Monday, 23 October 2023

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

            मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने २३,२५ व २६ ऑक्टोबर कालावधीत तीन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपजिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र राजपूतपदनिर्देशित अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023  या कालावधीत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी http://gterollregistration.mahait.org  या संकेत स्थळास भेट देऊ शकता. या शिबिरात कोकण आणि मुंबई मतदार संघातील पदवीधर मतदार नोंदणी करू शकणार असल्याची माहितीही मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            पदवीधर मतदार संघासाठी मतदार भारताचा नागरिक असावामतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2023 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असणे आवश्यक आहे.  यासाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी),  विद्यापीठ किंवा संबंधित संस्था  यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्रकागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच  https://rb.gy/thjo6 या लिंकवर अर्ज डाऊनलोड करता येईल.

            मुंबई जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभाग भायखळाजे.जे. हॉस्पिटल,  जी.टी.हॉस्पिटलकामा हॉस्पिटलसेंट जॉर्ज हॉस्पिटलश्रीमती नाथाबाई ठाकरसी महिला विद्यापीठमरीन लाईनमध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंसपश्चिम रेल्वेचर्चगेटआर.बी.आय. फोर्टसह आयुक्त मुंबई महानगर पालिका या विविध 12 शासकीय कार्यालयांमध्ये या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००

डालडाचा डब्बा ...!!

 डालडाचा डब्बा ...!!


दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.

तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......!


एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....!


डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी” नावांच कांही परिमाण समोर आलेल्या अन्न पदार्थांची मजा घेत चवीने खायच्या ऐवजी त्याचा विचका करायची “Diet Consciousness” चिकित्सा संपूर्णपणे अपरिचीत होती त्यामुळे सणासुदीला डालडांत तळलेल्या टम्म पुऱ्या आणि घरच्या दह्याचा (मलमलच्या फडक्यांत बांधून रात्रभर लोंबत ठेवललेली ती गठडी...) चक्का बनवून त्यांत साखर, केशर, वेलची, जायफळ आणि चारोळ्या घालून तयार केलेलं अस्सल श्रीखंड - पुरीच जेवण हादडून सगळी मंडळी दुपारची मस्त ताणून देत असत...तब्येतीत जगत असत.


शाळेतल्या सहलीला जातांना सकाळी लवकर उठून आई बटाट्याची पिवळी भाजी, डालडात तळलेल्या पुऱ्या आणि एका छोट्या डबीत घातलेलं लिम्बाच लोणच असा डबा तयार करायची ... त्याच्या वासानेच सकाळी सकाळी सातच्या आत भुकेचा लोळ पोटांत उठायचा....!


दिवळींत घरांतले मोठ्ठाले डबे भर भरून मेसुरपाक (कां म्हैसूरपाक ) , कडक बुंदीचे लाडू , जिलेबी वगैरे पदार्थ सर्रास डालडा वापरून बनवले जायचे आणि ते छान लागायचे....हे खाऊन कुणाच बेली फॅट वगैरे वाढल्याच्या तक्रारी कधी चुकुनही ऐकलेल्या नव्हत्या ना कधी ‘डालडा खाऊ नका हो... मराल’ !! असा कुठल्या डॉक्टरने धमकीवजा सल्ला दिला होता....थोडक्यांत काय डालडा हा खाद्य जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता.


१९३० साली प्रथमच तुपाला पर्याय म्हणून हे Hydrogenated Vegetable Fat डच व्यापारी भारतांत घेऊन आले....हळूहळू त्याचा प्रसार होऊ लागला कारण भारतांत तूप न परवडणारी जनता तेंव्हाही अस्तित्वांत होती. डाडा अॅण्ड कंपनी नामक एका डच कंपनीकडे ह्याचे सगळे व्यापारी हक्क होते.....ह्या वस्तूला हिंदुस्थानात जबर मागणी असणार आहे हे ओळखून त्यावेळच्या Lever Brothers ह्या कंपनीने Hindustan Vanaspati Manufacturing Company नांवाने एक कंपनी सुरु करून Hydrogenated Vegetable Fat भारतातच बनविण्यासाठी मुंबईच्या शिवडीला एक कारखाना टाकला. डाडा अॅण्ड कंपनीकडून सगळे हक्क विकत घेतले पण डाडा कंपनी आपलं नाव Product Brand Name मध्ये असावं म्हणून अडून बसली तर Levers आपल्या नावांतल “L” अक्षरावर अडून बसले शेवटी Da Da च्या मध्ये L घालून DALDA (डालडा) हे सोपं सुटसुटीत Brand Name तयार झालं आणि १९३७ सालापासून सर्वसामान्य भारतीयांच्या खाद्य जीवनांत डालडा येऊन बसला तो कायमचा...!


अजूनही डालडाच अस्तित्व आहे पण त्याची पूर्वीची ती शान राहिलेली नाही. हल्ली डालडाला वनस्पती ऑइल म्हणतात.. प्लास्टिकच्या थैलीत तो मिळतो....डालडाचा तो प्रसिद्ध पत्र्याचा दंड गोलाकृती पिवळ्या रंगाचा डब्बा हल्लीच्या पिढीला माहितही नसणार. त्यामुळे त्याचे दिवळीतले महत्व सुद्धा आता इतिहास जमा झाले आहे.


रेडिमेड कपड्यांसारखे रेडिमेड लाडू करंज्याची पार्सलं दादरच्या रानडे रोडवर, दिवाळीच्या मोसमांत ठायी ठायी मिळतात. अगदी अमेरिकेत सेटल झालेल्या लेकरांना ही पार्सलं घरपोंच मिळण्याची व्यवस्था सुद्धा अगदी सहजी होते. अमेरिकेतली पिढी त्यालाही घरचा फराळ मानून धन्य आहे ही त्यांतली जमेची बाजू.. !


एरवी घरांतल्या आया-बहिणीने अपार कष्ट करून बनवलेल्या फराळाला असलेली त्यांच्या हाताची चव, त्यांच्या मायेचा, प्रेमाचा आपुलकीचा दरर्वळ, त्यांतली स्निग्धता ती कशी काय एक्सपोर्ट करणार ? असो.. जे कांही शिल्लक आहे तेही नसे थोडके.. बाकी सारे कालाय तस्मै नम:


प्रदीप अधिकारी.

जिवन गाणे

 मस्तक थोडं वाकवून बघा अहंकार मरून

जाईल.

डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मन ही वितळेल.

वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा दुःखाच काळ निघुन जाईल..

इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं

जग दिसू लागेल.

विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की, जीवन संपवतो. आणि गैरसमजूतीचा एक शब्द कानात शिरला की, भली भली नाती संपवतो.

        ,, *सुप्रभात,*

Sunday, 22 October 2023

सुखांत, निवांत झोपा कायमचे

 



शरीर में तेजी से खून बढ़ाने के घरेलु उपाय।*

 *शरीर में तेजी से खून बढ़ाने के घरेलु उपाय।*


शरीर में खून की कमी से बहुत बीमारियां लग सकती हैं। जिस वजह से इंसान कमजोर हो जाता है और उसका शरीर बीमारियों से लड़ नहीं पाता है। इसलिए महिलाओं और पुरूषों को शरीर में खून की मात्रा बढ़ाने के लिए इन उपायों को अपनाना चाहिए।


https://chat.whatsapp.com/DAVUTcU1vPwBnRNDvqHtx2

*तिल और शहद* 

दो घंटे के लिए 2 चम्मच तिलों को पानी में भिगों लें और बाद में पानी से छानकर इसका पेस्ट बना लें। अब इसमें 1 चम्मच शहद मिलाएं और दिन में दो बार सेवन करें।


*काफी और चाय खतरनाक*

 काफी और चाय का सेवन कम कर दें। एैसा इसलिए क्योंकि ये चीजें शरीर को आयरन लेने से रोकते हैं।


*ठंडा स्नान* 

दो बार दिन में ठंडे पानी से नहाए और सुबह नहाने के बाद सूरज की रोशनी में बैठें।


*अंकुरित भोजन* 

आप अपने भोजन में गेहूं, मोठ, मूंग और चने को अंकुरित करके उसमें नींबू मिलाकर सुबह का नाश्ता लें।


*आम* 

पके आम के गुदे को मीठे दूध के साथ सेवन करें। एैसा करने से खून तेजी से बढ़ता है।


*मूंगफली और गुड़* 

शरीर में खून की कमी को दूर करने के लिए मूंगफली के दानों को गुड़ के साथ चबा-चबा कर सेवन करें।


*सिंघाड़ा*

 सिंघाड़ा शरीर में खून और ताकत दोनो को बढ़ाता है। कच्चे सिंघाड़े को खाने से शरीर में हीमोग्लोबिन का स्तर तेजी से बढ़ता है।


*मुनक्का, अनाज, किशमिश, दालें और गाजर*

 मुनक्का, अनाज, किशमिश, दालें और गाजर का नियमित सेवन करें और रात को सोने से पहले दूध में खजूर डालकर उसको पीएं।


*फलो का सेवन* 

अनार, अमरूद, पपीता, चीकू, सेब और नींबू आदि फलो का अधिक से अधिक सेवन करें।


*आंवले और जामुन का रस*

 आंवले का रस और जामुन का रस बराबर मात्रा में मिलाकर सेवन करने से हीमोग्लोबिन का स्तर बढ़ता है।


