Tuesday, 26 December 2023

Dwarika nagari पहायची तर चला

 गुजरात सरकार और मझगांव डाक के बीच वाइब्रेंट गुजरात में एक समझौता होगा जिसके तहत मझगांव डाकयार्ड  एक विशेष पनडुब्बी द्वारिका के समुद्र में चलाएगी जो समुद्र के नीचे 300 फीट गहराई में जाकर तीर्थ यात्रियों को समुद्र में डूबी हुई द्वारिका नगरी के अवशेष के दर्शन कराएगी 


इस पनडुब्बी में 24 यात्री और 6 क्रू बैठ सकते हैं


31डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यात आल्याने, बाजारात शाकाहारी कोंबडा दाखल..😂😂🐓🐓

31डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यात आल्याने, बाजारात शाकाहारी कोंबडा दाखल..😂😂🐓🐓

 

Important Cyber Updates* *Major Changes in UPI* --------------------------------

 *Important Cyber Updates*

*Major Changes in UPI*

--------------------------------------

*RBI ने NPCI च्या मार्फत रन होणार्‍या सर्व प्रकारच्या UPI पेमेंट सिस्टीम मध्ये 01 जानेवारी 2024 पासून महत्वाचे बदल केले आहेत.*

*हे बदल करणे RBI ला का गरजेचे होते हे पुढील आकडेवारी वरून पाहू.*


*# देशात UPI चे वापरकर्ते - 40 कोटी.*

*# 2023 या वर्षात नोव्हेंबर पर्यंत UPI च्या माध्यमातुन झालेली ट्रान्झ्याक्शन्स - 11 बिलियन.*

*# UPI द्वारे 2023 या वर्षात झालेल्या व्यवहारांचे मुल्य - ₹ 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त.*

*# 2023 या वर्षात UPI द्वारे सायबर गुन्ह्यात चोरी झालेली रक्कम - ₹ 30 हजार करोड रुपये.*

*# येत्या 3 वर्षात UPI चा अपेक्षित वापर - 100 बिलियन ट्रान्झ्याक्शन्स.*

--------------------------------------

*सायबर गुन्हेगारां कडून UPI च्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची रक्कम खूपच मोठी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव RBI ने पुढील बदल केले आहेत.*


1) जर आपण GPay, PhonePe, Paytm, Bhim... ईत्यादी UPI पेमेंट App फोन मध्ये ईनस्टॉल केली असतील आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या काळात ज्या App चा जर एकदाही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ती App ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंन्ड केली जातील.


*2) पेमेंट लिमिट -* डेली पेमेंट लिमिट जास्तीतजास्त 1 लाख रुपये असेल.


*3) स्पेशल पेमेंट लिमिट -* फक्त हॉस्पिटल्स व शैक्षणिक संस्था यांना एका दिवसात जास्तीतजास्त 5 लाख रुपये.

म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेज चि 5 लाख रुपया पर्यन्तची फी UPI द्वारे भरता येईल.


*4) ट्रान्झ्याक्शन सेटलमेंट टाइम -*  रुपये 2,000/- पेक्षा जास्त रकमेचे सेटलमेंट होण्यास चार तास लागणार.

RBI ने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. आत्ता पर्यंत ट्रान्झ्याक्शन झाले की लगेचच विक्रेत्याच्या अकाऊंट ला पैसे जमा व्हायचे, 

*जानेवारी नंतर तुम्ही कोणत्याही **नवीन व्यक्तीस, शॉप ला किंवा ऑनलाईन ₹ 2000 पेक्षा जास्त रक्कम UPI ने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाऊंट ला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहेत.* 

पण तुम्ही ती व्यक्ति किंवा दुकानदाराला नेहमी (Frequently) UPI द्वारे पेमेंट करत असाल तर हा नियम लागू होत नाही.


*5) UPI ट्रान्झ्याक्शन कॅन्सलेशन ऑप्शन -* येथून पुढे UPI द्वारे **नवीन व्यक्ति, दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट केल्या नंतर चार तासाच्या आत तुम्ही ते ट्रान्झ्याक्शन कॅन्सल करू शकणार आहे, असे कॅन्सल केलेल्या ट्रान्झ्याक्शन चे पेमेंट Revert होऊन मूळ अकाऊंट ला जमा होईल. 

