Friday, 18 August 2023

आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी

आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ बदलावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

आरे वसाहतीच्या तलावांमध्ये गेले कित्येक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते आणि त्यामुळे ‘वनशक्ती संघटना’ ही नेहमीच हिंदू समाजाच्या आणि विकासाच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोपही आ. भातखळकरांनी या पत्राद्वारे केलेला आहे. ही बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी त्यांनी केली असून, जर का ही बंदी आरे प्रशासनाने उठवली नाही तर या विरोधामध्ये आंदोलन करावे लागेल असे ही आ. भातखळकर यांनी सांगितले आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये आरे कॉलनीच्या तलावातच यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखत सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

 


डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमात

 डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी

'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमात


पालकमंत्री दीपक केसरकर यांचे महापालिकेला निर्देश


 


            मुंबई, दि. 17 : महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता राखून डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.


            मंत्री श्री. केसरकर यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड क्षेत्रातील 'जनतेशी सुसंवाद' साधून समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नाही तेथे प्रत्यक्ष भेट देऊन एका आठवड्यात समस्या सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विभागातील रहिवाशांच्या अनधिकृत पार्किंग, कमी दाबाने पाणी येणे, कचरा स्वच्छ करणे, राशन दुकानावरून धान्य न मिळणे आदी सर्वसाधारण समस्या आहेत. या समस्या सोडविणे ही राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस विभाग आदी यंत्रणांची जबाबदारी असते. संबंधित विभागांनी रहिवाशांच्या लहान लहान तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ड्रेनेजची नियमित सफाई करावी. शाळांच्या इमारती तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १९ वाहने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घेऊन आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना श्री. केसरकर यांनी केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.


            ड्रग्स मुक्त मुंबई करणे हे शासनाचे धोरण असून अशा घटना आढळून आल्यास पोलिसांनी त्या तातडीने बंद कराव्यात. ज्या विकासकांनी रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केली नसेल अथवा पुनर्विकासाची कामे थांबवली असतील त्यांना महापालिकेने नोटीस द्यावी. ज्यांचे जन्म दाखले अद्याप दिलेले नसतील त्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरात विशेष मोहीम राबवून ते दाखले द्यावेत, अशी सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


            उपस्थित नागरिकांसह आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी परिसरातील रहिवाशांच्या समस्या मांडल्या. गावदेवी मंदिरास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


0000

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी

 अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १७ : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.


            बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक संबंधित अधिकारी उपस्थित होते.


             मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन२०२३ मधील प्रात्यक्षिक परीक्षा दि. ७ ते १४ मे २०२३ दरम्यान तसेच लेखी परीक्षा दि.१७ मे ते ०६ जुन २०२३ दरम्यान घेण्यात आल्या होत्या या परीक्षेचा निकाल दि. २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता.हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी तंत्रनिकेतनातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहीले होते. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षापुरता कॅरीऑन चा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन २०२३ च्या निकालानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावलीतील तरतुदीनुसार पुढील सत्र/वर्षाकरिता प्रवेशास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये सदर सत्र/वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून एक वेळ संधीचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणत: २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सदर परिपत्रकानुसार पुढील वर्षाचे सत्रकर्म करणेबाबतची योग्य ती कार्यवाही संस्थेमार्फत करावी.


0000


काशीबाई थो

रात/विसंअ/


तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

 तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

तो क्षणात उत्तरला…

मनात जपायला चाफा आवडेल

आणि ओंजळीत धरायला मोगरा…


वहीत ठेवायला बकुळ आवडेल

आणि धुंद व्हायला केवडा…


बोलायला अबोली आवडेल

आणि फुलायला सदाफुली…


पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,

देवाच्या पायाशी ठेवायला.. आशीर्वादासाठी…


यावर ती थोडीशी नाराज झाली,

कारण तिचं नाव रातराणी होतं…


त्यानं ते ओळखलं… तो पुढे झाला आणि हलकेच हसत म्हणाला,

हे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर…!!


तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे…

त्याच्या मनात… अंगणात…!!!


आपल्या सावली पासून आपणच शिकावे

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे


शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत?

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.


- Life is Beautiful.

*सुप्रभात* 🌹

महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठीशाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता

 महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठीशाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दुतांसाठी कार्यक्रम


            मुंबई, दि. १७ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. राज्य देशात औद्योगिक विकासात आघाडीवरील राज्य आहे. राज्यात उद्योगांसाठी शाश्वत पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असून येथे उपस्थित विविध देशांच्या वाणिज्यदुतांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.


            भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सायंकाळी हॉटेल ताज लॅण्डस एण्डस येथे राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागातर्फे विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदुतांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, वाणिज्य दूतावासाच्या डीन श्रीमती अंड्रिया आदी उपस्थित होते.



            मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अशा या शूरवीरांना अभिवादन करतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जलदगतीने विकास होत आहे. जी २० परिषदेनिमित्त भारताला जागतिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे विविध देशांशी सौहार्दपूर्ण संबंध वृद्धिंगत होत आहेत. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा असून ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याबरोबरच देशात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे.


            आमचे सरकार विकासाभिमुख असून राज्यात शाश्वत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या सरकारने कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 'वसुधैव कुटुंबकम' हीच भारताची भूमिका असून आपण या कुटुंबाचे सदस्य आहात. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून भारताचा अमृतकाळ सुरू आहे. आगामी २५ वर्षात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. सन २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होईल. त्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहील. आगामी काळात भारतीय लोकशाही अधिकधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी श्रीमती आंद्रिया यांनी मनोगत व्यक्त केले. अपर मुख्य सचिव श्री. देवरा यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध देशांचे भारतातील राजदूत, वाणिज्यदूत, वरिष्ठ सनदी अधिकारी, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीजलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर

 मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीजलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर


            नवी‍ दिल्ली, 17 : देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.


निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए / एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे) चे शिक्षण घेत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असेल.


निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.


इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात: https://jalshakti-dowr.gov.in/document/notice-for-internship-of- mass-communication-last-date-15-sep-2023/

राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण रेल्वेमार्गाचा मार्ग मोकळाएकूण 2339 किमी लांबीच्या, सुमारे 32,500 कोटी रुपये किंमतीच्या सात बहु-मार्ग (मल्टीट्रॅकिंग) प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी

 राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण रेल्वेमार्गाचा मार्ग मोकळा

एकूण 2339 किमी लांबीच्यासुमारे 32,500 कोटी रुपये किंमतीच्या

सात बहु-मार्ग (मल्टीट्रॅकिंग) प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी

 

       नवी दिल्ली, 17 : भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रकल्पांना मंजुरी दिली  असून,  यात राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. एकूण  32,500 कोटी रुपयांच्या  सात रेल्वे प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक समितीने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे रेल्वेची मालवाहतूक वाढणार असून सुमारे कोटी लोकांना रोजगार मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांसाठी 32,500 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे प्रकल्प पूर्णपणे अभियांत्रिकीखरेदी आणि बांधकाम (EPC) मोडवर बांधले जातील. या प्रकल्पांद्वारे भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये 2,339 किलोमीटरची वाढ होणार आहे. तसेच राज्यातील लोकांना यामुळे 7.06 कोटी मनुष्य दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुदखेड-मेडचल-महबूबनगर-ढोण प्रकल्पाविषयी

            मुदखेड-ढोणे दुहेरीकरण प्रकल्प (417.88 किमी) अंदाजे 4,686.09 कोटी रुपये खर्चाचा असणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे सेवा सुरळीत होईल आणि गर्दी कमी होवून रेल्वेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळू शकेल.

प्रस्तावित प्रकल्पामुळे विभागाची विद्यमान लाईन क्षमता वाढेल आणि वक्तशीरपणा तसेच वॅगन टर्नअराउंड वेळेत सुधारणा होईल. मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण विभागाचे (417.88 किमी) दुहेरीकरण केल्याने बल्हारशाह-काझीपेठ-सिकंदराबाद आणि काझीपेठ-विजयवाडा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होईल.

या राज्यातील 35 जिल्ह्यांचा समावेश

            या सात नव्या रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये उत्तर प्रदेशबिहारतेलंगणाआंध्र प्रदेशमहाराष्ट्रगुजरातओदिशाझारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील 35 जिल्ह्यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे हजार 339 किलो मीटरने वाढणार आहे.  अन्नधान्य, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड आणि तयार पोलाद, क्लिंकर, कच्चे तेल, चुनखडी, खाद्यतेल इत्यादी विविध मालाच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमतावाढीच्या कामांमुळे 200 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) क्षमतेची अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने हवामाना संबंधित उद्दिष्टे साध्य करणे आणि देशाच्या मालवाहतूक खर्चात कपात करणे या दोन्हींसाठी मदत होईल.

नऊ राज्यांतील रेल्वेमार्गांच्या प्रकल्पांमध्ये गोरखपूर-कॅन्ट-वाल्मिकी नगर – मार्गिकेचे दुहेरीकरण, सोन नगर-आंदल मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प – मल्टी ट्रॅकिंग, नेरगुंडी-बरंग आणि खुर्दा रोड-विजियानगरम – तिसरी मार्गिका, मुदखेड-मेडचाळ आणि मेहबूबनगर-ढोण – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, गुंटूर-बिबीनगर – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, चोपण-चुनार – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व  समखियाली-गांधीधाम यांचा समावेश असणार आहे.

००००

Featured post

Lakshvedhi