Friday, 21 July 2023

एकनाथ शिंदे : ‘कार्यकर्ता मुख्यमंत्री’

 एकनाथ शिंदे : ‘कार्यकर्ता मुख्यमंत्री

            नवी मुंबई, दि. 20 :- आजची सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले.


            हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरुन निघाले.तेथे ते आठ वाजता पोहचेले. परिस्थितीची माहिती घेतली. घटना दुदैवी होती. हे लक्षात आले. त्यांनी लगेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला कामाला लावले. आणि काही क्षणात मदतीचे हजारो हात उभे राहीले. मदतकार्य जोरात सुरु होते. दुघर्टनाग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन मुख्यमंत्री करत होते. मदतकार्याने वेग घेतला आणि सकाळी 11.30 च्या सुमारात मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून बाहेर पडला. उपस्थितांना वाटले मुख्यमंत्री मुंबईला परतले म्हणून. परंतु असे सहज परत जातील ते मुख्यमंत्री थोडेच होते. त्यांच्यातला मदतीला धावून जाण्याचा ‘कार्यकर्ता’ या मोठया घटनेतही जागा होता. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाडीतून ते पुन्हा घटनास्थळी रेनकोट घालून आले. गडाच्या खाली उपस्थितांना त्याची कल्पना आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नव्हता आणि अचानक मुख्यमंत्री घटनास्थळाकडे चालू लागले. ते थेट इरशाळवाडीत पोहोचले.


            यावाडीपर्यंत पोहोचण्याचा पायमार्ग साधा नव्हता. धड चालताही येत नाही.अशी बिकटवाट धड मातीचा नाही की, दगडांचा. दगड गोटयांमधून येणारे पावसाचे पाणी, समोर भव्य असा कडा. पायवाटेच्या खाली 30 अंशापेक्षा जास्त उताराची तीव्रता. याही अवस्थेत मुख्यमंत्री केवळ दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी चालत होते. आभाळातून जोरदार पाऊस सुरु होता.


               घनदाट झाडाझुडपातून वाट काढत दर पंधरा ते वीस मिनिटांनी क्षणभरच थांबत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन बचावकार्याचे ‘सारथ्य’ केले. आभाळातून कोसाळणारा धो-धो पाऊस, खाली निसरडा गाळाने भरलेल्या दगडगोट्यांची वाट, पाय सटकल्यास काय होईल. याची कल्पना असून देखील न डगमगता या ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री सर्व सामान्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी निघाला होता. तब्बल दीड तासाचे अंतर चालून गेल्यावर मुख्यमंत्री पोहोचले त्यांनी प्रत्यक्ष बचावकार्य पाहिले. उपस्थितांना धीर दिला आणि खाली उतरू लागले.


            दुर्घटनाग्रस्त जागेवर जाणे जेवढे कठीण होते. त्या जागेवरुन खाली येणे ही मोठी कसरत होती. तरीही मुख्यमंत्री साऱ्या सहकाऱ्यांसोबत दुपारी 4.05 मिनीटांनी खाली आले.


            रेनकोट घातलेले ‘कार्यकर्ते मुख्यमंत्री’ तिथे उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनी पाहीले, आणि सारेच त्यांच्या या अशक्य वाटणाऱ्या घटनेबद्दल चर्चा करू लागले. तब्बल अडीच तासानंतर डोंगरमाथ्यावर प्रत्यक्ष घटना घडलेल्या ठिकाणी राज्याचा प्रमुख असूनही सर्वसामान्यांचा दु:खात धावून जाणारा नेता मुख्यमंत्री श्री. शिंदेच होते. “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे” या विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण या निमित्ताने होते. स्वत:ला सामान्यांचा कार्यकर्ता म्हणून भाषणात न सांगता त्यांनी आज सर्वांसमोर हे सिध्द केले. आज महाराष्ट्राने मुख्यमंत्री ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री होते, पावसातला ‘योध्दा ’होते, व्यवस्थापनातील ‘तज्ञ ’होते, प्रशासनातील जरब असलेले नेता होते, त्याचबरोबर ‘मानवी संवेदना’ जपणारा एक ‘माणूस’ देखील होते. स्वत:ला नेहमीच सामान्य कार्यकर्ता म्हणून संबोधतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.


            मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! नैसर्गिक आपत्तीने गेलेला माणूस परत आणता येते नाही, परंतु आहे त्या माणसाला मदतीचा हात देण्यासाठी शासन नेहमीच पुढे असते. हे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस घटनास्थळी थांबून साऱ्या राज्यासमोर दाखवून दिले आहे.


---

---------


ग्राहक राजा जागरूक राहा mseb नियम पहा

 *आपल्या सर्वांसाठी MSEB संबंधी एक उपयुक्त माहिती...*


इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहनजिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर

 इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहनजिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर


            अलिबाग, दि.20 (जिमाका) :- दि.19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरशाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


            ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर :- 38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.


            ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे, मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळ

विले आहे.


इरशाळवाडी येथे पशुधनाची काळजी घेण्यासाठीपशुसंवर्धन विभाग सरसावला

 इरशाळवाडी येथे पशुधनाची काळजी घेण्यासाठीपशुसंवर्धन विभाग सरसावला


            अलिबाग, दि.20 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.


            पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली.


            पशुसंवर्धन विभागाच्या पथकाचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील हे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


            इरशाळवाडी येथे बुधवारी रात्री अतिवतुष्टीमुळे दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. घटनास्थळी पशुधनाची काळजी घेण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांचे एक पथक यानुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत.


            या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.


            या पथकाद्वारे गुरुवारी पहाटे 5.30 वाजता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर संस्थान पनवेल या संस्थेकडून खाद्य प्राप्त झाले असून, ते खाद्य शुक्रवारी इरशाळवाडी येथे पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आ

ले आहे.


0000


पित्ताशयात खडे का होतात ?【गालब्लेडर स्टोन】*

 *पित्ताशयात खडे का होतात ?【गालब्लेडर स्टोन】*


शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते. तिला पित्ताशय असे म्हणतात.


यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते. स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यासाठी पित्त आवश्यक असते.


पित्ताशयात जंतूंमुळे दाह झाल्यावर बऱ्याचवेळा नंतर खडे तयार होतात. या खड्यांचे दोन प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल ७० टक्क्यांच्या वर असलेले कोलेस्टरॉल खडे, हा पहिला व कोलेस्टेरॉल १० टक्क्यांहून कमी असलेले रंगद्रव्य खडे हा दुसरा प्रकार.


जंतूसंसर्गामुळे पित्ताशयात प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात (पेशी नष्ट झाल्यामुळे). या प्रथिनयुक्त पदार्थांच्या सहाय्याने मग इतर क्षार तेथे गोळा होतात व मग खडे तयार होतात.


विषमज्वर झालेल्या रुग्णामध्येही कालांतराने पित्ताशयात खडे तयार होतात. चाळीशी ओलांडलेल्या दोन-तीन मुले झालेल्या, लठ्ठ स्त्रीमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण जास्त असते.


पित्ताशयात खडे झाले, तरी कित्येक वेळा कोणतेही लक्षण निर्माण होत नाही. मात्र काही वेळा ताप, खूप जीवघेणी वेदना, हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. वेदना खूपच तीव्र व असह्य अशी असते. त्यामुळे ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दवाखान्यात कळ थांबण्यासाठी मॉर्फीन किंवा पेंटोझोकेनचे इंजेक्शन देतात.


डॉ. प्रमोद ढेरे,



फक्त एक छान सखी हवी 💓

 फक्त एक छान सखी हवी 💓


४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरी सकट बोल्डसुद्धा असते


कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती 

सहज adjust करते.

मुलांबरोबर लहान होते,

मुलीचीही मैत्रीण होते.


संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.


४०/५०ची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही वावगं ठरणार नाही.


बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.


साडी आणि सासू आता discussion उरले नाही.


विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.


अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.

डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.


जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते.

४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते. 


देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं  


देवाने हसून म्हटलं "मागा, काय जे मनात साठलं."


"देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे "


"एक मिनिट, एक मिनिट ... विचारलेच आहेस म्हणून मागतेय.


एक छानशी मैत्रीण दे.

हवे तर अजुन एखादे फुल घे.


दिसायला छान नसली तरी चालेल.

पण बोलायला छान असायला हवी.


डोळे सुंदर नसले तरी चालेल,

पण नजरेतून बोलणारी हवी,


केस लांब नसले तरी चालेल,

पण सोबत लांब चालणारी हवी


माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,

फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.


यातलेही काही कमी असेल तरी चालेल,

फक्त एक छान मैत्रीण हवी.


.. मैत्रीण ..

 


किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,

कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.

ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.


४०/५०च्या स्त्रियाचें अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशी नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,

मैत्रिणीबद्दल खुपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.

मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.


आपापल्या छान मित्र - मैत्रीणीं साठी पाठवा.😊🙏🌹🌹🌹🌹

वेरिकोज व्हेन्स*

 *वेरिकोज व्हेन्स*


 हा पायांचा अशुद्ध रक्तवाहिन्यांचा( नीलांचा) आजार आहे. अत्यंत वेदनादायि, गुंतागुंतिंचा गंभिर आजार आहे. या नीलांचा व फुफ्फूसांचा जवळचा संबंध आहे. फुफ्फूसाकडे रक्तशुद्धि करता नेण्याचि भूमिका या व्हेंस करतात. त्यामुळे पायातिल रक्तवाहिन्या मधलि गुठळि वरच्या बाजुला सरकलि तर, त्यामूळे रक्तवाहिन्या ब्लाँक होउन ही क्रिया शुद्धिकरणाचि बंद पडते.( पल्मोनरि एम्बोलिसम)...


** कारणे***. अत्यंत चुकिचि जीवनशैलिचा आजकाल अवलंब केल्या जातो आहे.. बैठे काम, एका ठिकाणि बसून राहण्याचि सवय, हार्मोनल इम्बँलन्स, सततचा लांबचाप्रवास, रक्त पातळ करणार्या घटकाचि अनियमित पातळी, वाढते वय, .. यामूळे हा आजार बळावतो.


**उपचार योजना**..(१) सेब साईडर व्हिनेगार एक अद्भूत औषध आहे. त्या जागेवर मालिश करा, काहि दिवसातच वेरिकोज व्हेंसचा आकार कमि होतो.


(२) आँलिव्ह आँईल आणि vit. E. आँईल एकत्रित करून हलका मसाज करावा. एक ते दोन महिने.


(३)5,6, लसूण पाकळ्या घेऊन एका जारमद्धे टाकून 3 संत्र्यांचा रस टाकून जार वरखालि ढवळावा, नंतर आँलिव्ह आँईल टाका एक चमचा, 12 तास तसेच ठेवा आणि नंतर 15 मिनिटे जिथे सूज आहे तिथे मालिश करा. काहि महिन्यातच चांगले परिणाम दिसतात.


(४) अक्रोडचे तेल एका सूति कपड्यावर घेउन १,, 2 महिने हळूवार मसाज करा...


(५)झेंडूंच्या फुलांचा रस काढून नसांवर लाउन मसाज करा.(६) एक मूठभर ओवा घेउन एक कप पाण्यां उकळवा, मग थंड झाल्यावर रोज आँईलचे काहि थेंब टाकून कापसाने नसांवर लावा.


(७) अर्जुन व्रुक्षाचि साल गायिच्या दुधात उकळवून प्यावे

  (८) नियमितपणे अर्धा तास भरभर चालावे, जेणेकरून नसातले रक्त पातळ होईल.


(९) झोपतांना पाय उंच करून ठेवा काहि वेळ.. हळूहळू व्हेंसमधले रक्त कमि होते. आहारात धनेमिश्रित पाणी, शहाळ्याचे पाणी, पानकोबि, पालक, हिरव्या भाज्या ठेवा,


(१०) एका बादलित सोसेल ईतके गरम पाणि घेउन पाय बुडवून ठेवावे पंधरा मिनिटे... फळे, व अंकुरित कडधान्ये खावित...


 वरिल उपायांनि हा आजार नक्किच बरा होतो..*******...


 आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......


_*(

Featured post

Lakshvedhi