*याचा फार मोठा उपयोग सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी होईल किंवा चुकून दुसर्‍याच्या अकाऊंट ला पैसे गेले असतिल तर असे पेमेंट लगेच परत मिळू शकेल.*

          *पण याचा एक मोठा तोटाही आहे, जर तुम्ही **नवीन ठिकाणी 2000 रुपयां पेक्षा जास्त रकमेची UPI द्वारे खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूची डीलीव्हरी चार तासांनी देईल कारण चार तासांत तुम्ही ट्रान्झ्याक्शन कॅन्सल करू शकता हे त्यालाही माहिती असल्याने तो रिस्क घेणार नाही, तसेच हॉटेल मध्ये जेवायला गेलो आणि बिल 2000 पेक्षा जास्त झाले तर हॉटेल मालक UPI Accept करणार नाही, तिथे तुम्हाला पूर्वी सारखे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरावे लागेल.*


*6) विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार -*  बर्‍याच वेळा आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ठ नावाने सेव्ह असतो, नंतर ती व्यक्ति आपला मोबाईल नंबर बदलते. मोबाईल कंपनी सहा महिन्यांपासून रिचार्ज न केलेला/बंद असलेला नंबर दुसर्‍या कोणाला तरी विकते. आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या नंबर वर पेमेंट करतो पण ते जाते भलत्याच व्यक्तीला. किंवा ट्रुकॉलर ला नाव वेगळे दिसते आणि बँक अकाऊंट वेगळ्याच नावानी असते. 

*येथून पुढे सिमकार्ड कोणत्याही नावाने असले तरी बँक अकाऊंट ज्या नावाने असेल तेच नाव UPI पेमेंट करायच्या वेळी डिस्प्ले होईल.*


*7) UPI क्रेडिट लाइन -* UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बॅंकेत पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे, आता तुम्ही तुमच्या बॅंकेला रिक्वेस्ट करून शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकाल. 

तुमची बँक तुमचे ट्रॅक रेकॉर्ड व सीबील स्कोर चेक करून ही फॅसिलिटी (ओव्हर ड्राफ्ट/CC सारखी) देईल. 


*8) UPI ATM -* यासाठी RBI ने जपान मधील हिताची कंपनी बरोबर कोलॅबरेट केले आहे. लवकरच ही ATM मशीन्स सगळीकडे उपलब्ध होतील. जसे डेबिट/क्रेडिट कार्ड स्वॅप करून ATM मधुन कॅश काढता येते तसेच UPI QR कोड स्कॅन करून कॅश काढता येणार आहे. 


*9) UPI ट्रान्झ्याक्शन चार्जेस -* जर कोणी UPI क्रेडिट लिमिट वापरुन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे UPI व्हॅलेट मध्ये पैसे जमा केले असतिल (आत्ता फक्त Paytm ला ही फॅसिलिटी उपलब्ध आहे) आणि त्यातून UPI पेमेंट केले असेल तर विक्रेत्याला 1.1% सर्विस चार्ज द्यावा लागेल. 


**अजूनही काही नवीन सर्विसेस प्रस्तावित आहेत, तसेच वरील  UPI सर्विसेस च्या Implementing मध्ये येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून हे नियम NEFT, RTGS ईत्यादी ऑनलाईन पेमेंट साठी पण लागु करणे विचाराधीन आहे. लवकरच RBI च्या वतीने त्याबद्दल ऑफिशिअल Announcements केल्या जातील. 


#©️ संकलन, शब्दांकन 

Amod Wagh 


संदर्भ - 1) RBI Governor's announcements. 

2) NPCI Circular regarding this changes.

Monday, 25 December 2023

एरवी नवरा बायको ची भांडणाची जुगलबंदीच पाहायला मिळते.*❤️❤️❤️

 *अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!* *नवरा बायकोचे इतके शार्प ट्यूनिंग प्रथमच पाहिले. एरवी भांडणाची जुगलबंदीच पाहायला मिळते.*❤️❤️❤️


काव्य कला



प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

        मुंबई दि. 25: देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या  जयंती निमित्ताने  आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव   श्रीमती सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव श्रीप्रकाश इंदलकरअवर सचिव, श्रीरविंद्र पेटकरसहायक कक्ष अधिकारी श्रीराजेंद्र बच्छाव,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षकश्रीविजय शिंदे  यासह अधिकारी - कर्मचारी  उपस्थित होते.

