Wednesday, 31 May 2023

तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा

 तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा 

तुरटीचे काहीच फायदे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुरटीचे अनेक फायदे होतात. पाहूया काय आहेत तुरटी चे फायदे


https://chat.whatsapp.com/JiMgPUBZHHo4naAcpzoMBB



निरोगी दात -

तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.  


शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका-

जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते. 


माऊथवॉश म्हणून उपयोग - 

माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.


मांसपेशींसाठी -

तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता..


ताप, खोकला आणि दमा-

शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. 


युरिनरी इन्फेक्शन-

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते. 


केसांसाठी -

केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा. 


जखम भरण्यासाठी 

शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल. 


पिंपल्सना ठेवते दूर - 

तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.


सुरकुत्या आणि एजिंग -

तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.  


त्चचा उजळवण्यासाठी -

तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते. 


फाटलेल्या पायांसाठी -


पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही. 


तुरटीचा वापर कसा करावा 

तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे. जाणून घेऊया तुरटीचा वापर कसा करावा 


जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो

पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी

त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी

दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी 

चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते

खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात

मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो

शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते

चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा




Tuesday, 30 May 2023

सकाळी दात न घासता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या...*

 *सकाळी दात न घासता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या...* 


उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी दररोज जवळपास 4 ते 5 लिटर पाणी प्यायला हवं. याचं कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. आपल्या घरातील वडीलधारी माणसांकडून किंवा आजी-आजोबाकडून तुम्ही ऐकलं असेल की, सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यापूर्वी सर्वप्रथम भरपूर पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण हे कितपत खरं आहे? असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. 


 *सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी पिल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे मिळू शकतात...*


 *1. पचनसंस्थेचं कार्य राहतं चांगलं* 

               तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याआधी भरपूर पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते आणि तोंडात बॅक्टेरियाही जमा राहत नाहीत. 



 *2. प्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत* 

                दररोर सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी सर्दी, ताप यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं.


 *3. केस चमकदार राहतात* 

                     दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि केस चमकदार होतात. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपिणे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावं लागणार आहे. 



 *4. उच्च रक्कदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत* 

                 जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.


 *5. रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित* 

                    सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याधी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

 

कुठलीही गोस्ट प्रमाणातच चांगली असते त्या मुळे कुठल्याही गोष्टीचे अतीप्रमाण करू नये तसेच आपल्यासाठी योग्य गोष्टी शरीर आपल्याला स्वतः सांगत असते कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तो प्रयोग किंवा ती सवय ताबोडतोब थांबवावा...


*Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Bhorkar* 



 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना

 एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना


मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन


               मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी. मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, लघु ॠण योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे अर्ज दाखल केले होते, त्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले आहे.


               एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झालेला आहे. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते, त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन कर्जाचे वितरण करावयाचे आहे. तरी सर्व अर्जदारांनी तत्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कम्पाऊंड, खेरवाडी बांद्रा (पूर्व) मुंबई-४०००५१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठीचार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार


राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठीचार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार

ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

                मुंबई, दि. ३० : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


               सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन,एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन, ग्रामसेवा प्रतिष्ठान, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणांतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ४,८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृद्धीसाठी दत्तक घेतल्या आहेत.


*****

राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर

 राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्राच्या उद्योगांना आकर्षित करण्याच्या धोरणाचे केंद्राकडून कौतुक


राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक


               मुंबई, दि. 30 : राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी 239 प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे 200 प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. त्यावर केंद्रीय समितीने महाराष्ट्राच्या उद्योगांना आकर्षित करण्याच्या धोरण आणि कार्यप्रणालीचे कौतुक केले.


               राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीस दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल तर मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी उपस्थित होते.


               मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, शेंद्रा-बिडकीन येथील प्रकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केला आहे. याठिकाणी 197 प्लॉटचे वाटप केले आहे. यातील 150 प्लॉट उद्योगांसाठी आणि 47 प्लॉट हे निवासी वापराकरिता आहेत. सध्या 77 प्लॉटवर विकास कामे सुरू असून 27 उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. येणाऱ्या वर्षांत गुंतवणूकदारांना उच्च पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार असल्याने आणखी 50 उद्योगांचे उत्पादन सुरू होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याठिकाणी वीज पुरवठ्याचा परवाना मिळाला असून काही महिन्यात याठिकाणी कमी दरात उद्योगांना वीज दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


               औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम वेळेवर पूर्ण करावे, शिवाय औरंगाबाद-पुणे हरित महामार्गाची अधिसूचना निघाली असून यासाठी भूसंपादन लवकर व्हावे, या मार्गावर रेल्वे लाईनसाठी अतिरिक्त जागेचे भूसंपादन केल्यास दोन्ही प्रकल्पाच्या विकासाला गती येईल, करमाड (जि.औरंगाबाद) येथील रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सायडिंग व मालाची चढउतार करण्याची व्यवस्था करावी, या मागण्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे केल्या.


