Saturday, 30 December 2023

आई' नीति के अंतर्गत एमटीडीसी के पर्यटक आवासों में महिलाओं के लिए 50 प्रतिशत छूट

 आईनीति के अंतर्गत एमटीडीसी के पर्यटक आवासों में

महिलाओं के लिए 50 प्रतिशत छूट

                                               - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबई30 :   राज्य सरकार की 19 जून 2023 की 'आईमहिला केंद्रित/लिंग समावेशी पर्यटन नीति के अनुसारमहिला पर्यटकों और महिला उद्यमियों के लिए एमटीडीसी की विभिन्न योजनाएं लागू की जा रही हैं।  पर्यटन मंत्री गिरीश महाजन ने जानकारी दी है कि इस नीति के अंतर्गत अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मद्देनजर 1 से 8 मार्च 2024 तक 8 दिनों के लिए महामंडल के सर्वश्रेष्ठ पर्यटक आवास गृहों में महिलाओं के लिए 50 प्रतिशत की छूट दी जायेगी। 

            मंत्री श्री महाजन ने कहाएमटीडीसी के रिसॉर्ट्स/पर्यटक आवास राज्य के प्रत्येक कोने में महत्वपूर्ण स्थानों पर स्थित हैं। महामंडल के कुल 34 पर्यटक आवास27 उपहारगृहनिवास और जलपान (Bed and Breakfast), महाभ्रमणकलाग्रामयात्री केंद्र (Visitor Centre’s) ईको टूरिज्म जैसे अनुभवशील उपक्रम हैं।  साथ ही हाल ही में एमटीडीसी ने जवाबदेह पर्यटन (Responsible Tourism) के तहत एक बड़े स्तर पर गतिविधि शुरू की है।  इसी प्रकार बीच रिसॉर्टहिल रिसॉर्टजंगल रिसॉर्ट जैसे विभिन्न प्रकार के पर्यटक आवास और उपहारगृह तथा बोट क्लबस्कूबा डाइविंग (IISDA) आदि जल क्रीड़ा केंद्र पर्यटकों को आकर्षित करते हैं। 

            मंत्री श्री महाजन ने कहामहाराष्ट्र राज्य पर्यटन की दृष्टि से एक महत्वपूर्ण राज्य है।  महाराष्ट्र देश का एकमात्र ऐसा राज्य हैजहां 6 विश्व धरोहर स्थल850 से अधिक गुफाएंकरीब 400 किले और दुर्ग स्थित हैं।  इसके अतिरिक्त महाराष्ट्र विभिन्न पर्वत श्रृंखलाओंराष्ट्रीय उद्यानोंवन्यजीव अभयारण्योंसमुद्र तटोंनदियोंसांस्कृतिक विरासतरीति-रिवाजोंपरंपराओंवेशभूषात्योहारोंउत्सवों से समृद्ध है।  महाराष्ट्र के ये शानदारदर्शनीय और ऐतिहासिक स्थल सदैव देशी-विदेशी पर्यटकों को आकर्षित करते हैं।  1975 में अपनी स्थापना से लेकर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल पूरे महाराष्ट्र में प्रथम क्रमांक की अग्रणी पर्यटन संस्था है।  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल के सभी पर्यटक आवास गृहों में 'अतिथि देवो भवके मूल्यों का पूरी तरह से पालन किया जाता है। एमटीडीसी को महाराष्ट्र में एक प्रसिद्ध महामंडल के रूप में देखा जाता है जो रिसॉर्ट्स और पर्यटक आवासों में पर्यटकों को उत्तम आतिथ्य प्रदान करता है।                            

            इस अवसर का लाभ उठाने के लिए महामंडल की आधिकारिक वेबसाइट www.mtdc.co. पर संपर्क करें।  इसके लिए कुछ नियम और शर्तें हैं। आपके पास पहचान पत्र होना चाहिए। यह छूट केवल महिला पर्यटकों के लिए है।  महिला पर्यटकों को आवास में प्रवेश (चेक-इन) के समय उपस्थित रहना अनिवार्य है।

इसके लिए नियम एवं शर्तें इस प्रकार हैं।  यह छूट 01 से 08 मार्च की अवधि तक वैध रहेगी। यह छूट कॉन्फ्रेंस हॉललॉनस्पोर्ट्स कॉम्प्लेक्सऑडिटोरियम पर लागू नहीं है।  छूट में नाश्ता शामिल नहीं है.  इस ऑफर के अंतर्गत बुकिंग राशि रिफंडेबल और हस्तांतरणीय नहीं है।  इस छूट को वेबसाइट पर उपलब्ध किसी भी अन्य छूट के साथ नहीं जोड़ा जा सकता।  एक समय में केवल एक ही छूट का लाभ उठाया जा सकेगा।      

