Thursday, 24 August 2023

आज़ादी के अमृत महोत्सव के अवसर पर रिक्त पदों को भरने को प्राथमिकता

 आज़ादी के अमृत महोत्सव के अवसर पर रिक्त पदों को भरने को प्राथमिकता


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई शहर, उपनगरों और ठाणे जिले में 58 आंगनबाड़ियो की


कर्मचारियों को प्रतिनिधिक स्वरूप नियुक्ति पत्र प्रदान


 


            मुंबई :-महिलाओं के समग्र विकास के लिए राज्य में जल्द से जल्द चौथी महिला नीति लागू की जायेगी. आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर सरकारी रिक्त पदों को भरने को प्राथमिकता दी गई है और इनकी हुई नियुक्ति सेवा का एक अवसर है. इस कार्य के माध्यम से राज्य में बाल कुपोषण को कम करने और महिला स्वास्थ्य सुधार योजनाओं को प्रभावी ढंग से लागू करने का आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.


            सह्याद्री अतिथिगृह में एकात्मिक बाल विकास सेवा योजना के अंतर्गत भरती प्रक्रिया के द्वारा नवनियुक्त 19 हजार 577 आंगनबाड़ी सेविका, मददनीस में से मुंबई शहर, उपनगर और ठाणे जिले के 58 आंगनबाड़ी कर्मचारियों को प्रातिनिधिक स्वरूप में नियुक्ति पत्र प्रदान किए गए. इस कार्यक्रम में मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे. इस अवसर पर उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला एवं बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला एवं बालविकास विभाग के सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना की आयुक्त रूबल अग्रवाल, महिला एवं बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला एवं आर्थिक विकास महामंडल की व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशन की संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर और ठाणे जिले के 58 नवनियुक्त आंगनबाड़ी कर्मचारी और अधिकारी उपस्थित थे.


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने उन आंगनबाड़ी कर्मचारियों को बधाई दी, जिन्हें आज नियुक्ति पत्र दिया गया और उनके भविष्य के लिए शुभकामनाएं दीं. मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा, करीब 20 हजार 186 पद खाली थे. आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर हमने रिक्त पदों को भरने को प्राथमिकता दी है. आज हम राज्य में 'सरकार आपके द्वार' उपक्रम शुरु किया हैं. इस पहल के जरिए हम अब तक 13 जिलों तक पहुंच चुके हैं और राज्य के जिलों तक पहुंच रहे हैं. हमें संतोष है कि एक करोड़ से अधिक नागरिकों को लाभ हुआ है, ऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा.


            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि राज्य की भावी पीढ़ी मजबूत और सशक्त होगी तो राज्य का भविष्य भी उतना ही अच्छा होगा. इसके लिए माताओं, बच्चों का स्वास्थ्य और उनका समग्र विकास महत्वपूर्ण है. उन्होंने कहा, स्वास्थ्य क्षेत्र में भी महाराष्ट्र अग्रणी है. इसी प्रकार से महिला नीतियों के क्रियान्वयन में भी राज्य अग्रणी हैं. इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि राज्य की प्रगति और विकास में महिलाओं की भी बराबर की हिस्सेदारी है. इसलिए हमने राज्य में महिलाओं के सशक्तिकरण और उनके विकास, शिक्षा, रोजगार और उद्योग जैसे सभी क्षेत्रों में प्रोत्साहन और मजबूती के लिए एक नीति तय की है. आंगनवाड़ी कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी का फैसला किया गया है और सेविकाओं का वेतन 10 हजार, मिनी आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का 7,200 और सहायिकाओं का वेतन 5 हजार रुपये तक बढ़ाया गया है. आंगनबाड़ियों को दिए जाने वाले पोषण की मात्रा और गुणवत्ता में कोई समझौता नहीं किया जाएगा, ऐसा भी मुख्यमंत्री श्री शिंदे ने बताया.


००००

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 


संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत


           


            मुंबई, दि. 23 : चर्मकार समाजातील बांधवांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास होण्यासाठी शासनस्तरावर विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रम व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींनी घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.


            चर्मकार समाजातील बांधवांचा सामाजिकस्तर आणि जीवनमान उंचावण्यासाठी या योजनांची मदत होणार आहे. यामध्ये 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल, गटई स्टॉल, प्रशिक्षण योजना, मुदती कर्ज योजना आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला समृद्धी व किसान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांविषयी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गजभिये यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


             ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 24 ऑगस्ट, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक :


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR



ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये

 ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनीकोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये


- मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. २३ :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट - क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.


              ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे.



वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग कामाचीमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

 



वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग कामाचीमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी


 


            मुंबई, दि. २३ :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता सुनील भुतडा, कार्यकारी अभियंता नितीन बोरोले व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


              याप्रसंगी मंत्री श्री. भुसे यांनी वांद्रे - वर्सोवा सागरी महामार्ग, जुहू जोडणी रस्ता, वर्सोवा जोडणी रस्ता, वांद्रे येथील जेट्टी बांधकामाची माहिती घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाचे टप्पे करून प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, त्यानुसार कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


००००

वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

 वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


             मुंबई दि. 23 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक असून वित्त विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


               मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद, विधान सभेच्या सदस्यांकडून उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार डॉ. मनीषा कायंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते


                मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांना देय दिनांकापासून कॅसचे लाभ लागू करण्यात यावेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करत आहे. आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालय, अल्पसंख्याक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय अशा सात ते आठ वर्गवारीतून आपण हा विषय अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा पूर्ण करत आहोत. या सर्व कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


                  केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100 टक्के प्राध्यापक भरती करण्यात येईल. तसेच सुरू असलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया गतिमान करून वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदी संदर्भात वित्त विभागाशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


0000

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

 धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर


- मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


०००

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

 धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

- मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

Featured post

Lakshvedhi