Saturday, 22 July 2023

राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावानिधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना

 राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावानिधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना


          मुंबई दि. 21 :राज्यपाल रमेश बैस यांनी आज एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र - पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला.


            कृषी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा बळकट राहण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे असे सांगताना कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने अर्थसंकल्पीय निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. कृषी विकासासंदर्भात काही धोरणात्मक अडचणी असल्यास आपण त्याबाबत शासनाशी चर्चा करु, असे राज्यपालांनी सांगितले. 


            कृषी योजनांचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचत आहे किंवा कसे याबाबत आपणास अवगत करावे असे सांगताना फलोत्पादन विकासासंदर्भात आपण स्वतंत्रपणे आढावा घेऊ असे राज्यपालांनी सांगितले.


            कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी २०२३ - २४ या वर्षाकरिता कृषी क्षेत्रातील शासनाच्या उद्दिष्टांची तसेच २०२३ - २४ वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदी व नव्या उपक्रमांची माहिती दिली.     


            राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, 'स्मार्ट प्रकल्प' संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी देखील यावेळी सादरीकरण केले व आपापल्या विभागांच्या कामाची माहिती दिली. 



Governor reviews progress of Schemes of State Agriculture Department


          Maharashtra Governor Ramesh Bais reviewed the implementation of various state and centrally sponsored schemes being implemented by the State Agriculture Department at Raj Bhavan Mumbai on Fri (21 July).


            Additional Chief Secretary of Agriculture Anoop Kumar gave an Overview of Agriculture in Maharashtra and presented the document on Vision for Agriculture Development for the year 2023-24.


            Commissioner Agriculture Sunil Chavan, Project Director PoCRA Parimal Singh, Project Director SMARTAGRI Kaustubh Diwegaonkar, Director Mahabeej Sachin Kalantre and senior officials

 were present.


0000


मधुमेह म्हणजे काय...

 💉🇩 🇮 🇧 🇪 🇹 🇪 🇸 💊


*https://youtu.be/4p1erliQjBA*


*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*

      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...

    *👉 हे पूर्ण वाचा.....*

  *मधुमेह म्हणजे काय...?*         


      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....

कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-

१) सतत तहान लागणे....

2) घशा मध्ये कोरड पडणे

3) हाता-पायाची खाज सुटणे...

4) जखम बरी न हाेणे...

5) वारंवार लघवी ला येणे ..

6)लघवी करताना त्रास हाेणे...

7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....

8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे

9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.

      पण घाबरु नका.

आपल्या सर्व समस्या साठी.....

*संपूर्ण सुरक्षित हर्बल 100% आयुर्वेदिक FDA,FSSI,****** ***Approved *****

१) *अँटॉक्स D* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....

२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....

३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....

४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....

याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....

*अँटॉक्स D* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...

शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....

इंन्सुलीनला मजबुत करते....

शरीरातील ग्लुकोज कमी करते....

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....

*अँटॉक्स D व T* वापरा मधुमेह ,शुगर,daibitc वर नैसर्गिक नियंत्रण मिळवा .....

         

*

अस्थमा / दमा.....*

 *अस्थमा / दमा.....*


अस्थमा किंवा दमा हा त्रास बऱ्याच लोकांना असतो. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येतात. दमा सहजासहजी बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. धूर, धूळ, हवा प्रदूषण इत्यादीची अ‍ॅलर्जी, सतत सर्दी, खोकला, मानसिक तणाव, जागरण, अतिश्रम, रक्ताची कमतरता, आनुवंशिकता ही दमा होण्याची मुख्य कारणे आहेत.


*दमा/अस्थमाच्या पेशंटनी पुढील काळजी घ्यावी...*


*१. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कफ वाढवणारा आहार दही, दूध, ताक, साबुदाणा, केळी हे पदार्थ खाऊ नयेत. 


*२. थंड पदार्थ खाणे टाळावे. खूप तहान लागली तरी थंड पाणी, पेये याचा मोह टाळावा.


*३. धूम्रपान करू नये. हे व्यसन असेल तर दम्याचा धोका वाढतो. 


*४. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण करणे, थंड हवेत फिरणे टाळावे.  


*५. पोट नेहमी साफ राहील असे पहावे. मैदा, त्याचे पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळावे.


*दमा/अस्थमासाठी काही घरगुती उपाय...*


*१. थंडीमध्ये सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून चाटण करावे. 


*२. दम्याचा जोरात अ‍ॅटॅक आल्यास खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खावे. अ‍ॅटॅक कमी होतो. 


*३. छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्यावा. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो. ही गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करणे चांगले. 


*४. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी पुढील काढा घ्यावा. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. पाणी उकळू द्यावे. हा काढा घेतल्यास दमा कमी होतो.


*५. छातीतील व गळ्यातील कफ सुटण्यासाठी दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून प्यावे. 


*६. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून ते पाणी दिवसभर एक एक घोट प्यावे. पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. हृदयरोग असल्यास हा उपाय करू नये. 


*७. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छातीला चोळावे. गरम पाण्याने शेकावे. कफ पातळ होऊन सुटतो.


*८. आहारात दुधी भोपळा, लसूण, पडवळ,, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी. 


*९. प्राणायाम तसेच इतर व्यायाम प्रकृती प्रमाणे करावे. सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे. दीर्घश्वसन करण्याची सवय लावून घ्यावी.


*डॉ. सुनील ,*


Friday, 21 July 2023

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यासकरा व्हॉट्सॲपवर तक्रार

 ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यासकरा व्हॉट्सॲपवर तक्रार


            मुंबई, दि. 21 : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे.


            मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते. वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रामकावर मेसेज, फोटो किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कॉल स्वीकारले जाणार नाहीत. तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.


धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठीस्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

 धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठीस्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील दहा दिवसांच्या आत अर्ज करण्याचे माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.


            अर्जदार संस्था ही नोंदणीकृत तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील (स्थानिक) महिला पदाधिकारी असलेली असायला हवी. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य, समुपदेशनासाठी MSW उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा. संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट जोडावे. अर्ज करताना संस्थेने कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणाही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र जोडावे. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडावे. तसेच ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, १९७ बी.डी.डी. चाळ पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे संपर्क साधावा.

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठीप्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठीप्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

       मुंबई, दि. 21 : राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याबाबत‍ अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, 117, बी. डी. डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई-4000018, येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई हद्दीत 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी

 बृहन्मुंबई हद्दीत 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी


            मुंबई, दि. 21 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2023 पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

           पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

            चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi