Saturday, 24 February 2024

शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 23 - कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिले आहेत.

            भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी विषयाचे ज्ञान मिळाल्यास त्यांच्या मनावर शेती विषयाचे महत्त्व ठसवले जाऊन शेती विषयाची जाण असणारी उद्याची उज्वल व जागृत पिढी निर्माण होईल व ग्रामीण समाजाशी त्यांची नाळ जोडली जाईल. पर्यायाने यातूनच राष्ट्रप्रेम निर्माण होऊन शेती व शेतीवर आधारित व्यवसाय व उद्योगधंदे अधिक कुशलतेने केले जातील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जीवनमान उंचावण्यास मदत होईल या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृषी विषय हा पाठ्यक्रमात लक्षणीय स्वरुपात समावेश करण्याचा निर्णय घेतला.

            शालेय स्तरावर कृषी असा स्वतंत्र विषय नसला तरी कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे ज्ञान पूर्वीपासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. परसातील बागकामकुडीतील लागवडफळ प्रक्रियापशुपालनमत्स्य व्यवसायसुलभ शेतीखाद्यपदार्थ निर्मिती इत्यादी क्षेत्रांतर्गत इयत्तानिहाय उपक्रम राबविले जात आहेत. तसेच समाजोपयोगी उत्पादक कार्यवृक्षारोपण व निगाकाही शाळांमध्ये शेती व फळबागा इत्यादी उपक्रम सुरू आहेत.

            सर्व प्राथमिकउच्च प्राथमिक (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांमध्ये कार्यानुभव विषयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम राबवले जात आहेत. तसेच इयत्ता नववी ते बारावीसाठी नॅशनल स्कील्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विषय असलेल्या शाळांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भातील आशयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून अनुषंगिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 11वी व 12वी स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये कृषीच्या अनुषंगाने कृषीविज्ञान व तंत्रज्ञानपशुविज्ञान व दुग्धव्यवसायपीक शास्त्रमत्स्यपालन तंत्रज्ञानगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायउद्यानविद्या शास्त्र आदी स्वतंत्र वैकल्पिक विषय निवडण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी दिली आहे.

00000

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

 महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

 

            मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णीअजित गोपछडेअशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.

            राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्यानेया सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे

 नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

•      लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन

 

            लातूरदि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावाहे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेतअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

            लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेखासदार सुधाकर शृंगारेआमदार रमेश कराडआमदार संभाजी पाटील निलंगेकरआमदार अभिमन्यू पवारजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरप्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला.

            तरूणांसाठी रोजगार हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यात त्याच्या कुटुंबाचे समाधान आणि समृद्धता दडलेली आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीशासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी पूर्वी लोकांना हेलपाटे मारावे लागत आणि केवळ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक योजनांचे लाभ घेत नव्हते. अशा सर्व योजनांचे लाभ शासन आपल्या दारी उपक्रमांतून एका छताखाली देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत जवळपास 2 कोटी 60 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देण्यात आले. याच भावनेतून एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

            नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला. जवळपास 350 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला. त्याचे यश पाहूनच आपण दरवर्षी विभागस्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहे. बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळेलयासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या मेळाव्यात सहभागी तरूण-तरूणींची कुशलअकशुलनिमकुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईलअसे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाडा कायमच विकास प्रक्रियेत अग्रस्थानी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला. यात उपमुख्यमंत्री म्हणाले कीमराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली येथे भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधापायाभूत  सुविधा वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेतत्यामाध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जात आहेत.  या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचे चित्र वेगळे असणार आहे.

            रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीनागपूर येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात 10 हजार तरूणांना रोजगार मिळालाया रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेतूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभाग आणि जिल्हास्तरावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा व प्रत्येक मेळाव्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात 16 हजाराहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून 200 हून अधिक  कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.

