Wednesday, 21 June 2023

कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा

 कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी

रोजगाराच्या संधी उपलब्ध करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            सातारा, दि. 21 : कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्याबाबत प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


             सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असल्याने कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व त्यामुळे जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची निर्माण झालेली संधी या अनुषंगाने तत्काळ गाळमुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा, यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा.


             जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकऱ्यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील वाहनतळ, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा आढावा घेतला.


            जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यात कृषी पर्यटनावर भर देण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले.


            जिल्हा परिषदेकडील असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी सांगितले.


            पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी तापोळा येथील पोलीस चौकी सुधारण्याचे काम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे सांगित

ले.


0000


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गतअर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी केले आहे.


       सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर,नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसूली विभागतील शहरात व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते, अशी माहिती श्री. डिंगळे यांनी 

दिली.


वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण लाखो वारकऱ्यांना दिलासा.

 वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

लाखो वारकऱ्यांना दिलासा.

            मुंबई दि. २१ : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. 


            यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.


            वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला 

आहे.


००००

सरकारद्वारा अब वारकरीओंके लिए बीमा कवचलाखों वारकरीओं को मिलेगी राहत

 सरकारद्वारा अब वारकरीओंके लिए बीमा कवचलाखों वारकरीओं को मिलेगी राहत


             मुंबई, 21जून 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पंढरपुर की आषाढ़ी वारी में भाग लेने वाले वारकरीओंके लिए बीमा कवर प्रदान करने वाली 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी बीमा छत्र योजना' को लागू करने का निर्णय लिया है।


            सरकार की कीमत पर लाखों श्रमिकों को बीमा कवच मिलेगा। यह बीमा कवच महीने के 30 दिनों के लिए होगा।


             किसी श्रमिक की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु होने पर उसके परिवार को 5 लाख रुपये की अनुग्रह राशि दी जाएगी। स्थायी अपंगता या दुर्घटना के कारण अपंगता की स्थिति में एक लाख रुपये दिए जाएंगे। वारी के दौरान आंशिक विकलांगता की स्थिति में 50 हजार रुपये और बीमारी की स्थिति में चिकित्सा उपचार के लिए 35 हजार रुपये तक। इस संबंध में शासनादेश जारी कर दिया गया है और यह योजना राहत एवं पुनर्वास विभाग के माध्यम से क्रियान्वित की जाएगी।


             वारी के दौरान हादसा या दुर्घटनाएं होती हैं और वारकरी घायल हो जाते हैं या दुर्भाग्य से मृत्यु हो जाते हैं। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने यह फैसला उन्हें और उनके परिवार को आर्थिक मदद दिलाने के मकसद से लिया है।

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना 1500 कोटींची मदत वितरित होणार

 सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार  शेतकऱ्यांना 1500 कोटींची मदत वितरित होणार

             मुंबई, दि. २१ : गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख ५७ हजार ९७१ हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे.


           शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.


        अहमदनगर जिल्ह्यातील २,९२,७५१ शेतकऱ्यांना सुमारे २४१ कोटी, अकोला जिल्ह्यातील १,३३,६५६ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७२ लाख, अमरावती जिल्ह्यातील २,०३,१२१ शेतकऱ्यांना १२९ कोटी ५७ लाख, औरंगाबाद येथील ४,०१,४४६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख, बीड जिल्ह्यातील ४,३७,६८८ शेतकऱ्यांना १९५ कोटी ३ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील २,३८,३२३ शेतकऱ्यांना ११४ कोटी ९० लाख, जळगाव जिल्ह्यातील ६२,८५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख, जालना जिल्ह्यातील २,१४,७९३ शेतकऱ्यांना १३४ कोटी २२ लाख, नागपूर जिल्ह्यातील ६ हजार १६१ शेतकऱ्यांना ६ कोटी २३ लाख, नाशिक जिल्ह्यातील १,१२,७४३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख, उस्मानाबाद येथील २,१६,०१३ शेतकऱ्यांना १३७ कोटी ७ लाख, परभणी जिल्ह्यातील १,८८,५१३ शेतकऱ्यांना ७० कोटी ३७ लाख, सोलापूर जिल्ह्यातील ४९,१६८ शेतकऱ्यांना ४६ कोटी ८९ लाख, वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ३९ कोटी ९८ लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय २० जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


*****

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

 राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे   

गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.


युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत

पहिला दिवस

  महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.


            तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागीहोतील


दुसरा दिवस 

स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक     स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


            आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


तिसरा दिवस         

            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

                 या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.

मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

                 महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

केस गळण्यावर घरगुती उपाय, केसातील कोंडा उपाय, केसांची काळजी कशी घ्याल

 केस गळण्यावर घरगुती उपाय, केसातील कोंडा उपाय, केसांची काळजी कशी घ्याल


आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सूचवितो. या उपायमुळे तुम्हाच्या केसांमधला कोंडा दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून केसांना लावा.


क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने वगैरे कारणांनी केस गळू शकतात. 

केसांचे आरोग्य राखणे, सौंदर्य वाढवणे याला प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातच नव्हे, तर वेदातही, विशेषतः अथर्ववेदात केशबृंहण, केशवर्धन करणारी औषधे वगैरेंचे संदर्भ आढळतात. 

https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

केशप्रसाधन म्हणजे केसांच्या विविध रचना करून सौंदर्यामध्ये भर घालणे हीसुद्धा प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे.

"व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती' या नियमानुसार प्रत्येक व्यक्‍तीचे केस वेगवेगळे असतात. केसांची जाडी, लांबी, पोतसुद्धा प्रकृतीसापेक्ष असते; मात्र प्रकृतीला साजेसे केस आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे निरोगी केस असण्यासाठी प्रयत्न निश्‍चित करता येतात. केसांचा संबंध असतो हाडांशी. "अस्थ्नोः मलः' म्हणजे केस अस्थिधातूचा मलभाग असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अस्थिधातूमध्ये बिघाड झाला की त्यामुळे केसामध्ये दोष निर्माण होतो, असेही चरकसंहितेत सांगितलेले आहे. याखेरीज रसधातूतील बिघाडाचा केसांवर विपरीत परिणाम होतो. तसेच पित्तदोष प्रमाणापेक्षा अधिक वाढणे, हेसुद्धा केसांसाठी हानिकारक असते. यावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की केसांच्या आरोग्यासाठी, केसांच्या सौंदर्यासाठी बाह्य उपचारांबरोबर आतून हाडे, रसधातू व पित्त निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. केसांच्या आरोग्याचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की केस धुण्यासाठी, केशरचना करण्यासाठी किंवा केसांचे कंडिशनिंग वगैरे करण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर करायला हवा. अनैसर्गिक, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या असणाऱ्या उत्पादनांमुळे तात्पुरता फायदा झाल्यासारखा वाटला तरी त्यांचे दुष्परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. याउलट नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला असता केसांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहतात, बरोबरीने रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणालाही प्रतिबंध होऊ शकतो. 


केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपचार यांची माहिती आपण घेणार आहोतच. तत्पूर्वी दैनंदिन जीवनात केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे सांगता येईल.


* त्यामुळे उत्साह वाढायला मदत मिळते, केसांमधील गुंता नीट काढल्यामुळे विचारातही सुसूत्रता येण्यास मदत मिळते. 

* डोक्‍यावरून अति गरम पाणी न घेणे.

* उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी, स्कार्फचे संरक्षण घेणे.

* केस नीट विंचरण्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते, तसेच केसांच्या मुळांशी असणाऱ्या तैलग्रंथींना उत्तेजना मिळाल्याने केसांचे पोषण होते. 

* केस विंचरण्यापूर्वी केसांच्या मुळाशी व केसांनाही थोडे तेल लावणे चांगले असते, त्यामुळे गुंता निघायला मदत मिळते व केस अकारण तुटत नाहीत. 

* आठवड्यातून दोनदा तरी केस धुणे उत्तम होय. केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, रिठा, नागरमोथा, संत्र्याची साल यांसारख्या द्रव्यांच्या मिश्रणाचा किंवा तयार "संतुलन सुकेशा' मिश्रणाचा वापर करता येतो. यामुळे केस, डोके स्वच्छ होतेच, पण केस आवश्‍यकतेपेक्षा कोरडे होणे टळते. 

* डोक्‍याला आणि केसांना नियमित तेल लावणेसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी महत्त्वाचे असते. केस चिकट होतील या कारणाने बऱ्याचदा तेल लावणे टाळले जाते; पण शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले औषधी तेल वापरले तर ते लावण्याने केस तेलकट होत नाहीत. उलट केसांचा अनावश्‍यक कोरडेपणा दूूर होऊन केस मऊ, रेशमी व्हायला मदत मिळते. असे "संतुलन व्हिलेज तेला'सारखे आतपर्यंत जिरणारे तेल लावलेले असले की नंतर केस धुण्यासाठीसुद्धा नैसर्गिक द्रव्ये वापरता येतात. 

* केस धुतल्यावर लगेच न विंचरणे चांगले असते, कारण केसांची मुळे नाजूक झालेली असतात, तसेच केस कोरडे होण्यासाठी गरम झोत येणारा ड्रायर वापरणे तितकेसे चांगले नाही. यामुळे केस कोरडे होण्याची प्रवृत्ती वाढते. 


केसांचे कंडिशनिंग होण्यासाठी घरच्या घरी साधे व प्रभावी उपाय करता येतात. 

* केस धुण्याअगोदर केसांना 20-25 मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवणे.

* जास्वंदीची फुले, कळ्या व कोवळी पाने बारीक वाटून बनविलेला लेप 20-25 मिनिटांसाठी लावून मग केस धुणे.

* ताजी पाने आणि आवळा यांच्यापासून तयार केलेला लेप किंवा 100 टक्के शुद्ध मेंदीचे आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून तयार केलेला लेप केसांना लावून मग केस धुणे.

* नारळाचे दूध केसांना लावून मग केस धुणे.

याप्रकारे सुरवातीपासून केसांची नीट काळजी घेतली, केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर केला आणि अस्थी व रसधातूचे पोषण व पित्तसंतुलन याकडेही लक्ष ठेवले, तर केसांचे आरोग्य व सौंदर्य नीट राहील.

केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपाय-

- केसांमध्ये कोंडा होणे. आयुर्वेदात याला दारुण असे म्हणतात.

दारुणा कण्डुरा रुक्षा केशभूमिः प्रपाठ्यते । कफमारुतकोपेन विद्यात्‌ दारुणकं तु तम्‌ ।।...माधवनिदान

कफ आणि वातदोषाच्या प्रकोपामुळे डोक्‍यावर कोंडा होतो. त्या ठिकाणची त्वचा अतिशय कोरडी, खरखरीत होते, खाज सुटते. कधी कधी यामध्ये पित्त व रक्‍तप्रकोपाचाही सहभाग असू शकतो. नावाप्रमाणेच कोंडा "दारुण' म्हणजे कष्टप्रद, बरा होण्यास कठीण असतो. 


कोंड्यासाठी घरच्या घरी करता येण्याजोगे उपाय पुढीलप्रमाणे होत-

* डोके धुण्याअगोदर लिंबाची फोड डोक्‍यावर हलक्‍या हाताने चोळणे व 20-25 मिनिटांनंतर शिकेकाई, रिठा, आवळा वगैरे द्रव्यांनी केस धुणे.

* खसखस दुधात भिजवून तयार केलेला लेप डोक्‍याला लावून ठेवण्यानेही कोंडा कमी व्हायला मदत मिळते.

* मेथीच्या बियांचे चूर्ण पाण्यात भिजवून उमलून आले की त्याचा डोक्‍यावर लेप करण्यानेही कोंडा कमी होऊ शकतो. 

https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

* केस अकाली पांढरे होणे.. याला आयुर्वेदात पलित असे म्हणतात,

क्रोधशोकश्रमकृतः शरीरोष्मा शिरोगतः । पित्तं च केशान्‌ पचति पलितं तेन जायते ।।...माधवनिदान

क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने केसांना इजा पोचणे वगैरे कारणांनी केस गळू शकतात. 


केस गळणे थांबावे व केस पांढरे होऊ नयेत यासाठी पुढील उपायांची योजना करता येते. 

* आवळा, जटामांसी अनंतमूळ, ब्राह्मी वगैरे केश्‍य म्हणजे केसांना पोषक अशा द्रव्यांपासून बनविलेले हेअर पॅक केस (उदा. "सॅन वात हेअर पॅक', "सॅन पित्त हेअर पॅक') धुण्याआधी अर्ध्या तासासाठी लावून ठेवणे.

* झोपण्यापूर्वी शीतल द्रव्यांचा संस्कार केलेले "नस्यसॅन घृता'सारख्या औषधी तुपाचे 2-3 थेंब नाकात टाकणे.

* नियमित पादाभ्यंग करून शरीरातील उष्णतेचे, पित्ताचे संतुलन करणे.

* दूध, खारीक, डिंकाचे लाडू, खसखस, प्रकृतीनुरूप फळांचे रस, बदाम अशा रसधातू, अस्थिधातूला पोषक गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करणे.

* "सॅन रोझ',"मॅरोसॅन', "कॅल्सिसॅन', "हेअरसॅन' यासारख्या रसधातू, अस्थिधातूपोषक रसायनांचे सेवन करणे.


केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे.


Cp


_*

Featured post

Lakshvedhi