Friday, 18 August 2023

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणारसर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार

 सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार


            17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा असेल.


 एकंदर 6838 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.


            आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये रस्त्यांअभावी अनेक दुर्देवी घटना घडतात. या योजनेमुळे मुख्य रस्त्यांशी या वाड्यांचा सातत्याने संपर्क राहील. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन ‘भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना’ राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असेल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते बांधेल.


            त्यानुसार या योजनेंतर्गत सर्व आदिवासी वाडे/पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र /आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यास येणाऱ्या अडचणी दूर होणा

र आहेत.


देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य

 देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य

• राज्यसभा  खासदार डॉ.अनिल बोंडे यांची माहिती

• पावसाळी अधीवेशनातील सरकारच्या कामगिरीचा मांडला आलेख

देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागितक पातळीवर अग्रेसर ठेवण्याचे काम प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार तथा अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष मा.डॉ.अनिल बोंडे यांनी शुक्रवारी (ता.18) पत्रपरिषदेत दिली. तर विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवित देशाच्या विकासात्मक कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम होत असल्याचेही ते म्हणाले. 

केंद्र सरकारचे पावसाळी  अधीवेशन नवी दिल्ली येथे  20 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात पार पडले.  एकूण 17 दिवस कामकाज चालणाऱ्या या संपूर्ण अधिवेशनामध्ये देशातील जनतेच्या हितासाठी  घेतल्या निर्णयाची, कामकाजाची माहिती  देण्यासाठी   खासदार मा.डॉ.अनिल बोंडे यांच्याकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान माहिती देताना त्यांनी सांगितले की,  संसदेची पावसाळी अधिवेशन 2023 पूर्णपणे यशस्वी झाले आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधकांनी मणिपूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या आडून संसदेत गोंधळ निर्माण करून संसदेचे कामकाज प्रभावीत करण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेला भ्रमित करण्याचा हा प्रयत्न देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने हाणून पाडला. अधिवेशन काळात सरकारने सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातून सामान्य नागरिकांच्या विकासाच्या त्यांच्या हितार्थ एकनिष्ठ व कर्तव्यबद्ध असलेल्या सरकारच्या कामकाजाची जाणीव होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मूलमंत्र नागरिकांसमोर ठेवून भारताला अमृत काळाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी परिश्रम करीत आहेत. अधिवेशनकाळात लोकसभा आणि राज्यसभेत एकूण 25 सरकारी विधेयक प्रस्तुत करण्यात आली. 23 विधायक दोन्ही सभागृहात पारित झाले. तर 7 विधेयक 11 ऑगस्ट 2023 पर्यंत भारताच्या राज्य पत्रात अधिसूचित केले जाणार असल्याचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.  वसाहतवादी फौजदारी कायद्यांना रद्द करण्यासाठी व अमृत काळात आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्यासाठी देशातील फौजदारी न्याय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तीन विधेयक भारत न्याय संहिता प्रस्तुत करण्यात आले. तिन्ही विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. पत्रकार परिषदेला  भाजपा माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, सचिव रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष नितीन गुडधे, विवेक गुल्हाने आदी उपस्थित होते.

----

BOX

विरोधकांनी स्वार्थासाठी मणिपूरचा वापर केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे, लोकशाहीमध्ये पवित्र असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनाच्या प्रारंभीच घमंडीया विरोधकांनी लोकशाहीला मारक, अडमुठेपणाची  भूमिका घेतली. संसदेमध्ये कोणतीही चर्चा होऊ नये यासाठी सातत्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये मणिपूर विषयावर चर्चा करण्यास सत्ताधारी पक्ष तयार असल्याचे सांगत तसे, लेखी पत्र सुद्धा दिले. राज्यसभेत पक्ष नेते पियुष गोयल यांनी सुद्धा चर्चेसाठी पुढाकार घेतला. परंतु विरोधकांनी नियमाचा वाद उकरून काढत चर्चा होऊ दिली नाही. रोज गोंधळ घालून सभागृह बंद पाडणारे, बहिर्गमन करणारे दिल्लीच्या विधेयकावेळी मात्र चर्चेसाठी सभागृहात  सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी मणिपूरचा मुद्दा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजूला ठेवला. लोकसभेसोबत राज्यसभेतही विरोधकांना दिल्लीच्या विधेयकावर हार मानवी लागली. विधेयकाच्या बाजूने 131 मते प्राप्त झाली.  बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस सारख्या पक्षांनी विरोधी पक्षापासून फारकत घेतल्याचे अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले.

..

BOX

अविश्वास प्रस्तावाचे प्रधानमंत्र्यांनी संधीत रुपांतर केले

विरोधी पक्षाने लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये,  2022 ला विरोधक पुन्हा अविश्वास आणतील अशी भविष्यवाणी केली होती. ती विरोधकांनी खरी ठरविली. अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमृल काँग्रेस या पक्षाची तयारी नसल्याने संपूर्ण देशभरात विरोधकांनी स्वताःचे हसे करून घ्यावे लागले. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अविश्वास प्रस्तावाचे सोने करून नववर्षात देशात केलेल्या विकासाच्या व सकारात्मक बाबींचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री मा.अमित शहा यांनी कणखरपणे देशांमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली. मणिपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अभिवचन देऊन देशाचा विश्वास जिंकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधीक अजूनही घराणेशाही, भ्रष्टाचार तुष्टीकरणाच्या  जोखाड्यात अडकलेला आहे.I.N.D.I.A. मधील दोन आय हे अहंकाराचे द्योतक असून सामान्य नागरिक प्रधानमंत्री झालेला काँग्रेसला सहन होत नाही.  कोरोना संकट असतानाही भारत आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला आहे. मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये जगात भारत हा तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल याची हमी मोदीजींनी दिली. प्रधानमंत्री यांच्या दोन तासाच्या माऱ्यापुढे विरोधकांनी गलितगात्र होऊन सभागृहातून पळ काढला. विरोधी पक्षाला प्राप्त असलेला ‘राईट टू रिप्लाय’ ची संधी सुद्धा गमवावी लागली. अविश्वास प्रस्तावाला समोर जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. युद्धापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केल्याचेही खा.अनिल बोंडे यावेळी म्हणाले.

..

BOX

मणिपूरमध्ये शांतता नांदेल

मणिपूरमध्ये झालेली हिंसा अतिशय गंभीर आहे. गत अनेक वर्षांपासून मणिपूर, नॉर्थ ईस्टमध्ये असलेली अशांतता नऊ वर्षात विशेष प्रयत्नाने व विकासाने संपवण्यात सरकारला यश आले आहे. परंतु, ब्रह्मदेशामधून आलेले निर्वासित, न्यायालयाचा निर्णय या अनेक बाबींमुळे पेटलेला हिंसाचार हा दुर्दैवी आहे असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  लोकसभेत देशातील जनतेला आश्वस्त केले की, मणिपूरच्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. लवकरच मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही मोदीजींनी ग्वाही दिल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.

----

BOX

संसदेच्या कामावर एक दृष्टिक्षेप 

संसदेत 20 नवे कायदे दोन्ही सभागृहात प्रस्तुत करण्यात आले. दोन्ही सभागृहात 21 विधायक पारित करण्यात आले. ज्यामध्ये प्रलंबित कायदे व नवीन कायद्यांचा समावेश आहे. मानसून सत्र 2022 सोबत याची तुलना केल्यास सहा नवीन कायदे प्रस्तुत करण्यात आले. पाच संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले. यामध्ये पूर्वी प्रलंबित असलेल्या कायद्यांचा सुद्धा समावेश आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 25 जुलै 2023 रोजी राज्यसभेची अध्यक्षता उत्तर पूर्व राज्यातील नागालँड येथील भाजपच्या खासदार श्रीमती एस. फांगनोन कोन्याक यांनी केली. तर विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व घटनांच्या संदर्भात सभागृहात सर्वाधिक म्हणजे दोन तासांपेक्षा जास्त वेळ विचार व्यक्त केले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली संशोधन विधेयक 2023 ला उत्तर देताना विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपाचे जोरदार खंडन केले. मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांनी खोटे षडयंत्र रचून देशात कशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भातही बोलताना विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी नमूद केले.

BOX

देशहिताची महत्वपूर्ण सहा विधेयक पारित

अधिवेशनामध्ये दिशहिताची सहा महत्वपूर्ण विधेयक पारित करण्यात आले. ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार संशोधन विधेयक 2023, डिजीटल व्यक्तिगत डाटा संरक्षण (डीपीडीपी) विधेयक 2023, मध्यस्थता विधेयक 2023, अनुसंधान राष्ट्रीय अनुसंधान फाउंडेशन विधेयक 2023, राष्ट्रीय नर्सिंग और मिडवाईफरी आयोग विधेयक 2023 इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व घटकांचा सर्वोच्च अन् सर्वोत्तम विकासाला प्राधान्य देत या अधिवेशनकाळातील कामकाजावर भर दिल्याचेही डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले. 

000

आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी

आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ बदलावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

आरे वसाहतीच्या तलावांमध्ये गेले कित्येक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते आणि त्यामुळे ‘वनशक्ती संघटना’ ही नेहमीच हिंदू समाजाच्या आणि विकासाच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोपही आ. भातखळकरांनी या पत्राद्वारे केलेला आहे. ही बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी त्यांनी केली असून, जर का ही बंदी आरे प्रशासनाने उठवली नाही तर या विरोधामध्ये आंदोलन करावे लागेल असे ही आ. भातखळकर यांनी सांगितले आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये आरे कॉलनीच्या तलावातच यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखत सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

 


डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमात

 डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी

'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमात


पालकमंत्री दीपक केसरकर यांचे महापालिकेला निर्देश


 


            मुंबई, दि. 17 : महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता राखून डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.


            मंत्री श्री. केसरकर यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड क्षेत्रातील 'जनतेशी सुसंवाद' साधून समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नाही तेथे प्रत्यक्ष भेट देऊन एका आठवड्यात समस्या सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विभागातील रहिवाशांच्या अनधिकृत पार्किंग, कमी दाबाने पाणी येणे, कचरा स्वच्छ करणे, राशन दुकानावरून धान्य न मिळणे आदी सर्वसाधारण समस्या आहेत. या समस्या सोडविणे ही राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस विभाग आदी यंत्रणांची जबाबदारी असते. संबंधित विभागांनी रहिवाशांच्या लहान लहान तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ड्रेनेजची नियमित सफाई करावी. शाळांच्या इमारती तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १९ वाहने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घेऊन आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना श्री. केसरकर यांनी केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.


            ड्रग्स मुक्त मुंबई करणे हे शासनाचे धोरण असून अशा घटना आढळून आल्यास पोलिसांनी त्या तातडीने बंद कराव्यात. ज्या विकासकांनी रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केली नसेल अथवा पुनर्विकासाची कामे थांबवली असतील त्यांना महापालिकेने नोटीस द्यावी. ज्यांचे जन्म दाखले अद्याप दिलेले नसतील त्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरात विशेष मोहीम राबवून ते दाखले द्यावेत, अशी सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


            उपस्थित नागरिकांसह आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी परिसरातील रहिवाशांच्या समस्या मांडल्या. गावदेवी मंदिरास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


0000

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी

 अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १७ : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.


            बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक संबंधित अधिकारी उपस्थित होते.


             मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन२०२३ मधील प्रात्यक्षिक परीक्षा दि. ७ ते १४ मे २०२३ दरम्यान तसेच लेखी परीक्षा दि.१७ मे ते ०६ जुन २०२३ दरम्यान घेण्यात आल्या होत्या या परीक्षेचा निकाल दि. २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता.हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी तंत्रनिकेतनातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहीले होते. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षापुरता कॅरीऑन चा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन २०२३ च्या निकालानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावलीतील तरतुदीनुसार पुढील सत्र/वर्षाकरिता प्रवेशास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये सदर सत्र/वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून एक वेळ संधीचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणत: २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सदर परिपत्रकानुसार पुढील वर्षाचे सत्रकर्म करणेबाबतची योग्य ती कार्यवाही संस्थेमार्फत करावी.


0000


काशीबाई थो

रात/विसंअ/


तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

 तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

तो क्षणात उत्तरला…

मनात जपायला चाफा आवडेल

आणि ओंजळीत धरायला मोगरा…


वहीत ठेवायला बकुळ आवडेल

आणि धुंद व्हायला केवडा…


बोलायला अबोली आवडेल

आणि फुलायला सदाफुली…


पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,

देवाच्या पायाशी ठेवायला.. आशीर्वादासाठी…


यावर ती थोडीशी नाराज झाली,

कारण तिचं नाव रातराणी होतं…


त्यानं ते ओळखलं… तो पुढे झाला आणि हलकेच हसत म्हणाला,

हे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर…!!


तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे…

त्याच्या मनात… अंगणात…!!!


आपल्या सावली पासून आपणच शिकावे

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे


शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत?

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.


- Life is Beautiful.

*सुप्रभात* 🌹

महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठीशाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता

 महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठीशाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दुतांसाठी कार्यक्रम


            मुंबई, दि. १७ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. राज्य देशात औद्योगिक विकासात आघाडीवरील राज्य आहे. राज्यात उद्योगांसाठी शाश्वत पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असून येथे उपस्थित विविध देशांच्या वाणिज्यदुतांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.


            भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सायंकाळी हॉटेल ताज लॅण्डस एण्डस येथे राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागातर्फे विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदुतांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, वाणिज्य दूतावासाच्या डीन श्रीमती अंड्रिया आदी उपस्थित होते.



            मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अशा या शूरवीरांना अभिवादन करतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जलदगतीने विकास होत आहे. जी २० परिषदेनिमित्त भारताला जागतिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे विविध देशांशी सौहार्दपूर्ण संबंध वृद्धिंगत होत आहेत. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा असून ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याबरोबरच देशात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे.


            आमचे सरकार विकासाभिमुख असून राज्यात शाश्वत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या सरकारने कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 'वसुधैव कुटुंबकम' हीच भारताची भूमिका असून आपण या कुटुंबाचे सदस्य आहात. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून भारताचा अमृतकाळ सुरू आहे. आगामी २५ वर्षात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. सन २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होईल. त्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहील. आगामी काळात भारतीय लोकशाही अधिकधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी श्रीमती आंद्रिया यांनी मनोगत व्यक्त केले. अपर मुख्य सचिव श्री. देवरा यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध देशांचे भारतातील राजदूत, वाणिज्यदूत, वरिष्ठ सनदी अधिकारी, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi