Thursday, 15 June 2023

एसटी’चे आधुनिकीकरण करून लोकवाहिनीला सक्षम करणार

 एसटी’चे आधुनिकीकरण करून लोकवाहिनीला सक्षम करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा


            मुंबई, दि. १४ : राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले, ‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त श्री. विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग आहे. एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करावे. एसटीची सेवा गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असावे, कायदा पण लोकांच्या हिताचा असावा. शासनाने मागील काळात लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. राज्यात मेट्रो प्रकल्प, रस्ते निर्मिती आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये काँक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.


            प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.


       प्रास्ताविकात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.चन्ने यांनी एसटीच्या विविध योजना व आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या जडणघडणीत एसटीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.


            कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे ते अहमदनगर या पहिल्या बसचे वाहक स्व. केवट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 'अमृत महोत्सव महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा' कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २५ वर्ष सतत विना अपघात सेवा देणाऱ्या पाच चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आर्वी आगाराचे एजाज खान इस्माईल खान, तळेगाव जि. वर्धा आगाराचे विलास नाथे, नईमुद्दीमु काझी, धुळे आगाराचे भाऊसाहेब सूर्यवंशी व लासलगाव येथील मेहमूद चौधरी यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभागांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव, जालना व भंडारा विभागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहादा, कराड, बीड, अंबड, जामनेर, चोपडा, राळेगाव, सोयगाव व दिग्रस आगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एसटीच्या विविध योजना व माहिती देणाऱ्या फिरत्या प्रदर्शन विश्वरथचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


 थोडक्यात एसटी..


            राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटीकडे 16 हजार 500 बसेस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटीतर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने - आण होते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.

*भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला.....*


*भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला.....*

वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण ब्राऊन राईस खातात. भात आणि वजनवाढ याबाबत लोकांमध्ये अनेक भेद मतभेद आहेत. वजन कमी करण्यासाठी भात कसा शिजवायचा, कोणत्या प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करावा याबाबत क्लिनिकल डाएटिशियन नियती नाईक (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे. 


*वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ खावा...?*

भारतीय आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे भात. देशभरातील जवळपास सर्व घरांमध्ये रोजच्या आहारात भात खाल्ला जातो. असे असून देखील खूप जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते अशी टीका तांदुळावर केली जाते. प्रत्येक आहारामध्ये भात योग्य प्रमाणात खाल्ला जात असेल आणि ताटातील उर्वरित पदार्थ संतुलित असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता याने फारसा फरक पडत नाही. पण तरीही निवड करायचीच असेल तर, कमीत कमी प्रक्रिया केलेला किंवा अनपॉलिश्ड तांदूळ वापरणे हितावह आहे.


तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. ब्राऊन राईस, लाल तांदूळ, काळा तांदूळ हे असे काही पर्याय आहेत जे अनपॉलिश्ड असतात आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे यापेक्षा ताटामधील भाताचे प्रमाण व ताटातील इतर पदार्थ संतुलित आहेत की नाही याला जास्त महत्त्व असते.


*कोणत्या प्रकारचा तांदूळ खाणे टाळावे...?*

संतुलित आहारामध्ये जर भाताचा समावेश असेल आणि त्याचे प्रमाण नियंत्रणात असेल तर भात खाणे टाळण्याची अजिबात गरज नाही. पण तरीही जर भात खाणे टाळायचे असेल तर पॉलिश्ड तांदूळ खाणे टाळावे. तांदुळाचा प्रकार कोणताही असला तरी चालेल, पण तो जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूपात असेल तर तब्येतीसाठी चांगला असतो.


फॅड डाएट्सचा जमाना आहे, कॉलीफ्लॉवर राईस किंवा ब्रोकोली राईस असे पर्याय मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पारंपरिक तांदुळापेक्षा त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते पण या तांदुळांवर देखील खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली असते त्यामुळे हे पर्याय आरोग्यास हानिकारक आहेत.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत,

 कोणत्या आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत, हे माहिती असल्यास योग्य त्या भाजीचा नियमित आहारात समावेश करणे शक्य होऊ शकते. यासाठी यासंबंधीची माहिती करून घेणे खुप गरजेचे आहे. तसे पाहता सर्वच भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. 


पालकचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. रक्ताची समस्या दूर होते.

 मटारमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

कोबीमध्ये कॅल्शिअम असल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.


टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.


बीट खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

गाजराचे सेवन केल्यास शरीराची ताकद वाढवते. मधुमेहाचा त्रास कमी होतो. चेहऱ्यावर तेज येते. मुरुमेदेखील कमी होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


प्रमोद पाठक.



अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!*

 *अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!* 


तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते.


आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची पाने पोटासाठी गुणकारी असतात. पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या असतील तर त्या तुळशीमुळे दूर करता येतात. तुळशीची पाने देखील पीएच पातळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुळशीची पानं अनेक रोगांवर कशी गुणकारी आहेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुळशीचे फायदे...


*थंडीपासून संरक्षण :* 


तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणार नाहीत. घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.


