पहिला हप्त्याच्या 375 कोटी निधीचे होणार वितरण

 

            मुंबई‍‍दि. 27 : मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

              आर्थिक वर्ष 2023-24 ते  2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2023-24 मध्ये मंजूर 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17,00,728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 7,03,497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महा आवास अभियान 2023-24 अंतर्गत 7 लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.

0000

शैलजा पाटील/स.सं

Featured post

Lakshvedhi