Tuesday, 27 February 2024

विकासोन्मुख, दिशादर्शक व सर्व समावेशक अंतरिम अर्थसंकल्प - ललित गांधी* *व्यवसाय कर व बाजार समिती कर रद्द करण्याची महाराष्ट्र चेंबरची पुन्हा मागणी*

 विकासोन्मुख, दिशादर्शक व सर्व समावेशक अंतरिम अर्थसंकल्प - ललित गांधी*

*व्यवसाय कर व बाजार समिती कर रद्द करण्याची महाराष्ट्र चेंबरची पुन्हा मागणी* 

-----------------------------

मुंबई:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतरिम असल्याने फार मोठ्या बदलांची अपेक्षा नव्हती. परंतू या अर्थसंकल्पाची दिशा नक्कीच विकासोन्मुख आहे. फार मोठा भर रेल्वे, बंदरे, रस्ते, विमानतळे, पाच निर्यात पार्कस्,मेक इन महाराष्ट्रासाठी तरतूद, यावरुन हे दिसून येते. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली.


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्यात ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती, कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, जालना, जळगाव, नांदेड, बिदर अशा रेल्वे मार्गांसाठी आर्थिक सहभाग, वाढवण बंदराचा विकास आणि मुंबईला रेडिओ क्लब येथे २३० कोटी रुपयांचे जेट्टीचे काम, भगवती बंदर, सागरी दुर्ग जंजिरा, एलिफन्टा आणि मुंबई बंदर यासाठी तरतूद अशा महत्वाच्या बाबी आहेत. त्यासाठी परिवहने, बंदरे, या विभागाला ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये १८ लघु वस्त्रोउद्योग संकुले, निर्यात प्रोत्साहनासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाला ४०० कोटी रुपये आणि ५ इंडस्ट्रियल पार्क हि तरतूदही महत्वाची आहे. नवे एमएसएमई नवे धोरण आणि पर्यटनासाठी प्राधान्य हे स्वागतार्ह आहे. कौशल्य विकासासाठी खास केंद्रे व आजपर्यंतची सर्वाधिक तरतूद, सौर ऊर्जासाठी प्रोत्साहन याचाही उल्लेख करावा लागेल.

एमएसएमई धोरण व विकासासंदर्भात महाराष्ट्र चेंबरने वेळोवेळी अनेक सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचा समावेश नव्या एमएसएमई धोरणात होईल अशी अपेक्षा आहे. नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर संपूर्ण देशात आहे हे लक्षात घेता या कार्यासाठी विशेष अशी आर्थिक तरतूद आणि केंद्रे व्हावीत. कौशल्य विकासामध्ये केवळ इंजीनीरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक अशा ठराविक कौशल्यांचा विचार न करता हल्लीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचाही प्राधान्याने विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली. *व्यवसाय कर रद्द व्हावा* गेली अनेक वर्षे सर्व सामान्य नागरिकांसकट सर्व व्यवसायकही दरवर्षी व्यवसाय कर भरतात. हा कर भारभूत झाला असून तो रद्द करण्याची मागणी सर्व स्तरांवरून केली जाते. हा कर येत्या आर्थिक वर्षापासून रद्द होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय बाजार हि एक महत्वाची संकल्पना आहे. त्यादृष्टीने कृषी मालावर प्रत्येक बाजार समितीत जो मार्केट सेस अनेकदा घेतला जातो हि पद्धत व नियम लगेच रद्द व्हावी अशी मागणी असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.


राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

 राज्याच्या शाश्वतपर्यावरणपूरकसर्वसमावेशक विकासाला गती

देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

 

·       राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी

आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी

·       राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला

अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर

 

            मुंबईदि. 27 :- राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तरराजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपयेरोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपयेमराठी विभागासाठी 71 कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना 1 लाख 92 हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 15 हजार 893 कोटी रुपयेआदिवासी विकास उपयोजनेसाठी 15 हजार 360 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

            राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीशेतकरीकष्टकरीमहिलाविद्यार्थीयुवकमागासवर्गीयआदिवासीअल्पसंख्याकउद्योजकव्यापारीव्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री श्री.पवार यांनी शाश्वतपर्यावरणपूरकसर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.

            राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूकनागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा  प्रयत्न अर्थमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातून केला आहे. 

