Monday, 10 July 2023

पित्ताशयातील खडे

 पित्ताशयातील खडे


 आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


पित्त दोष: त्याच्या अत्याधिक वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात दगड तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.

कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते जे संपूर्णपणे पित्ताशयामध्ये जास्त चिकट पदार्थ तयार करतात.

वात दोष: पित्त आणि कफ दोषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो ज्यामुळे दगड तयार होतात.


 ◆पंचकर्म चिकित्सा◆

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे एका ठिकाणी म्हंटल आहे चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष आपल्या शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे या आजारावर पंचकर्मातील वमन विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास रूग्णाचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.


आयुर्वेदाने यावर काही रामबाण उपाय व औषधी सुचवल्या आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास रुग्णाचे खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.

◆आयुर्वेदिक उपचार व घरगुती उपचार◆


*कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.


*मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात


*रोज आल्याचा चमचाभर रस घेणे देखील फायदेशीर आहे

 

*कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे

आहारात कुळीथाचा त्याच्या डाळीचा समावेश करा


*ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.


**रोज एक चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते.


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1


*गाजर,काकडी रस प्रत्येकी100 मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.


*सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.


*नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.


*गोमूत्र:तुमच्या आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार 30 मिली ते 40 मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतले जाऊ शकते. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.


*भृंगराज:यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.


*सैधव /रॉक मीठ:हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्हाला पित्तचा प्रवाह वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट किंवा सैधव . हे पेय घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे लागेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणामकारक परिणाम दिसून येतील.


*पिक्रोराइजा कुरोआ (किटनी) :

हे लिव्हर ला उत्तेजन देऊन पित्ताचे कार्य सुरळीत करत

 *गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद


*इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.


*बर्बेरिस अरिस्टाटा:याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने, आपण नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळू शकता.


* मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात


* एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा नंतर मध घालून ते पाणी प्या.

*गुळवेलीचा काढा घेणे ही फायदेशीर


*जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधात हा यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे


*वासागुलुच्यादी कषायम,अविपित्तीकर चुर्ण,द्राक्षादी कषाय,वरूणादी कषाय,पटोलकतुरोहीन्यादी कषायम,त्रिविल लेहम,आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा,रोहितकारिष्ट इ. औषध रचना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येते. अजूनही असंख्य औषधी आयुर्वेदात आहेत ज्याचा वापर निष्णात वैद्य रूग्ण बरा होण्यासाठी करत असतात.

ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस,श्वेत पर्पटी,गोखरू क्वाथ इ.यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने व मार्गदर्शनाखाली करावा.


. आपल्याला ही यातील काही लक्षण जाणवायला लागल्यास आपण आपल्या विभागातील आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन लवकरच व्याधीमुक्त व्हावे हीच सदिच्छा.

आशा आहे आपणास लेख आवडला असेल


वैद्य. गजानन



महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या

 महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या


75 परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

       मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि क. जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ धर्म स्टडिज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.


            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.


            परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारो

प झाला.


जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे

 जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे


मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन


       मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.


            जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.


पुरस्कार पात्रतेचे निकष :


(अ) युवक/युवती पुरस्कार


(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.


(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.


(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.


(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.


(ब) संस्था युवा पुरस्कार


(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.


(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० नुमार पंजीबद्ध असावी


(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत.


            वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल - दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


000

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितर मुंबई, दि.

 राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितर


मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक वितरण सन 2021-22 साठीचे मंगळवार, दिनांक 11 जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


            सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.


            यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.


            बुधवार, दि.12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.   




आयुर्वेदातील आहाराचे नियम:

 आयुर्वेदातील आहाराचे नियम:


*नियम १ : आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा द्रव आहारासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते .

*नियम २ :

 सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो .

*नियम ३ : जेवणाआधी आर्धा ते पाऊण तास एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

*नियम ४ : कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोहोंच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

*नियम ५ : अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो . 

*नियम ६ : दुपारी जेवणानंतर लगेचच जास्त वेळ झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .

*नियम ७ : सकाळचे व दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात . 

*नियम ८ :

 आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

*नियम ९ :

 पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.

*नियम १० : दुपारच्या जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही . 

*नियम ११ : रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . ( केवळ फोडणीपुरते नाही ) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो देशी गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते . 

 *नियम १२ :

 दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते . कारण आयुर्वेदामध्ये हा विरुद्ध आहार मानला जातो.

*नियम १३ : अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला , तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

प्रमोद पाठक.


_*(कॉपी पेस्ट)*_

*

Sunday, 9 July 2023

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे.*

 *मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे.*


कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण होतो आणि फायटीक आम्लामुळे चुण्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सीन इनहीबीटरमुळे ट्रिप्सीन नावाच्या एन्जाइम (विकर) निर्मीतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे कडधान्याचे पचन नीट होत नाही आणि पोट जड होते.


कडधान्य रात्रभर भिजवत ठेवली तर त्यातील टॅनीन आणि फायटीक अॅसीडचे प्रमाण कमी होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सीन इनहीबीटरचा नाश होतो. शिजवतांना आमसूल आणि चिंच यासारखे थोडेसे आंबट पदार्थ टाकले तर अपोषक अथवा घातक द्रव्ये सामू बदल्यामुळे पूर्णपणे नष्ट होतात. कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात. 

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने खालीलप्रमाणे फायदे होतात. .

1. प्रथिने पचायला सोपी होतात.


2. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते.


3. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅम पर्यंत वाढू शकते.


4. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो.


5. मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक अॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.


6. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.


7. मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढते.


8. सुकविलेले मोड थोडया वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात। अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात।


9. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरूकिल्ली.

सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग व चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडु वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असते. कडधान्यात भरपूर पोशक तत्वे असतात. 100 ग्रॅम कडधान्यामध्ये 17 ते 25 टक्कयापर्यंत प्रथिने असतात याला अपवाद सोयाबीन आहेत. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 40 ते 42 टक्के प्रथिने असतात. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे एका वर्षात दर माणसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य वापरणे आवश्यक आहे. म्हणजे 70 ते 80 ग्रॅम कडधान्य प्रतिदिन प्रति माणसी वापरणे आवश्यक आहे.


प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असतात। 100 ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-1) रिबोफलेवीन (जीवनसत्व ब-2) 0.18 ते 0.26 मिलीग्रॅम आणि नायसीन 2.1 ते 2.9 मिलीग्रॅम असतात. चुना 76 ते 203 मिलीग्रॅम, लोह 7.3 ते 10.2 मिलीग्रॅम, स्फुरद 300 ते 433 मिलीग्रॅम या प्रमाणात असते. सोयाबीन अपवाद आहे. त्यामध्ये 18 ते 20 टक्के मेद असते. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.म्हणूच निरोगी राहायचे असेल तर कडधान्या चा जास्त उपयोग करा.


प्रमोद पाठक.



जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी

 जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी

                                 - आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत


पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा


             पुणे, दि. 8: राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या.


            पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी पुणे येथे आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.


            कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


            साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.


आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.


आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना


 -जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.


- गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.


- आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.


- पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.


- पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.


- एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले .


-प्रयोगशाळा सिद्धता


- पुरेसा औषध साठा


-शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .


-गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे .


0 0 0

Featured post

Lakshvedhi