Saturday, 24 June 2023

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

 आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर


 


            मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.


            धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमुद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकुण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोली निहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे योजनेमध्ये नमुद आहे.


            औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तु (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही, याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमुद आहेत.


            धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभुत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतुन साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजीटल अनावरण लवकरच होणार आहे.


            या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे, रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमुद केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमुद केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.


            निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकिय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधीतांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येउन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतुने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतुन या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.


००००


 

अचानक ब्लड प्रेशर लो होते, चक्कर येते, पायात गोळे येतात? ६ उपाय, लो बीपी त्रास करा.....*

 *अचानक ब्लड प्रेशर लो होते, चक्कर येते, पायात गोळे येतात? ६ उपाय, लो बीपी त्रास करा.....*


ब्लड प्रेशर कमी होणे किंवा जास्त होणे ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयस्कर व्यक्तींना होणारा हा त्रास आता तरुणांमध्येही दिसू लागला आहे. ताणतणाव, अनुवंशिकता यांसारख्या बाबी यासाठी कारणीभूत असल्या तरी अन्नातून पुरेसे पोषण न मिळणे हे ब्लड प्रेशर कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. व्हिटॅमिन बी-12, फोलेट आणि लोहाची कमी पातळी शरीराला पुरेशा लाल रक्त पेशी (अ‍ॅनिमिया) तयार करण्यापासून रोखते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे डीहायड्रेशन आणि हृदयाच्या तक्रारींमुळेही रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. रक्तदाब कमी झाल्याची काही सामान्य लक्षणे असतात ती माहित करुन घेणे आणि त्याकडे लक्ष ठेवून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते (Easy Remedies For Low Blood Pressure). 


*ब्लड प्रेशर कमी झाल्याची लक्षणे...*


*१. अंधुक किंवा कमी झालेली दृष्टी,


*२. अचानक येणारा घाम,


*३. चक्कर येणे किंवा अचानक डोके दुखणे,


*४. अचानक बेशुद्ध पडणे,


*५. लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे,


*६. थकवा आल्यासारखे वाटणे,


*७. अचानक मळमळल्यासारखे होणे. 


*उपाय...*


*१. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मनुका सकाळी रीकाम्या पोटी खाणे अतिशय फायदेशीर असते.


*२. शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. किमान १२ ग्लास पाणी दररोज प्यायला हवे. 


*३. आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर प्रमाणात समावेश करणे.


*४. पालक आणि गाजराचा ज्यूस करुन तो पिणे, ज्यामुळे लोह आणि व्हिटॅमिन बी १२ ची पातळी चांगली राहण्यास मदत होते. 


*५. रक्तदाब योग्य राहावा यासाठी आवळ्याचा रस फायदेशीर ठरतो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत असल्याने आहारात रोज १ आवळा घ्यायलाच हवा. 


*६. दररोज न चुकता ५ ते ६ तुळशीची पाने खावीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


             केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी 'प्रोत्साहन निधी ' देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


            ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.*

 *जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


*हे आहेत दुष्परिणाम.* 


◼️ *चक्कर येणे.* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


◼️ *ताण-तणाव.* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


◼️ *लठ्ठपणा वाढतो.* 

भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो... वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि किमान 20 मिनिटे व्यायाम करा...


◼️ *मेंदूचे कार्य बिघडते.* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


◼️ *चिडचिड.* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो...



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठीअभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा

 भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठीअभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा


- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. २३ : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातील बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून रहावे लागत नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


            या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगारांच्या संधी, नवीन संशोधनाचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.


            त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल, कला, विज्ञान, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊ शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षण सुद्धा घेता येईल. हे या शैक्षणिक धोरणाचे महत्त्पपूर्ण वैशिष्ट्ये आहे.


            या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले


आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचेमहाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड

 आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचेमहाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड


- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया


केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


            मुंबई, दि. 23: आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिली.


            आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मांडविया बोलत होते. 


            बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            जनऔषधी केंद्र अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे. जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटीकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे. त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी सांगितले.


            राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे. संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल .


            ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत. गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्यमान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.


केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


             केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी 'प्रोत्साहन निधी ' देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


            ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.


००००

ज्वारी एक पौष्टिक खाद्य.*

 *ज्वारी एक पौष्टिक खाद्य.*


सध्या स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणं हे एक आव्हान झालं आहे. आपल्या सर्वांची बदललेली दिनचर्या, कामाचे वेगवेगळे स्वरूप आणि खाण्याची बदललेली आवड. फास्ट फुड आणि स्नॅक्स या गोष्टींची आवड इतकी वाढली की आपल्यापैकी काही लोक घरच्या खाण्यापेक्षा बाहेरच्या खाण्याला जास्त प्राधान्य देऊ लागलो.


