Sunday, 28 May 2023

Suorabhat

: 🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

*ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात, सदैव यशस्वी होतो. लाचारी स्विकारून, अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा, स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा, कधीही चागंला.*

🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

🪔🪔 **🪔🌸❄️⚜️सुप्रभात ⚜️❄️🌸🔅*

*आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत.*

*पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते.*

🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️

Saturday, 27 May 2023

झोपेचे नियम,l निवांत झोप

 कस झोपावं.

लाईफस्टाईलमधील अनेक चूकीच्या सवयीमुळे आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. झोप ही शरीराला सक्रीय करते आणि दिवसा आपले शरीर जी उर्जा गमावते ती पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केवळ झोपेमुळेच शक्य होते.रात्रीच्या झोपेसाठी संस्कृतमध्ये 'भुतधात्री' असा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे 'संपूर्ण चराचराची माता'. ज्या प्रकारे आई आपल्या बाळाचे पालन पोषण करते त्या प्रमाणे ही सृष्टी आपल्याला निद्रा काळात विश्रांती देऊन एक प्रकारे पोषणच करीत असते.म्हणूनच रात्री गाढ झोप घेणे आणि ही झोप पुरेशी असणे खूप गरजेचे आहे.

झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतू ती योग्य स्थितीत योग्य दिशेत घ घेणेही तितकेच आवश्यक आहे.

चला तर मग पाहूया कस झोपाव या संबंधित काही नियमः


,*झोपण्यासाठी योग्य दिशा*

*पूर्व दिशेला डोके करून झोपणे आयुर्वेदामध्ये खूप चांगले समजले गेले आहे. जर तुम्हाला स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असले तर तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला डोके करून झोपायला हवे. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल असे जाणकार सांगतात. पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने एकाग्रता सुधारते, चांगली गाढ व शांत झोप लागते आणि मेंदू तल्लख होतो.

 

*पश्चिमेला डोके करून झोपण्यास सुद्धा आयुर्वेद मनाई करते. पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास रात्री गाढ झोप लागत नाही. वास्तूशास्त्र म्हणते की या दिशेला डोके करून झोपल्यास वाईट स्वप्ने पडू शकतात आणि त्यामुळे रात्रभर तुम्ही झोपेत तळमळत राहू शकता. शास्त्रामध्ये सुद्धा पश्चिम दिशेला तोंड करून झोपणे अशुभ मानले जाते.


*पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा ह्रास होतो, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे.


*दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने खूप गाढ आणि सुखाची झोप लागते असे आयुर्वेद सांगते. दक्षिणेकडे ऋणात्मक आवेश असते आणि तुमचे डोके हे धनात्मक रूपाने अवेषित असते आणि म्हणून तुमचे डोके आणि दिशा यांच्या मध्ये एक सामंजस्यपूर्ण आकर्षण निर्माण होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने शरीरात स्वास्थ, सुख आणि समृद्धी यांना वाढवणारी उर्जा निर्माण होते.


*आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे की उत्तर दिशेला डोके करून कधीच झोपू नये अन्यथा शरीरावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.आयुर्वेदामध्ये असे समजले जाते की या दिशेला वाहणारी चुंबकीय धारा तुमच्या डोक्यात प्रवेश करू शकते आणि रक्ताभिसरण क्रियेला (Blood circulation) प्रभावित करते. यासोबतच डोक्याला डिस्टर्ब करण्याचे काम करते. या दिशेने डोके करून झोपल्यास सकाळी उठल्यावर उर्जावान वाटत नाही.


*वास्तुशास्त्रानुसार ही दक्षिण दिशेसह पूर्व दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जाते. पूर्वेला डोके करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सूर्योदयाची हीच दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली आहे.

    आता पाहूया कुठल्या कुशीवर झोपण योग्य ते.


*कोणत्या कुशीवर झोपल्यास काय फायदे तोटे होतात.*


आपण कोणत्या बाजूला चेहरा करून किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणे (Best Sleeping Position) चांगले आहे जेणेकरून अन्न पचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील.झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरित प्रतिसाद देते. याचे कारण म्हणजे, बाहेरून आपले शरीर डाव्या व उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते. हृदय, पोट, मूत्राशय व आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात. आपले हृदय, पचनक्रिया व मेंदू कसा काम करेल, हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपण्याच्या दिशेची (डावी की उजवी) भूमिका महत्त्वाची असते.

