Wednesday, 21 June 2023

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी41 कोटींचा निधी देणार

 पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी41 कोटींचा निधी देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई दि. 20 : पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणारे क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी 41 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.


            यावेळी श्री. प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.


            पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरी

करण केले.


००००


शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ

 शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र, ठाणे येथे विज्ञान केंद्र


राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सादरीकरण


            मुंबई, दि. 20 :- शेतकऱ्यांना फायदा होईल अशा रितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत, त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोगाच्या कामकाजाबाबत व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक -आर्थिक विकासासाठी नाविन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणे, लोणार सरोवर (जि. बुलढाणा) येथे केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि एमटीडीसी यांच्या वतीने सुरू असलेला प्रकल्प गतीने पूर्ण करणे, ठाणे येथे विज्ञान केंद्र सुरू करणे असे निर्णय घेण्यात आले.


            बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, आयोगाचे सदस्य सचिव डॉ. एन. जी. शहा उपस्थित होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बुलढाणा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, “आपल्या जंगलांमध्ये आणि परिसरात वनौषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना देखील त्यांची माहिती आहे. या सर्व नैसर्गिक संपत्तीचे मूल्यवर्धन (व्हॅल्यू ॲडीशन) होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा नाशवंत माल दीर्घकाळ टिकावी यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करावे लागेल. यामुळे समृद्धी महामार्गालगतचे १८ नोड्स म्हणजे नवनगरे विकसित होतील. याठिकाणी विविध पायाभूत सुविधांच्या दृष्टीने विकास होईल."


            बैठकीतील चर्चेनंतर आयोगाच्या सदस्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण आणि उद्योग विभागाच्या सचिवांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोगाच्या जैव वैद्यकीय उपकरण निर्मिती उपक्रम व विविध प्रकल्प, बायोमेडिक पार्क, महाराष्ट्र जनुक कोष, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एमएसएमई आंतरवासिता या उपक्रमांची विविध योजना आणि धोरणांशी सांगड घालण्याचेही निश्चित करण्यात आले.


            राज्यातील कोल्हापुरी गुळ, हळद आणि बांबू या महत्त्वाच्या उत्पादनांविषयी आयोग राबवत असलेल्या कार्यक्रमाबाबत यावेळी चर्चा झाली.


आयोगाची वाटचाल


            विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अर्थसहाय्य योजना अनुदानित प्रकल्प – १३७, पूर्ण झालेले प्रकल्प – ९१, विभागनिहाय संख्या पुढीलप्रमाणे शिक्षण - १५, माहिती संकलन - ८, अभियांत्रिकी - २५, कृषि, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया - ३८, औषध निर्मिती उद्योग- १२, मत्स्य उद्योग- २०, जल संसाधन -१०, ग्रामीण विस्तार - ९

केसगळती होतेय ? हे ' 7'* *घरगुती उपाय नक्की करुन पहा*

 *केसगळती होतेय ? हे ' 7'* *घरगुती उपाय नक्की करुन पहा*

*स्त्रीचे खरं सौंदर्य तीच्या केसांमध्ये असते , मग केसगळती रोखा या काही घरगुती उपायांनी !*


काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१००केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा

१) कांद्याचा रस

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.


कसे कराल ?

- एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा

- रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा

- सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या

- आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा

२) लसुण

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .


कसे कराल ?

- लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या

- त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या

- मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा

- ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका

- असे आठवड्यातून दोनदा करा.

३) नारळ

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.


कसे कराल ?

- नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा

- तासाभराने केस धुऊन टाका

- किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा

- रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

४) हीना

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘ हीना ‘ प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

कसे कराल ?

- २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.

- हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.

- आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा

- सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका

अन्य घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी – (‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

५) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

कसे कराल ?

- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.

- हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा

- थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीचदेखील बनवू शकता हे जास्वंदाचे हेअर पॅक्स

६) आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

कसे कराल ?

- आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा

- हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या

- केस कोमट पाण्याने धुऊन टाका

७) अंड

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?

- एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.

- १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .




Tuesday, 20 June 2023

पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबतकोकण विभागातील सहा जिल्ह्यांचा घेणार आढावा

 पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबतकोकण विभागातील सहा जिल्ह्यांचा घेणार आढावा


- ॲड. सुशीबेन शहा, अध्यक्ष, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग


 


            मुंबई, दि. २० : पोक्सो अर्थात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, २०१२ ते कलम ४४ अन्वये तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ च्या कलम १०९ अन्वये या दोन्ही कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागातील ६ जिल्ह्यांच्या विभागीय बैठकीचे आयोजन २२ जून रोजी मुंबईत करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली आहे.


            या दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसंदर्भात कोकण विभागातील ६ जिल्ह्यांतील बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण युनिट व विशेष बाल संरक्षण युनिटचे प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, परिविक्षा अधिकारी, चाईल्ड लाईन व खाजगी स्वंयसेवी संस्थाचे (NGO) प्रतिनिधी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी या सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांची ही एकत्रित बैठक असेल. या बैठकीत ज्या सूचना, शिफारशी सहभागी तज्ज्ञांकडून सुचविल्या जातील त्या राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या शिफारशींसंदर्भात कालबद्ध पद्धतीने कारवाईचा अहवालही मागविण्यात येणार आहे.


