Saturday, 12 August 2023

राज्यातील ‘आयटीआय’मध्ये 75 व्हर्चुअल क्लासरूमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन

 राज्यातील ‘आयटीआय’मध्ये 75 व्हर्चुअल क्लासरूमचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन


 


       मुंबई, दि.12: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 75 व्हर्चुअल क्लासरूमचे दि. 15ऑगस्ट 2023 रोजी दु. 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


      


            कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले, व्हर्चुअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'स्कील इंडिया' व 'डिजिटल इंडिया' या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे 419 शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, 547 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात येईल.


 


          या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.


0000



 

सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ दि. 15 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी

 सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’

दि. 15 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी

        मुंबई, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्ट 2023पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.


 


            सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगले आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजे. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 


            आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन - सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो. सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.


 


            शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येते आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.  


                                                           


                                                             0000


 

कलात्मकता आणि कारागिरी: प्रत्येक राखी एक उत्कृष्ट नमुना आहे, प्रेम,

 🎨 कलात्मकता आणि कारागिरी: प्रत्येक राखी एक उत्कृष्ट नमुना आहे, प्रेम, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. क्लिष्ट डिझाईन्सपासून ते दोलायमान रंगांपर्यंत, या राख्या कलेचा खरा उत्सव आहेत.😇


🎨 Art has the Power: Let Kajal Mali's art speak to your heart and remind you of the beauty that exists within and around us. Welcome to a world where imagination knows no limits!


📲 91300 77442

60वर्षांवरील मोफत आरोग्यतपासणी



 

स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी मान्यवरांचा शासन निर्णय निर्गमित

 स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी

मान्यवरांचा शासन निर्णय निर्गमित 


            मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत.


            जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.


            नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे –


अमरावती - मंत्री छगन भुजबळ



चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार,


रायगड - चंद्रकांत पाटील,


वाशिम - दिलीप वळसे-पाटील,


अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील,


नाशिक - गिरीष महाजन,


धुळे - दादाजी भुसे,


जळगाव - गुलाबराव पाटील,


ठाणे - रविंद्र चव्हाण,


सोलापूर - हसन मुश्रीफ,


सिंधुदुर्ग - दिपक केसरकर,


रत्नागिरी - उदय सामंत,


परभणी - अतुल सावे,


औरंगाबाद - संदीपान भुमरे,


सांगली - सुरेश खाडे,


नंदुरबार - विजयकुमार गावीत,


उस्मानाबाद - तानाजी सावंत,


सातारा - शंभूराज देसाई,


जालना – अब्दुल सत्तार


यवतमाळ -संजय राठोड


बीड – धनंजय मुंडे,


गडचिरोली – धर्मराव अत्राम


मुंबई उपनगर –मंगलप्रभात लोढा


लातूर –संजय बनसोडे


बुलढाणा –अनिल पाटील


पालघर –अदिती तटकरे,


हिंगोली – जिल्हाधिकारी हिंगोली


वर्धा – जिल्हाधिकारी वर्धा


गोंदिया – जिल्हाधिकारी गोंदिया


भंडारा – जिल्हाधिकारी भंडारा


अकोला – जिल्हाधिकारी अकोला


नांदेड – जिल्हाधिकारी नांदेड


            कोकण भवन येथे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


०००


श्रद्धा मेश्राम/ससं/



 


वृत्त क्र. 2732


 


दिलखुलास कार्यक्रमात

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        नवी दिल्ली, 11 : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

दूध उत्पादक शेतकरी, दूग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी),दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केला जातो. यासाठी इच्छुकांनी https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.


शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये “राष्ट्रीय गोकूळ अभियान(आरजीएम)” सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.


वर्ष 2023 या वर्षासाठी विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे), सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.


 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) पारितोषिक दिले जाईल.


सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.


            या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट द्यावी.

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)


 


Friday, 11 August 2023

गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*

 *गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*


 😡म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही.


🔴 तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही.

 त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.

 

 म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल ,

 पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता आवडते.

 

 म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही, तिची स्मरणशक्ती शून्य आहे.


 गायीला घरापासून ५ किमी अंतरावर सोडा.

 तिला घरचा रस्ता माहित आहे, ती येईल.गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.

 

 दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा, एकही मूल आईला ओळखू शकत नाही.


 तर गोशाळांमध्ये दिवसभर गाई-वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो तेव्हा सर्व मुले (हजारोच्या संख्येने) आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात, ही गाईच्या दुधाची आठवण आहे.

 

 म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते,


 पण गाय थोडं दूध शिल्लक ठेवतर आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला घेते तेव्हा शिल्लक दूध पाजते.

 हे गुण आईचे आहेत जे म्हशीत नाहीत.

 

 रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलांवर पाय ठेवते.


 पण गाय आली तर ती मुलांवर कधीच पाय ठेवत नाही.

 

 म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...


 तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते.

 

 म्हशीचे दूध तामसिक असते.गाईचे सात्विक असताना.

 

 म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते.

 जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक ते उचलतो ...


 पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही.

 

 तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतसारखे आहे.


 *संकलनः रविंद्र प्रभाकरराव घोडके आर्किटेक्चर कन्सल्टंट ओझर* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Featured post

Lakshvedhi