*डाव्या कुशीवर का झोपावे.*

    जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून म्हणजेच डाव्या कुशीवर (Sleeping On Left Side) झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण असे केल्याने शरीराला आरामही मिळतो आणि अनेक फायदेही होतात.

      डाव्या कुशीवर का झोपावे, यामागेही शास्त्रीय कारण आहे. आपल्या नाकातून जो श्वास बाहेर येतो आणि आत जातो, याला आवाज म्हणतात. नाकाच्या डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याच्या प्रक्रियेला चंद्र स्वर म्हणतात. तर उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याला सूर्य स्वर म्हणतात. सूर्य स्वर हा आपल्या शरीरात उष्णता उपन्न करतो. यामुळे जेवणाचे पचन होण्यास मदत होते. तसेच हृदयावर दबाव जाणवत नाही. यामुळे ते सुरळीत कार्य करते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शास्त्रात डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले जाते.


https://chat.whatsapp.com/HbXbrXHDBms0IucijhSlEZ

* पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्‍यांनी अवश्य डाव्या कुशीवर झोपावे. 

*डाव्या कुशीवर झोपल्याने ह्रदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. हृद्याला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.


*डाव्या कुशीवर झोपल तर याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.


*डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


*घोरण्याची सवय तुम्हांला त्रासदायक आणि तुमच्या आजुबाजूच्या लोकांंना नाहक त्रासदायक ठरू शकते. पाठीवर झोपण्याच्या सवयीमुळेही घोरण्याची सवय वाढते. डाव्या बाजूला झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहू शकतो.  


*दम्याचा त्रास होत असेल, तर डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहातील उष्णता वाढून श्वसनमार्गातील कफाचे कण वितळून दम्याचा त्रास न्यून होतो. त्यामुळे शांत झोप लागते.


*गरोदर स्त्रिया - डाव्या कुशीवर झोपल्याने पाठीवर आणि कंबरेवर दाब कमी पडतो. यामुळे गर्भाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाळाच्या विकासासाठी गरोदर स्त्रियांंनी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरतंं.

याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.डाव्या कुशीवर झोपल्याचे बाळाला पण खुप फायदे आहेत.रक्त प्रवाह सुरळीत चालते.आणि बाळ जास्त हालचाल करते.


*बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.


*अन्न पचत नसेल, तर जेवल्यावर डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या बाजूला जठराचा भाग अधिक असल्यामुळे, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन अन्नपचन होण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला झोपल्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. त्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते आणि लवकर अन् शांत झोप लागते.


*डाव्या कुशीवर झोपल्या मुळे सांधे आणि पाठदुखी तसेच तीव्र वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते.


*उजव्या कुशीवर का झोपू नये.*

उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. याला राइट लॅटरल पोझिशन म्हणतात, मात्र त्यावर झोपू नये. जेव्हा आपण उजव्या कुशीवर वळून झोपतो, तेव्हा फूड पाइपचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग, ज्याला GE जंक्शन म्हटले जाते. तिथे अन्न एकत्रित होते. ते वरच्या बाजूस येऊ शकते. उजव्या कुशीवर वळून झोपल्यामुळे अन्न, पाणी किंवा हवा वर येऊ शकते. आणि आपण झोपेत असताना ते आपल्या नाकातून अथवा तोडांतून बाहेर येऊ शकते. अथवा त्याचे काही कण फुप्फुसांमध्येही जमा होऊ शकतात. हे न्यूमोनियासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साधारणत: उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे.

    आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवायच्या असतील योग्य दिशेला झोपावे, व उजव्या बाजूवर झोपणं टाळाव म्हणजे शांत झोप लागून आरोग्य ही उत्तम राहील हे वरील पोस्ट वरून आपल्याला एव्हाना समजले असेल अशी आशा करतो.

वैद्य. गजानन


B p issues? No problem, स्मॉल टिप्स fallaw

 Please send it all your groups, known and related people. Please target atleast 1000 people by each person. The domino effect of your action will be that in one week it will reach 10 crore people and in three weeks 100 crore people


थायराँईड साठी उपाय व उपचार...*

 *थायराँईड.....*


*थायराँईड साठी उपाय व उपचार...*


*उपाय...१*

ऊपाशी पोटी 

1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.

1 चमचा धणे पावडर १ वेळा.

1 एक चमचा बडिसोप १वेळा.

पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी 

रोज खायची 3 महिने 

 उपाशी पोटी.


 *उपाय...२*


 सकाळी 

अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.


*उपाय...३*


अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.

उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.

कपालभाती 10 मिनिटे.

रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.


*उपाय...४*


वजन वाढले असेल तर 

भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.

एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.


*उपाय...५*


दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.


*उपाय...६*


 नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.


*उपाय...७*


रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.


*उपाय...८*


थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची. 


*उपाय...९*


रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.


*उपाय...१०*


आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी 

सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.


*उपाय़...११*


मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.


*उपाय़...12*


अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.


 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.


*राजु गोल्हार आरोग्य संवाद गृप, अौरंगाबाद,*

*सुनील इनामदार,संग्रहक.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

पित्त (ऍसिडिटी

 🛑 *पित्त (ऍसिडिटी )*🛑

===========

आम्लपित्त



https://chat.whatsapp.com/HbXbrXHDBms0IucijhSlEZ



🛑 हल्ली जिकडे तिकडे ऍसिडिटी या शब्दाने उच्छाद मांडला आहे. ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास नाही असे म्हणणारा माणूस औषधाला सुद्धा सापडणार नाही. हि ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय? 

ते आहि आपण पाहू. 

आपल्या अन्नाच्या पचनासाठी जठरात असणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिड ,पेप्सीन ,ग्यास्ट्रीन इ. 

या स्रावांचं प्रमाण वाढत म्हणजे पित्त होत ......

 ऍसिडिटी होते. हे प्रमाण वाढविण्यासाठी आपला चुकीचा आहार,विहार,सवयी ,ताणतणाव 

,प्रवास,वाद,दगदग,धावपळ या गोष्टी कारणीभूत ठरतात.खालील आहारविहारासंबंधी चुकीच्या सवयी पित्त वाढवतात.

पित्त का व कसे वाढते ते आपण समजून घेऊ ....

🛑१) घाईघाईने जेवल्याने जठरात अन्न कोंबून कोंबून भरले जाते व ते नीट न पचल्याने ग्यासेस तयार होतात व जठरात फंड्स नावाची जागा वायू खेळण्यासाठी असते तीच जागा अन्नाने भरल्याने पचनाला जागा उरात नाही व पित्ताची निर्मिती होते. जस प्रवासाला जाताना बॅगेत वाटेल तसे कपडे कोंबले तर कमी कपडे बसतात शिवाय ते चुरगळतात .,पण तेच इस्त्री करून नीट घडी करून भरल्यास जास्त कपडे बसतात .

🛑२)जेवणानंतर लगेच आडवे झाल्याने काही वेळा अन्ननलिका जिथं संपते तिथली कार्डियाक स्पिंक्टर हि झडप उघडून अन्न वर फेकले जाते व आंबट गुळण्या घशाशी येतात ,म्हणून दुपारी जेवणानंतर झोपू नये व रात्री जेवणानंतर कमीतकमी २ तासांनी झोपावे.

🛑३)आम्लधर्मी पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन दही हिरवी मिरची,तूरडाळ,मांसाहार,अंडी,डालडा,मैदा,बेकारी पदार्थ,चहा,कॉपी,फास्ट फूड,तंबाखू जन्य पदार्थ,,दारू,सुपारी,बेसनाचे,उडीद डाळीचे पदार्थ,इत्यादींनी पित्त अधिकच खवळते. हे जड पदार्थपचनासाठी जठरातून जास्त ऍसिडिक स्त्राव सोडले जातात व परिणामी ऍसिडिटी वाढते.

🛑४)अति गोड पदार्थांनी ऍसिडिटी वाढते ,कारण हेच कि अति गोड पदार्थ पचायला जड असल्याने जठर आत उष्णता व ऍसिडिक स्त्राव वाढवते.

🛑५)जसा आहार तशी प्रकृती .उष्ण,तीक्ष्ण,आम्लधर्मी पित्ताशी सामान गुणधर्माचे पदार्थ खाल्यास समानाने समानाची वृद्धी होऊन पित्त वाढतेच.

🛑६)पित्त वाढण्याला झोपेची अनियमितता कारणीभूत ठरते. रात्रीची जागरणे ,पार्ट्या, उशिरा उठणे,दुपारची झोप याने हमखास पित्ताचा त्रास बळावतो. पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी ५-६ तास,तेलकट पदार्थांच्या पचनासाठी ८-१० तास, प्रथिनांच्या पचनासाठी ६-८ तास वेळ लागतो. क्षारयुक्त,अल्कली पदार्थांच्या पचनासाठी ४ तास झोप पुरेशी होते. पण जस अन्न तशी झोप घ्यावयाची हे माहीतच नसते. व त्यामुळे पित्त वाढते.

