Sunday, 20 August 2023

बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू

 बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू

 

            मुंबईदि. 20 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेत स्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. तरी सदरचे अर्ज हे वर दिलेल्या संकेतस्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच.नागरगोजे यांनी केले आहे.

         बाल शक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कलासांस्कृतिक कार्यखेळ नावीण्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहेत्यांना हा पुरस्कार दिला जातो.

         बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकाससंरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्थास्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातोसंस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

      पुरस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in संकेत स्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई  उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतचीकेलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता

 शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतचीकेलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता


महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती


 


            मुंबई, दि. १९ : शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.


            ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील चार अतिक्रमणे शासनस्तरावर नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.विखे -पाटील यांनी सांगितले.


            कातकरी समाजाकडून सुरू असलेल्या मागणीवर गेली अनेक वर्षे निर्णय होत नव्हता, अखेर मंत्री श्री.विखे-पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून याबाबत महत्वाचा आणि कातकरी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे कातकरी समाजाने स्वागत केले आहे.

डॉ. गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 डॉ. गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन


ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी


केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन


 


            मुंबई, दि. 20 : नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.


            राज्यपाल श्री.बैस म्हणाले, सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे व या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू, असेही राज्यपालांनी सांगितले.


            आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. 


            प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संतोष क्षीरसागर तसेच कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


००००


 


 


Maharashtra Governor releases Gajanan Shepal's book 'Ranga Sabha’


 


      Mumbai 20 : Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Rang Sabha' authored by Prof Ganajan Shepal at Sir J J School of Applied Art in Mumbai on Sat (19 Aug).


          Speaking on the occasion, the Governor said he will put his best efforts to establish the Sub Centre of Lalit Kala Academy in Maharashtra. The Governor said the Creative and Culture Industry is among the fastest growing industries in the world having immense potential for job creation. In this connection, he called for efforts to strengthen art institutions in the State.


          Former Chairman of Lalit Kala Academy Dr Uttam Pacharne, author Dr Gajanan Shepal, President of Marathi Vruttapatra Lekhak Sangh Mumbai Ravindra Malusare, senior journalist Vivek Sabnis and invitees were present.


The book 'Rang Sabha' is a compilation of the published articles of Dr Shepal, covering the life and work of 100 visual arti

sts and art institutions.


000


इस चार पायी (खाट) बनाने वाले को 21 तोपों की सलामी

 इस चार पायी (खाट) बनाने वाले को 21 तोपों की सलामी. गांवो में आज भी एक से बढ़कर एक प्रतिभा छुपी हुई है केवल इनको खोजने की जरुरत है.*

*इस पर लिखा गया हे *5/8/19 को धारा 370 और 35A को हटाया गया* *देखो यह कला.* 🙏🇮🇳🙏


जागतिक रक्त शोशक दिं न



 

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठीकौशल्य विकास कार्यक्रम आखावेत

 शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठीकौशल्य विकास कार्यक्रम आखावेत 


                                         -- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


मुंबई, दि.19 : चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली. मानखुर्दमधील नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील मुलींनी कोळीनृत्याने मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले.


            भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली.


             तेथील बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ

 महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ  

                                                     पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
            मुंबईदि.19   महिला बचतगटांना  त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची जागा आणि प्रसिद्धी यासाठी संसाधने उपलब्ध नसल्याची तक्रार पालकमंत्री लोढा यांच्यासमोर मे २०२३ मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली गेली होती. त्या अनुषंगाने सर्व महिला बचतगटांना आठवडी बाजाराच्या माध्यमातून हक्काची जागा देण्याचे आणि त्यांच्या उत्पादनां ची प्रसिद्धी करण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले होते. मुंबई महापालिकेतील २४ प्रभागांमध्ये १९ ऑगस्टपासून  आठवडीबाजार सुरू करण्यात आला आहे.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते  घाटकोपरमध्ये शुभारंभ

       महापालिकेच्या एन विभागातर्फे सुचित्रा बिझनेस पार्कबी. एम. सी. पार्किंगपटेल चौकघाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम आठवडी बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार राम कदम याप्रसंगी उपस्थित होते.
            "महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार तत्पर असूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आयोजन नेहमीच होत राहील. जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने हा आठवडी बाजार सुरू करण्यात आलेला असून ही तात्पुरती राबवली जाणारी संकल्पना नाही. या योजेनेचा कायमस्वरुपी लाभ महिला बचतगटांना मिळणार आहे. यापुढे देखील महिलांच्या आर्थिक विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध बदल करण्यात येतील"असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.
            "आठवडी बाजारामध्ये सहभागी होण्यासाठी महिला बचतगटांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या 50 बचतगटांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. आठवडी बाजारात महिला बचतगटांकडून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे माहितीपत्रक ग्राहकांना देण्यात येईलज्यामुळे ग्राहक त्या वस्तू 
 थेट महिला बचतगटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर सुरू  राहील. महापालिकेच्या माध्यमातून वस्ती-वस्तीत फलक  व स्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजाराचा प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचतगटसुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. स्थानिक व्यापारी वर्गालादेखील या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना महिला बचतगटांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे"असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.
या आठवडी बाजारांच्या माध्यमातून
 महिला बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होऊन त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

***

 

 


Featured post

Lakshvedhi