            यह छूट एमटीडीसी की लीज प्रॉपर्टी के लिए (अंबोलीत्र्यंबकेश्वरतुलजापुर) की गयी बुकिंग और किसी अन्य ओटीए (OTA) प्लेटफॉर्म के माध्यम से की गयी बुकिंग के लिए मान्य नहीं है।  पर्यटक डिस्काउंट प्रोमो कोड का उपयोग केवल एक बार ही कर सकेंगे।  इस अवसर का लाभ उठाने के लिए इसके पहले की गयी बुकिंग पर प्रोमो कोड लागू नहीं होगा।    

 बिना किसी पूर्व सूचना के किसी भी समय इन नियमों और शर्तों को बदलने का अधिकार एमटीडीसी के पास सुरक्षित  है। इस प्रोमो कोड का उपयोग करके एक समय में केवल एक कमरा बुक किया जा सकता है। जिस व्यक्ति के नाम पर बुकिंग की जायेगीउसे चेक-इन के समय उपस्थित रहना अनिवार्य होगा  अन्यथा बुकिंग की पूरी राशि जमा करनी होगी।           

            सभी क्षेत्रों में महिलाओं के अमूल्य योगदान की सराहना करने के उद्देश्य से एमटीडीसी अपने 'आई' (AAI) उपक्रम के तहत इस रियायत की घोषणा कर रहा है। इस योजना से पर्यटन के लिए माहौल बनेगा और महिलाओं को महाराष्ट्र के विभिन्न पर्यटन स्थलों पर जाने के लिए प्रोत्साहन मिलेगा।  साथ ही सही अर्थों में महिलाओं की भागीदारी में वृद्धि होगी और महिला पर्यटकों की संख्या में भी वृद्धि होगी।  इस अवसर का लाभ उठाने के लिए जल्द से जल्द आधिकारिक वेबसाइट www.mtdc.co पर संपर्क करें।  एमटीडीसी का यह ऑफर न केवल महाराष्ट्रबल्कि भारत और विदेश की सभी महिलाओं के लिए एक विशेष उपहार है।  एमटीडीसी ने अपील की है कि महिला पर्यटक  इस अवसर का भरपूर लाभ उठाएं।

            पर्यटन विभाग की सचिव जयश्री भोजएमटीडीसी की प्रबंध निदेशक श्रद्धा जोशी-शर्मा और एमटीडीसी के महाप्रबंधक चंद्रशेखर जयसवाल के मार्गदर्शन में राज्य में 'आईमहिला केंद्रित/लिंग समावेशी (Gender Inclusive) पर्यटन नीति लागू की जा रही है।

०००

 


 

Under the 'AAI' policy, MTDC is offering a 50% discount

for women at its tourist residences.

                     - Tourism Minister Girish Mahajan

      Mumbai, Dec. 30:  As per the 'AAI' women-centric/Gender Inclusive tourism policy of the state government dated June 192023, various schemes are being implemented by MTDC for women tourists and women entrepreneurs. As part of this policy, a 50% discount is being offered to women for 8 days from March 1 to March 82024, at all premium tourist residences of the corporation, informed Tourism Minister Girish Mahajan.

      Minister Mahajan said, "MTDC's resorts/tourist residences are located at important places across the state. The corporation has a total of 34 tourist residences, and 27 restaurants, and offers experiences like Bed and Breakfast, Mahabhraman, Kalagram, Visitor Centers, and Eco-Tourism. Recently, under Responsible Tourism, MTDC has made significant progress. Similarly, various types of tourist residences and restaurants like Beach Resorts, Heal Resorts, Jungle Resorts, as well as Boat Clubs, Scuba Diving (IISDA), etc., attract tourists."

      Minister Mahajan stated, "Maharashtra is an important state from a tourism perspective. It is the only state in the country with 6 World Heritage Sites, over 850 caves, and nearly 400 forts. Maharashtra is rich with various mountain ranges, national parks, wildlife sanctuaries, beaches, rivers, cultural heritage, traditions, costumes, festivals, and celebrations. These scenic, natural, and historical places in Maharashtra always attract domestic and international tourists. Since its establishment in 1975, the Maharashtra Tourism Development Corporation has been the leading and foremost tourism organization in Maharashtra.

      The principle of 'Atithi Devo Bhava' is fully implemented in all the tourist residences of the Maharashtra Tourism Development Corporation. MTDC is known as a prestigious corporation in Maharashtra for excellently hosting tourists in its resorts and tourist residences.

      To avail of this opportunity, visit the official website www.mtdc.co. There are terms and conditions for this. Having an ID proof is necessary. This discount is exclusively for women tourists. Women tourists must be present at the time of check-in (arrival).

The terms and conditions are as follows. This discount is valid for the period from March 1 to March 8.

      This discount does not apply to conference halls, lawns, sports complexes, or auditoriums. The discount does not include breakfast. The booking amount under this offer is non-refundable and non-transferable. This discount cannot be combined with any other discounts available on the website. Only one discount can be availed at a time.

This discount is not valid for bookings made for MTDC's lease properties (Amboli, Trimbakeshwar, Tuljapur) and bookings made through any other OTA (Online Travel Agency) platforms. Tourists can use the discount promo code only once. The promo code will not apply to prior bookings. MTDC reserves the right to change these terms and conditions at any time without prior notice. Using this promo code, booking can be made for only one room at a time. The person in whose name the booking is made must be present at the time of check-in. Otherwise, the full booking amount must be paid.

To express appreciation for the invaluable contributions of women in all fields, MTDC is announcing this discount under its 'AAI' initiative. This initiative will create an environment for women to travel and encourage them to visit various tourist places in Maharashtra. It will also significantly increase women's participation and the number of women tourists. To take full advantage of this opportunity, visit www.mtdc.co as soon as possible. This offer from MTDC is a special gift not only for women in Maharashtra but also for women across India and abroad. Women tourists are encouraged by MTDC to fully avail themselves of this opportunity.

      The 'AAI' women-centric/Gender Inclusive tourism policy of the state is being implemented under the guidance of Jayashree Bhoj, Secretary of the Tourism Department of the state, and Shraddha Joshi-Sharma, Administrative Director of MTDC, and executed by Chandrashekhar Jaiswal, General Manager of MTDC.

०००

 

दि. 30 डिसेंबर, 2023


आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के सवलत

 आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये


 महिलांसाठी 50 टक्के सवलत


- पर्यटन मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि.30 : राज्यशासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


            मंत्री श्री.महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट्स / पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे, 27 उपहारगृहे असून, निवास व न्याहारी (Bed and Breakfast), महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र (Visitor Centre’s), इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलिकडेच जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग (IISDA) इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.


            महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे, 850 हून अधिक लेण्या, 400 च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. 1975 मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये केली जाते. रिसॉर्टस आणि पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे.


            या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या www.mtdc.co. या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. ही सवलत 01 ते 08 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही सवलत, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतीं सोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल.


            ही सवलत एमटीडीसीच्या लिज प्रॉपर्टीजसाठी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटकांना डिस्काऊंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकाच वेळी करता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार एमटीडीसीने राखून ठेवले आहे. हा प्रोमो कोड वापरून एकावेळी फक्त एका कक्षाचे बुकिंग करता येईल. ज्यांच्या नावावर बुकिंग केले जाईल त्या व्यक्तीने चेक-इनच्या वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा, बुकिंगची पूर्ण रक्कम जमा करावी लागेल.


            सर्व क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी, एमटीडीसी आपल्या ‘आई’ (AAI) उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर करत आहे. या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी, लवकरात लवकर www.mtdc.co या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. एमटीडीकडून ही ऑफर केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील आणि परदेशातील सर्व महिलांसाठी एक खास भेट आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीद्वारे महिला पर्यटकांना करण्यात आले आहे.


  ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणाची राज्यात पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल या धोरणाची कार्यवाही करीत आहेत.


००००

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

 भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महासंकल्प रोजगार अभियानात महानिर्मितीकडून १०४२ उमेदवारांची निवड

       विजया बोरकर यांची ‘महानिर्मिती’च्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड

 

            मुंबईदि. २९ :- राज्यात खात्रीशीरदर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनी समोरील आव्हान आहे. यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरणेबाबतराज्य शासनाच्या "महासंकल्प रोजगार" अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेत १२ प्रातिनिधिक उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले. या समारंभात ते सह्याद्री अतिथीगृह येथे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगनमहापारेषणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमारसूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

            महाराष्ट्रात युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ हजार पदभरती करण्याचा शासनाने निर्धार केला आणि महानिर्मितीने पारदर्शकतेसह जलदगतीने मागील एक वर्षाच्या काळात विविध संवर्गातील १०४२ उमेदवारांची निवड केली ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. शिवाय १५० उमेदवारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. पारदर्शक भरतीमुळे युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतोअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. विजया बोरकर यांची महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचे आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नवीन उत्साहाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

            भारत विकसनशील आणि जलदगतीने आर्थिक विकास करणारे राष्ट्र आहे. या आर्थिक विकासाचा कणा ऊर्जा विभाग आहे. आगामी काळात ऊर्जेची मागणी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने ऊर्जा क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी तीनही कंपन्यांनी आपापल्यापरीने सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०३५ पर्यंतचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सद्य:स्थितीत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात  बदल होईल. पंप स्टोरेजग्रीन हायड्रोजनसारखे धोरण राज्याने तयार केले आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले कीऊर्जा पुरवठ्यावर गुणवत्तापूर्ण जीवन,औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे. महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये लवकरच सुमारे १५ हजार भरती प्रक्रिया होणार आहे. त्यांनी मागील दीड वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती देत ऊर्जा विभागाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

            प्रास्ताविकातून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबलगन यांनी सांगितले कीमानव संसाधन विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यात येणार असून त्याद्वारे बदलीबढती टपाल,उच्च श्रेणी लाभ गोपनीय अहवाल ई - सेवा पुस्तिकेचा  समावेश करण्यात येणार आहे . राज्यभरात महानिर्मितीचे एकूण 9 हजार 915 प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी 6814 व्यक्तींना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. 2 हजार 103 पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण  देण्यात येत आहे.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते १२ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आलेत्यात विजया बोरकर (मुख्य अभियंता)राहुल नाळे (उप मुख्य अभियंता)अरुणा भेंडेकर (अधीक्षक अभियंता)जयदीप राठोड (लॅब केमिस्ट)अक्षय शिरसाट (सहाय्यक अभियंता)ज्ञानेश्वर कारंडे (सहाय्यक अभियंता)प्रकृती यादव (सहाय्यक अभियंता)प्रथमेश सोनजे (सहाय्यक अभियंता)सागर बागुल (कनिष्ठ अभियंता)मंगेश लाखे (कनिष्ठ अभियंता)तेजस काटे(कनिष्ठ अभियंता)वैभव सोनवणे(कनिष्ठ अभियंता) यांचा समावेश होता.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनीतर आभार प्रदर्शन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी केले. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक बाळासाहेब थिटेसंजय मारुडकरअभय हरणेकार्यकारी संचालक डॉ.नितीन वाघपंकज नागदेवतेउपसचिव नारायण कराडतसेच मुख्य अभियंते आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन 'सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन

'सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार

 

            नवी दिल्ली, दि.२९ : राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.

            मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वर्ष 2023 करिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी 31 जानेवारी  2024 पर्यंत पाठविता येणार आहे.

एकूण 4 विभाग35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रुपयांचा पुरस्कार

             यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रुपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाङ्मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

            प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण 6 साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रुपयांची पुरस्कार रक्कम आहे.

            सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी  साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार’  (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये)  प्रदान करण्यात येणार आहे.

            बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल.  प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे  31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

            राज्यशासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नवीन संदेश’ या सदरात यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.  यासह  या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाट्य मंदिर इमारतदुसरा मजलासयानी रोडप्रभादेवीमुंबई-400 025 यांच्या कार्यालयात  उपलब्ध आहे. तसेचबृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्रए/8स्टेट एम्पोरिया बिल्डिंगबाबाखडक सिंह मार्गनवी दिल्ली  या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.

ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेलत्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहीत नमुन्यातील प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाट्यमंदिर इमारतदुसरा मजलासयानी रोडप्रभादेवीमुंबई 400025 येथे पाठवाव्यात.

            मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तर बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावेअसे आवाहन सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

            पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाराष्ट्र परिचय केंद्रए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग बाबा खडक सिंग मार्गनवी दिल्ली या कार्यालयास भेट द्यावी. 

