Friday, 14 July 2023

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप

 भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन


            मुंबई, दि. 14 :- चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


            शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.   


0000




 


वृत्त क्र. 22

फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!

 सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!


दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात.

अधिकृत नाही


कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा.


ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत.


त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील.

हे सर्व फसवणूक आहे.


त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका.


कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका.


माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे!


कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!! दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात. अधिकृत नाही कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा. ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील. हे सर्व फसवणूक आहे. त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका. कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका. माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे! कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

 सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!


दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात.

अधिकृत नाही


कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा.


ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत.


त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील.

हे सर्व फसवणूक आहे.


त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका.


कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका.


माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे!


कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

निरोगी जीवनशैलीसाठी*

 *निरोगी जीवनशैलीसाठी* 


डान्स किंवा नृत्य ही एक कला आहे. ही कला भाव व्यक्त करण्यासाठी असली तरी शारिरीक हालचालीसाठी उत्तम पर्याय आहे दे तुम्हाला प्रेरणा देत राहील. सर्व सामन्यांपैकी डान्सर हे नेहमी निरोगी राहतात आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करतात. डान्स किंवा नृत्य करणे हा सक्रिय राहण्याचा आणि एखाद्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा उत्तम मार्ग आहे.

तुमचे घर स्वच्छ करा

स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते. झाडून काढणे. धूळ पुसणे आणि फरशी पुसणे या अशा गोष्टी करुन घरात स्वच्छता ठेवू शकता आणि या सर्व गोष्टी रोज करत असाल तर तुमच्या दैनदिन कामामध्ये तुम्हाला मदत होईल.

टिव्ही पाहात व्यायाम करणे

टिव्ही पाहताना जर तुम्ही काही शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या शारीरिक हालचालींमध्ये सीट-अपस मारणे, साधे खांदे वक्राकार फिरवणे किंवा स्ट्रेचिंग करणे अशा गोष्टी करता येऊ शकतात.

जेव्हा शक्य आहे तेव्हा चाला.

चालणे ही अशी दिवसभरातील सामान्य क्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती दररोज ठराविक पाऊले चालतो. पण ज्या लोकांना दिवसभरात दिर्घकाळ चालण्यासाठी वेळ मिळत नाही ते जवळच्या ठिकाणी चालत जाऊ शकता. बाईक किंवा कार अशा कोणत्याही वाहनाने जाण्याऐवजी जर जवळच्या दुकानात तुम्ही चालत गेलात तर तुमची शारीरिक हालचाल होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल.

नियमित योगा केल्यात तुम्हाला लवचकिता मिळेल आणि तुम्हाला तणावातून मुक्ती मिळेल. योगा ही एक सामान्य क्रिया आहे जी तुमचे मन शांत करते आणि शरीराला उर्जा प्रदान करते.

प्रमोद पाठक

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी

 विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 13 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.


            प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, आघारकर संशोधन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, पोषण तज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकांची पौष्टिकता लक्षात येईल. पोषण हा विद्यार्थ्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा (मिलेटस्) वापर करावा. हे करीत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्याअनुषंगाने दररोज खिचडीसारखे पदार्थ देण्याऐवजी त्यात विविधता आणण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी उपस्थित सदस्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले पोषण, त्यांची आवड या अनुषंगाने उपयुक्त सूचना केल्या.


00000

खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*

 🇮 🇲 🇵 


*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*


...(१). हळदिच्या दुधात  खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो

...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो

....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.

     (४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.

.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

    (६)  खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

      (७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास  ढास जाते. बरं वाटते

.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण  करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..

      (८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम  प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

     (९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध  खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते.  झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..

    (१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून  बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील

   (११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून   मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो 

   (१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या  पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

  १३)..  सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.

(१४). खोकला, कफ,  सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.

(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..

(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि

(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून  घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.

२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात  एक चमचा मध मिसळून घ्यावे.

(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.

(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या  उकळून घ्यावे.

(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.

(२८).  कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..

(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो

(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..


सुनिता सहस्रबुद्धे

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

             मुंबई, दि. 13 : आठ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री (७.३३% महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३१) अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                     


           १८ जुलै 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १९ जुलै 2023 रोजी करण्यात येईल.          


            यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.


            कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३१ मे 2023 पासून सुरु होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३१ मे २०३1 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.३३ टक्के दरसाल दरशेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ३० नोव्हेंबर आणि ३१ मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल. शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Featured post

Lakshvedhi