               दिघी येथे २ हजार ४५० हेक्टरवर ही औद्योगिक नगरी उभी राहत असून यासाठी ९० टक्क्यांपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित भूसंपादन सुरू आहे. यामध्ये २ हजार २०५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाकडून या प्रकल्पाला त्वरित मंजुरी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच दिघी पोर्ट ते रोहा रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे लाईन प्रकल्पाची सुरूवात करावी, नियोजित प्रकल्पाच्या स्थानकापासून कोलाड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे लाईन जोडणी मिळावी, या क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, चौपदरीकरण व्हावे. या प्रकल्पातील बोंडशेत व कुंभार्ते या गावांना पर्यावरण संवेदनशील भागामधून वगळण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.   


               सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातून दिल्ली-मुंबई, बंगळुरू-मुंबई आणि दिल्ली-नागपूर हे तीन औद्योगिक कॉरिडॉर आहेत. यामध्ये दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक नगर- ऑरिक सिटी, दिघी पोर्ट औद्योगिक नगर (जि. रायगड)असे प्रकल्प सुरू आहेत. दिल्ली-नागपूर आणि बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक नगरी साठी सुयोग्य जागांचा शोध सुरू आहे. या औद्योगिक केंद्रांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार 49 टक्के निधी देणार आहे.


               केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मंजूर करण्यात येतील, अशी हमी वाणिज्यमंत्री श्री. गोयल यांनी यावेळी दिली.


               यावेळी देशभरातील औद्योगिक प्रकल्प, भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक राज्याने औद्योगिक प्रकल्पांची कामे प्राधान्याने करून घ्यावीत, त्या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी यावेळी दिली. देशभरातील 11 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


               केंद्रीय सचिव सुमिता दावरा यांनी देशभरातील सुरू असलेले प्रकल्प आणि भूसंपादन याबाबतची माहिती सादरीकरणातून दिली.


0000

बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसहशहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार

 बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसहशहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार


- मुख्याधिकारी विकास नवाळे


राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त


विकास नवाळे यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत


 


               मुंबई, दि. 26 : शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांमधील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


               राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शासकीय अधिकारी गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारे मुख्याधिकारी श्री. नवाळे यांनी बचतगटाच्या माध्यमातून फळझाडांची लागवड, त्यातून रोजगार निर्मिती तसेच घनकचरा व्यवस्थापनातून कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या माध्यमातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, कचरा लाखमोलाचा आणि शहरातील जेष्ठ नागरिक व महिलांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 31 मे, 2023 आणि गुरुवार, दि. 1 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत ज्येष्ठ निवेदक सुषमा जाधव यांनी घे

तली आहे.


००००

जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते*

 *जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते*


ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. 


परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात.


*सर्दीची कारणे :*


 थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. 


*सर्दीची लक्षणे*


नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, ताप आल्यासारखा वाटणे, दम लागणे अशी अनेक सर्दीच्या रुग्णात सामान्यपणे आढळून येतात. अनेक रुग्णांना तर 2-3 रुमाल घेऊन बाहेर पडावे लागते. नाक सतत गळत असते. अनेकांना एकावेळा 20-20 शिंका येतात. धुळीची अ‍ॅलजी असणा-यांना धुळीशी संपर्क येताच त्रास सुरू होतो. केवळ चादर झटकल्याचे निमित्त होऊन सर्दीचा त्रास सुरू होतो. औषधे घेतल्यास तात्पुरते बरे वाटते, परंतु परत सर्दीचा त्रास सुरू होतो. वीस-वीस वर्षांपासून सर्दीने त्रस्त असलेले अनेक रुग्ण मी प्रॕक्टीसमध्ये पाहिलेले आहेत. 


*सर्दीवरील उपचार :-*


आयुर्वेदीय उपचारांच्या साहाय्याने जुनाट सर्दी देखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते. पंचकर्मापैकी एक असलेले ‘नस्यकर्म’ हे सर्दीच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे. विशिष्ट पद्धतीने औषधी तेल नाकात सोडण्याच्या प्रक्रियेला नस्यकर्म म्हणतात. नस्यकर्मामुळे नासामार्गातील दोष बाहेर पडून सर्दीची लक्षणे त्वरेने कमी होतात. अ‍ॅलर्जीमुळे होणा-या सर्दीमध्ये सुद्धा नस्याचा अतिशय उत्तम उपयोग दिसून येतो. यासोबतच काही आयुर्वेदीय औषधांचे सेवन केल्यास अनेक वर्षांच्या सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो. 

 

*काय करावे* 


◼️कोल्ड्रींक्स, आइस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळावे. 

◼️केळी, काकडी, दही, टोमॅटो हे पदार्थ टाळावेत.

◼️गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये.

◼️पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे.

◼️केस धुतल्यानंतर लवकर कोरडे करावेत.

◼️शिंका जास्त येत असल्यास ‘क्षवथु तेल ’ नाकात टाकावे.

◼️रात्री सर्दीचा त्रास अधिक होत असेल तर झोपताना थोडे फुटाणे खावेत, त्यानंतर पाणी पिऊ नये.

◼️भाताचे प्रमाण कमी करावे.

◼️शक्यतो एसीचा वापर टाळावा.


*संकलन-* 


डॉ. प्रमोद ढेरे

Featured post

Lakshvedhi