*हृदयाचे आरोग्य राखणे :* 


तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते, मग तेही कमी नाही. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि हृदय नेहमी सुरक्षित राहते. तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.


*पोटाच्या समस्या दूर होतील :* 


रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतील. पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाची सूजही कमी होते. इतकंच नाही तर ही पाने तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम देतात.


*त्वचेची काळजी घ्या :* 


रोज सकाळी तुळशीची पाने चघळल्याने त्वचा तजेलदार होते. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात. मुरुम देखील येणं बंद होतं.


*दुर्गंधीपासून मुक्त होणे :* 


श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.


*कर्करोग टाळण्यास मदत होते :* 


तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



उत्तम आरोग्य साठी खा कंदमूळ त्याचे फायदे.*

 *कंदमूळ त्याचे फायदे.*



 जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. अश्मयुगात माणसं फक्त फळं आणि कंदमूळंच खात असत. आजकाल मात्र फक्त उपवासाच्या दिवशी अथवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमूळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळू शकते. भारतात बटाटा, रताळी, गाजर, बीट, अरवी, सुरण अशी अनेक कंदमूळं आढळतात. यासाठीच जाणून घ्या रोजच्या आहारात कंदमुळांचा समावेश करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे.


बटाटा

स्वयंपाकघरात बटाटा हे कंदमूळ आवर्जून आढळतं. बटाट्याचे विविध प्रकार आपण नेहमीच तयार करत असतो. शिवाय डाळ, सांबर, भाजी, पराठा, काप, भजी करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो. घाईघाईत केलेली अगदी साधी बटाट्याची भाजीदेखील जेवणाला एक मस्त रूचकर चव आणते. मात्र या बटाट्यामध्ये उत्तम अशी पोषकतत्व दडलेली असतात. बटाटा खाण्याने वजन वाढते या गैरसमजापोटी अनेकजण बटाटा खाणं टाळतात. उत्तम आरोग्यासाठी बटाट्याचे तळलेले पदार्थ खाणं नक्कीच टाळायला हवं. मात्र बटाटा उकडून खाण्यास काहीच हरकत नाही. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेड, फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 असते. ज्यामुळे तुमचे योग्य पद्धतीने पोषण होऊ शकते.


रताळं


रताळं हे भारतात पिकणारं आणखी एक महत्त्वाचं कंदमूळ आहे. रताळी बाहेरून पांढरी आणि आतून लाल रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही रताळी कधीही खाऊ शकता. रताळ्यामधील नैसर्गिक साखरेचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. ज्यामुळे मधुमेहींनीदेखील रताळी खाण्यास काहीच हरकत नाही. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी रताळी उकडून अथवा रताळ्याचा कीस करून खाल्ला जातो. रताळ्यामध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत


मुळा

मुळा हे एक आयुर्वेदिक कंदमूळ आहे. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो. त्यामुळे मुळा खाण्याचा लोक कंटाळा करतात. मात्र कच्चा मुळा खाणं आरोग्यासाठी फार गुणकारी असतं. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, फॉस्फरस, लोह असतं. ज्यामुळे मुळा नियमित खाण्यामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. ताप आल्यावर मुळा खाण्याने ताप कमी होण्यास मदत होते. मुळ्याची भाजी आणि मुळ्याचं थालीपिठ अथवा पराठा फारच चविष्ट लागतं. 


गाजर

गाजर हे कंदमूळ केशरी आणि गुलाबी रंगाचं असून ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. चवीला गोडसर असल्याने बऱ्याचदा आपण गाजराचा हलवा करतो. मात्र गाजराचा रस आणि सॅलेडदेखील खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. गाजरामधील अ जीवनसत्वामुळे ते डोळ्यांसाठी उपयुक्त असतं. नियमित गाजराचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यसमस्या कमी होऊ शकतात. गाजरातील पोषकघटक तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी फार उपयुक्त ठरतात. 


सुरण

सुरणाचा कंद जमिनीखाली वाढतो. विशेष म्हणजे या कंदमूळाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येतं. सुरण आरोग्यासाठी फारच गुणकारी असते. सुरणाला देखील खाज येते म्हणून ते व्यवस्थित स्वच्छ करून चिंच अथवा कोकमासोबत शिजवलं जातं. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी मुळव्याध अवश्य खावं. सुरणामधील औषधी गुणधर्मामुळे त्याला कंदनायक असंही म्हणतात. सुरणाच्या वड्या, भजी, भाजी काप असे अनेक पदार्थ करता येतात.


प्रमोद पाठक.



*⭕️

Wednesday, 14 June 2023

वारीच्या निमित्ताने


दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत

 अन् दिव्यांग 'संदेश'च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदतअवघ्या काही मिनिटांत मिळाला पाच लाखांचा धनादेश


            मुंबई, दि. १४ : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला...मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...


            मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. त्यांना प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री श्री. शिंदे मंत्रालय सोडत नाही. सामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबवितानाच त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमीच आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात.


            आज दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या...लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.


            बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला. त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला. शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी 

दिल्या.


०००००


Featured post

Lakshvedhi