Wednesday, 21 June 2023

कोरडा खोकला*

 *कोरडा खोकला*


 हा खोकला अतिशय त्रासदायक असतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.


कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपायः-


बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.


खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. 


यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. 


सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 


आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.


मध


कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.


आले आणि मीठ


खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.


ज्येष्ठमधाचा चहा


ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा घेवू शकता.


हळदीचे दूध


हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.


गूळ


सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. 


सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्या.


मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.


गरम पाण्याची वाफ


सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.


_*(

_मनाची अवस्था_*

 *_मनाची अवस्था_*


     एकदा धनाढ्य व्यक्तिने एका गुरुजींना जेवणासाठी निमंत्रित केले... परंतु एकादशीचा उपवास होता, म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत... परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्तिकडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले...

     परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता...

     गुरुजींना त्यांना बघून आश्चर्य वाटले... म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले, "बाळा तू दुःखी का आहेस?... मालकाने भोजनात काही फरक केला का"?... "नाही गुरुजी"...

     मालकाने बसण्यात फरक केला का?... "नाही गुरुजी"...

     मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का?... "नाही गुरुजी"...    

     दक्षिणा बरोबर २ रुपये "मला आणि २ रुपये दुसऱ्याला" दिली...

     आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, मग कारण काय आहे?... जो तू दुःखी आहेस?... तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे... कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल... परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे...

     गुरुजींनी दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस?... तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहीत होते की, ती धनाढ्य व्यक्ती खूप कंजूष आहे... आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही... परंतु त्यांनी २ रुपये दिले, म्हणून मी प्रसन्न आहे...

     हीच आपल्या मनाची अवस्था आहे... संसारात घटना या समानरुपी घडतात... परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात... तर कोणी दुःखी होते... परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे...

     म्हणून मन प्रभुच्या चरणाशी जोडून असूद्या... इच्छा पूर्ण झाली नाही, तर दुःख आणि इच्छा पूर्ण झाली, तर सुख... परंतु जर कोणती इच्छाच नसेल, तर आनंद... 

      ज्या शरीराला लोक सुंदर समजतात, मेल्यानंतर तेच शरीर सुंदर का वाटत नाही?... त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात?... ज्या शरीराला सुंदर मानतात, फक्त त्याची त्वचा काढून टाका... तेव्हा वास्तव दिसेल की, आत काय आहे?... आत फक्त रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे... मग हे शरीर सुंदर कसं असेल?...

     शरीरात कोणती ही सुंदरता नाही. तर सुंदर असतात ते व्यक्तिचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य!... ज्याच्या जीवनात हे सर्व आहे, तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे...

     दुधाला दुःख दिले की, दही बनते... दह्याला दुखावले की, ताक बनते... ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते... आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते...

     दुधापेक्षा दही महाग... दह्यापेक्षा ताक महाग... ताकापेक्षा लोणी महाग... लोण्यापेक्षा तूप महाग... परंतु या सर्वांचा रंग एकच... तो म्हणजे शुभ्र...

     याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते...

     दूध उपयोगी आहे, पण ते एक दिवसात नासते... दुधाचे विरजण, दही दोन दिवस टिकेल... दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन... ताकामधले लोणी आठवडाभर राहील... पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही...

    आता बघा आहे की नाही गंमत... एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...

     तसेच आपले मन अथांग आहे... त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा... चिंतन करा, मनन करा... आपले जीवन तावून सुलाखून घेतलेले आणि त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही... म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्त्व... मग निष्कारण घाबरायचे कशाला?... फक्त एवढेच करा की, आपल्या चंचल मनाला सावरा आणि आवरा..

२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी*

 🟪🟪

*२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी* 


*मुंबई-* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.


पृथ्वीचे अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकाव्याने ११ हजार किमी प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडे पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १,०५,००० किमी प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९.४० कोटी किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातला जसा २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो, त्याप्रमाणे २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होत असते.


पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी जास्त होत आहे. सन २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली होती. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घड्याळामध्ये लिप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 *न्यूजमंत्रा*

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे

 *लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे 



तान्ह्या बाळाला पोट दुखतं हे त्याला सांगत येत नाही त्यामुळे त्याला काही झालं की ते रडतं. जर बाळ रडत असेल, काही दूध प्यायला तयार नसेल, बाळाचे पोट फुगलेले दिसत असले, पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखते आहे असे समजावे.


 *बाळाचे पोट दुखत असल्यास हिंग घालून कोमट लेप बाळाच्या बेंबीभोवती लावावा.


 *हिंगाप्रमाणेच डिकेमालीचा लेप लावल्यास बाळाच्या पोटातील गॅसेस मोकळे होऊन पोट दुखायचे कमी होते.


*ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते.

* बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते. यासाठी गरम तव्यावर सुती हातरूमाल गरम करून, चटका बसणार नाही याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे.

*बाळाची शी होण्यासाठी

मुलांना रोज कमीत कमी १-२ वेळा शी व्हायला हवी. रोज पोट साफ होत नसल्यास, खडा होत असल्यास किंवा बाळाला शी करायला जोर लावावा लागत असेल तर पुढील उपाय करावे


*आईने आहार हलका ठेवावं वातूळ पदार्थ टाळावे. उकळून कोमट केलेलं पाणीच प्यावे व जेवणानंतर ओवा, बडीशेप, बाळंतशेप, जिरे, सैंधव यांचे मिश्रण मुखशुद्धीप्रमाणे खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.


*बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्‍या हाताने चोळावे.


*१०-१५ काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे.


*आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.


*आई ने गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. ते. "शी'च्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे.


*एक दाण्या एवढे हिंग व दोन चार थेंब पाणी दिल्यास शी होते

पोस्ट आवडल्यास आयुर्वेद प्रचार हे पेज लाईक शेअर करा.

कुठलाही आजारावरील निशुल्क उपाययोजना साठी व्हाँटसप करा.


वैद्य. गजानन.



_*

कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण भाग केंद्रीत हवे

 कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण भाग केंद्रीत हवे


- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.२० : कौशल्य विकास उपक्रम हा ग्रामीण भाग केंद्रीत असायला हवा. ग्रामीण भागातील युवकांना कुशल बनवण्याची गरज असून यातूनच ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल आणि घरोघरी कौशल्य पोहोचेल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. 


            सीआयआय बिझनेस २० अंतर्गत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कार्यशक्ती गटाच्या परिषदेत मंत्री श्री. लोढा बोलत होते.


            उद्योग सहकार्य आणि व्यावहारिक शिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये परिवर्तन होईल, अशी अपेक्षा श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केली.


            महाराष्ट्रात एक हजारहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून तिथे देशातल्या सर्वाधिक सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी सांगितले. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात असून देशातील स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.


            सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, उद्योगाने अकुशल कामगारांपर्यंत पोहोचून एक कौशल्य व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे. ज्यामुळे एकूण उत्पादकता वाढेल. सीआयआय बिझनेस २० उपक्रमाचा एक भाग म्हणून, कामाचा गतिशील मार्ग तयार करण्यासाठी आम्ही भविष्यातील कामांचा आराखडा तयार करत असून त्यामध्ये व्यापक कार्य करत आहोत.      


            असेंचर इंडियाच्या चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रेखा मेनन म्हणाल्या की, मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील सहजीवन संबंधांची गरज आहे. इंडस्ट्री सहयोग, डेटा आधारित मनुष्यबळ विश्लेषण आणि महिलांचा सहभाग वाढवून कौशल्य वाढवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.


000

महाराष्ट्र राजभवनात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा

 महाराष्ट्र राजभवनात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा


राज्याच्या विकासात बंगाली समाजाचे योगदान मोठे


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. 20 : मुंबईतील बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून या समाजाचे मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २०) राजभवन मुंबई येथे प्रथमच 'पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


            'एक भारत श्रेष्ठ भारत' या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरे करण्याच्या प्रथेनुसार पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.


            पश्चिम बंगालने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठी भूमिका बजावली असल्याचे सांगून राज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारखे द्रष्टे नेते दिले आहेत. रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले 'जन गण मन' राष्ट्रगीत ही बंगालची देशाला देण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.


            स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेचा मुंबई येथील आश्रम यंदा स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद करून मुंबई येथून स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्व धर्म संसदेत सहभागी होण्याकरिता गेले होते याचे स्मरण राज्यपालांनी केले.


            राज्यात तसेच मुंबई येथे अनेक ठिकाणी दुर्गा पूजा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व काही दुर्गा पूजा मंडळे तर १०० वर्षे जुनी आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.


            पश्चिम बंगालने केवळ व्यापार वाणिज्य या क्षेत्रांमध्येच नाही, तर संसदीय लोकशाहीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान विसरता येत नाही असे राज्यपालांनी सांगितले.


            राज्य स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना परस्परांना समजण्याची तसेच आपली सामायिक संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते, असे राज्यपालांनी सांगितले. 


            यावेळी रामकृष्ण मठ मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज, ज्येष्ठ तबला व सतार वादक पं. नयन घोष, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ एस. भट्टाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या संचालक शारोनी मल्लिक, ताज हॉटेल्सचे उपाध्यक्ष शोमनाथ मुखर्जी, हिंदुजा हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जॉय चक्रवर्ती, ग्रँट मेडिकल कॉलेज येथील निवृत्त सर्जन प्रा. डॉ. गौतम सेन व श्रीजोन फाउंडेशनच्या अध्यक्ष कमोलिका गुहा ठाकुरता यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            यावेळी श्रीजोन फाउंडेशनच्यावतीने पश्चिम बंगालची सांस्कृतिक झलक दाखविणाऱ्या संगीत, नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईतील बंगाली भाषिक मान्यवर उपस्थित होते.


००००

West Bengal State Formation Day Celebrated at Maharashtra Raj Bhavan


            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the West Bengal State Formation Day at Maharashtra Raj Bhavan Mumbai on Tue (20 June).


            The Governor applauded the contribution of the Bengalis in the socio economic and cultural development of Mumbai and Maharashtra.


            The State Formation Day of West Bengal was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan as part of the 'Ek Bharat Shrestha Bharat' initiative of Government of India.


            A cultural programme comprising Bengali songs, dance and Ravindra Sangeet was presented with the collaboration of Srijon Foundation.


            The Governor felicitated the President of Ramakrishna Math and Mission Swami Satyadevananda Maharaj, Tabla Maestro Pt. Nayan Ghosh, Vice President of Taj Hotels Somnath Mukherjee, COO of Hinduja Hospital Joy Chakraborty, Director, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya Sabyasachi Mukherjee, Professor of Surgery Dr Gautam Sen, Director, Singapore International School Sharonee Mullick and Founder of Srijon Foundation Kamalini Guha Thakurta on the occasion.  


            Members of the Mumbai Bengali community were present.

Featured post

Lakshvedhi