Friday, 25 August 2023

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्यासागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

 पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्यासागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता


  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार


            मुंबई, दि. २५:- महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


            याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा आराखडा सादर करण्यात आला होता. हा आराखडा लोकहितांचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले होते. महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणाने तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केला होता.


            पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी पाच जिल्ह्यांकरिता किनारपट्टी क्षेत्राचे नियमन अधिनियमन-२०१९ नुसार हा प्रारुप आराखडा तयार केला होता. त्यामध्ये चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने किनारपट्टीच्या क्षेत्राचे भरती व ओहोटी रेषेचे आलेखन केले आहे. त्यावर पाच जिल्ह्यांतून सूचना व हरकती मागवून हा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला. यात सागरी नियमन क्षेत्राचे चार प्रकारात वर्गीकरण आहे. त्यामध्ये परिस्थितीकीदृष्ट्या संवेदनशील, विकसित भाग, ग्रामीण भाग आणि पाण्याचा भाग यांचा समावेश आहे. यात पूर्वीच्या २०११ च्या अधिसूचनेतील भरती रेषेपासूनची १०० मीटर अंतरापर्यंतची मर्यादा आता खाडी, नद्या, नाले या क्षेत्रांकरिता ५० मीटर पर्यंत करण्यात आली आहे.  


            यामुळे या पर्यटन उपक्रमांनाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छिमारांना आणि पारंपरिक घरांच्या बांधकाम व दुरुस्तीची परवानगीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण परवानगी देऊ शकेल.


            तसेच स्थानिक लोकांची जुनी घरेही नियमित केली जाऊ शकणार आहेत. किनारपट्टीच्या भागामध्ये स्थानिक नागरिकांकरिता सामुदायिक पायाभूत सुविधा उभे करणे शक्य होणार आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व पारंपारिक व्यवसायासाठी आवश्यक अशा वाळवण, मासळी बाजार, जाळी बांधणी, होड्यांची दुरूस्ती अशा सुविधांनाही परवानगी दिली जाणार आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी घरगुती मुक्काम पर्यटन सुविधा देता येणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रासाठीच्या आवश्यक अशा समुद्रकिनारा शॅक (खोपटी), प्रसाधनगृहे, बैठक व्यवस्था आदी सुविधा तात्पुरत्या पर्यटन सुविधांनाही परवानगी देणे शक्य होणार आहे.  


0000

Jai ho

 अंतरिक्ष के प्रोजेक्ट सफल बनाने मे वैज्ञानिकों के अलावा बहुत लोगो का योगदान होता है छोटी सी भूल करोड़ों रुपए स्वाहा आप ड्राइवर की मनोदशा का अंदाजा लगाए जब वह यह कर रहा होगा👏👏


चांदोबा चांदोबा भागळास का, इस्त्रो chya याणातून येशील का

 🧡🌕🤍


आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया - पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..


का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?


कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की "ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल." 


चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे विलीनीकरण, सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना....ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या


फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका - रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.


तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र - साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडल होत. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ - ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हत. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ - ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली...!!!


पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभ रहायचं. देश लढत राहिला. 

ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणार एक आदर्श संविधान लिहिलं गेलं. जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारच शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. 

पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 


आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याच समोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय - फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेट मध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.


चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्या मागे मोठा इतिहास आहे.

आज उदयोन्मुख महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांचं यश - अपयश प्रत्येकाला आपलस वाटल कारण फक्त पैसाच नाही तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.


आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय. 

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडी वर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेल वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलच भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट........सगळ डोळ्यासमोर तरळल आहे.!!


आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल....आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!! 🇮🇳💐


-- Saurabh Ratnaparkhi

घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*

 *घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*


*१) ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल.

   

*२) मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल.

 

*३) लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे.

 

*४) वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र चघळावे, हळद व गूळ एकत्र करून खावे.

  

*५) संशमनि वटि चघळावी, एक पेला भर पाण्यात तिन चार कडुनिंबाची पाने उकळून थंड करून त्यात एक चमचा भरून मध मिसळून याने गुळण्या कराव्यात. लगेच आराम मिळतो.

   

*६) पाण्यात बडिशेप उकळून, गाळून, मग मध मिसळून घ्यावे.

  

*७) मधात काही लवंगा टाकून, मग थोड्या वेळाने हे चाटण घ्यावे, घसा दुखणं थांबेल.

  

*८) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळावा. याने जंतुसंसर्ग जातो.

 

*९) घसा खवखवत असल्यास खडिसाखर व चिमूटभर काथ जिभेवर ठेवून चघळावे, त्याने खुपचं आराम मिळतो.


*१०) त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.

 

*११ मध, ज्येष्ठमध पावडर हळद व कोरफड गर एकत्र मिसळून हे चाटण दिवसभर थोडे थोडे घ्यावे.


*१२) खदिरादि वटि, एलादि वटी चघळावी. याने घसा दुखणं थांबेल.


*१३ आंब्याची पाने पाण्यात उकळून मग गुळण्या कराव्यात.


*१४) कोमट पाण्यात मीठ घालून याने गुळण्या कराव्यात.


*१५)एक प्रभावी काढा...

एक पेला भर पाण्यात लवंग, ज्येष्ठमध, काळे मिरे, हळद, दालचिनी, केशर, आले, गुळ, हे सर्व पदार्थ एकत्र टाकून अर्धं उकळावे. व गरम गरम, शेकत प्यावे. याने घशाची सूज, वेदना, जंतूसंसर्ग, जातो.


 वरील सर्व प्रकारचे उपाय करावेत. आराम पडेल नक्कीच...


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



रोजगार


 

आरोग्यं संपदा

 


महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.79 टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.79 टक्के दराने परतफेड


            मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची 9.79 टक्क्याने 24 सप्टेंबरपर्यंतच्या देय व्याजासह 25 सप्टेंबर 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.


            शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.


            दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 9.79 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.


*****

Featured post

Lakshvedhi