बर्गर, पिझ्झा ने कधी आपल्या घरातील पोळी आणि भाकरीची जागा घेतली हे आपल्याला कळलं सुद्धा नाही. बदललेल्या खाण्याच्या सवयीमुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतांना आपण बघतच आहोत.

भारतीय लोकांची रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली आहे हे आपण आजही सांगतो. पण, जर का पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला ही देणगी द्यायची असेल तर त्यांना आपल्या पारंपारिक खाद्य पदार्थांची माहिती आणि फायदे सांगणं अत्यंत आवश्यक आहे.


ज्वारीची भाकरी ही एकेकाळी आपल्या जेवणाचा भाग होती. पण, आता ‘भाकरी’ म्हणजे फार दिवसांनी एकदा होणारा ‘पदार्थ’ सर्वांना वाटत आहे. भाकरी पेक्षा पोळी लवकर होते म्हणून आपण सरसकट पोळीच रोजच्या स्वयपाकात करायला लागलो.


टिफीन मध्ये नेलेल्या पोळीला दुपारपर्यंत येणाऱ्या कोरडेपणामुळे बरीच शाळेतील मुलं, नोकरदार वर्ग हे अर्धवटच जेवू लागले आणि त्यांना थकवा, कामात येणारा निरुत्साह यासारख्या परिस्थितीला वारंवार तोंड द्यावं लागत आहे.


शेतात काम करणारे लोक इतके काटक का असतात आणि ते इतक्या वेळ अंग मेहनत करू शकतात याचं कारण त्यांचा सकस आहार सुद्धा आहे.


आपण भाजी आणायला बाजारात गेल्यावर बघतो की, वयस्कर आजी बाई भली मोठी टोपली डोक्यावर ठेवून घेऊन येतात. कोणी मदतीला असेल तर ठीक नाही तर एकट्याच ती टोपली परत डोक्यावर ठेवतात आणि बाजाराची वेळ संपली की निघतात. त्यांचं कधी अंग दुखत नाही.


त्यांना कधी आपल्यासारखी सुट्टी नसते आणि त्यांना त्याची गरज सुद्धा नसते.


सकाळी लवकर उठून त्या ज्वारीची भाकरी, चटणी किंवा पिठलं सोबत घेऊन त्या कामावर निघालेल्या असतात आणि त्या खाण्यावरच त्या संध्याकाळ पर्यंत इतकं चालणं, बोलणं सहजपणे करत असतात.


पचनास हलकी :

ज्वारी ही फायबर युक्त असते. आपल्या शरीराला रोज ४८% फायबरची गरज असते. फायबर मुळे अन्न नलिकेचं कार्य सुरळीत होत असतं.

ज्वारी मध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्याने ज्वारी च्या भाकरीने गॅसेस, बद्धकोष्ठता, खाणं झाल्यावर जड वाटणे, पोट साफ न होणे अश्या तक्रारी अगदी कमी होतात.

कॅन्सर पासून बचाव करणे :

ज्वारी वर एक थर असतो जो कॅन्सर चा प्रतिकार करू शकत असतो. ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व सुद्धा येत नाही.

सध्या अँटी-एजिंग साठी लोक किती तरी केमिकल्स चा वापर करताना दिसतात. त्यापेक्षा हा खाण्यातला बदल केल्यास कोणत्या रिऍक्शन चा सुद्धा धोका नसेल.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे :. हृदयाची काळजी :

ज्वारी मध्ये असलेल्या फायबर मुळे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) चं प्रमाण कमी होतं ज्यामुळे हृदया संबंधित होणारे आजार जसं की स्ट्रोक, अटॅक येण्याची शक्यता कमी होते.

पोटदुखी होत नाही :

गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं एक चिकट द्रव्य असतं. या द्रव्याची काही लोकांना त्यांच्याही नकळत एक ऍलर्जी असते. ज्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत असतो.

शरीराला ग्लुटेन सहन होत नसल्याने हा त्रास होत असतो. ज्वारी मध्ये ग्लुटेन अजिबात नसल्याने पोटाचे कोणतेही विकार त्यामुळे होत नाहीत.

प्रोटीनचं अधिक प्रमाण :

ज्वारी च्या एक कप मध्ये २२ ग्रॅम इतकं प्रोटीन असतात. प्रोटीन हे शरीराला उर्जा देत असतात आणि शरीरातील पेशींसाठी उपयुक्त असतात.

हेच कारण आहे ज्यामुळे ज्वारीची भाकरी खाणारे लोक जास्त वेळ ताजेतवाने राहतात आणि पुढच्या कामासाठी कायम तयार असतात.

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे :

ज्वारी हे एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा प्रकार असल्याने त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण हे वाढत असतं. रक्ताभिसरणात मदत :

ज्वारी मध्ये असलेल्या कॉपर आणि आयर्न हे दोन मिनरल्स (खनिज) असल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. आयर्न (लोह) मुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.ह्या लेखात मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली माहिती आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे.

प्रमोद पाठक.


 *माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा*



Featured post

Lakshvedhi