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-    

          मौजे वडजतालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

          युवकमहिलागरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

          स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंतविलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

          विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी 

          पुणे चक्राकार वळण मार्गाकरिता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी

          जालना-नांदेड द्रुतगती  महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये

          सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये नियतव्यय

          महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे

          मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती

          कल्याण-मुरबाडपुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु

          फलटण-पंढरपूरकांपा-चिमूर-वरोराजालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

          जालना-खामगावआदिलाबाद-माहूर-वाशिमनांदेड-हिंगोलीमूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

          वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये

          सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे229 कोटी 27 लाख रुपये  किंमतीचे बांधकाम

          भगवती बंदररत्नागिरी-३०० कोटी रुपयेसागरी दुर्ग जंजिरारायगड-१११ कोटी रुपयेएलिफंटामुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे

          मिरकरवाडारत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा

          छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला 9 हजार 280 कोटी रुपये

          गृह-परिवहनबंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता माहिती तंत्रज्ञान विभागास 920 कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभाग, विधानमंडळ सचिवालयास प्रत्येकी 547 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

          उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिकइलेक्ट्रॉनिक्सअवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्मलघू व मध्यम उपक्रम धोरण

          18 लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती

          एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप

          निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात 450 कोटी

          निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये

          निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क

          सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी

          मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25 हजार उद्योग घटक -30 टक्के महिला उद्योजक -सुमारे 50 हजार नवीन रोजगार

          थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक  गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 20 हजार रोजगार निर्मिती

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला 1 हजार 21 कोटी रुपये

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 952 कोटी रुपये

          अमृत 2.0  अभियानांतर्गत 145 शहरांमधील 28 हजार 315 कोटीचे 312 प्रकल्प मंजूर

          महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार

          महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या 50 ते 95 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 875 कोटी रुपये नियतव्यय

          दरवर्षी सुमारे 25 हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड

          अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

          जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886  कामांना मंजूरी

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 245 कोटी रुपये

          वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

          मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

          शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 

          शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषि पंप ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप

          राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण

          सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच.

          डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान 

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला 11 हजार 934 कोटी रुपये

          नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये

          नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपयेपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये नियतव्यय

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला 638 कोटी रुपये नियतव्यय

          39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार

          बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प  पूर्ण  झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार

          कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प

          विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद

          वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाव्दारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

          सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वीज निर्मितीचे खाजगी सहभागातून उदंचन जलविद्युत प्रकल्प

          खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत 113 कोटी रुपयांची तरतूद

          सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा विभागाला 16 हजार 456 कोटी रुपये नियतव्यय

          मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख  महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

          राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

          कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु 

          दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा

          कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बालविकास विभागास 3 हजार 107 कोटी रुपये

          वाशिम,जालना,हिंगोली,अमरावतीभंडारागडचिरोलीवर्धाबुलढाणापालघरनाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसंलग्नित 430 खाटांचे रुग्णालय

          जळगावलातूरबारामतीनंदूरबारगोंदियाकोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय

          नागपूर एम्सच्या धर्तीवर औंधपुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

          ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना

          सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर

          234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र

          रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका

          कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास 2 हजार 574 कोटी रुपयेसार्वजनिक आरोग्य विभागास 3 हजार 827 कोटी रुपये नियतव्यय

          स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनातृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीजभांडवल योजनामातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी

          संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्ककोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ,प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्रांची स्थापनागोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी

          मातंग समाजासाठी आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना

          कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18 हजार 816 कोटी रुपये

          कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता 15 हजार 360 कोटी रुपये नियतव्यय

          बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ

          मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्जडॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सुक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये

          दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर -नवीन घरकुल योजना - 34 हजार 400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ

          श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही आनंदाचा शिधा वाटप करणार

          कार्यक्रम खर्चाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि   अल्पसंख्याक विकास विभागाला 5 हजार 180 कोटी रुपयेगृहनिर्माण विभागाला 1 हजार 347 कोटी रुपयेकामगार विभागाला 171 कोटी रुपये नियतव्यय

          मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत राज्यस्तरावर उच्च कामगिरी केंद्रविभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा

          नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा

          कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागाला 537 कोटी रुपये नियतव्यय

          महाराष्ट्र ड्रोन मिशन साठी 5 वर्षासाठी 238 कोटी 63 लाख रुपये

          वरळीमुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य  विकास भवन

          कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 2 हजार 98 कोटी रुपयेशालेय शिक्षण विभागाला 2 हजार 959 कोटी रुपये नियतव्यय