*टमाटर का रस* 

एक गिलास टमाटर का रस रोज पीने से भी खून की कमी दूर होती है। इसलिए टमाटर का सूप भी बनाकर आप ले सकते हो।


*हरी सब्जिया*

 बथुआ, मटर, सरसों, पालक, हरा धनिया और पुदीना को अपने भोजन में जरूर शामिल करें।


*फालसा*

 फालसे का शर्बत या फालसे का सेवन सुबह शाम करने से शरीर में खून की मात्रा जल्दी बढ़ती है।


*सेब का जूस*

सेब का जूस रोज पीएं।


*चुकंदर* 

चुकंदर के एक गिलास रस में अपने स्वाद के अनुसार शहद मिलाकर इसे रोज पीएं। इस जूस में लौह तत्व ज्यादा होता है।


🪷 _ 🪷 _ 🪷 _ 🕉️ _ 🪷 _ 🪷 _ 🪷






 


   *🪷🪷।। शुभ वंदन ।।🪷🪷*


*🪷🪷प्रेषक: डॉ दर्शन बांगिया🪷🪷*


*WhatsApp:.* https://chat.whatsapp.com/DAVUTcU1vPwBnRNDvqHtx2


*Telegram:.* https://telegram.me/dadimaa


*YT:.* https://youtube.com/playlist?list=PLl52TwLppqHOUfSNI3uSAocH6e1H7Crv_


ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

🌸♾️🌸♾️🌸♾️🌸♾️🌸♾️🌸

शिंक आली तर लोकांना SORRY नाही देवाला THANKS म्हणा!*

 *शिंक आली तर लोकांना SORRY नाही देवाला THANKS म्हणा!*


*होय न सांगता येणारी**

*न थांबवता येणारी शिंक*

*ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे!*


१. शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.


२. पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.


३. आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.


४. दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे कारण स्त्रिया स्वपांक करतेवेळी किंवा घराची साफ सफाई करतेवेळी शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.


५. नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते. 


६. कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात ह्यासाठी तपकीर वापरणेची गरज नाही. 


७. शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धतीमध्ये ही क्रिया दिलेली आहे. 


८. अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते. 


९. शिंकामुळे चेहरा थोडासा लालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्यवर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात. 


१०. शिंकेमुळे डोक्यातील विचार चक्र खंडित होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांना मेंदुला नवचैतन्य निर्माण होते. 


११. सतत सर्दी होत असेल तर ती शिंकांमुळे. काही काळाने अशी सततची सर्दी थांबते. 


अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे...


अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे !!!

!'.. दयाघना

 '' 

तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची..पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत..पण..त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून..भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे..पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकड़े ती अतीव दयनीयतेनं पहात असे..त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई !..

आजचा दिवसही सणाचा..दिवाळीचा होता !

घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता..हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला..तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते !..मुलं सकाळपासून उपाशी होती..आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते !

शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला..

''..इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या

नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला..ना कधीही

आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण..आज अस्वस्थ का वाटतंय ?...'परमेश्वर दयाळू असतो,'असं म्हणतात..मग त्याला आपली परिस्थिती काकळू नये ?..आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?...की 'परमेश्वर दयाळू आहे' ही अफवाच आहे ?...होय..तसंच असलं पाहिजे !..तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस

पहावे लागले नसते !...''

विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.

पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते..त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं..

...तो शब्द होता ''दयाघन'' !

त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.

जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता..तो त्यांनी उचलला..आणि त्या ''दयाघन'' शब्दावर फुली मारली !

त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती !..

त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला..सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यांनं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्वं सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली..त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या !..निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.

श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती..

इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली..शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवे..कोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत..

मुलांच्या अंगावर ओरडले..

'' काय रे !..कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?''

दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही..असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत..असं क्षणभर का होईना..पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,

'' बाबा,..इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !

आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीयं !''

श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.

घरी येऊन पहातात तर काय...घरभर दिवे तेजाळत होते..सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता..एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?..विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली..सुवर्णालंकारांनी ती सजली होती..शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं..

'' एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?''

'' काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला..आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला !..जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय !''

शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.

'' काय निरोप दिलाय ?''

श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.

'' त्यानं निरोप दिलाय की..

'शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !'...

कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?''

पत्नीनं गोंधळून विचारलं.

क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.

पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता..कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली..हळूवार उघडली..आणि पानावरच्या ''दयाघन'' या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली !..

पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली...


*श्रद्धा !*

*श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते.*. 

        

🙏🏻 *अवधूत चिंतन श्री  गुरुदेव दत्त*

Featured post

Lakshvedhi