            अशाप्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विभागीय मुख्यालयांमध्ये आगामी कालावधीत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम - २०२४ जाहीर

 आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम - २०२४ जाहीर


- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे


                                                       


        मुंबई, दि. २० : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे.यामध्ये पूर्व - पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.


            मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी ॲप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण दि. 01 जून, 2023 (गुरुवार) पासून ते दि. 20 जुलै, 2023 (गुरुवार) असेल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 21 जुलै, 2023 (शुक्रवार) ते दि. 21 ऑगस्ट, 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे दि. 22 ऑगस्ट, 2023 (मंगळवार) ते दि. 29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार) नमूना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे, दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार) ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार) असा कार्यक्रम आहे.


          पुनरीक्षण कार्यक्रमात एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार) ते दि. 30 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी, मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, दि. 26 डिसेंबर,2023 (मंगळवार) पर्यंत, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे दि. 05 जानेवारी, 2024 (शुक्रवार) दि.21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन पडताळणीसाठी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांचा तपशिल घेण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोबत एक बुथस्तरीय एजंट (BLA), नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 ऑक्टोबर, 2023 रोजी पात्र असलेले),संभाव्य मतदार (01 जानेवारी, 2024 रोजी पात्र होणारे),संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती ही माहिती गोळा करणार आहेत.


               अर्जदार नमूना अर्ज क्र. ६ व नमूना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. तथापि, आधार कार्ड क्रमांक कळविला नाही किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमूना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.


                मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


             राज्यात सध्या वयोगटनिहाय अंदाजे असलेली मतदार संख्या आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.


१८ ते १९ वयोगटातील ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०,


२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१,


३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०,


४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३


५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१


६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१


७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८


८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६ प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८


              वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.


******






 

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम - २०२४ जाहीर

 आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम - २०२४ जाहीर


- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे .                                             

        मुंबई, दि. २० : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे.यामध्ये पूर्व - पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.


            मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी ॲप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण दि. 01 जून, 2023 (गुरुवार) पासून ते दि. 20 जुलै, 2023 (गुरुवार) असेल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 21 जुलै, 2023 (शुक्रवार) ते दि. 21 ऑगस्ट, 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे दि. 22 ऑगस्ट, 2023 (मंगळवार) ते दि. 29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार) नमूना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे, दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार) ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार) असा कार्यक्रम आहे.


          पुनरीक्षण कार्यक्रमात एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार) ते दि. 30 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी, मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, दि. 26 डिसेंबर,2023 (मंगळवार) पर्यंत, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे दि. 05 जानेवारी, 2024 (शुक्रवार) दि.21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन पडताळणीसाठी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांचा तपशिल घेण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोबत एक बुथस्तरीय एजंट (BLA), नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 ऑक्टोबर, 2023 रोजी पात्र असलेले),संभाव्य मतदार (01 जानेवारी, 2024 रोजी पात्र होणारे),संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती ही माहिती गोळा करणार आहेत.


               अर्जदार नमूना अर्ज क्र. ६ व नमूना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. तथापि, आधार कार्ड क्रमांक कळविला नाही किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमूना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.


                मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


             राज्यात सध्या वयोगटनिहाय अंदाजे असलेली मतदार संख्या आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.


१८ ते १९ वयोगटातील ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०,


२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१,


३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०,


४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३


५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१


६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१


७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८


८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६ प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८


              वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.


****

भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना

 भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई दि. २० :- राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियानही हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            भांडुप येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी श्री.रामचंद्र सावंत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण व डॉ.दीपक सावंत लिखित “गुलदस्ता” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवजीवन संस्थेचे सरचिटणीस डॉ दीपक सावंत, संस्थेचे अध्यक्ष ऍड दीपक साळवी, माजी आमदार श्याम सावंत, अशोक पाटील, सौ अनिला सावंत यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे. म्हाडा एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भांडुप आणि परिसरातील पुनरविकासाचे प्रकल्प, रस्ते, नालेसफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच या भागातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विक्रोळी येथे 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “स्व. प्राचार्य सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वट वृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असेच आहे. शिक्षण हे आपल्या परिवर्तनाचे प्रमुख साधन असून प्रत्येकाने आपली क्षमता, कुवत ताकद ओळखून कार्य करावे. प्रत्येक जण कर्माने मोठा असतो तेव्हा प्रत्येकाने चांगले कर्म करण्यावर भर द्यावा”.


            डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. डॉ. सावंत यांचे राज्याच्या कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे. हे लक्षत घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


            डॉ. दीपक सावंत यांनी प्रास्ताविका मध्ये दिवंगत रामचंद्र सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


00




 

Featured post

Lakshvedhi