 

00000

वृत्त क्र. 4028

 

स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन

राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली

 

मुंबई दि. 25: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघलविशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

00000


 


भवतल

 चेरापुंजीचा पाऊस आणि २३ वर्षांची प्रतिक्षा !

(मेघालय डायरी)


दोन मित्र. जगातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी पाऊस पडत असताना जायचं ठरवतात. पुरेसे पैसे जमत नाहीत. शिवाय ऑफिसची सुट्टी, त्या भागातली अनिश्चितता या सर्व गोष्टींचे अडथळे असतात. त्यामुळे सारं काही बारगळतं. पण २३ वर्षांनंतर त्यांचा तिथं जाण्याचा योग येतो. मात्र, दिवस हिवाळ्याचे असतात. 

मग नेमकं काय होतं??

...


समीर कोडिलकर आणि माझी मैत्री १९९९-२००० पासूनची. मी पुण्यात ‘लोकसत्ता’ मधे आणि तो ‘प्रभात’ मधे असताना आम्ही भेटलो. आमचा बीट क्राइम. त्यामुळे पोलीस-प्रेसरूममधे भेटणं, बातम्या करणं, गप्पा – टप्पा, त्या निमित्ताने फिरणं. मैत्री घट्ट होत झाली. त्या वेळी मी हौस म्हणून हवामान, पर्यावरण असे त्या काळी फारसे महत्त्वाचे समजले न जाणारे विषयही हाताळायचो. तेव्हाची माझी फॅण्टसी होती- जगातल्या सर्वाधिक पावसाच्या चेरापुंजीचा धो-धो पाऊस अनुभवायचा. समीरला बोललो. त्यालाही कल्पना आवडली. तिकडं जायचं तर दोन गोष्टी महत्त्वाच्या- तीनेक आठवड्यांची सुट्टी (तेव्हा आमची झेप रेल्वेपर्यंतची) आणि खर्चासाठी पैसे. पैसे जमा करायला सुरुवात केली. पाच-सहा महिन्यांत माझ्याकडं काही पैसे जमले, त्याच्याकडंही तसेच काही. पण तेवढ्याने काही होणार नव्हतं. आणि मोठ्या सुट्टीचं काय? मग तो विषय मागं पडला.


अलीकडं मी *‘भवताल इकोटूर्स’* या उपक्रमाच्या निमित्ताने जुलै महिन्यात चेरापुंजीला गेलो होतो. गंमत म्हणजे आम्ही पूर्ण दोन दिवस तिथं होतो, पण पावसाचा एकही थेंब पडला नाही. (आधी सलग ५० दिवस पाऊस पडला होता.) याच उपक्रमासाठी नवनवी ठिकाणं, संकल्पना, वेगळी आकर्षणं यांचा शोध घेण्यासाठी आणि पूर्वतयारीसाठी नुकताच डिसेंबर महिन्यात पुन्हा मेघालय गेलो होतो. सोबत चार मित्र होते. त्यात समीरही होता. पावसाळा नाही तर नाही, निदान ठरवल्यानुसार चेरापुंजीला तरी भेट देता येईल, असा विचार करून समीर सहभागी झाला होता. २००० साली जायचं ठरवलेलं, प्रत्यक्षात तिथं जायला २०२३ साल उजाडलं. यावेळी अनेक भन्नाट गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. त्याबद्दल लिहीनच. पण आता चेरापुंजीबद्दल.


चेरापुंजीत आमचे दोन मुक्काम होते. नेमकं त्या वेळी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं. हवामान ढगाळ बनलं. रात्रीच्या वेळी छतावर टपटप आवाज सुरू झाला. डिसेंबर महिन्यात चक्क पाऊस पडत होता. आमची चेरापुंजीच्या पावसात भिजण्याची इच्छा इतकी तीव्र होती की जणू त्यासाठीच एवढं सारं जुळून आलं होतं... दुसऱ्या दिवशी उठल्यावर पावसात भिजलो. मग हवामान विभागाची वेधशाळा गाठली आणि जिथं सर्वाधिक पाऊस मोजला जातो, ते ठिकाणही पाहिले. तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिथला पाऊस, मान्सून समजून घेतला... जे ठरवले होते ते तब्बल २३ वर्षांनंतर प्रत्यक्षात येत होते.


- अभिजित घोरपडे


Exclusive Meghalaya - Kaziranga

नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी, चलो मेघालय

(Feb - March च्या सीमेवर)

9545350862 / bhavatal@gmail.com


.................................


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

954


5350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi