Friday, 29 December 2023

ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा

रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक

 

               मुंबई, दि. 28 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक मंडळाची बैठक आज झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्राउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी अनबलगनमहापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमारस्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

            राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे हे सांगून श्री. फडणवीस म्हणालेमहाजेनकोने सर्व अंगाने ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे. कोराडीपारस व  इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी. आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील यंत्रे ही खूप महागडी व जास्त वीज घेणारी असतात. त्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा करणे आवश्यक ठरते. अन्यथा ही यंत्रे निकामी होतात.

            त्याचबरोबर भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा. प्रथम २५ टक्के भूमिगत प्रणाली करुन त्याचा अभ्यास करावा. वितरण खर्च किती वाढतोवीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने नियोजन करावे. जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी. त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सीएसआर निधी वापरावा,जेणेकरून यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

 विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. २८ : विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

               सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. तसेच यावेळी कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळतापी पाटबंधारे विकास महामंडळकोकण पाटबंधारे विकास महामंडळगोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च १०० टक्के किंवा १० कोटी पेक्षा जास्त होत असेल, तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कीया निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदा मान्यता द्यावी. प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत आहे. भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. न्याय प्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यायालयात भरावी. त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठित करून तडजोडीसाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी तडजोड करावी. भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज दर बँके प्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करावा. महसूल विभागाने मुदतीत प्रस्ताव पाठवावेत. मुदतीत प्रस्ताव न पाठविणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावीअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावेसिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षानंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा. धरणाच्या भिंतीवर तसेच जलाशयाच्या भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा. यातून पाटबंधारे विभागाला महसूल मिळेलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी जिंगाव मध्यम प्रकलपातील प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या बेसिक या ऑनलाईन प्रणालीचे व या प्रणालीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे दाखले ऑनलाइन मिळणार आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी

कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 28 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

            ‘सेंद्रीय शेती विषमुक्त शेती’ या सारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्या. तृणधान्याला आता मोठी मागणी आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्ये उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तृणधान्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट - ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

            शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावीजागतिक कृषी गणना व शेती विषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावाकृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावीपिकांवरील कीड नियंत्रणासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाटपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर आणखी वाढीव निधीची मागणी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा. विभागाने आर्थिक वर्षात केलेल्या तरतुदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षांत वाढीव निधीची मागणी करता येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी

मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

- मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

            नवी दिल्लीदि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणेकेंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणेसावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.

            सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावीअशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावाया मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला.

            याशिवाय गाडी क्रमांक २२६५३२२६५४२२६५५२२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणेमुंबई - मंगलोर एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेसमुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसएर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेसएर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.)लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावाया मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली.

            या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत.

००००

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या - मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश नवी दिल्ली, दि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणे, सावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती. सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावी, अशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ आणि ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला. याशिवाय गाडी क्रमांक २२६५३, २२६५४, २२६५५, २२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणे, मुंबई - मंगलोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, एर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस, एर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.), लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.), एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावा, या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली. या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत. ००००

 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी

मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या

- मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

            नवी दिल्लीदि. 28 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी मंत्री श्री.केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणेकेंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणेसावंतवाडी स्थानकामध्ये पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्त्वतः मान्य केल्या व याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास दिल्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या (केआरपीए) मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री श्री. केसरकर यांनी मंत्री श्री.वैष्णव यांच्याकडे याबाबतची विनंती केली होती.

            सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी थांबले आहे. यासाठी आवश्यक असलेला नऊ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून कामाला गती द्यावीअशी विनंती मंत्री श्री.केसरकर यांनी केली होती. यास रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. कोकणातील प्रवाश्यांना अधिक चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने सावंतवाडी स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन’ आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेमध्ये समावेश करण्यात यावाया मागणीला देखील तत्काळ प्रतिसाद देत श्री.वैष्णव यांनी मान्यता दिली. सर्व प्रवाशांबरोबरच विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारी पूर्ण वेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्ट‍िम सावंतवाडी स्थानकावर सुरू करण्यास देखील त्यांनी होकार दर्शविला.

            याशिवाय गाडी क्रमांक २२६५३२२६५४२२६५५२२६५६ यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा देणेमुंबई - मंगलोर एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेसमुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसएर्नाकुलम हजरत निझामुद्दीन मंगला एक्सप्रेसलोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेसएर्नाकुलम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)त्रिवेंद्रम - हजरत निझामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - अजमेर मरूसागर एक्सप्रेस (साप्ता.)लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस (साप्ता.)एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर नियमित थांबा देण्याची विनंती देखील मंत्री श्री.वैष्णव यांनी मान्य केली. सावंतवाडी स्थानकावरून चांगले उत्पन्न असताना देखील नागपूर - मडगाव स्पेशल एक्सप्रेसचा रद्द केलेला सावंतवाडी स्थानकावरील थांबा तत्काळ सुरू करण्यात यावाया मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री श्री.वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली.