          जागतिक बँक सहाय्यित  मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास(दक्ष) या 2 हजार 307 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी

          राज्यात नवीन 2 हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे

          प्रत्येक महसुली विभागामध्ये  आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी

          कार्यक्रम खर्चाकरिता कौशल्य,नाविन्यता,रोजगार व उद्योजकता विकास विभागाला 807 कोटी रुपये नियतव्यय

          कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे  नूतनीकरण व संवर्धन

          पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण

          50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्कॲडव्हेंचर स्पोर्टस्शॉपिंग मॉलवॉटर पार्क आणि निवास व्यवस्था

          शिवसागर- कोयना जिल्हा सातारागोसीखुर्द जलाशयजिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशयजिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प

          लोणारजिल्हा बुलढाणाअजिंठा-वेरुळजिल्हा छत्रपती संभाजीनगरकळसुबाई - भंडारदराजिल्हा अहमदनगरत्र्यंबकेश्वरजिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा

          लोणावळाजिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत

          श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन - 77 कोटी रुपयांची तरतूद

          महाविस्टा-मंत्रालयपरिसरातील शासकीय इमारती आणि त्यांच्या परिसराचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास

          कार्यक्रम खर्चाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाला 1 हजार 186 कोटी रुपयेपर्यटन विभागाला 1 हजार 973 कोटी रुपये नियतव्ययसार्वजनिक बांधकाम (इमारती) विभागास 1 हजार 367 कोटी रुपयेमहसूल विभागास 474 कोटी रुपये

          कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलिस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्ययगृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये नियतव्यय

          वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना

          कार्यक्रम खर्चाकरिता वित्त विभागाला 208 कोटी रुपये नियतव्यय

          स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूरता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुरजिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडाकाम सुरु

          12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेडएकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तृतीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम - 20 कोटी रुपये निधी

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरेबारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपये

          धाराशीव जिल्हयात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी

          प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा

          संगमवाडी,पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक

          अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सानेगुरुजींचे स्मारक

          हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा

          श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गडता. कळवण स्थळाच्या 81 कोटी 86 लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

          मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव उपक्रम- वेंगुर्लाजिल्हा सिंधुदुर्ग

          कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपयेरोहयो प्रभागासाठी 2 हजार 205 कोटी रुपये मराठी विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय

          सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद

          वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपयेअनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपयेआदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये

          सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटींची तरतूद

          सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये,  महसुली तूट- 9 हजार 734 कोटी रुपयेराजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये

०००००

नीलेश तायडे/विसंअ


 


अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

 अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या

शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 27 : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

            विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण § 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार

 प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

§  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर

पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार

मुंबई, दि. 27 : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि 28 फेब्रुवारी2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ दि. 28 फेब्रुवारी, 2024 च्या समारंभात राज्यातील सुमारे 88.00 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी, 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरीरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेउपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री  अजित पवारवनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजनयवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोडकृषी मंत्री धनंजय मुंडेगृहनिर्माणइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेकेंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसानयोजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पतीपत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये रू. 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

समारंभास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पदधतीने सहभागी व्हावे

 - कृषीमंत्री धनंजय मुंडे

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते या समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.  

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. 1943.46 कोटीचा लाभ  राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहेराज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहेत्यामुळे या लाभार्थींना पी.एम.किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

राज्यात सन 2023-24 पासून पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पी. एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम रू. 1712 कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. महाराष्ट्र शासन सन 2023-24 मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास रू. 3800 कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.   

०००००

अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

 अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या

शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 27 : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

            विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

 बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना

 राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

आदिवासी क्षेत्रात चैत्राम पवार यांचे वनसंवर्धनासाठी मोलाचे काम

 मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबई, दि. 27 :  वनवानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्रीजि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्हमानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वौच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या पुरस्काराबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी श्री. पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

            राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करुन श्री. चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धनसक्षमीकरणस्वावलंबनवनहक्क कायदाकृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील 26 वर्षापासून श्री. पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या श्री. पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

            वनभूषण पुरस्कार निवडीबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले असून श्री. पवार यांचे आदिवासी क्षेत्रातील वनजमिनींच्या अनुषंगाने केलेले काम मोलाचे असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणेराखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहेअशा शब्दांत श्री. मुनगंटीवार यांनी कौतुकोद्गार काढले.

            चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापरमृद व जलसंधारणाची कामेसौर ऊर्जेचा वापरप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्नसार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.

            चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2003भारत जैवविविधता पुरस्कार -2014संत तुकाराम वनग्राम पुरस्कारशेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारआदिवासी सेवक पुरस्कारडॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कारवसुंधरा पुरस्कारआदिवासी अस्मिता पुरस्कारनातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कारपु. भा. भावे स्मृती पुरस्कारसंस्कार कवच पुरस्कारगो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/


 

कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित होणार

 कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून

जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित होणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

 

            मुंबईदि. २७ :  सातारा जिल्ह्यातील  जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यासाठीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार झाला.

            विधानभवन येथे झालेल्या सामंजस्य करारावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवारराज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाईजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्माजलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोलेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजारपेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनातून १०० कोटीपेक्षा अधिक  आर्थिक उलाढाल होईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

            शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर)ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा, गर्द झाडीनिळेशार पाणी, समृध्द जैवविविधतेचे आगार असलेला, नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे. नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या  माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या  प्रकल्पासाठी  ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

             महाराष्ट्राला मोहक ७२० किमीचा सागरी किनारा तसेच निसर्गसंपन्न छोटे - मोठे जलाशय, धरणेप्रदूषण मुक्त नद्या यांचे वैभव लाभलेले आहे. या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायव्हिंग प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या प्रमाणत आकर्षित झाले. नाशिक बोट क्लबचे प्रचलन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. बोट क्लब पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे मुंबईपुणेठाणे आणि गुजरातमधून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. हा अनुभव बघता शासनाने महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

            या प्रकल्पामुळे महाबळेश्वरपाचगणीवाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवती असलेल्या ग्रामीण भागात वळेलतसेच पर्यटकांचा साताऱ्यात राहण्याचा काळ आणि खर्च करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील पहिले नाविन्यपूर्ण

गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग

            या प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा आणि जल पर्यटन प्रकार असतील. भव्य पॅव्हेलियनकॉन्फरन्स हॉलजलतरण तलावभारतातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंगजल सफर मध्ये पर्यटन प्रकल्पात मोठी क्रुझ बोट ज्यामध्ये १०० च्या वर पर्यटक बसूननाश्ता आणि जेवण याबरोबर कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या सह्याद्री पर्वत रांगाहरित जंगलेवन्य जीव याचा आनंद घेऊ शकतातभारतातील पहिली अत्याधुनिक आणि अलिशान हाउस बोटसौर उर्जा/बॅटरीवर चालणारी बोटअत्याधुनिक प्रवासी बोटीहवेत उडणारी बोटअत्यंत वेगवान जेट बोटपॅरासेलिंग बोटगोड्या पाण्यात पहिल्यांदा सेलिंग यॉट (शिडाची नौका) आणि त्याशिवाय आकर्षक वॉटर स्पोर्टस असतील. अशाप्रकारच्या जल पर्यटनाची आकर्षणे तसेच पायाभूत सुविधा असलेला हा भारतातील पहिला जल पर्यटन प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसामध्ये प्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात (८ महिन्यात) नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसरा आणि अंतिम टप्यात (२० महिन्यात) संपूर्ण नवीन भव्य वास्तूक्रुझ बोटहाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.

प्रकल्पात पायाभूत सुविधा आणि विविध जल पर्यटन प्रकार

             प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांसाठी विविध सुविधा व प्रशासकीय कार्यालय, जलतरण तलाव, स्कूबा प्रशिक्षण तलाव, कॉन्फरस हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय, बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडीतरंगती जेट्टी (मरीना), वाहनतळ,आकर्षक बगीचा असतील.

            यामध्ये विविध जल पर्यटन प्रकार जेट स्की, जेटो व्हेटर (पाण्यात उडणे), बम्पर राईड, कयाकिंग, बनाना राईड, सेलिंग, नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावात गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, हवेत उडणारी बोट, फ्लाईंग फिश, अतिवेगवान जेट बोट राईड, सौर/विद्युत बोटपर्यटकांसाठी आरामदायी प्रवाशी बोट, व्हर्ल पूल राईड, पॅरासेलिंग, अलिशान लेक क्रूझिंग प्रवासी बोट, अलिशान वेगवान बोट, मरीना, भारतातील पहिली अत्याधुनिकअलिशान हाउस बोट असे विविध नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकार असतील.

००००

संध्या गरवारे/विसंअ/


Featured post

Lakshvedhi