कौशल्य आणि रोजगार संधीसाठी नेटाने प्रयत्न- मंगल प्रभात लोढा

            कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,  रोजगार मेळावे आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची होती. त्यांनी राज्यात रोजगार मेळावेस्टार्टअपची कल्पना रुजवली आणि आपण ती पुढे नेत आहोत. नागपूर येथील रोजगार मेळाव्यानंतर आता लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. राज्यभरातही ते आयोजित होतील. कौशल्य विकास आणि रोजगारासंबंधीच्या सर्व योजनांची माहिती येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मिळेल. युवक-युवतींच्या कौशल्य विकास आणि रोजगाराचे कामत्यांना रोजगार संधीची उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेटाने केले जातीलअशी ग्वाही श्री.  लोढा यांनी दिली.

लातूरच्या औद्योगिक विकासासाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त - संजय बनसोडे

            लातूरची ओळख पूर्वी व्यापारी शहर अशी होतीत्यानंतर सहकार चळवळीने जिल्हा ओळखला जावू लागला. आता शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्वपरिचित आहे. राज्य शासनामार्फत लातूर येथे होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारस्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेलअसा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममुद्रा योजना आणि उमेद अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त रेणुका कंबालवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर दिंडीने कार्यक्रमाला प्रारंभ

            विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीने झाली. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला. यामध्ये करिअर मार्गदर्शन विषयक ग्रंथांची पालखी घेवून विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर कौशल्य ज्योत प्रज्वलित करून नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीआमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

००००

सन 2020, 2021 व 2022 चे कृषी पुरस्कार जाहीर राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान - धनंजय मुंडे पुरस्कारांच्या रक्कमेत चार पटीने वाढ

 सन 20202021 व 2022 चे कृषी पुरस्कार जाहीर

राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान

- धनंजय मुंडे

पुरस्कारांच्या रक्कमेत चार पटीने वाढ

 

            मुंबई़ दि. 23 : सन 20202021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारजिजामाता कृषिभूषण पुरस्कारकृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारवसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारयुवा शेतकरी पुरस्कारउद्यान पंडित पुरस्कारवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट)पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

            सन 2020 पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता. दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यानुसार सन 20202021 व 2022 मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

            कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जातेत्या रकमेतही मंत्री श्री.मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे.

            दरम्यान लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.


००००

प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले

 प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            ठाणे, दि.23 (जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. समस्त विश्व गायत्री परिवार राष्ट्रात सनातन संस्कृतीचा प्रसार करून विश्व बंधुतेचा संदेश देत आहे. अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे आयोजित अश्वमेध महायज्ञ ज्ञान मंच येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भावना व्यक्त केली.


            यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.


     अश्वमेध महायज्ञ आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे आभार मानले. यासाठी देवभूमी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे सांगितले. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे, असे सांगितले. कारण मन मोठे झाले की, सर्व संकटे आपोआप दूर होतात. या विचाराने केलेले कार्य समाज आणि राष्ट्राच्या विकासाकडे घेऊन जाते. अखिल विश्व गायत्री परिवारातील प्रत्येक सदस्य याच विचाराने कार्य करीत असून जगाला विश्वबंधुतेचा संदेश देत आहे.


      अश्वमेध महायज्ञाच्या उपयुक्तततेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे पुण्य वाढते आणि दुर्गुण कमी होतात. प्रधानमंत्री मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक करताना ते म्हणाले की, देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने पुढे नेले आहे.


            केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राजकीय व्यक्तींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यांना अशा कार्यक्रमातून दशा आणि दिशा मिळते. राजकारण हे राज आणि नीती या दोन शब्दांपासून बनलेले आहे, ज्याचा अर्थ राज्य आणि समाजाला योग्य मार्गावर नेणे. अशा घटना ही व्यवस्था मजबूत करण्याचे काम करतात.


००००



 

Friday, 23 February 2024

दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दीपक

 दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण

वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता - अभिनेत्री

संजय पाटील यांचे 'आभाळसंग मातीचं नांदनठरले उत्कृष्ट गीत

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान

 

            मुंबईदि. 23-   सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीकलाकारांचे बहारदार  नृत्यकार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी 57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'वायया चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.  बाबा चित्रपटातील भूमिकेसाठी दीपक डोब्रियाल यास उत्कृष्ट अभिनेता तर मिस यू मिस्टर मधील भूमिकेसाठी मृण्मयी देशपांडे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.