🛑७)अतिरुचकर पदार्थ , तेलकट पदार्थांच्या सेवनाने जास्त तहान लागते व पाणी जास्त प्यायले गेल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही परिणामी पित्त वाढते.

🛑८)जास्त प्रमाणात अन्न घेतल्यामुळेही पित्त वाढते.

वरील सर्व गोष्टी वाचून आपल्या सहज लक्षात आलं असेल कि आम्लता आरोग्याचा व तारुण्याचा महान शत्रू आहे. यासाठी रोजच्या आहारात २/३ पदार्थ अल्कली व फक्त १/३ आम्लधर्मी असायला हवेत. आता अल्कालाईन पदार्थ कोणते?-तर फळे,पालेभाज्या,दूध,ताक,कोबी,बदाम,पिस्ते,गाईचे तूप इत्यादी... तसेच क्षारयुक्त व सत्त्वयुक्त फळांच्या सेवनाने पित्त कमी होते.यासाठी लंघन करून पोटाला विश्रांती द्यावी लागते. कारखान्यात शटडाऊन वीक असतो,मग आपण काही तास तरी पोटाला विश्रांती नको का द्यायला ...

कारल्याचा रस ,आवळ्याचा रस आल्याचा रस तुमच्या पचनाला मदत करतील. तुमच्या लिव्हर वरचा ताण कमी करतील. परंतु या सर्व गोष्टी तात्पुरत्या काम करतील ,त्यामुळे महत्वाचे आहाराचे व विहाराचे नियम पाळलेले सर्वात उत्तम. तुमच्या रोजच्या जेवणातील लसूण,पांढरा कांदा,सलाड,मेथीची भाजी,मोडाचे मूग अश्या पदार्थातून तुमच्या मोठ्या आतड्याला चोथा (फायबर )मिळून पचनास मदत होईलच शिवाय पोट हि साफ होईल. पण ज्यांना पित्ताचा खूपच त्रास आहे त्यांनी कांदा व लसूण कच्चा खाऊ नये ,जेवणातून शिजवून खावा. शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी तुम्हाला पथ्य पाळावेच लागेल. चहा ,कॉपी,व्यसने, बंद करावी लागतील. शिळे,शीतकपाटात ठेवलेले अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने खूप प्रमाणात आम्लता वाढते हा महत्वाचा मुद्दा अनावधानाने सांगायचं राहिलाच ... जे आपण वारंवार करतो. चहा कॉपी हे सुद्धा व्यसनच आहे ...

ऍसिडिटी वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा,कष्टाचा आभाव...तेव्हा रोज व्यायाम ,सायकलिंग,पोहणे,योग,एरोबिक्स,सूर्यनमस्कार...इत्यादी. पैकी काहीतरी केलं पाहिजे. जेवणानंतर १०-१५ मिनिटे वज्रासनात बसने...व नंतर शतपावली करणे जरुरी आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी पवनमुक्तासन,धनुरासन,भुजंगासन,वज्रासन आदी आसने योग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावीत .

🛑 9वरीलप्रमाणे आरोग्य नियम 

पाळावे बाहेर चे खाने बंद करावे


🛑10 रोज रात्री झोपताना 1

त्रिफळा पावडर 2 ग्लास कोमट पाणी सोबत घेतले तर 

अँसिडिटी कमि होते



बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇

 *####बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇


... आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभुळिच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 👇

  ..... (१)..गुडघेदुखित बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे.. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळिसिनंतर चालू होते. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच ,, गुडघेदुखी,, समूळ नष्ट होते..


....(२).. डोकेदुखी दूर होते.. वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


....(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे... आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर,. . पांढरे पाणी जाणे, हि समस्या बहुतेक महिलांना होतो. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच..


......(४).. पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते.. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो.. वंध्यत्व दूर होते..


.......(५).. पाठदुखी कंबरदुखी या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच.. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात..


..... जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. बरेच वेळा , बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते,. यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो


...(७). . अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर..जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर , तुम्ही. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता. आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या.. 


..... तेव्हा वरिल फायदे बघता .. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण.. अतिशय मौल्यवान औषध आहे.. आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं.. जरुर हि पावडर घरात असू द्यावि..


.........###आयुर्वेद##अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार!!!


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


इंद्रवज्र निसर्गाचा आविष्कार

 


Featured post

Lakshvedhi