0000000


भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे

 भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे

राज्यपाल रमेश बैस

'मेरी माटी मेरा देशअभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

 

            मुंबईदि. २९ : देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला देश विश्वगुरू व्हावाअसेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेऊन कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरु होईलअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

            राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते  प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने 'मेरी माटी मेरा देशया अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

            याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता रायराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.              

            यावेळी राज्यपाल श्री.बैस म्हणालेदेशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासीक वारसा जोपासण्याचे काम केले.

            या अभियानात महाराष्ट्राने दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली यांचा अभिमान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपण माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांनाशहिदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन साजरा केला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्नं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

0000


Friday, 29 December 2023

बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 

            मुंबईदि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 जानेवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

           या आदेशानुसार शस्त्रेअग्नीशस्त्रेबॅटनतलवारीभालेदंडुकेविना परवाना बंदुकाचाकूकाठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकतेअशी हत्यारे बाळगणेस्फोटके वाहून नेणेप्रेतआकृतीपुतळे यांचे प्रदर्शनसार्वजनिक टिकाकरण उच्चारगाणी गाणेसंगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

         कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेतनोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखाचौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

 भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महासंकल्प रोजगार अभियानात महानिर्मितीकडून १०४२ उमेदवारांची निवड

       विजया बोरकर यांची ‘महानिर्मिती’च्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड

 

            मुंबईदि. २९ :- राज्यात खात्रीशीरदर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनी समोरील आव्हान आहे. यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरणेबाबतराज्य शासनाच्या "महासंकल्प रोजगार" अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेत १२ प्रातिनिधिक उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले. या समारंभात ते सह्याद्री अतिथीगृह येथे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगनमहापारेषणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमारसूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

            महाराष्ट्रात युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ हजार पदभरती करण्याचा शासनाने निर्धार केला आणि महानिर्मितीने पारदर्शकतेसह जलदगतीने मागील एक वर्षाच्या काळात विविध संवर्गातील १०४२ उमेदवारांची निवड केली ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. शिवाय १५० उमेदवारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. पारदर्शक भरतीमुळे युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतोअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. विजया बोरकर यांची महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचे आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नवीन उत्साहाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

            भारत विकसनशील आणि जलदगतीने आर्थिक विकास करणारे राष्ट्र आहे. या आर्थिक विकासाचा कणा ऊर्जा विभाग आहे. आगामी काळात ऊर्जेची मागणी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने ऊर्जा क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी तीनही कंपन्यांनी आपापल्यापरीने सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०३५ पर्यंतचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सद्य:स्थितीत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात  बदल होईल. पंप स्टोरेजग्रीन हायड्रोजनसारखे धोरण राज्याने तयार केले आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले कीऊर्जा पुरवठ्यावर गुणवत्तापूर्ण जीवन,औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे. महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये लवकरच सुमारे १५ हजार भरती प्रक्रिया होणार आहे. त्यांनी मागील दीड वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती देत ऊर्जा विभागाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

            प्रास्ताविकातून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबलगन यांनी सांगितले कीमानव संसाधन विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यात येणार असून त्याद्वारे बदलीबढती टपाल,उच्च श्रेणी लाभ गोपनीय अहवाल ई - सेवा पुस्तिकेचा  समावेश करण्यात येणार आहे . राज्यभरात महानिर्मितीचे एकूण 9 हजार 915 प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी 6814 व्यक्तींना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. 2 हजार 103 पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण  देण्यात येत आहे.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते १२ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आलेत्यात विजया बोरकर (मुख्य अभियंता)राहुल नाळे (उप मुख्य अभियंता)अरुणा भेंडेकर (अधीक्षक अभियंता)जयदीप राठोड (लॅब केमिस्ट)अक्षय शिरसाट (सहाय्यक अभियंता)ज्ञानेश्वर कारंडे (सहाय्यक अभियंता)प्रकृती यादव (सहाय्यक अभियंता)प्रथमेश सोनजे (सहाय्यक अभियंता)सागर बागुल (कनिष्ठ अभियंता)मंगेश लाखे (कनिष्ठ अभियंता)तेजस काटे(कनिष्ठ अभियंता)वैभव सोनवणे(कनिष्ठ अभियंता) यांचा समावेश होता.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनीतर आभार प्रदर्शन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी केले. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक बाळासाहेब थिटेसंजय मारुडकरअभय हरणेकार्यकारी संचालक डॉ.नितीन वाघपंकज नागदेवतेउपसचिव नारायण कराडतसेच मुख्य अभियंते आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi