Monday, 24 July 2023

निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही

 निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यकतेनुसार निधीचे वितरण करण्यात येते. यामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये समान वाटपाबाबत धोरण आणणार का याबाबत नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत निधीची उपलब्धता विचारात घेऊन अर्थसंकल्प अंतिम केले जाते. यापूर्वीच्या काही योजनांना स्थगिती देण्यात आली होती. प्राधान्य लक्षात घेऊन काही कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. विधान परिषदेतील सदस्यांमध्ये निधीचे असमान वितरण झाले असल्यास कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही यादृष्टीने विकास कामांची आवश्यकता आणि गुणवत्ता लक्षात घेऊन निधीचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.


0000

दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत

 दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत


 - मंत्री अनिल पाटील 


      मुंबई, दि 24: दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

            मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीवर स्लम ॲक्टखाली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या ज्यांना अन्य नागरी सुविधा देण्यात येतात, अशा ठिकाणीही दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

            मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी सुपेकर, ठाणे महानगरपालिकेचे प्रशांत रोडे, व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे नालेसफाईच्या कामाप्रमाणेच संरक्षक भिंतीच्या व्हीपहोलची साफसफाई करण्यात यावी, तसेच सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा व जिल्हा नियोजन समिती यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवावा.

         मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रातील दरडप्रवण भागाची माहिती व मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन काय काय उपाययोजना करता येतील, याबाबतची माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दि

ली


.      




00000


जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*

 *जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*


*१- पचन सुधारते*


जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.


*२-वजन घटवण्यास मदत होते* 


जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.


*३-लवचिकता वाढवत*े 


पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.


*४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*


जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. 


*५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते*


दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.


*६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते* 


शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.


*७-दीर्घायुषी बनवते* 


ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.


*८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*


Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.


*९-चंचलता कमी होत*े 


मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.


*१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो* 


काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम*

 *पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम*


                पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

                जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ? जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.


 *पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान*


👉 पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.

👉 रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी ( मूत्रपिंड ) संबंधी समस्या होऊ शकतात. तसेच रोज घेतल्याने यकृत सबंधीही समस्या उद्भवतात.

👉 अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.

 👉 पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो.


 *काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.* 


- जेवल्यावर ३० मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.

- पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.

- जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.

- पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.

- पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.


 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar* 



 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


प्रवाळ ##पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध...*

 *प्रवाळ ##पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध...*


.....प्रवाळ म्हणजे मराठीत पोवळे, आणि हिंदित मूंगा.. याच्यावर आयुर्वेद पद्धतीने काही संस्कार केले कि प्रवाळ पिष्टि हे औषध तयार होते. शुद्ध प्रवाळ हे चिनि मातिच्या खलात , गुलाब पाण्यात २१ दिवस कुटल्या जाते.. आणि मग हि पुटि तयार होते.. अतिशय उपयुक्त असे हे औषधं आहे. आपण याचे औषधि गुणधर्म बघू या...👇


..१) तळहात व तळपाय यांचि आग, जळजळ होत असल्यास किंवा पूर्ण शरीराचि आग होत असल्यास, त्वचा कोरडी पडत असेल तर, डाळिंबाचा रस काढून घ्यावा व प्रवाळ पिष्टि सोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.

२) लहान मुलांना दात येताना खूप त्रास होतो, जुलाब डिसेंट्री होते,ताप येतो, अशा वेळी त्यांना मधात मिसळून चाटण द्यावे. दात लवकर येतात, तसेच बर्याच लहान मुलांना रिकेटस् मूडदुस कुपोषणामुळे होतो. हाडे ठिसूळ होतात,अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध गुळवेल सत्त्वासोबत दिल्यास हा रोग बरा होतो.

३) रक्ति मूळव्याध झाल्यास, तसेच नाकातून रक्त येत असल्यास, युरिनमधून रक्त येत असल्यास, शरिरातील कोणत्याही भागातून रक्त येत असल्यास प्रवाळ पिष्टि , हे गुळवेल सत्त्व, व नागकेशर चूर्णासोबत दिल्यास वरील सर्व त्रास दूर होतात.

४) हायपर अॅसिडिटि, आम्लपित्त झाले की, छातीत जळजळ होते, जीव घाबरतो, पोट दुखत, घशात जळजळ होते, तोंडात आंबट पाणी येते, अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध जेवणाच्या एक तास आधी गुळवेल सत्त्व व आवळा रसासोबत दिल्यास बरे वाटते.


                     


५) प्रवाळ पिष्टि मध्ये कॅल्शियम विपूल प्रमाणात असते,कारण प्रवाळ हा एक प्रकारचा खडक आहे, जो समुद्रिजीवजंतू तयार करतात.म्हणून ज्यांना याची कमतरता आहे त्यांनी हे रोज मधात मिसळून घ्यावे.

६) बर्याच जणांना छातित धडधड होणे , जीव घाबरणे, पल्सेस वाढतात, अशांनी प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून, यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

७) गरोदर स्त्रियांना प्रवाळ पिष्टि दिल्यास होणारं बाळ हेल्दी, निरोगी आणि भविष्यात देखील बलवान राहतं, कारण यात विटामिन डी, व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

८) कांजिण्या गोवर येऊन गेल्यावर, शरिराची आग होते, नागिण झाल्यावर देखील आग होते. अशा वेळी रोज प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून यासोबत घेतल्यास आराम मिळतो, आणि शरिरात थंडावा तयार होतो.

९). संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार नेहमी कॅल्शियम कमी झाल्यामुळे होतात, कारण बहुतेक डिलिव्हरी मध्ये हे खुप कमी होते. आणि मग याची पूर्तता. न झाल्याने चाळीशी नंतर वरील आजार उद्भवतात.अशा वेळी. प्रवाळ पिष्टि व दूध एकत्र घ्यावे. याने ताकद येते.

‌१०) त्वचा विकार..\\-- प्रवाळ पिष्टि मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे, पिंपल्स, फुंसि, पुरळ, हे सर्व दूर होतात, आणि चेहरा उजळतो,प्रवाळ पिष्टि दूधातून घ्या.

११) प्रवाळ पिष्टि मध्ये लेक्सेटिव्ह गुण धर्म आहे. त्यामुळे पचन संस्था मजबूत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, हे सर्व त्रास दूर होतात. पचन व्यवस्थित होते. पित्त होतं नाही, सर्व प्रकारचे पित्त विकार दूर होतात.

१२) ताप आला की, तहान तहान होते,खूप घाम येतो, थकवा येतो, अशा वेळी प्रवाळ पिष्टि शहाळे पाण्यासोबत घ्यावे याने शरिरातील उष्णता कमी होते, व तापही उतरतो.

१३) मुत्र विकार\\--\\.. युरिनची जळजळ होणे, युरिन होतांना वेदना होणं, वारंवार होणे, किंवा न होणे यासर्व विकारांवर प्रवाळ पिष्टि दिल्यास जळजळ दूर होते. .


  आपण याचे अतिशय मौल्यवान उपयोग बघीतले.. आयुर्वेद जगतातील. हे फार महत्त्वाचे औषध आहे.

.. घरात जरूर ठेवावे. कधीही उपयोगी पडते..


  आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे....



सन फ्लॉवर थिअरी

 🌞 *सन फ्लॉवर थिअरी..*🌻


 *जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?*


*नाही... तर काय घडते त्यावेळी?ही फुले खाली किंवा वरती नाहीवळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !!*


*निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !*


*तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !*🤝


🌞🌻🌼🌞🌻🌼🌻🌞

सन फ्लॉवर थिअरी..*🌻

 🌞 *सन फ्लॉवर थिअरी..*🌻


 *जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?*


*नाही... तर काय घडते त्यावेळी?ही फुले खाली किंवा वरती नाहीवळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !!*


*निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !*


*तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !*🤝


🌞🌻🌼🌞🌻🌼🌻🌞

Featured post

Lakshvedhi