Thursday, 22 February 2024

ध्यानपूर्वक वाचा कदाचित आवडेल ...🙏🌹✍️only ज्येष्ट

 ध्यानपूर्वक वाचा कदाचित आवडेल ...🙏🌹✍️


 वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा ते टोमणे मारतात, परंतु डॉक्टर ते वरदान मानतात: डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्याचे रोखण्याचा कोणताही मार्ग नाही.  अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे.  अति बोलण्याचे किमान तीन फायदे ज्येष्ठ नागरिकांना होतात.

 *_प्रथम:_* बोलणे मेंदूला सक्रिय करते आणि मेंदू सक्रिय ठेवते, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: जेव्हा पटकन बोलले जाते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांची गती जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते.  जे ज्येष्ठ नागरिक बोलत नाहीत त्यांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

 *_दुसरा:_* जास्त बोलल्याने तणाव दूर होतो, मानसिक आजार टळतो आणि तणाव कमी होतो.  आपण अनेकदा काही बोलत नाही, परंतु आपण ते आपल्या हृदयात दडपतो आणि गुदमरल्यासारखे वाटते आणि अस्वस्थ वाटते हे खरे आहे, म्हणून, वरिष्ठांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले होईल.

 *_तिसरा:_* बोलण्यामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो तसेच घशाचा व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता वाढते, तसेच डोळे आणि कानांना होणारा हानीचा धोका कमी होतो आणि चक्कर येणे, डोके चढणे आणि बहिरेपणा यासारखे सुप्त धोके कमी होतात.

 *_थोडक्यात,_* सेवानिवृत्त, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही शक्य तितके बोलणे आणि लोकांशी सक्रियपणे संवाद साधणे.  याला दुसरा कोणताही इलाज नाही.

      शक्य तितक्या वरिष्ठांना पाठवा....🙏🙏🙏

सातारा शहरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट विकसित करावे

 सातारा शहरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट विकसित करावे


- उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचना


 


            मुंबई, दि. 21 : सातारा शहरातील नगर पालिका हद्दीत पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट (आयलँड) विकसित करण्याची कार्यवाही करून शहराच्या सौंदर्यात भर घालावी. याठिकाणी जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे करावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.


               सह्याद्री अतिथीगृह येथे याविषयी आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी प्रदीप डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी चर्चेत सहभाग घेतला.


                बाळासाहेब देसाई आयलँड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या आयलँडवरील बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे डिझाईन अंतिम करावे. आचासंहितेपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. सातारा येथील जिल्हा लोकल बोर्ड इमारत हेरीटेज दर्जा असलेली इमारत आहे. या इमारतीचा पुनर्विकास हेरीटेज दर्जानुसार करावयाचा असून त्यासाठी अशा प्रकारचे काम करणारा कंत्राटदार असावा. हेरीटेज कामाला कुठेही धक्का न लागता दुरूस्तीचे काम करावे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम करून काम सुरू करावे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.   

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे

 कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या

पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे

- उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

            मुंबईदि. 21 : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे विविध  प्रश्न सोडविण्यासाठी शासन संवेदनशील आहे. यासंदर्भातील न्यायालयीन लढा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्याने याबाबत समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून सीमावर्ती मराठी भाषिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  संवेदनशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली शासन सीमावर्ती भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेअसे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

            महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकसहसचिव (विधी) प्रशांत सदाशिवउपसचिव रा. दि. कदम – पाटीलमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेएकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकरसमितीचे दिनेश ओऊळकरप्रकाश मरगाळेॲड एम. जी पाटील आदी उपस्थित होते.

            सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले,  सीमावर्ती भागातील 865 गावांमधील मराठी भाषिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनामुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तहसिलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला असून शिनोली (ता. चंदगडजि. कोल्हापूर) येथे कार्यालय असणार आहे. कायदेशीर पातळीवर लढा देण्यासाठी समन्वयक मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जावून नियुकत केलेल्या विधीज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत आग्रही असून सातत्याने त्यांच्या स्तरावरही पाठपुरवा करण्यात येत आहे.

            सीमावर्ती भागात नागरिकांचे प्रशासनातील काम जलद गतीने होण्यासाठी मराठी भाषा समजणाऱ्या दुभाषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कर्नाटक शासनाला पत्र देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र ताकदीने ही लढाई लढणार असून त्यासाठी आणखी दर्जेदार विधिज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. राज्य शासनाने या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तीन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.  कर्नाटक शासनानेही समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.  

            बैठकीत कायदेशीर बाबीसीमावर्ती भागातील मराठी भाषिकांसाठी आरोग्य योजनांचा लाभद्विभाषक अधिकारी नियुक्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीच्या शिष्टमंडळातील पदाधिकारीतसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

***

निलेश तायडे/विसंअ/


 


सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही

 सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती

पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार

मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 21 : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता विकासकांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून विकासक त्यांच्याकडे धावत येतीलअशी परिस्थ‍िती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

            गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास, पुनर्विंकासाच्या निर्णयाबाबात अभ्युदयनगर येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरपालकमंत्री दीपक केसरकरगृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार सर्वश्री प्रवीण दरेकरआशिष शेलार आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणालेराज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान 25 हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे 5 लाख घरांची निर्मिती होणार आहे. तीन पिढ्यांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बीडीडी चाळींचा विकासकांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना 560 स्क्वेअर फुटांचे घर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            अभ्युदयनगरच्या सीएनडीच्या विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्यांचाप्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेउपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान 17 पोलीस वसाहती म्हाडाकडून विकासित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशनआदर्शनगर वरळीपीएमजीपी कॉलनी पुनमनगरअंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

***

छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे

 छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे

- मंत्री संजय बनसोडे

            मुंबई दि. 21 : छत्रपती संभाजीनगरमधील तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

            आज मंत्रालयात जिल्हाविभागतालुकाक्रीडा विद्यापीठ स्तरावरील क्रिडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री बनसोडे बोलत होते.

            मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीसोयगावखुलताबादगंगापूरकन्नडपैठणसिल्लोडवैजापूर येथील क्रीडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेतला.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीप्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडा खेळपट्टी बांधण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय निकष वेगळे करण्यात यावेत.  एखादी इमारत बांधकामप्रेक्षागॅलरीसाठीचे नियम, हॉकीचे मैदानफुटबॉलबॅडमिंटनचे सिंथेटीक रोलींग कोर्ट यासाठी तांत्रिक मान्यतेबाबतचे सुधारित धोरण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. लातूर येथील उदगीर क्रीडा संकुल आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, खेळाडूंना उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देणारे उभारण्यात यावे. त्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा

  आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसान बाधितांना

मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता

निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा

- मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. २१ :-  सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.  याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने  या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

            सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पीक व मालमत्ता नुकसानाच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात  आली. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना  दिलासा मिळणार आहेअशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली

            राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत करण्यासाठी  विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.

            कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर  कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

            त्यानंतरही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून  काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली व  निधी मंजुरीस मान्यता देण्यात आली.

००००

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता

 नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी

1792 कोटी निधी वितरणास मान्यता

- धनंजय मुंडे

राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी 2 हजार जमा

 

            मुंबई दि. 21 : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

            या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली आहे.

            राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे.

            एप्रिल ते जुलै 2023 या पहिल्या हप्त्यामध्ये 1 हजार 720 कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1 हजार 792 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेर पर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली आहे.

            राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर श्री. मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 13 लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

Featured post

Lakshvedhi