            वरळी येथील डोमएन एस सी आय येथे गुरुवारी रात्री राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रंगला. मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री  श्री.फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार ॲड. मनीषा कायंदेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरेकिरण शांतारामजब्बार पटेलसचिन पिळगावकरमहेश कोठारेमहेश मांजरेकर आदींसह चित्र नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.

            याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेचमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विविध वर्गातील पुरस्कार विजेते :-

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.१ -

            वाय (अजित वाडीकर)भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.१ - वाय ( अजित वाडीकर). बाबूराव पेंटर उत्कृष्ट चित्रपट क्र.2 - मिस यु मिस्टर (श्रीम. दिपा त्रेसी). राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक क्र. 2 -मिस यु मिस्टर (समीर जोशी). मा. विनायक उत्कृष्ट चित्रपट क्र.3 -  स्माईल प्लिज (श्रीम. निशा सुजन /श्रीमसानिका गांधी). राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3- स्माईल प्लिज ( विक्रम फडणीस).

अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट-  (ताजमाल) नियाज मुजावर.

दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट - ताजमाल ( कुलभूषण मंगळे).

दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक -समीर विद्वांस (आनंदी गोपाळ).

व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- आनंदी गोपाळ (मंगेश कुलकर्णी).

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती -  विशबेरी ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि (झॉलिवूड).

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक - अच्युत नारायण (वेगळी वाट).

उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक  व श्री शिवाजी गणेशन पुरस्कार -दीपक डोब्रियाल (बाबा).

उत्कृष्ट अभिनेत्री (कै.स्मिता पाटील पारितोषिक) - मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - कै.काशिनाथ घाणेकर पारितोषिक -अजित खोब्रागडे (झॉलिवूड).

 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री कै. रंजना देशमुख पारितोषिक - अंकिता लांडे (गर्ल्स).

उत्कृष्ट विनोदी अभिनेता कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक -पार्थ भालेराव (बस्ता).

सहाय्यक अभिनेता - कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक -  रोहित फाळके (पांघरुण).

सहाय्यक अभिनेत्री - कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर पारितोषिक - नंदिता पाटकर (बाबा).

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - राज्याभिषेक गीत सुभाष नकाशे (हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वगायिका- मधुरा कुंभार (गीत- आभाळसंग मातीचं नांदन ,मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट पार्श्वगायक - सोनू निगम ( गीत- येशील तूहिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रफुल्ल - स्वप्निल (स्माइल प्लिज).

उत्कृष्ट संगीत -कै. अरुण पौडवाल पारितोषिक

 - अमितराज (हिरकणी).

            उत्कृष्ट गीते - कै.ग. दि. माडगूळकर पारितोषिक -  संजय कृष्णाजी पाटील (गीत- आभाळसंग मातीचं नांदन,हिरकणी).

उत्कृष्ट संवाद- कै.आचार्य अत्रे पारितोषिक

 इरावती कणिक (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट पटकथा-  विक्रम फडणीस,इरावती कर्णिक (स्माईल प्लिज),

सर्वोत्कृष्ट कथा - कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक -पांघरुण.

            याशिवायतांत्रिक गट आणि उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारही यावेळी देण्यात आले. यामध्येउत्कृष्ट कला दिग्दर्शन-(कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक ) - सुनील निगवेकरनिलेश वाघ (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट छायालेखन ( कै. पांडुरंग नाईक पारितोषिक) - करण बी. रावत (पांघरुण)

उत्कृष्ट संकलन- आशिष म्हात्रेश्रीमती अपूर्वा मोतीवाले (बस्ता).

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - अनुप देव (माईघाट),

उत्कृष्ट ध्वनिसंयोजन - मंदार कमलापूरकर (त्रिज्या),

उत्कृष्ट वेशभूषा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज),

उत्कृष्ट रंगभूषा - श्रीमती. सानिका गाडगीळ (फत्तेशिकस्त)

उत्कृष्ट बालकलाकार (कै. गजानन जहागिरदार पुरस्कार)  - आर्यन मेघजी (बाबा).

            या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

 0000

Dylisis centre,Mumbai,sindudrag

 




Featured post

Lakshvedhi