            या बाबींचा लाभ केवळ कोकणातील नव्हे, तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाश्यांना होणार असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी या मागण्या मान्य केल्याबद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या रेल्वेसंदर्भातील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दल रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांचे वैयक्तिक तसेच केआरपीएच्या वतीने आभार मानले आहेत.

००००

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

 कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी

राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

– मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 28 : सहकार क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. याशिवायकेंद्र सरकार नवीन सहकार धोरण तयार करत आहे. सहकारातील या बदलांची माहिती आणि अभ्यास हा विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधील सचिव ते बँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत सर्वांचा हवा. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वतःचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करावेअसे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बँकिंग दिनदर्शिका २०२४चे प्रकाशन सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्करमाजी मंत्री आनंदराव अडसूळबँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघेअनंत भुईभारतेजल कोरडेलीलाताई अनास्कर आदी यावेळी उपस्थिती होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणालेबँक आणि येथील व्यवस्थापनाने आर्थिक शिस्त वाढवली. अडचणीतून बाहेर काढून आज चांगल्या स्थितीला आपण आलो. अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. बँकेचे सगळ्यात महत्वाचे काम हे कृषी क्षेत्राला अर्थसाह्य करण्याचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. सध्या राज्यातील सगळ्या भूविकास बँका बंद पडल्या आहेत, तर 5-6 जिल्हा बँका तग धरून आहेत. इतर जिल्हा बॅंकांची स्थिती ही आजारी पडल्यासारखी आहे. अशा बॅंकांना मदत केल्याशिवाय त्या उभ्या राहणार नाहीत. राज्य बँकेने जिल्हा बँकेला मदत केली नाही तर त्या बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मदत करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मदत मिळत नाही. गावपातळीवर शेतकऱ्यांना बॅंकेने मदत केली पाहिजेअसे ते म्हणाले.

            सध्या केंद्र सरकारचे नवीन सहकार धोरण तयार होत आहे. प्राथमिक सहकारी सेवा संस्थांची बळकटीकरणावर यामध्ये भर देण्यात आला आहे. सर्व सहकारी संस्था एकमेकांना जोडण्याची (लिंक करण्याची) तरतूद यामध्ये आहे. अशावेळी विकास संस्थापतसंस्थानागरी सहकारी बॅंका येथील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

            राज्य सहकारी बॅंकेने राबविलेली आत्मनिर्भर कर्ज योजना अतिशय चांगली आहे. कोविड नंतर आपण आत्मनिर्भर कर्ज योजनेतून अनेक कारखाने आणि संस्थांना मदत केली. त्यामुळे या संस्था काहीशा सुस्थितीत येऊ शकल्या. विविध प्राथमिक सहकारी संस्थांना बळकटी आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहेत. त्यासाठी काय योजना आणता येतीलत्यादृष्टीनेही राज्य सहकारी बॅंकेने पावले उचलावीतअसे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. सहकारविषयक धोरणात सातत्य असणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

            बॅंकेचे प्रशासक श्री. अनास्कर यांनी यावेळी बॅंकेने गेल्या काही वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. देशातील राज्य सहकारी बॅंकामध्ये सर्वात जास्त स्व-निधीसर्वात जास्त 45 हजार कोटी रुपयांचे व्यवहार609 कोटी रुपये निव्वळ नफासुरक्षा व्यवस्थापनात आयएसओ मानांकन मिळविणारी ही एकमेव बॅंक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

            बॅंकिंग दिनदर्शिका -2024 मध्ये आर्थिक शिस्त आणि व्यवहारांविषयीची माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले.

0000

Thursday, 28 December 2023

जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

 जेएन- 1’ घातक नाहीनागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 28 : राज्यात कोरोनाच्या जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावेअसे आवाहन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

               ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज झाली.

                आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमारसर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा आरोग्य अधिकारीमहानगरपालिका आरोग्य अधिकारीजिल्हा शल्यचिकित्सकतसेच टास्क फोर्सचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्तेपुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदारनवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदमआरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले. 

                 ‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रशासकीय रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम झालेली नाही तेथे ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळेधार्मिक स्थळी जातात. मात्र, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नयेअसे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतीलत्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहेत्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सुचविल्या जातीलअसेही त्यांनी सांगितले.

            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलेजेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईलअशी परिस्थिती सध्या नाही. मात्र, तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.  उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. कानिटकरडॉ. कार्यकर्तेडॉ. पोतदारडॉ. कदम यांनी विविध सूचना केल्या.

****

Featured post

Lakshvedhi